धाराशिव: येथे अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
बीड: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 22 सप्टेंबरपासून बीड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, अनेक भागांत पूर आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी, जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.