Perfect Chapati Dough Ratio And Soft Roti Secrets: रोज चपात्या करूनही त्या मऊ आणि टम्म फुगलेल्या होत नाहीत? कधी त्या कडक होतात, तर कधी लाटताना पोळपाटाला चिकटतात. याचं मुख्य कारण म्हणजे पीठ मळताना होणाऱ्या चुका.
चपाती किंवा पोळी हा अनेक भारतीय घरांमध्ये सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणाचा मुख्य भाग आहे. पण मऊ आणि टम्म फुगलेल्या चपात्या बनवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. यासाठी पीठ मळण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते.
25
पीठ आणि पाण्याचे योग्य प्रमाण
चपातीच्या पिठासाठी लागणारं पाणी नेहमी पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. साधारणपणे, २ कप गव्हाच्या पिठासाठी सुमारे १ कपापेक्षा थोडं कमी पाणी लागतं. म्हणजे पीठ आणि पाण्याचं प्रमाण २:१ असं असावं. जर पीठ थोडं जाडसर असेल, तर ते जास्त पाणी शोषून घेतं. अशावेळी थोडं जास्त पाणी लागू शकतं.
35
कोमट पाण्याचा वापर करा
चपात्या जास्त वेळ मऊ राहाव्यात असं वाटत असेल, तर पीठ मळण्यासाठी साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. असं केल्याने पिठातील प्रोटीन सक्रिय होतं आणि पीठ जास्त मऊ होतं.
45
दुधाचा वापर (पर्यायी)
काही वेळा चपात्या लवकर कोरड्या पडतात. अशावेळी कोमट पाणी हा उत्तम उपाय आहे. पण तुम्हाला आणखी मऊ आणि पांढरेशुभ्र चपात्या हव्या असतील, तर पाण्याऐवजी दुधाने पीठ मळू शकता. यामुळे चपातीला एक क्रीमी चव येते.
55
मळलेलं पीठ मुरू द्या (१५-२० मिनिटं)
बरेच जण पीठ मळल्यानंतर लगेचच चपात्या लाटायला घेतात. पण चांगल्या चपात्यांसाठी, पीठ मळल्यानंतर ते एका कापडाने किंवा ताटाने झाकून १५-२० मिनिटं तसंच ठेवा. यानंतर चपात्या केल्या तर त्या अधिक मऊ होतात.