Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार एन्ट्री?, हवामान विभागानं या ४ जिल्ह्यांसाठी दिला यलो अलर्ट

Published : Jul 31, 2025, 08:29 PM IST
Rain Alert In Delhi and Up

सार

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात मात्र, मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर आता ओसरलेला दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून पावसाने काढता पाय घेतला आहे, त्यामुळे या भागांत केवळ हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र, विदर्भ वगळता इतरत्र कुठेही मुसळधार पावसाचा अंदाज नाही. हवामान विभागाने १ ऑगस्ट रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे पुढील तीन-चार दिवस या भागातील नागरिकांना सतर्क राहावे लागेल.

 

 

विभागानुसार हवामानाचा अंदाज

कोकण आणि मुंबई

मुंबईसह कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. येथे ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने हलका पाऊस पडेल. मात्र, घाटमाथ्याच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

मराठवाडा

मराठवाड्यातूनही पावसाने विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहून हलका पाऊस पडू शकतो. हवामान विभागानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढू शकतो.

विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

राज्यात इतरत्र पाऊस कमी झाला असताना, विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता कायम असल्याने या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.

या उलट, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वातावरणातील दमटपणामुळे नागरिकांनी आरोग्याची आणि शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती