TCS १२,००० कर्मचाऱ्यांना काढणार, कौशल्य आणि तंत्रज्ञान बदलाचा परिणाम!

Published : Jul 27, 2025, 07:57 PM IST
Ratan Tata's TCS loses

सार

Tata Consultancy Services (TCS) : टीसीएस आपल्या १२,२०० कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आणि कंपनीला भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.

Tata Consultancy Services (TCS) : भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी Tata Consultancy Services (TCS) आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २ टक्के म्हणजेच सुमारे १२,२०० कर्मचाऱ्यांना पुढील आर्थिक वर्षात (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) कमी करणार आहे. या निर्णयामागे बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची आणि कंपनीला भविष्यासाठी सक्षम करण्याची भूमिका आहे, असं CEO के. कृतिवासन यांनी सांगितलं.

कंपनीचा मोठा निर्णय, CEO म्हणाले, "हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय"

Moneycontrol ला दिलेल्या मुलाखतीत TCS चे CEO के. कृतिवासन म्हणाले, “AI आणि नव्या ऑपरेटिंग मॉडेलमुळे काम करण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणावर AI वापरत आहोत आणि भविष्यातील आवश्यक कौशल्यांची तपासणी करत आहोत. अनेक कर्मचाऱ्यांना करिअर ग्रोथसाठी संधी दिल्या गेल्या, मात्र काही भूमिका अशा आहेत ज्या पुन्हा उपयोगात आणणे शक्य नाही. त्यामुळे हा कठीण पण आवश्यक निर्णय घ्यावा लागला.” TCS चा एकूण कर्मचारी वर्ग सुमारे 6.13 लाख इतका आहे. त्यापैकी २ टक्के म्हणजे सुमारे १२,२०० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे कर्मचारी भारतासह अन्य देशांमधील असून, विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे.

कंपनीचा दावा, सहानुभूतीपूर्वक प्रक्रिया राबवणार

TCS ने सांगितले की, प्रभावित कर्मचाऱ्यांना नोटिस पिरियड वेतन, अतिरिक्त सेव्हरन्स पॅकेज, विमा लाभ, आणि बाह्य नोकरी शोधण्याच्या संधी (outplacement) दिल्या जातील. AIITEU चे सरचिटणीस सौभिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, “TCS ने जून-जुलै २०२५ मध्ये जॉईन होणाऱ्या किमान ५०० lateral hires च्या ऑनबोर्डिंगलाही विलंब दिला आहे.”

नवीन 'बेंच पॉलिसी'मुळे दबाव वाढला

12 जून 2025 रोजी, TCS च्या Resource Management Group (RMG) ने नवीन ‘बेंच पॉलिसी’ लागू केली. त्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याने वर्षभरात किमान 225 दिवस बिलेबल (billable) काम केलेले असणे आवश्यक आहे. तसेच कोणीही एका वर्षात ३५ दिवसांपेक्षा अधिक बेंचवर राहू शकत नाही.

बेंचवरील कर्मचाऱ्यांना राजीनाम्याचा पर्याय

एका कर्मचाऱ्याने Moneycontrol ला सांगितले की, “ज्यांना दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेंचवर आहे, त्यांना HR भेटायला बोलावून राजीनामा देण्यास सांगतात. राजीनामा दिल्यास ३ महिन्यांचे वेतन दिले जाते. मात्र नकार दिल्यास कंपनीकडून थेट सेवा समाप्त केली जाते आणि सेव्हरन्स वेतन दिले जात नाही.”

AI ही मुख्य कारण नाही, CEO ची स्पष्टोक्ती

AI मुळे कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली यावर CEO कृतिवासन यांनी स्पष्टीकरण दिले की, “हा निर्णय AI मुळे नसून, भविष्यातील योग्य कौशल्ये तयार करण्यासाठी आहे. हे ‘redeployment feasibility’ बद्दल आहे, ‘headcount reduction’ बद्दल नाही.”

मार्केट ट्रेंड आणि तंत्रज्ञान बदलाचा प्रभाव

विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ TCS पुरताच मर्यादित राहणार नाही. कंपनीचा AI चा वाढता वापर, testing सारख्या पारंपरिक स्किल्सचा मागासलेला उपयोग, आणि क्लायंट प्रोजेक्ट्सचे लहान व कमी कालावधीचे होणे या सर्वांमुळे ही restructuring पुढील काळात इतर IT कंपन्यांमध्येही पाहायला मिळू शकते.

TCS ने घेतलेला हा निर्णय निश्चितच धक्कादायक आहे, पण भविष्यातील स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी तो आवश्यक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कौशल्य अपग्रेड, प्रोजेक्टवर कार्यरत असणे, आणि सतत बदलत चाललेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हेच आता TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या युगाचे संकेत आहेत.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Gold Rate: 11 महिन्यांत सोनं किती महागलं, खरेदीआधी जाणून घ्या आजचा भाव
अनिल अंबानी यांनी Cobrapost आणि Economic Times विरोधात 41 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणावरून बदनामीचा दावा दाखल