
IND vs OMN Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ च्या १२व्या सामन्यात टीम इंडियाने ओमानचा पराभव करून आपली विजयी मोहीम कायम ठेवली आहे. ग्रुप स्टेजमधील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने धावांनी विजय नोंदवला आहे. या सामन्यात अर्शदीप सिंग T20 मध्ये १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी धावफलकावर १८८ धावा केल्या. संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीतही सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
ओमानविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने नवा इतिहास रचला. अर्शदीप T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १०० बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने ओमानचा फलंदाज विनायक शुक्लाला बाद करून ही कामगिरी केली. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाने T20i मध्ये १०० बळी घेतले नाहीत, पण आता अर्शदीप या यादीत सामील होणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
भारत आणि ओमान यांच्यात झालेल्या सामन्यावर नजर टाकल्यास, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १८८ धावा धावफलकावर लावल्या. संजू सॅमसनने सर्वाधिक ४५ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याच्याशिवाय अभिषेक शर्माने १५ चेंडूत ३८, तिलक वर्माने १८ चेंडूत २९, अक्षर पटेलने १३ चेंडूत २६, हर्षित राणाने ८ चेंडूत १३*, शुभमन गिलने ८ चेंडूत ५, शिवम दुबेने ८ चेंडूत ५, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १-१ धावांचे योगदान दिले.
भारतीय फलंदाजांसमोर ओमानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली. संघाकडून फैजल शाहने सर्वाधिक २ बळी घेतले आणि ४ षटकांत फक्त २३ धावा दिल्या. त्याच्याशिवाय जीतेन राममंडी आणि आमिर कलीम यांनाही प्रत्येकी २-२ यश मिळाले.
प्रत्युत्तरात १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानचा डाव २० षटकांत ४ गडी गमावून धावांवर मर्यादित राहिला. फलंदाजीत आमिर कलीमने सर्वाधिक ४६ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. त्याने आपल्या फलंदाजीत ७ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याच्याशिवाय हमीद मिर्झाने ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. कर्णधार जतिंदर सिंगने ३३ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या.