१. सुरक्षा कवच हरवून बसाल: पॉलिसी बंद करताच तुमचे लाइफ कव्हर (विमा संरक्षण) संपुष्टात येते. दुर्दैवाने भविष्यात काही अघटित घडल्यास तुमच्या कुटुंबाला किंवा वारसाला कोणताही क्लेम मिळत नाही. ज्या उद्देशासाठी तुम्ही विमा घेतला होता, तोच मूळ हेतू नष्ट होतो.
२. जमापुंजीवर पडते दरोडा: पॉलिसीच्या सुरुवातीच्या काळात कंपनीचा बराच खर्च एजंट कमिशन आणि प्रशासकीय कामात जातो. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीच्या २-४ वर्षांतच पॉलिसी बंद केली, तर तुम्हाला अत्यंत कमी पैसे परत मिळतात. शिवाय, एंडोमेंट किंवा मनी-बॅक पॉलिसीमध्ये मिळणारे बोनस आणि लॉयल्टी बेनिफिट्स एका झटक्यात शून्य होतात.
३. भविष्यातील लाभ संपुष्टात: दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे मिळणारे व्याजाचे आणि चक्रवाढ व्याजाचे फायदे तुम्ही गमावता. नवी पॉलिसी घ्यायची ठरवल्यास वाढत्या वयानुसार तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागेल.