हे सगळं दाखवल्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, “जेव्हा संकटं येतात, तेव्हा तू कशी प्रतिक्रिया देतेस?
* बटाट्यासारखी कमकुवत होतेस?
* अंड्यासारखी कडक बनतेस? की कॉफीसारखी परिस्थितीच बदलून टाकतेस?”
या गोष्टीचं तात्पर्य: आपल्या आयुष्यात, आपल्यासोबत किंवा आजूबाजूला काय घडतं यापेक्षा, आपल्या आत काय घडतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण संकटांना कसं सामोरं जातो, यावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं, हाच या कथेचा संदेश आहे.