Relationship Problems: नवरा-बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील, तर त्यांच्यातील प्रेम आणि जिव्हाळा कमी होतो. एकमेकांवर राग असताना किंवा सतत वाद होत असताना शारीरिक संबंधांची इच्छा होणं जवळजवळ अशक्य असतं.
नवरा-बायकोचं नातं फक्त शारीरिक नसतं, ते एक मानसिक बंधनही आहे. जोडप्यांमध्ये होणारी भांडणं आणि त्याचा त्यांच्या लैंगिक जीवनावर होणारा परिणाम, याबद्दल डॉक्टर समरम यांनी माहिती दिली आहे.
25
एकमेकांचा आदर करा
नवरा-बायकोमध्ये समजूतदारपणा नसेल, तर त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा राहत नाही. एकमेकांवर राग असताना शारीरिक संबंधांची इच्छा होणं शक्य नाही. कारण आनंद ही फक्त शारीरिक गोष्ट नाही, तर ती मनाशी जोडलेली आहे. मनात राग किंवा द्वेष असेल, तर आनंद देणारे 'डोपामिन'सारखे हार्मोन्स शरीरात तयार होत नाहीत. त्यामुळे नातं गोड हवं असेल, तर दोघांनी एकमेकांचा आदर करायला हवा.
35
विश्वासाची कमतरता
अनेक जोडप्यांमध्ये भांडणाचं मुख्य कारण म्हणजे एकमेकांवर विश्वासाची कमतरता. विशेषतः पुरुष खोटं बोलतात, तेव्हा बायकोचा त्यांच्या शब्दांवरचा विश्वास उडतो. तसेच, दोघांमध्ये 'पुअर कम्युनिकेशन' म्हणजे संवाद कमी असल्यामुळेही समस्या वाढतात. मनात काय आहे हे स्पष्टपणे न बोलल्यामुळे गैरसमज निर्माण होतात.
जोडप्यांनी भावनिकरित्या जोडलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे. पत्नी आजारी असताना किंवा तिचं डोकं दुखत असताना पतीने तिची काळजी घेतली नाही, तर तिच्या मनाला खूप वाईट वाटतं. 'डॉक्टरकडे जायचं का?' असं विचारणं किंवा ताप आहे का हे पाहण्यासाठी साधा हात लावणं, या छोट्या गोष्टीही प्रेम वाढवतात. एकमेकांची काळजी घेतली नाही, तर ते नातं व्यर्थ ठरू शकतं, असा इशारा डॉक्टर समरम यांनी दिला आहे.
55
आयुष्य आनंदी आणि उत्साही कसं जगावे?
जेव्हा नवरा-बायको एकमेकांना समजून घेतात आणि छोट्या-छोट्या समस्या शांतपणे सोडवतात, तेव्हाच त्यांचं आयुष्य आनंदी आणि उत्साही राहतं, असं डॉक्टर समरम यांनी सांगितलं.