१३५ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या नवीन मार्गामुळे रेल्वे वाहतुकीतील सर्वात मोठा अडथळा दूर होणार आहे.
बँकरची कटकट मिटणार: कसारा घाटातील तीव्र चढ-उतारामुळे सध्या गाड्यांना अतिरिक्त इंजिन (बँकर) लावावे लागते. नवीन लाईनमुळे ही गरज भासणार नाही, परिणामी इगतपुरी आणि कसारा येथे इंजिन जोडण्यासाठी वाया जाणारा वेळ वाचणार आहे.
वेळेची मोठी बचत: या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा किमान २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
लोकल रेल्वेचे स्वप्न होणार साकार: नाशिक-मुंबई दरम्यान दररोज अप-डाऊन करणाऱ्यांसाठी 'नाशिक-मुंबई लोकल' सुरू होण्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे.