येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. अशातच शंकराच्या मंदिरात जाऊन मोठ्या पूजा-प्रार्थना केली जाते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही ज्योतिर्लिंगांबद्दल अधिक…
त्र्यंबकेश्वर मंदिर हे सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. हे भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. हे मंदिर नाशिक विमानतळापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर आहे.
श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये मिळतो, जसे की शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण आणि महाभारत.हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे.
परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे. औंढा नागनाथ येथील जोतिर्लिंग शंकराचं येथील मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.