Mumbai Accident : वांद्र्यात महिलेच्या गाडीखाली चिरडून ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Published : Aug 31, 2026, 08:30 AM IST
Mumbai Accident : वांद्र्यात महिलेच्या गाडीखाली चिरडून ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सार

मुंबईच्या वांद्रे परिसरात एका महिलेच्या गाडीखाली आल्याने ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर गाडी चालवणाऱ्या महिलेनेच मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने चालवलेल्या गाडीखाली आल्याने अंश नावाच्या ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात घडल्यानंतर, मेघना रावळ नावाच्या या महिलेने स्वतः मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

वडिलांचा आक्रोश, न्यायाची मागणी

ANI शी बोलताना अंशचे वडील अरविंद गुप्ता यांनी आपल्या मुलासाठी न्यायाची मागणी केली आहे. ते म्हणाले, "माझ्या मुलाचं नाव अंश होतं. त्याच्यासोबत जे झालं, त्यासाठी मला न्याय हवाय. तो माझा एकुलता एक मुलगा होता... त्याला माझ्यापासून हिसकावून घेतलं. मी आता काय करू? मला फक्त न्याय हवाय, बस्स... माझी मुलगीही तिथे रडत आहे... मला काहीच माहित नव्हतं, मला एक मेसेज आला आणि सांगितलं की माझ्या मुलाचा अपघात झालाय. मी इथे आलो, तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की अपघात झाला आहे."

पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात

दरम्यान, मुंबई पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं आहे. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Weather Update : सरासरीपेक्षा कमी पाऊस, मात्र ऑगस्टच्या अखेरीस वातावरणात बदल; काय आहे पावसाची स्थिती? IMDची माहिती
Navi Mumbai Crime: वाशीच्या मिनी सी-शोअरवर १९ वर्षांच्या तरुणाची हत्या, परिसरात खळबळ