
MNS Chief Raj Thackeray on Gautam Adani and Devendra Fadnavis : "विकास जरूर व्हावा, पण तो मराठी माणसाच्या मुडद्यावर नको," अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईच्या भविष्याबाबत एक धोक्याची घंटा वाजवली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC 2026) पार्श्वभूमीवर, 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुंबईच्या भौगोलिक आणि राजकीय नकाशातून मराठी माणसाला हद्दपार करण्याचे जे 'षडयंत्र' मांडले, त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज ठाकरेंनी मांडलेला सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे मुंबई विमानतळाच्या जमिनीचा व्यवहार. त्यांच्या दाव्यानुसार:
सत्ताधाऱ्यांवर प्रहार करताना राज ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे 'स्वतंत्र' नेते नसून ते दिल्लीने 'बसवलेले' लोक आहेत. "ठाकरेंच्या वर कोणी नाही, पण या नेत्यांना वरून जो कागद दिला जातो, त्यावर त्यांना फक्त सह्या कराव्या लागतात," असे म्हणत त्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याच्या सुप्त हालचालींकडे निर्देश केला.
मुंबईत मराठी माणूस फक्त २७ टक्के उरला आहे, हा आकडा राज ठाकरेंनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. हा चुकीचा आकडा पसरवून मराठी माणसाचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचे सांगत त्यांनी दावा केला की, मुंबईत आजही ४० ते ४१ टक्के मराठी लोक आहेत. गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांच्या टक्केवारीपेक्षा मराठी टक्का आजही वरचढ आहे, हे त्यांनी आकडेवारीनिशी स्पष्ट केले.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी काही गंभीर मुद्दे मांडले:
"मुंबई ही 'स्टेट विदिन स्टेट' असे सांगितले जात आहे. ती फक्त ठाकरेंच्या हातातच सुरक्षित आहे," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या एमएमआर (MMR) रिजनवरील फोकसमागे आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत, हे सांगताना त्यांनी मराठी मतदारांना जागे राहण्याचे आणि हे षडयंत्र मतदानातून उधळून लावण्याचे आवाहन केले आहे.