कोल्हापूरच्या रणसंग्रामात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या युतीवर बोळा फिरवला.
जनतेचा कौल महत्त्वाचा: "काही लोक केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. पण ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. जनताच ठरवते कुणाला आपलं मानायचं," असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
शिवसेनेचा करिष्मा: कोल्हापुरात शिवसेनेचे ५ आमदार आणि १ खासदार असल्याचे सांगत, शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.