एखाद्या व्यक्तीसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आपल्याला आठवण राहीलच असं नाही. पण भावनिकदृष्ट्या जोडलेल्या घटना मात्र जास्त काळ लक्षात राहतात. पहिली ओळख, पहिला फोन कॉल, एकत्र फिरलेली जागा, एखादं गाणं... आपला मेंदू या गोष्टींना त्या व्यक्तीशी जोडतो. नंतर तेच गाणं ऐकलं किंवा तीच जागा पाहिली की जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.
वारंवार विचार करणे
"असं का झालं? मी तसं बोलायला नको होतं" अशा प्रश्नांची उत्तरे मन वारंवार शोधत राहतं. सायकोलॉजीमध्ये याला 'रुमिनेशन' (Rumination) म्हणतात. अभ्यासानुसार, असुरक्षिततेची भावना जास्त असलेल्या लोकांमध्ये ब्रेकअपनंतर असे विचार जास्त येतात.