उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना उद्देशून संदेश, एकनाथ शिंदेंनी सर्व नगरसेवक रिसॉर्टमध्ये हलविले!

Published : Jan 17, 2026, 06:07 PM IST
Eknath Shinde Moves 29 Shiv Sena Councilors to Resort in Mumbai

सार

Eknath Shinde Moves 29 Shiv Sena Councilors to Resort in Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना नगरसेवकांना पंचतारांकित रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे. 

Eknath Shinde Moves 29 Shiv Sena Councilors to Resort in Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिवसेना नगरसेवकांना पंचतारांकित रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले. वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचून तीन दिवस येथे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका महापौरांची निवड होणार असतानाच ही हालचाल झाली आहे. 2019 मध्ये आणि नंतर 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यावरही शिवसेनेने राज्यातील आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवले होते.

भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटासह एनडीए पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 118 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 89 जागा जिंकून सर्वात मोठा एकल पक्ष ठरला. यामुळे एनडीए आघाडीची सत्ता निश्चित झाली. दुसरीकडे, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळून 72 जागा जिंकल्या. स्वतंत्रपणे लढलेल्या काँग्रेसने 24 जागा जिंकल्या. काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आल्यास त्यांच्या 96 जागा होतील. शिंदे गटातील नगरसेवक फोडल्यास ठाकरे गट एनडीएला सत्तेपासून दूर ठेवू शकतो. मात्र, उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य हालचाली रोखण्यासाठीच नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एक सूचक संदेश दिला. ते म्हणाले, “मुंबईत शिवसनेचा (युबीटी) महापौर निवडून आणणे हे माझे स्वप्न आहे आणि ईश्वराची इच्छा असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल.” ठाकरे यांनी भाजपवर “विश्वासघाताने” निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आणि असा दावाही केला की, भाजपला “मुंबई गहाण टाकायची” आहे.

या संदेशानंतर एकनाथ शिंदे यांनी सावधानता बाळगत आपले नगरसेवक रिसॉर्टमध्ये हलविले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी पाणीकपातीचा इशारा! तीन दिवस अनेक भागांत पाणीपुरवठा बंद
BMC Election Results 2026 : “सत्ता आणि पैसा आमच्याकडे असता तर भाजप देशही टिकवू शकला नसता”; मुंबई निकालानंतर संजय राऊतांचा थेट हल्लाबोल