बहुतांशजण चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीमध्ये चुकीच्या मार्गाने आलेला पैसा कधीपर्यंत टिकतो याबद्दल सांगितले आहे. याबद्दल जाणून घेऊया.
अन्यायोपार्जितं वित्तं दशवर्षाणि तिष्ठति।
प्राप्ते चैकदशे वर्षे समूलं तद् विनश्यति ।।
चुकीच्या कामाने कमावलेले धन अधिकाधिक 10 वर्षांपर्यंतच व्यक्तीकडे टिकलते. यानंतर व्याज आणि मूळ रक्कमेसह नष्ट होते.
आचार्य चाणक्यनुसार, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा आरामाचे आयुष्य देईल पण मनाची शांती नाही. मन शांत असल्यास सरळ मार्गाने कमावलेल्या पैशांचा आनंद घेता येईल.
आचार्य चाणक्यनुसार, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा ज्यावेळी जातो तेव्हा सरळ मार्गाने आलेला पैसाही घेऊन जातो. यावेळी व्यक्तीला आपल्या चुकांची आठवण येते.
आचार्य चाणक्यनुसार, सरळ आणि शुद्ध मनाने कमावलेला पैसा नेहमीच सुख, शांती देतो. यामुळे कधीच वाईट मार्गाने पैसा कमावू नये.