
रणवीर सिंग हा आजच्या काळातल्या सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. त्याचा चार्मिंग अंदाज, एनर्जी आणि अभिनयावरचं प्रेम यामुळे लाखो चाहते त्याच्यावर फिदा आहेत. तोच खरा 'धुरंधर' आहे, आणि हे आम्ही नाही, तर आकडेच सांगतायत. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. इंडिया टुडेच्या ताज्या 'मूड ऑफ द नेशन' पोलमध्ये रणवीर सिंग देशाचा नंबर 2 हिरो म्हणून समोर आला आहे. ही त्याच्या करिअरसाठी एक मोठी अचिव्हमेंट आहे, कारण या यादीत तो थेट अमिताभ बच्चन यांच्या नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
या रिपोर्टनुसार, या पोलमध्ये अमिताभ बच्चन 14.7% मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ रणवीर सिंग 9.5% मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, विजय थलपथी 8.5% मतांसह तिसऱ्या, अक्षय कुमार 7.4% मतांसह चौथ्या आणि सलमान खान 6.8% मतांसह पाचव्या क्रमांकावर आहे. या निकालांवरून देशभरातील प्रेक्षकांमध्ये रणवीरची वाढती लोकप्रियता आणि प्रभाव स्पष्ट दिसतो.
रणवीरने त्याच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका केल्या आहेत, पण 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन सिनेमांनी त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. हो, 'धुरंधर'ने आपली जादू दाखवली आहे, यात काहीच शंका नाही. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे आणि त्याचे चाहतेही यामुळे खूप खूश आहेत. या निकालामुळे 'भारतीय सिनेसृष्टीचा खरा धुरंधर' हा टॅग त्याला आणखी शोभून दिसतोय. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आणि 'धुरंधर' फ्रँचायझीने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर, आता रणवीर प्रेक्षकांच्या पसंतीच्या पोलमध्येही आपली छाप पाडत आहे.
रणवीर सिंगच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच 'प्रलय' या सिनेमात दिसणार आहे. हा एक पोस्ट-अपोकॅलिप्टिक झॉम्बी सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट असून, जय मेहता याचं दिग्दर्शन करत आहेत.