Love Psychology: प्रेमात पडणं सोपं असतं, पण ते नातं टिकवणं खूप अवघड. सुरुवातीला सगळं छान वाटतं, पण काळानुरूप भावना आणि अपेक्षा बदलतात. मानसशास्त्रानुसार प्रेमवीरांनी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. चला, त्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
प्रेम ही केवळ एक भावना नाही, तर मन, मेंदू आणि आपलं वागणं या सगळ्यांचा समावेश असलेली एक मानसिक प्रक्रिया आहे. सुरुवातीला नातं खूप आनंददायी आणि उत्साही वाटणं स्वाभाविक आहे. पण काळानुसार यात बदल होऊ शकतो आणि नात्यात दुरावा येऊ शकतो. असं होऊ नये आणि नातं टिकून राहावं यासाठी काही सत्यं समजून घेणं आवश्यक आहे, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. प्रेमात असलेल्यांनी या पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच जाणून घ्यायला हव्यात.
26
आकर्षण वेगळं, ओढ वेगळी
मानसशास्त्रानुसार, आकर्षण (attraction) आणि ओढ (attachment) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेमात पडल्यावर सुरुवातीला डोपामाइन आणि ऑक्सिटोसिनसारखी केमिकल्स मेंदूत जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला परफेक्ट वाटते. पण हा टप्पा कायम टिकत नाही. काही काळानंतर नातं वास्तवात येतं. तेव्हा लहान-सहान दोष दिसणं स्वाभाविक आहे. तज्ज्ञांच्या मते, याच टप्प्यावर खरं नातं सुरू होतं. त्यामुळे सुरुवातीचा उत्साह कमी झाला म्हणजे प्रेम संपलं, असं समजणं चुकीचं आहे.
36
संवाद महत्त्वाचा
मानसशास्त्रानुसार, संवाद हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. अनेकजण प्रेमाच्या अभावामुळे नाही, तर योग्य संवाद नसल्यामुळे वेगळे होतात. आपल्या भावना, दुःख आणि अपेक्षा स्पष्टपणे न सांगितल्यास गैरसमज वाढतात. तसंच, समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भावना स्पष्टपणे व्यक्त केल्याने नातं निरोगी राहतं. अनेकदा शांत राहिल्याने समस्या आणखी वाढतात.
मानसशास्त्रानुसार, प्रेमात असलेल्या दोन व्यक्तींना वाटतं की पार्टनरने पूर्णपणे आपल्यासोबतच राहावं. पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची स्पेस, आवड-निवड आणि मित्र-मैत्रिणींची गरज असते. मानसशास्त्र सांगतं की, ज्या नात्यांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याच्या सीमा (boundaries) नसतात, तिथे काही काळानंतर तणाव निर्माण होतो. एकमेकांवर जास्त अवलंबून राहणं किंवा नियंत्रण ठेवणं प्रेम कमकुवत करतं.
56
भावनांवर लक्ष द्या..
प्रेमात असुरक्षिततेची भावना येणं स्वाभाविक आहे, पण या भावनांनी नात्यावर ताबा मिळवता कामा नये. मत्सर, भीती किंवा पार्टनरला गमावण्याची चिंता या सामान्य भावना आहेत. पण त्या वाढल्या तर संशय आणि भांडणं वाढतात. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा स्वतःबद्दलचा आदर (self-respect) मजबूत असतो, तेव्हा नातं स्थिर राहतं. त्यामुळे प्रेमात असलेल्यांनी आधी स्वतःच्या भावनांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
66
समस्या आल्यावर..
मानसशास्त्रानुसार, प्रेम म्हणजे दोघांनी मिळून एकत्र पुढे जाणं. काही वेळा मतभेद होणं स्वाभाविक आहे. पण ते कसे सोडवले जातात, हे महत्त्वाचं आहे. समस्या आल्यावर पळ काढण्याऐवजी त्यावर बोलून तोडगा काढल्यास नातं अधिक घट्ट होतं. एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, जसे आहेत तसे स्वीकारणं आणि एकमेकांना प्रोत्साहन देणं हा सर्वोत्तम मार्ग आहे.