Marathi

वारीचा अनुभव वारकरी म्हणून कसा असतो?

Marathi

पंढरपूर वारी – एक भक्तिमय प्रवास

वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ती एक भक्तीची, श्रद्धेची आणि आत्मशुद्धीची वाटचाल असते. लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात, टाळ-मृदुंगाच्या गजरात चालत पंढरपूरच्या दिशेने निघतात.

Image credits: social media
Marathi

वारकरी होण्याचा क्षण

पहिल्यांदा डोक्यावर फेटा, अंगात धोतर-उपरणा आणि हातात टाळ घेऊन वारीला निघालो तेव्हा मन भरून आलं. वाटेत अनोळखी पण आपुलकीने वागणारे लोक भेटतात. 

Image credits: social media
Marathi

भूक, विश्रांती घेऊन मनात समाधान असतं

ही एक संस्कृती आहे जिथे प्रत्येक वारकरी हा कुटुंबाचा भाग वाटतो. वारीत रोज १५-२० किमी चालावं लागतं. उन्हाचा त्रास, पाय दुखणं, पावसात भिजणं सगळं होतं.

Image credits: social media
Marathi

हरिपाठ, अभंग आणि विठूनाम

प्रत्येक सकाळ हरिपाठाने सुरू होते आणि रात्र अभंग गायनाने संपते. डोंगर-दऱ्या ओलांडत असताना एकच नाद कानात घुमतो "विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल!"

Image credits: social media
Marathi

पावसाचा विठोबा नामासोबतचा आनंद

पावसाळ्याचे दिवस असतात, अनेकदा ओलेचिंब होतो. पण त्या पावसातही नाचताना, भजन करताना मन विठोबाच्या चरणी वाहून जातं. वाटेतली चिखलट मातीही पवित्र वाटते.

Image credits: social media

Ashadhi Ekadashi 2025: मित्र मैत्रिणींना पाठवा शुभेच्छा संदेश

वारीत संत तुकाराम महाराजांच्या कोणत्या शिकवणी माहित होतात?

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ५ शिकवणी सांगा

देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं?