भारत देशात अनेक उद्योजक आहेत. अंबानी, अदानी, टाटा, महिंद्रा, शिवनाडार असे अनेक बडे उद्योजक जागतिक स्तरावर ओळखले जातात. त्यापैकी एकाने अलीकडेच जगातील १०० सर्वात शक्तिशाली उद्योजकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ते रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. त्यांनी शक्तिशाली उद्योजक म्हणून देशालाच नव्हे तर जगालाही पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही माहिती फॉर्च्यून मॅगझिनने प्रसिद्ध केली आहे.