महाराष्ट्र कन्यादान योजनेत मोठा बदल, सामूहिक विवाहासाठी मिळणाऱ्या अनुदानात २५% वाढ

Published : May 20, 2025, 07:19 PM IST
Maharashtra Kanyadan Yojana

सार

राज्यातील मागासवर्गीय समाजातील सामूहिक विवाह सोहळ्यांना चालना देण्यासाठी कन्यादान योजनेत २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आता विवाह करणाऱ्या जोडप्यांना २० हजारांऐवजी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. 

पुणे: राज्यातील मागासवर्गीय समाजातील सामूहिक विवाह सोहळ्यांना चालना देण्यासाठी कन्यादान योजनेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत आता २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, विवाह करणाऱ्या जोडप्यांना २० हजारांऐवजी थेट २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

ही योजना राज्य शासनाने सन 2003-04 पासून लागू केली असून, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील कुटुंबांना सामूहिक विवाहाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा उद्देश होता. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात १०० जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळावा, असे शासनाचे धोरण आहे.

पूर्वी या योजनेतून मंगळसूत्रासाठी ६ हजार आणि संसारोपयोगी साहित्यासाठी ४ हजार रुपये मिळून एकूण १० हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. २०१६ मध्ये ही रक्कम वाढवून २० हजार रुपये करण्यात आली, तसेच स्वयंसेवी संस्थांना देखील चार हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

मात्र, या अनुदानाची रक्कम दहा वर्षांपासून बदलण्यात आलेली नव्हती. आता महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘शुभमंगल सामूहिक विवाह योजना’च्या धर्तीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने कन्यादान योजनेत सुधारणा केली आहे.

नवीन सुधारित अनुदानाचे तपशील :

मागासवर्गीय सामूहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना : २५,००० रुपये (पूर्वी २०,००० रुपये)

स्वयंसेवी संस्थांना अनुदान : जैसे थे - ४,००० रुपये

ही सुधारणा केवळ आर्थिक मदतच नाही, तर मागासवर्गीय समाजाच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, योजनेत एकसूत्रता आणण्याचा उद्देशही या निर्णयामागे आहे. या निर्णयामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांना नवा बळ मिळेल आणि अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!