जीएसटीतील बदलांमुळे होणाऱ्या महसुली नुकसानीची भरपाई करण्याची मागणी आठ विरोधी पक्षांच्या राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांनी ही मागणी केली आहे.
झारखंडचे अर्थमंत्री राधाकृष्ण किशोर म्हणाले, "आम्ही अतिरिक्त कर आकारणीची मागणी केली आहे. यावर केंद्र सरकार विचार करेल असे आश्वासन दिले आहे."