सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. शक्य असल्यास गंगाजल किंवा तुळशीचं पाणी पाण्यात टाकावं. मनात 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा जप करावा.
तुळशीचे पूजन करावे. ताजं फुल, कापुराचा दिवा, नैवेद्य अर्पण करून तुळशीला नमस्कार करावा. कारण तुळशी आणि विष्णू यांचा अतूट संबंध आहे.
सकाळी किंवा दिवसभरात श्रीविष्णू सहस्त्रनाम, श्रीमद्भगवद्गीता, रामायण यांचं वाचन केल्याने विशेष पुण्य लाभतं.
विठ्ठलाच्या नामस्मरणात दिवस घालवा. संत तुकाराम, नामदेवांचे अभंग ऐका. विठ्ठल रखुमाईच्या भजनात स्वतःला हरवून जा.
या दिवशी केलेलं दान अनेकपटीने वाढून आपल्याकडे परत येतं. अन्नदान, वस्त्रदान, किंवा एखाद्या वाचलेल्या व्यक्तीला मदत करा.
वारकऱ्यांची दिवाळी - देवशयनी आषाढी एकादशी, महत्व जाणून घ्या
पंढरपूरच्या वारीतून काय शिकायला मिळतं?
विठ्ठलाच्या पादुका लंडनमध्ये पोहचल्या, एकादशी सोहळा रंगणार
पंढरपूरच्या वारीतील रिंगण म्हणजे काय, माहिती जाणून घ्या