'मुंबईत स्पेशल 26', म्हैसूर कॅफेच्या मालकाला 25 लाखांचा लावला चुना

सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली . या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : May 16, 2024 8:51 AM IST

मुंबई: माटुंग्यातील म्हैसूर कॅफेच्या व्यावसायिकांला गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चोरीत आजी-माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने अनेकांच्या भूवया उंचवल्या आहेत. सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार 'स्पेशल 26' या चित्रपटाप्रमाणेच आरोपींनी कट रचला होता. बाबासाहेब भागवत (50), दिनकर साळवे (60),वसंत नाईक (52), शाम गायकवाड (52),नीरज खंडागळे (35) आणि सागर रेडेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीत आणखी काही सेवानिवृत्त पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

'स्पेशल 26' चित्रपट पाहतच रचला कट

'स्पेशल 26' चित्रपटात दाखवलेल्या एका सीनप्रमाणे आरोपींनी निवडणुकीच्या काळात चोरीचा कट रचला होता. यातील वसंत नाईक हा मुख्य आरोपी असून वर्षभरापूर्वी त्याला म्हैसूर कॅफेतून काढले होते. मालकाच्या अंत्यत जवळचा व्यक्ती असल्याने मालकाच्या घरात दररोज येणाऱ्या पैशांची माहिती त्याला होती. मालकाने कामावरुन काढल्याचा राग त्याच्या मनात होता. हाच राग मनात ठेवत आरोपीने लुटीचा कट रचला होता. म्हैसूर कॅफेच्या मालकाच्या घरी रक्कम ठेवलेली असते हे आरोपी वसंत नाईकाला माहित होते. त्याने साथीदारांना आपल्या डोक्यात सुरू असलेली लुटीची योजना सांगितले. साथीदारांना देखील हा कट आवडला त्यांनी देखील तयारी दाखवली.

 

Share this article