Girlfriend Murdered : तरुणीला कानशिलात लगावली, जमिनीवर पाडले, छातीवर बसला अन् चिरला गळा

Published : Jul 01, 2025, 04:16 PM IST
Girlfriend Murdered : तरुणीला कानशिलात लगावली, जमिनीवर पाडले, छातीवर बसला अन् चिरला गळा

सार

प्रेयसीचा प्रियकराने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात घडली. १९ वर्षीय संध्या चौधरी हिचा तिच्या प्रियकराने सर्वांसमोर खून केला.

नरसिंहपूर : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी २७ जून रोजी एका भयंकर घटना घडली. १९ वर्षीय संध्या चौधरी हिची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षासमोर ही घटना घडली, जिथे डॉक्टर, परिचारिका आणि सुरक्षा रक्षक उपस्थित होते. पण कोणीही काहीच करू शकले नाही. संध्याला कोणीच वाचवू शकले नाही. 

तरुणाने केला गळा चिरून खून, १० मिनिटे चालला थरार 

संध्या बारावीची विद्यार्थिनी होती. ती दुपारी २ वाजता आपल्या वहिनीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती. तेव्हा आधीच लपून बसलेला अभिषेक कोष्टी नावाच्या युवकाने तिच्यावर हल्ला केला. त्याने प्रथम तिच्या कानशिलात लगावली. तिला जमिनीवर पाडले. तिच्या छातीवर बसून धारदार चाकूने लगेत तिचा गळा चिरला. ही संपूर्ण घटना १० मिनिटे चालली. यावेळी रुग्णालयातील लोक तमाशा पाहत राहिले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

आत्महत्येचा प्रयत्न, नंतर दुचाकीने पळून गेला 

घटनेनंतर, अभिषेकने स्वतःलाही चाकू मारण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला. नंतर तो रुग्णालयातून पळून गेला. रुग्णालयाबाहेर त्याने दुचाकी लावली होती. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या हतबलतेवर प्रश्नचिन्ह 

घटनेच्या वेळी रुग्णालयात डझनभर लोक उपस्थित होते. पण कोणीही युवतीच्या मदतीसाठी पुढे आले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की लोक शांतपणे ये-जा करत होते तर युवती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ही घटना केवळ सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, तर सामाजिक संवेदनशीलतेवरही प्रश्न निर्माण करते.

नातेवाईकांचा संताप, रास्ता रोको आंदोलन 

संध्याच्या कुटुंबियांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा ते रुग्णालयात पोहोचले. मुलीचा मृतदेह तिथेच पडलेला पाहिला. हे दृश्य पाहून त्यांच्या संतापाचा पारा चढला. नातेवाईक आणि स्थानिकांनी रुग्णालयाबाहेर रस्त्यावर निदर्शने केली. पोलिसांना आश्वासन द्यावे लागले की दोषींवर आणि सुरक्षेत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

आरोपी दोन वर्षांपासून करत होता पाठलाग

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की आरोपी अभिषेक दोन वर्षांपासून संध्याच्या मागे लागला होता. तो तिच्यासाठी वेडापिसा झाला होता. पण मुलीने त्याच्यापासून अंतर ठेवले होते. अलीकडेच त्याने संध्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा तो अयशस्वी झाला. तेव्हा त्याने हत्येचा कट रचला.

प्रशासनाने मागवला अहवाल 

मध्य प्रदेशातील ही घटना केवळ एका तरुणीची निर्घृण हत्याच नाही, तर प्रशासकीय निष्काळजीपणा आणि सामाजिक असंवेदनशीलतेचीही कहाणी आहे. रुग्णालय, जे मनुष्याचे आयुष्य वाचवण्याचे ठिकाण आहे, तिथे मृत्यूचे असे दृश्य पाहून प्रत्येकजण हादरला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद
महिला कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; मासिक पाळीच्या रजेला हायकोर्टाची स्थगिती