वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका संभवतो. स्वतःची काळजी घेण्यासाठी खालील उपाय करा.
१. भरपूर पाणी प्या: तहान नसली तरीही ठराविक अंतराने पाणी पीत राहा.
२. वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
३. पोशाख: बाहेर जाताना सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरा, डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवा.
४. शेतकरी व मजूर: कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा उरकून घेण्याचा प्रयत्न करा.