Maharshi Dhondo Keshav Karve Jayanti: आपले 104 वर्षांचे आयुष्य महिलांसाठी दान केले, पुरुष असूनही त्यांनी महिलांच्या वेदना समजून घेतल्या

Published : Apr 18, 2024, 07:00 AM ISTUpdated : Apr 18, 2024, 12:55 PM IST
Dhondo Keshav Karve Indian social worker

सार

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे हे सर्वांनाच परिचयाचे आहेत.ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे हे सर्वांनाच परिचयाचे आहेत. रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.

कर्वे यांना स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

सामाजिक प्रथांविरुद्ध केलेला बंड :

कर्वेंचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे १८९४ या दिवशी कर्वेंनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंब मेळावा घेतला. याच सुमारास कर्वेंनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये कर्वेंनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली.

पहिली स्त्रीशिक्षण संस्था :

रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी कर्वेंचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी कर्वेंकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर कर्वेंनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची बीज आज वट वृक्षसारखे सारखे ताठ मानेन उभे आहे.

पुनर्विवाह :

वयाच्या १४ वर्षीच कर्वेंचे लग्न झाले होते. इ.स. १८९१ मध्ये त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. त्या वेळी कर्वेंचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेहीअल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या कर्वेंनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. कर्वें पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर कर्वेंवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. कर्वेंच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

PREV

Recommended Stories

Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कार कालव्यात कोसळली, पती-पत्नी बेपत्ता
Thane Traffic Update : ठाण्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना! 31 मार्चदरम्यान हे मार्ग वाहतूकीसाठी राहणार बंद