
पुणे : पावसाळ्यात पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने लोणावळा आणि मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र दुडी यांनी जारी केला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरही बंदी घालण्यात आली आहे. ती १९ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे.
कोणत्या ठिकाणी बंदी?
हा आदेश पुढील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आला आहे:
काय बंदी घालण्यात आली आहे?
प्रशासनाच्या आदेशानुसार खालील सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे:
वाहतुकीसाठी विशेष आदेश
धबधबे, धरणे आणि नद्यांच्या परिसरात दुचाकी, त्रिचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रवेश बंदीस्त आहे, केवळ आपत्कालीन व अत्यावश्यक सेवांसाठीच परवानगी दिली जाईल. वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग वळविण्याचे आदेशही मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत जारी करण्यात आले आहेत.
कायदेशीर कारवाईची तरतूद
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, गट किंवा संस्थांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ नुसार कठोर कारवाई केली जाईल.
सातारा : जिल्ह्यात जोरदार पावसाची संततधार सुरू असताना, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने २० जूनपासून १९ ऑगस्टपर्यंत अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळांवर कडक निर्बंध लागू केले आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा आदेश जारी करण्यात आला असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात त्या नैसर्गिक स्थळांवर या आदेशाचा प्रभाव असणार आहे.
प्रभावित स्थळांमध्ये कोणकोणती ठिकाणे?
या आदेशाअंतर्गत पुढील पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू केले आहेत:
काय काय बंदी घालण्यात आली आहे?
आदेशाचे कारण काय?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी पावसाळ्यात प्रचंड गर्दी होत असून, पाण्याचे स्तर वाढल्याने आणि परिसरात भूस्खलन, घसरणाऱ्या मातीच्या कड्यांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पर्यटकांना प्रशासनाची विनंती
जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना सहकार्याची विनंती केली असून, "पावसाळ्याच्या काळात अत्यावश्यक नसल्यास या ठिकाणी जाणे टाळावे," असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि वन विभाग यांच्यासोबत समन्वय साधून ही कारवाई करण्यात येणार आहे.
साताऱ्यात निसर्ग सौंदर्य जितकं अप्रतिम आहे, तितकाच पावसाळ्यात धोका वाढतो. पर्यटन करताना सुरक्षिततेचा विचार करा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.