चाणक्य नीती सांगते, नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम महत्त्वाचं आहे, तितकाच एकमेकांवरचा विश्वास, समजून घेणं गरजेचं आहे. पण कधी छोट्या गोष्टींमुळेच या नात्यात वाद निर्माण होतात. चाणक्यच्या मते, नवरा-बायकोमधील भांडणांना कारणीभूत ठरणाऱ्या ५ गोष्टी कोणत्या?
कोणत्याही नात्यात आदर खूप महत्त्वाचा असतो. प्रेम असूनही, जर नवरा-बायको एकमेकांना कमी लेखत असतील, दुसऱ्यांच्या मतांना किंमत देत नसतील किंवा इतरांसमोर अपमान करत असतील, तर नात्यात दुरावा येतो. रागात बोललेले शब्द नंतर विसरले तरी, त्यामुळे झालेली जखम मनात घर करून राहते.
25
पैशांच्या बाबतीत पारदर्शकतेचा अभाव
पैशांचे व्यवहार हे कौटुंबिक जीवनात खूप महत्त्वाचे असतात. कमाई किती, खर्च कसा करायचा, बचत किती करायची, कर्ज आहे का? या गोष्टींवर नवरा-बायकोमध्ये स्पष्टता नसेल, तर सतत वाद होऊ शकतात. एकजण उधळपट्टी करत असेल आणि दुसरा बचतीवर लक्ष देत असेल, तर मतभेद नक्कीच होतात. पैशांच्या गोष्टी लपवणे किंवा जोडीदाराला न सांगता मोठे आर्थिक निर्णय घेणे यामुळे विश्वास तुटतो.
35
संशय
पती-पत्नीच्या नात्यात विश्वास हा सर्वात मौल्यवान असतो. विनाकारण संशय घेणे, फोन तपासणे, प्रत्येक लहान गोष्टीवर स्पष्टीकरण विचारणे किंवा जोडीदाराच्या मित्र-मैत्रिणींना चुकीच्या नजरेने पाहणे, या गोष्टी नात्यात तणाव निर्माण करतात. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा मिळवायला खूप वेळ लागतो.
नवरा-बायकोच्या नात्यात प्रत्येक गोष्टीत कोणीतरी एक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल, तर नातं कमजोर होतं. वैवाहिक जीवन ही काही स्पर्धा नाही. एकमेकांचं न ऐकता, 'मीच बरोबर' असा हट्ट धरल्यामुळे छोटीशी समस्याही मोठ्या भांडणाचं रूप घेते. चूक झाल्यावर ती मान्य करणं ही कमजोरी नाही, तर नात्याबद्दलचा आदर दर्शवते.
55
तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप
नवरा-बायकोमधील प्रत्येक लहान-सहान गोष्ट आई-वडील, नातेवाईक किंवा मित्रांना सांगितल्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. विशेषतः रागाच्या भरात जोडीदाराबद्दल इतरांसमोर वाईट बोलल्यास त्याचा भविष्यात नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. शक्यतोवर दोघांनी मिळूनच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.