खो खो वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा ७८-४० असा पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात नेपाळ संघाने भारतीय महिला संघासमोर गुडघे टेकले.
खो खो वर्ल्ड कप २०२५: खो खो वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८-४० असा पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले आहे. सुरुवातीपासूनच भारतीय महिलांनी दमदार कामगिरी केली आणि कोणत्याही संघाला पुनरागमनाची संधी दिली नाही. अंतिम सामन्यातही नेपाळला पूर्णपणे गुडघ्यावर आणले आणि भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या खेळात इतिहास रचला आहे.
भारतीय महिला संघ आणि नेपाळ संघ यांच्यातील अंतिम सामन्याच्या स्कोअरकार्डवर एक नजर टाकली तर सुरुवातीपासूनच भारतीय आक्रमकांनी नेपाळच्या बचावपटूंसमोर धमाकेदार कामगिरी केली. नेपाळ संघाच्या कर्णधारने नाणेफेक जिंकून प्रथम बचाव करण्याचा निर्णय घेतला, पण तो उलटा पडला आणि पहिल्या फेरीत भारताच्या धावत्या खेळाडूंनी नेपाळच्या बचावपटूंना पाय रोवण्याची संधी न देता ३४ गुण मिळवले. दुसरीकडे, नेपाळच्या आक्रमकांना एकही ड्रीम रनवरून गुण मिळवता आले नाहीत. भारतीय संघाने नेपाळच्या ६ बॅचला बाद केले.
दुसऱ्या फेरीत बचाव करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या बचावपटूंनी नेपाळच्या आक्रमकांना चांगलेच धाववले आणि उत्कृष्ट बचाव करत १ गुण मिळवला. भारतानेही दुसऱ्या फेरीत बचाव करून ड्रीम रनच्या माध्यमातून १ गुण मिळवला. तर नेपाळने आक्रमकांनी २२ गुण मिळवले. तिसऱ्या फेरीत आक्रमण करताना प्रियंकाच्या संघाने पुन्हा एकदा कमाल केली आणि नेपाळला पूर्णपणे सामन्यातून बाहेर काढले आणि ३८ गुण मिळवले. तर नेपाळने बचाव करताना कोणतेही गुण मिळवले नाहीत.
चौथ्या फेरीतही भारतीय महिला संघाने नेपाळच्या आक्रमकांना जास्त वर्चस्व गाजवू दिले नाही आणि बचाव करताना जबरदस्त खेळ दाखवला. या फेरीत भारतीय महिला खेळाडूंनी नेपाळ संघाला पूर्णपणे सामन्यातून बाहेर काढले. शेवटी हा सामना ७८-४० अशा धावसंख्येवर संपला.
अंतिम सामन्यातही भारतीय संघाने तेच केले जे ते पहिल्या सामन्यापासून करत होते. संपूर्ण सामन्यादरम्यान कुठेही नेपाळला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले. प्रत्येक सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावले. सलग ६ सामने जिंकून भारताने खो खो वर्ल्ड कप २०२५ ची ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने ४ सामन्यांत १०० हून अधिक गुण मिळवले. तर दक्षिण कोरियाविरुद्ध १७५ गुणांसह विश्वविक्रमही केला होता.