Kolhapur Ration Card Update : रेशन कार्डधारकांना मोठा धक्का! 'या' जिल्ह्यातील २० हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद; तुमचे नाव तर नाही ना?

Published : Jan 22, 2026, 04:33 PM IST

Kolhapur Ration Card Update : कोल्हापूर जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मोठी कारवाई करत २०,३१० अपात्र रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण थांबवण्यात आले. बायोमेट्रिक, आधार लिंकिंगमुळे सरकारी कर्मचारी, सधन व्यक्ती, निष्क्रिय कार्डधारकांना वगळण्यात आले. 

PREV
15
कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद

कोल्हापूर : रेशनिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने आता कडक पावले उचलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 'अन्नसुरक्षा योजने'अंतर्गत मोठी छाननी मोहीम राबवण्यात आली असून, तब्बल २०,३१० रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण तातडीने थांबवण्यात आले आहे. अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने ही 'साफसफाई' मोहीम हाती घेतली आहे. 

25
कोणाचे रेशन धान्य बंद झाले?

जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत खालील प्रवर्गातील कार्डधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचारी: जे लाभार्थी शासकीय सेवेत असूनही नियबाह्य रित्या स्वस्त धान्याचा लाभ घेत होते.

सहा महिन्यांपासून निष्क्रिय: ज्यांनी गेल्या सलग सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्य उचलले नाही.

मृत व्यक्तींची नावे: अनेक ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर अजूनही धान्य उचलले जात असल्याचे निदर्शनास आले.

सधन व्यक्ती: ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे परंतु तरीही ते अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत होते. 

35
कारवाईमागचे मुख्य कारण, बायोमेट्रिक आणि आधार लिंकिंग

रेशन वितरण व्यवस्थेत आता बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) प्रणाली अनिवार्य झाली आहे. यामुळे कोणता लाभार्थी धान्य घेतोय आणि कोण नाही, याची अचूक माहिती शासनाकडे जमा झाली. तसेच, रेशन कार्ड आधारशी लिंक असल्यामुळे लाभार्थ्यांची संपूर्ण कुंडली शासनाच्या एका क्लिकवर उपलब्ध झाली, ज्यामुळे अपात्र व्यक्तींना शोधणे सोपे झाले. 

45
धान्य पुन्हा सुरू होऊ शकते का?

जिल्हा पुरवठा विभागाने लाभार्थ्यांना एक छोटी संधीही दिली आहे. ज्या लाभार्थ्यांचे धान्य तांत्रिक कारणामुळे किंवा चुकीने बंद झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या क्षेत्रातील पुरवठा विभागाशी (Tehsil Supply Office) संपर्क साधावा. जर तुम्ही शासनाच्या निकषात बसत असाल, तर कागदपत्रांची पूर्तता करून आपले नाव पुन्हा सुरू करून घेता येईल. मात्र, जे अपात्र ठरतील त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

55
प्रशासनाचा इशारा

पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळावे, यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे आपले रेशन कार्ड अपडेट ठेवणे आणि नियमित धान्य उचलणे आवश्यक आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories