महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगे माहित आहेत का, तुम्ही कुठं जाऊन आला?

Published : Jan 31, 2025, 03:20 PM IST
Bhimashankar Jyotirlinga

सार

महाराष्ट्रात भगवान शिवाची पाच पवित्र ज्योतिर्लिंगे आहेत जी लाखो भाविकांना आकर्षित करतात. ही ज्योतिर्लिंगे भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ आहेत.

महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगे हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचे धार्मिक स्थळ मानले जातात. संपूर्ण वर्षभर लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

ही आहेत महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगे:

भीमाशंकर (पुणे): 

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्थित, हे ज्योतिर्लिंग निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. 

त्र्यंबकेश्वर (नाशिक): 

गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेले हे ज्योतिर्लिंग कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. 

घृष्णेश्वर (औरंगाबाद): 

वेरूळच्या लेण्यांजवळ असलेल्या या मंदिराचा लाल दगडांनी बांधलेला सुंदर स्थापत्यशैली भाविकांना आकर्षित करतो. 

औंढा नागनाथ (हिंगोली): 

पांडवांनी वनवासात बांधलेले हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे.

परळी वैजनाथ (बीड): 

येथे भगवान शंकराने अमृतकलश ठेवला होता, अशी मान्यता आहे.

महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात गर्दीचा उच्चांक महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या पाचही ज्योतिर्लिंगांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. शासनाकडून विशेष वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि भाविकांसाठी सोयीसुविधा पुरवण्यात येतात.

PREV

Recommended Stories

लहान मुलींसाठी ट्रेन्डी अँकलेट्स, वाईट नजरेपासून राहतील दूर
खरेदी करा 12GB रॅमचा Samsung Galaxy A55 5G निम्म्या किमतीत, Amazon वर खास ऑफर!