सफरचंद हे पावसाळ्यात खाण्यासाठी सर्वात चांगलं फळ मानलं जातं. सफरचंदामध्ये फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि ‘सी’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं.
Image credits: Social media
Marathi
पावसात लिंबू देखील आहे उत्तम पर्याय
लिंबू पाण्यामध्ये ‘व्हिटॅमिन C’ मुबलक प्रमाणात असतं, जे थंडी-खोकल्यासारख्या त्रासांपासून दूर ठेवतं. शरीरात डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबूपाणी उपयोगी ठरतं.
Image credits: Pinterest
Marathi
केळं – ऊर्जा देणारं आणि पचायला हलकं
पावसाळ्यात ऊर्जा टिकवून ठेवणं गरजेचं असतं. केळं हे झटपट ऊर्जा देणारं फळ आहे. त्यात पोटॅशियम आणि फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात.
Image credits: Pinterest
Marathi
पेरू – अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असलेलं फळ
पेरूमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे फळ पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यास मदत करतं. त्यातील फायबर्स पचन क्रिया सुधारतात.
Image credits: Pinterest
Marathi
निष्कर्ष
पावसाळ्यात सफरचंद, केळं, लिंबू आणि पेरू यांसारखी फळं शरीराला रोगप्रतिकारशक्ती देतात, पचन सुधारतात आणि ऊर्जा टिकवून ठेवतात.