India vs England : लाज वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात; बदल शक्य, संजूला संधी?

Published : Jul 11, 2026, 02:10 PM IST
India vs England : लाज वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात;  बदल शक्य, संजूला संधी?

सार

2006 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केल्यापासून टीम इंडियाची ही सर्वात मोठी सलग पराभवाची मालिका आहे. फक्त इंग्लंडच नाही, तर याआधी आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्येही भारताला पराभव पत्करावा लागला होता.

साउथम्प्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. साउथम्प्टनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. पहिले तीन सामने गमावल्यामुळे भारताने मालिका आधीच गमावली आहे. मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे सलग पराभव टाळून दिलासादायक विजय मिळवणं, एवढंच टीम इंडियाचं लक्ष्य आहे.

इतिहासातील सर्वात खराब कामगिरी

2006 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केल्यापासून टीम इंडियाची ही सर्वात मोठी सलग पराभवाची मालिका आहे. फक्त इंग्लंडसमोरच नाही, तर या मालिकेच्या आधी झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्येही भारताला पराभव पत्करावा लागला होता. 

श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाला एकही सामना जिंकता आलेला नाही, ही गोष्ट मॅनेजमेंटसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कर्णधार म्हणून श्रेयससाठीही आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या टीमला आज साउथम्प्टनमध्ये विजयाच्या मार्गावर आणता आलं नाही, तर संघावर मोठ्या टीकेची झोड उठेल.

संघात बदलांची शक्यता

शेवटच्या टी-20 सामन्यात बॅटिंग लाईन-अपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन सामन्यांपासून बाहेर बसलेल्या संजू सॅमसनला आज पुन्हा एकदा संधी मिळू शकते. जर संजू प्लेइंग इलेव्हनमध्ये आला, तर ईशान किशन किंवा तिलक वर्मा यांना बाहेर बसावं लागेल. 

चौथ्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही संघातून वगळलं जाऊ शकतं. शिवम दुबेच्या जागी सुर्यांश शेटगेलाही आज संधी मिळण्याची शक्यता आहे. सलग तीन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या न करता बाद झालेल्या वैभव सूर्यवंशीची बॅट आज तळपणार का, याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ronaldo: वर्ल्ड कपचं स्वप्न भंगलं, महान खेळाडूची डोळ्यात पाणी आणणारी एक्झिट!
AI Impact : २०२६ मध्ये AI मुळे या नोकर्‍या होतील नाहिशा, तुम्ही या सेक्टरमध्ये काम करत नाहीना!