Gold Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या लोकांनी सोनं घालणं टाळावं. असं न केल्यास त्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांनी सोनं का घालू नये? चला जाणून घेऊया.
भारतात सोनं फक्त एक दागिना नाही, तर ती एक परंपरा आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सोनं हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. नवग्रहांपैकी शुभ ग्रह आणि धनकारक मानल्या जाणाऱ्या 'गुरु' ग्रहाचं सोन्यावर अधिपत्य असतं. सोनं काही लोकांसाठी नशिबाचे दरवाजे उघडतं, तर काहींसाठी अनावश्यक मानसिक ताण आणि आर्थिक संकट घेऊन येतं. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत लग्न आणि राशीचा स्वामी (राशी अधिपती) यांचा गुरु ग्रह शत्रू असतो, त्यांनी सोनं घालणं टाळलेलं बरं.
26
वृषभ
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो ऐश्वर्य आणि विलासी जीवनाचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचे गुरु बृहस्पती (गुरु) आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य (शुक्र) यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे, वृषभ राशीच्या लोकांनी जास्त सोनं घातल्यास त्यांच्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येऊ शकतात. विशेषतः, अपेक्षित धनलाभात अडथळे निर्माण होऊ शकतात.
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात. पण, बुध आणि गुरु यांच्यातील ग्रहस्थितीनुसार त्यांच्यात फारसं सख्य नाही. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी सोनं घातल्यास ते चुकीचे निर्णय घेऊन पैसे गमावू शकतात. मनात गोंधळ वाढण्याची शक्यता असते.
36
कन्या
मिथुन राशीप्रमाणेच कन्या राशीचा स्वामीही बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या लोकांनी हातात किंवा गळ्यात जास्त सोनं घातल्यास त्यांची आर्थिक प्रगती थांबू शकते. बचत कमी होऊन अनावश्यक खर्च वाढू शकतात.
तूळ राशीवर शुक्राचा प्रभाव जास्त असतो. या राशीचे लोक सौंदर्यप्रेमी असतात आणि त्यांना दागिन्यांची आवड असते. पण ज्योतिषानुसार, सोनं त्यांना अशुभ फळ देऊ शकतं. विशेषतः, तूळ राशीच्या लोकांनी कंबरेच्या खाली किंवा पायात सोनं अजिबात घालू नये.
कुंभ राशीचा स्वामी न्यायाची देवता शनी आहे. शनी आणि गुरु यांच्यात फार मोठं वैर नसलं तरी, कुंभ राशीच्या लोकांसाठी सोनं फारसं शुभ मानलं जात नाही. या लोकांनी सोनं घातल्यास त्यांना अनावश्यक वैद्यकीय खर्च किंवा नात्यांमध्ये दुरावा यांसारख्या नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
56
पायात सोनं का घालू नये?
आपल्याकडे कितीही श्रीमंत व्यक्ती असल्या तरी त्या पायात सोन्याचे पैंजण घालत नाहीत. पायात फक्त चांदीच घालतात. यामागे एक महत्त्वाचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य दडलेलं आहे.
आध्यात्मिक कारण: सोनं हे महालक्ष्मीचं रूप आणि गुरुचं प्रतीक मानलं जातं. जमिनीच्या सर्वात जवळ असलेल्या पायांमध्ये सोनं घातल्यास त्या दैवी शक्तीचा अपमान होतो, असं मानतात. यामुळे घरातील संपत्ती कमी होऊन गरिबी येते, असा समज आहे.
वैज्ञानिक कारण: चांदी हा धातू शरीरातील उष्णता नियंत्रित करून शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. याउलट, सोन्यामध्ये उष्णता वाढवण्याचा गुणधर्म असतो. डोक्याच्या भागात सोनं आणि पायाच्या भागात चांदी घातल्यास शरीराचा ऊर्जा समतोल (Energy Balance) राखला जातो. यामुळेच काही लोक पायात सोनं घालत नाहीत.
66
कोणत्या राशीच्या लोकांनी सोनं घालावं?
अग्नी आणि जल तत्त्व असलेल्या राशींसाठी सोनं नेहमीच उत्तम फळ देतं. मेष, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी सोनं घातल्यास त्यांची चुंबकीय आकर्षण शक्ती वाढते. व्यवसायात चांगला नफा, समाजात उच्च पद आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना सोन्याच्या माध्यमातून गुरुची कृपा सहज मिळते.
(टीप: या लेखात दिलेली माहिती ज्योतिषीय मान्यता, धार्मिक ग्रंथ आणि पंचांग यावर आधारित आहे. Asianet News Marathi याची पडताळणी करत नाही. केवळ माहिती पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. याची अचूकता, विश्वासार्हता आणि परिणामांसाठी Asianet News Marathi कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.)