Operation Sindoor : पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त, मशीदींमधून 'घर सोडा'ची घोषणा

Published : May 07, 2025, 06:05 AM IST
Visuals of exchange of fire at border (Photo/ANI)

सार

India strikes: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि PoK मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, भारताने हा हल्ला आत्मरक्षणासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Operation Sindoor : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने इतिहासातील एक निर्णायक पाऊल उचलले ऑपरेशन सिंदूर. 7 मेच्या मध्यरात्री बरोबर 2 वाजता, भारतीय वायूदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) येथील 9 दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ला केला. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील ठिकाणं या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आली. भारताने याच तळांवरून देशावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याचा ठोस पुरावा मिळवल्यानंतर ही कारवाई केली.

मशीदींमधून भीतीची घोषणा

भारतीय हल्ल्यांनंतर पाकिस्तानमधील अनेक भागांत घबराट पसरली असून, मशीदींमधून नागरिकांना घरं सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सरकारनेच मशिदींमार्फत नागरिकांना तात्काळ सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक भागांमध्ये लोक घरं रिकामी करून सुरक्षित भागांत स्थलांतर करत आहेत.

पाकिस्तानची दहशतीची स्थिती

भारताच्या जोरदार कारवाईमुळे पाकिस्तान गोंधळलेल्या अवस्थेत आहे. लाहोर विमानतळावर तात्काळ आणीबाणी लागू करण्यात आली असून, प्रवाशांना तात्काळ परिसर रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली असून, काही विमानं वळवण्यात आली आहेत.

खोट्या आरोपांची खवखव

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर महिलांवर गोळीबार आणि मशिदी उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र भारताने यावर स्पष्ट केले की सर्व लक्ष्य केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केंद्रित होती आणि कोणत्याही नागरी ठिकाणाला धक्का पोहोचलेला नाही.

 

 

भारताचं स्पष्ट विधान

भारताने हा हल्ला आत्मरक्षणासाठी आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. पाहलगाम हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेला रोष आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची गरज या कारवाईमागचं प्रमुख कारण ठरलं.

'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कारवाई करण्यास तो मागे हटणार नाही. पाकिस्तानला याचा ठोस प्रत्यय आला आहे आणि आता ते परिणाम भोगत आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर