
मुंबई : मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोणते रस्ते राहणार बंद?
६ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपासून ते ७ सप्टेंबर पहाटे ६ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते बंद राहतील.
पर्यायी मार्गांची व्यवस्था
अवजड वाहनांना प्रवेशबंदी
६ सप्टेंबर सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण बृहन्मुंबई परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. यामुळे विसर्जन मिरवणुकीत होणारी गर्दी आणि वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. उत्तर ते दक्षिण मुंबई किंवा दक्षिण ते उत्तर मुंबई जाणाऱ्यांनी कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी सुविधा
नागरिकांची सोय व्हावी म्हणून तीनही मार्गांवरील लोकल ट्रेन रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहेत. विसर्जनासाठी प्रमुख ठिकाणे म्हणजे गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी-जंक्शन आणि पवई गणेश घाट अशी निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांच्या या नियोजनामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.