भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना सध्या चांगल्या फॉर्ममधे आहे. २०२४ च्या अखेरीस तिने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती.
२०२४ मध्ये स्मृती मानधनाने चार एकदिवसीय शतके नोंदवली. ती भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक शतके झळकावणारी क्रिकेटपटू ठरली. त्याचे फळ आता तिला मिळाले आहे.
२०२५ च्या सुरुवातीला स्मृती मानधना हिच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिच्याकडे आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय निवड समितीने कर्णधार हरमनप्रीतला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्मृती मंधानाला कर्णधार बनवण्यात आले आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन वनडेंची मालिका १० जानेवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने मायदेशातच खेळणार आहे
स्मृती मानधना, दीप्ती, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा, उमा छेत्री, ऋचा, तेजल हसबेन्स, राघवी बिष्ट, मीनू मानी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतस साधू, सायमा ठाकोर, सावली सातघरे.
हरमनप्रीत कौरला बाहेर ठेवून स्मृती मंधानाकडे कर्णधारपद सोपवणे हे सूचित करते की निवडकर्ते तिच्याकडे टीम इंडियाची भावी कर्णधार म्हणून पाहत आहेत.