अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची मोठी सभा झाली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. “लोक म्हणत होते की सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल. पण माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कधीच बंद होणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की,
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशातील गरीबांना घरे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळाल्या.
महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला सरकारला एक वर्ष पूर्ण झाले.
या काळात लाडकी बहीण योजना लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे.