हुबळीमध्ये एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हुबळीजवळील इनामपूरमध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या गर्भवती मुलीला तिच्या वडिलांनीच जीवे मारले. दलित तरुणासोबत प्रेमविवाह केल्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य करण्यात आले असून, पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.
हुबळी : प्रेमविवाह केलेल्या गर्भवती मुलीला तिच्या वडिलांनीच अमानुषपणे जीवे मारल्याची घटना हुबळी तालुक्यातील इनामपूर गावात घडली आहे. कुटुंबीयांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
25
सात महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
सात महिन्यांपूर्वी मान्या पाटील आणि विवेकानंद दोड्डामणी यांनी रजिस्टर पद्धतीने प्रेमविवाह केला होता. विवेकानंद दोड्डामणी दलित समाजाचा असल्याने मान्या पाटीलच्या कुटुंबीयांनी या लग्नाला तीव्र विरोध केला होता. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्नही केला होता. जीवाला धोका असल्याने विवाहानंतर मान्या आणि विवेकानंद हावेरी जिल्ह्यात राहत होते.
35
तरुणीच्या कुटुंबीयांकडून हल्ला
8 डिसेंबर रोजी मान्या आणि विवेकानंद गावात परतले होते. सात महिन्यांनंतरही मान्याचे वडील प्रकाश गौडा पाटील आणि इतरांनी सासरे वीरनगौडा पाटील आणि भाऊ अरुण गौडा ऊर्फ आकाश गौडा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मान्या गावात आल्याचे कळताच पाटील कुटुंबीयांनी हत्येचा कट रचला. रविवारी संध्याकाळी विवेकानंदचे वडील सुभाष दोड्डामणी यांना ट्रॅक्टरने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, वडिलांचा अपघात झाल्याचे विवेकानंदला सांगितले. हे कळताच विवेकानंद घराबाहेर पडला. त्यावेळी मान्या तिच्या सासूसोबत (रेणव्वा) घरी होती.
55
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घरात दोघीच असताना पाटील कुटुंबीयांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. अतिरक्तस्रावामुळे मान्याचा मृत्यू झाला, तर तिची सासू गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील यांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मान्या सहा महिन्यांची गर्भवती होती.