Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात पुन्हा वाढणार गारठा! वाचा 21 नोव्हेंबरचा हवामान खात्याचा अलर्ट

Published : Nov 20, 2025, 10:45 PM IST

Maharashtra Cold Wave : 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात गारवा कायम राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने राज्यात थंडीची तीव्रता जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

PREV
15
पुणे, नाशिक, जळगावमध्ये तापमानात 1–2 अंशांनी वाढ

मागील काही दिवसांत पुणे, नाशिक आणि जळगाव येथे एक अंकी तापमान नोंदवलं गेलं होतं. परंतु आता या शहरांत किमान तापमानात 1 ते 2 अंशांची वाढ दिसून येत आहे. 20 नोव्हेंबर रोजी पुण्यात 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होते, तर 21 नोव्हेंबर रोजी ते 12 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तरीही थंडीचा कडाका कायम आहे.

25
मुंबईत तापमान स्थिर, गारवा मात्र कमी

राज्यातील इतर अनेक शहरांमध्ये तापमानात घट होत असताना मुंबईत अपेक्षित थंडावा जाणवत नाही. 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत किमान तापमान 22 अंश तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल. त्यामुळे मुंबईकरांना अजून थंडीची चाहूल पूर्णपणे लागलेली नाही.

35
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचे सावट

पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम असून कोल्हापूरमध्ये जवळपास 20 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे विभागातही गारवा ठसठशीत जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र सर्वाधिक तापमान घट बघायला मिळत आहे.

45
उत्तर महाराष्ट्रात पारा घसरलेला, नाशिक- जळगाव गारठ्यात

नाशिकमध्ये किमान तापमान 12 अंश नोंदवले गेले असून 21 तारखेला ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. जळगावमध्येही पारा घसरलेलाच दिसत असून सकाळी दाट गारवा जाणवत आहे. तापमानात 1–2 अंशांची वाढ असली तरी थंडीचा प्रभाव तसाच टिकून आहे.

55
मराठवाडा व विदर्भात निरभ्र आकाश, थंडीचा सौम्य अनुभव

छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता असून किमान तापमान 14 अंश व कमाल तापमान 32 अंश असेल. विदर्भातील नागपुरातही कोरडे हवामान व स्वच्छ आकाशाचा अंदाज आहे. येथे किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 29 अंश असेल. सकाळ-संध्याकाळ गारवा जाणवत असला तरी दुपारी उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे.

Read more Photos on

Recommended Stories