‘ऑपरेशन सिंदूर’च्या निशाण्यावर दहशतवादी तळ
२६ नागरिकांचा बळी गेलेल्या २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.