
एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन एक महिना उलटून गेला. पण अजूनही या अपघातातून नागरिक बाहेर पडलेले नाहीत. १२ जूनला अहमदाबादहून उड्डाण केलेल्या बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमानाला अपघात झाला आणि त्यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला. विमानातील केवळ १ प्रवासी वाचला. बाकीच्या २४१ जणांनी अपघातात जीव गमावला. भारतीय विमान दुर्घटना तपास अन्वेषण विभागानं (एएआयबी) या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून विमानाने लँडिंग केलं आणि काही क्षणात त्याचा अपघात झाला. विमान आकाशात जात असताना ते उंचीवर गेलं नाही आणि अचानक अपघात झाला. या अपघातातील कारणांचा आढावा घेण्यात आला. विमानानं उड्डाण केल्यावर काही सेकंदातच दोन्ही इंजिन अचानक आपोआप बंद झाली. त्यामुळे विमान कोसळलं, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.
एआयबीने जाहीर केलेला अहवाल हा १५ पानांचा आहे. त्यानुसार विमानानं उड्डाणानंतर काही सेकंदात १८० नॉट्सचा वेग गाठला. पण त्यानंतर लगेचच इंजिन-१ आणि इंजिन-२ चे फ्यूल कट ऑफ स्विच (ज्यांच्या माध्यमातून इंजिनाला इंधन पाठवलं जातं) रनपासून कट ऑफ पोझिशनमध्ये गेले. हा प्रकार अवघ्या १ सेकंदाच्या दरम्यान हा प्रकार घडला.
या गोष्टीमुळे विमानाला इंधन मिळणे बंद झालं, ते बंद झाल्यानंतर दोन्ही इंजिनांची एन१ आणि एन२ रोटेशन स्पीड वेगानं कमी होऊ लागला. विमानात असलेल्या व्हाईस रेकॉर्डमध्ये दोन पायलटचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. त्यामध्ये एक पायलट दुसऱ्याला तू इंजिन बंद केलं का असं म्हणतो तर यावर दुसरा मी बंद केलं नाही असं उत्तर दिलं. यामध्ये इंजिन दोनही पायलटने बंद केले नव्हते त्यामुळे कदाचित हा प्रकार तांत्रिक बिघाडाचा असू शकतो.
बोईंग कंपनी किंवा त्यांच्यासाठी इंजिन बनवणाऱ्या कंपनीसाठी यामधून कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही. विमानाचे दोनही इंजिन बंद पडणे ही खूप मोठी धोक्याची घटना आहे. एक इंजिन जरी बंद पडलं तरी दुसऱ्या इंजिनच्या मदतीने पायलट विमानाला आकाशात उडवू शकतात. पण अहमदाबाद येथील घटना दुर्दैवी ठरली आहे.