जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत खालील प्रवर्गातील कार्डधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचारी: जे लाभार्थी शासकीय सेवेत असूनही नियबाह्य रित्या स्वस्त धान्याचा लाभ घेत होते.
सहा महिन्यांपासून निष्क्रिय: ज्यांनी गेल्या सलग सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्य उचलले नाही.
मृत व्यक्तींची नावे: अनेक ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर अजूनही धान्य उचलले जात असल्याचे निदर्शनास आले.
सधन व्यक्ती: ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे परंतु तरीही ते अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत होते.