
नारायण राणे हे कायमच चर्चेत राहत असतात. खासदारकीसाठी राणेंचं नाव सुचवणारा मी पहिला व्यक्ती होतो. मी राणेंचं नाव सुचवताच मला धमक्या आल्या होत्या. दीपक केसरकर यांनी यावेळी हा गौप्यस्फोट केला आहे. राजकीय वर्तुळात आता यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे. यावेळी केसरकर यांनी नारायण राणे यांना तिकीट मिळावं म्ह्णून प्रयत्न केलं होतं.
नारायण राणे यांनी तिकीट मिळावं म्हणून मी सर्वात आधी आवाज उठवला होतो. राणे साहेबांचं निवडणुकीला उभं राहण्याचं ठरलेलं नव्हतं. परंतु जे लोक इच्छुक होते त्यांनी मला धमक्या दिल्या. राणे यांचं नाव सुचवल्यामुळं राग आलं होतं. त्या धमक्यांचे व्हाट्स अँप चॅट माझ्याकडे होते. ते डिलीट झाले आणि तुम्ही मंत्री असणार नाही अशा मला धमक्या दिल्या.
मनात असेल तर तर करायचं असतं. मी मंत्री नसलो तरी साईबाबांची कृपा माझ्यावर आहे. माझं चांगलं चालू आहे. देवाच्या कृपेनं आजोबा वडिलांचा वारसा आहे. माझं व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं मी आता मंत्री नसणं हे कदाचित साईबाबांच्या मनात नसेल. सावंतवाडीची जनता म्हणजे माझं कुटुंब आहे. राणे यांनी केलेल्या आग्रहामुळं मी निवडणूक लढवून जिंकून आलो.