
NEET पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारने पुनर्परीक्षा घेतली आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, असा दावा संजय निरुपम यांनी केला. सध्याचे जंतर-मंतरवरील आंदोलन विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकीय पक्षांकडून चालवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच अयोध्या राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. NCP (शरद पवार) यांनी काही घटनादुरुस्ती विधेयकांबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.