<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="yes"?>
<rss xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" version="2.0">
    <channel>
        <title>Asianet News Marathi</title>
        <link>https://marathi.asianetnews.com</link>
        <description><![CDATA[Marathi News - No.1 News channel in Maharashtra, which delivers Local and International news in Marathi language.]]></description>
        <image>
            <url>https://static-assets.asianetnews.com/images/ogimages/OG_Marathi.png</url>
            <width>143</width>
            <height>100</height>
            <link>https://marathi.asianetnews.com</link>
            <title>Asianet News Marathi</title>
        </image>
        <lastBuildDate>Tue, 09 Jun 2026 16:44:44 +0530</lastBuildDate>
        <atom:link href="https://marathi.asianetnews.com/rss/sports" rel="self" type="application/rss+xml"/>
        <item>
            <title><![CDATA[IPL 2026 : विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडकडे केले दुर्लक्ष? सामन्यानंतरच्या व्हिडीओवरून सोशल मीडियात चर्चा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/virat-kohli-snubs-travis-head-post-match-sparking-fan-debate-on-sportsmanship/articleshow-0lng8vw</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/virat-kohli-snubs-travis-head-post-match-sparking-fan-debate-on-sportsmanship/articleshow-0lng8vw</guid>
            <pubDate>Sat, 23 May 2026 08:29:34 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;IPL 2026 : SRH विरुद्धच्या मॅचमध्ये RCB हरल्यानंतर विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. मैदानावरील बाचाबाचीनंतर ही घटना घडली. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, खिलाडूवृत्तीवर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. पराभव होऊनही RCB ने पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर राहत क्वालिफायर 1 मध्ये जागा मिळवली आहे.&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01ks8mf7qb6jnhs18kss4tpzkz,imgname-untitled-design-1779480108779.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;IPL 2026 :&lt;/strong&gt; स्टार बॅटर विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुक्रवारी, २२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या आयपीएल २०२६ च्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा पराभव झाला. या मॅचनंतर विराटने ट्रॅव्हिस हेडसोबत हस्तांदोलन करणं टाळल्याचं दिसलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;या मॅचमध्ये RCB चा ५५ रन्सनी पराभव झाला असला तरी, टीमने लीग स्टेजमध्ये टेबल टॉपर म्हणून आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे RCB क्वालिफायर १ साठी पात्र ठरली आहे. SRH ला RCB चा नेट रन रेट (NRR) मागे टाकण्यासाठी मोठ्या फरकाने विजय आवश्यक होता, पण त्यांना ते जमलं नाही. २५६ रन्सच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना, RCB ने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून २०० रन्स केले. कॅप्टन रजत पाटीदारने अर्धशतक झळकावलं, तर कृणाल पंड्याने ४१ रन्सची तुफानी खेळी केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;SRH कडून गोलंदाजीत ईशान मलिंगाने ४ ओव्हर्समध्ये ८.२० च्या इकॉनॉमी रेटने ३३ रन्स देत २ विकेट्स घेतल्या. साकिब हुसेन (१/३१) आणि ट्रॅव्हिस हेड (१/७) यांनी प्रत्येकी एक विकेट घेत आपल्या टीमला घरच्या मैदानावर मोठा विजय मिळवून दिला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;कोहलीने हेडकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ व्हायरल&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव होऊनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर राहत क्वालिफायर १ मध्ये जागा मिळवली. पण यानंतर सगळ्यांचं लक्ष मॅचनंतरच्या एका नाट्यमय घटनेकडे वेधलं गेलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;मॅच संपल्यावर दोन्ही टीम्स हस्तांदोलनासाठी रांगेत उभ्या होत्या. त्यावेळी विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील एका क्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराटने पॅट कमिन्स आणि अभिषेक शर्मा यांच्याशी हस्तांदोलन केलं, पण त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या हेडकडे त्याने साफ दुर्लक्ष केलं. हस्तांदोलन करण्याऐवजी, कोहली सरळ पुढे बघत हेडच्या बाजूने निघून गेला.&lt;/p&gt;&lt;p&gt;हस्तांदोलनासाठी पुढे केलेला हात तसाच राहिल्याने ट्रॅव्हिस हेड चांगलाच आश्चर्यचकित झाला. काही सेकंद त्याचा हात तसाच हवेत होता. चेहऱ्यावर गोंधळलेल्या भावनेने त्याने आपला हात मागे घेतला आणि तो पुढच्या खेळाडूकडे वळला.&lt;/p&gt;&lt;p&gt;Wtf kohli refused to hand shake Travis Head What type of EGO is this?  pic.twitter.com/2unxKR6tyN&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; `mr. villa (@Luccydevil07) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;ही घटना घडण्याआधी, RCB च्या रन चेसवेळी विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी फिल्डिंगमधून सल्ला देणाऱ्या हेडला विराटने, &quot;जास्त माहिती असेल तर तूच बॉलिंग कर,&quot; असं काहीतरी म्हटल्याचं दिसलं. मात्र, त्यावेळी हेडने कोहलीच्या बोलण्यावर जास्त प्रतिक्रिया न देता शांत राहणं पसंत केलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;Embed&lt;/p&gt;&lt;p&gt;याआधी, पहिल्या इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये रसिक सलाम दारने एका भेदक यॉर्करवर ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केलं होतं. त्यावेळी विराट कोहली खूपच उत्साहात दिसला होता. दारच्या आधीच्या तीन बॉल्सवर सलग बाऊंड्री मारणाऱ्या हेडला तो यॉर्कर कळलाच नाही आणि बॉल थेट स्टंप्सवर जाऊन आदळला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;मॅचनंतरच्या या घटनेवर फॅन्सच्या प्रतिक्रिया&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर, विशेषतः X (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. या घटनेवरून क्रिकेट चाहते आणि विश्लेषकांमध्ये दोन गट पडले आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;अनेकांनी X वर आपल्या प्रतिक्रिया देत कोहलीच्या वागण्याला 'अनादर' म्हटलं आहे. हेडने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असतानाही त्याला दुर्लक्षित केल्याबद्दल काहींनी कोहलीवर टीका केली. तर काहींच्या मते, मॅच दरम्यान हेडने नक्कीच काहीतरी चुकीचं बोललं असेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;अनेक चाहत्यांनी कोहलीला नम्र राहण्याचा सल्ला दिला आहे. मैदानावरची बाचाबाची मॅचनंतरच्या खिलाडूवृत्तीवर परिणाम करू नये, असं मत अनेकांनी व्यक्त केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;Genuinely disrespectful from KohliJudging by the clips doing the rounds, what happened between Head and Kohli was nothing more than the usual on-field banter https://t.co/hTIJpPDV5q&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Shaan Waseem (@shaanwaseem2) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Travis Head extended his hand in true cricket spirit. Virat Kohli walked past. This isn't the respect the game deserves#SRHvsRCB #SRHvRCB pic.twitter.com/GrwpJN5HW2&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Shashank (@Shashankmsdian) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Genuinely asking: Why Virat Kohli didn&rsquo;t shake hands with Travis Head? pic.twitter.com/uYvuUmpSF0&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Abhishek Kumar (@Abhishek060722) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Virat Kohli should have shaken hands. When Travis Head was offering a handshake, Virat should have done the same. Too much ego and too much aggression is not right either. When you&rsquo;re such a big player, staying humble matters too. pic.twitter.com/JeF587jtlh&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Arav (@context313) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Come on Virat you should have shook that hand. It wasn't something big. https://t.co/6r1KFfb4H3&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Archer (@poserarcher) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Virat was continuously saying something to Travis Head while Kohli was batting&amp;nbsp;Not really sure what happened? But the reaction? https://t.co/Asr7lT9sTY&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; The Reverse Sweep (@trspodcastt) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;I think Travis Head might have said something to Virat Kohli during their battle and Virat probably didn&rsquo;t like it.&amp;nbsp;That could be the reason there was no handshake from Virat after the match.&amp;nbsp;He looked a bit upset after the game.&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Cricholic (@Cricholic340626) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Virat will have his reasons.But really not cool to disrespect another sportsman like this.Unless until Travis Haa crossed the line &amp;amp; made some personal comments or mentioned Vitas family.&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Rahul D / राहुल (@rdalwale) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Head said something to Venky Iyer and Kohli in 4th over , head is no saint . He is known to say creepy words .https://t.co/d98SCOdd22&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Riki (@Riki_tweets) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;He first said something wrong to Venky, then some creepy to Kohli&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Chirag Goyal (@chiraggoyal2734) May 22, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना आता क्वालिफायर १ मध्ये गुजरात टायटन्सशी होणार आहे. यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये जाईल, तर पराभूत संघाला क्वालिफायर २ मध्ये खेळून फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा सामना एलिमिनेटरमध्ये चौथ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. या मॅचमध्ये पराभव झाल्यास संघाचं आव्हान संपुष्टात येईल, तर विजयामुळे त्यांना क्वालिफायर २ मध्ये खेळण्याची संधी मिळेल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/virat-kohli-snubs-travis-head-post-match-sparking-fan-debate-on-sportsmanship/articleshow-0lng8vw"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[युवराज सिंगची कमेंट झाली व्हायरल, या ३ खेळाडूंचे नाव घेऊन केले आरोप]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/yuvraj-singh-comment-has-gone-viral/articleshow-17xkrnv</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/yuvraj-singh-comment-has-gone-viral/articleshow-17xkrnv</guid>
            <pubDate>Mon, 25 May 2026 11:55:57 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;पंजाब किंग्सच्या आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि प्रियांश आर्य यांच्या फोटोवर एक मजेशीर कमेंट केली आहे. युवराजने &quot;तुम्हा सगळ्यांना चपलेने मारण्याची वेळ आली आहे,&quot; असे म्हटले.&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kg2e3kexsev2wq17j4nc3yyg,imgname-gettyimages-924590870-1769608433117.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;IPL 2026 च्या हंगामात पंजाब किंग्स पुन्हा एकदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची एक सोशल मीडिया कमेंट सध्या जोरदार चर्चेत आली आहे. पंजाबच्या काही खेळाडूंवर युवराजने मजेशीर पण टोलेबाज शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;कोण आहेत हे खेळाडू&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;ही चर्चा सुरू झाली हरप्रीत ब्रार याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे. या फोटोमध्ये प्रियांश आर्य, अर्शदिप सिंग आणि हरप्रीत ब्रार एकत्र दिसत होते. फोटोला दिलेल्या मजेशीर कॅप्शननंतर युवराज सिंगने कमेंट करत, &ldquo;आता तुम्हा सगळ्यांना चपलेने मारण्याची वेळ आली आहे,&rdquo; असे लिहिले. त्याची ही कमेंट काही वेळातच व्हायरल झाली.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;रागाच्या भरात दिली प्रतिक्रिया&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;विशेष म्हणजे युवराज सिंगचा प्रियांश आर्याशी जवळचा संबंध मानला जातो. प्रियांशने अनेकदा युवराजकडून मार्गदर्शन घेतल्याचं बोललं जातं. त्यामुळे युवराजची ही प्रतिक्रिया रागापेक्षा मित्रत्वाच्या शैलीत केली गेली असावी, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. पंजाब किंग्सचा संघ यंदाही अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. संघातील काही खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर चांगली कामगिरी केली असली, तरी संघाला सातत्य राखण्यात अपयश आलं. त्यामुळे पंजाबचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग पुन्हा अडला.&lt;/p&gt;&lt;p&gt;दरम्यान, अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवरही प्रश्न उपस्थित झाले होते. काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यामुळे पंजाबच्या चाहत्यांकडूनही संघ व्यवस्थापनावर आणि खेळाडूंवर टीका होताना दिसली. युवराज सिंगची ही कमेंट मजेत केली असली तरी सोशल मीडियावर ती प्रचंड चर्चेत आली आहे. अनेक चाहत्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी पंजाब किंग्सच्या सातत्याने होणाऱ्या अपयशावर नाराजी व्यक्त केली. IPL संपत आलं असतानाच या व्हायरल कमेंटने क्रिकेटविश्वात वेगळीच रंगत आणली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/yuvraj-singh-comment-has-gone-viral/articleshow-17xkrnv"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[IPL 2026: आयपीएल स्टार असूनही मोठ्या कंपन्या वैभव सूर्यवंशीपासून दूर, नेमकं काय झालं?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/despite-being-an-ipl-star-big-companies-are-staying-away-from-vaibhav-suryavanshi/articleshow-2q8pzz1</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/despite-being-an-ipl-star-big-companies-are-staying-away-from-vaibhav-suryavanshi/articleshow-2q8pzz1</guid>
            <pubDate>Sat, 06 Jun 2026 23:23:09 +0530</pubDate>
            <description><![CDATA[IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने विक्रमी कामगिरी केली. मात्र, त्याच्या लोकप्रियतेनंतरही काही मोठ्या कंपन्या बदललेल्या मार्केटिंग धोरणांमुळे IPL प्रायोजकत्वापासून दूर राहत आहेत. कंपन्या आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने IPL च्या जाहिरात विश्वात बदल दिसून येत आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01knrzr83kmafzsj2tx0mgan3n,imgname-vaibhav-suryavanshi-ank-jyotish-01-1775733842035.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या खेळाडूंमध्ये होता. अवघ्या 15 वर्षांच्या या खेळाडूने संपूर्ण हंगामात धडाकेबाज फलंदाजी करत मोठी छाप पाडली. मात्र, त्याच्या लोकप्रियतेनंतरही काही मोठ्या कंपन्या IPL प्रायोजकत्वापासून दूर राहत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;कंपन्यांच्या मार्केटिंग धोरणात बदल&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;गेल्या काही वर्षांत IPL हे ब्रँड प्रमोशनसाठी सर्वात मोठे व्यासपीठ मानले जात होते. मात्र आता अनेक कंपन्या डिजिटल प्लॅटफॉर्म, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि लक्ष्यित जाहिरात मोहिमांकडे अधिक भर देत आहेत. त्यामुळे IPL वरील जाहिरातींसाठी मोठा खर्च करण्याबाबत काही कंपन्या सावध भूमिका घेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये 16 सामन्यांत 776 धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. त्याचा स्ट्राइक रेट 237 पेक्षा अधिक राहिला. युवा वयात केलेल्या या कामगिरीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतील सर्वात मोठा आकर्षणबिंदू ठरला. क्रिकेटपटूंची लोकप्रियता वाढत असली तरी ब्रँड गुंतवणूक करताना कंपन्या केवळ स्टारडम पाहत नाहीत. ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा खर्च, गुंतवणुकीवरील परतावा आणि डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव या बाबीही महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे IPL चा प्रभाव कायम असला तरी जाहिरातदारांची रणनीती बदलताना दिसत आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;IPL अजूनही मोठे व्यासपीठ&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;तज्ज्ञांच्या मते, काही कंपन्या मागे सरकत असल्या तरी IPL चे व्यावसायिक महत्त्व कमी झालेले नाही. देशभरातील कोट्यवधी प्रेक्षक, सोशल मीडियावरील प्रचंड पोहोच आणि युवा प्रेक्षकवर्ग यामुळे ही स्पर्धा अजूनही ब्रँड्ससाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र आता कंपन्या अधिक विचारपूर्वक आणि निवडक गुंतवणूक करत आहेत. वैभव सूर्यवंशीसारख्या नव्या स्टार्सच्या उदयामुळे IPL ची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील हंगामात मोठ्या कंपन्या पुन्हा आक्रमकपणे मैदानात उतरतात की डिजिटल मार्केटिंगलाच प्राधान्य देतात, याकडे क्रीडा आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/despite-being-an-ipl-star-big-companies-are-staying-away-from-vaibhav-suryavanshi/articleshow-2q8pzz1"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[सॅटनरचा गौप्यस्फोट, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे बुडवले पैसे]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/which-mumbai-indians-player-money-was-stolen/articleshow-3q9y2ob</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/which-mumbai-indians-player-money-was-stolen/articleshow-3q9y2ob</guid>
            <pubDate>Wed, 03 Jun 2026 23:00:22 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिशेल सॅटनरने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीवर आयपीएल 2026 च्या करारातील पूर्ण मानधन न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यानंतर त्याला दोन कोटी रुपयांपैकी केवळ अर्धीच रक्कम मिळाल्याचा दावा त्याने केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01krb7ejce6f4qnb7y8b22ne57,imgname-mumbai-indians--1--1778493376910.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;आयपीएल 2026 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबई इंडियन्स संघ नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिशेल सॅटनर याने फ्रँचायझीवर करारातील पूर्ण मानधन न दिल्याचा आरोप केला असून क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;गंभीर दुखापतींचा केला सामना&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;यंदाच्या हंगामात सँटनरला दुखापतींनी मोठा फटका बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती आणि त्याच्या जागी केशव महाराज याची निवड करण्यात आली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून फारच कमी सामने खेळू शकला. एका पॉडकास्टमध्ये बोलताना सँटनरने सांगितले की, त्याने संघासाठी खेळताना गंभीर दुखापतींचा सामना केला, मात्र त्यानंतरही त्याला करारातील संपूर्ण रक्कम मिळाली नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, दोन कोटी रुपयांच्या करारापैकी केवळ अर्धेच पैसे त्याच्या खात्यात जमा करण्यात आले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;सर्वांचे लक्ष लागले&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;सँटनरने दुखापतींची माहिती देताना सांगितले की, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पुनरागमन केल्यावर डाव्या खांद्यालाही दुखापत झाली. या दुहेरी धक्क्यामुळे त्याचा संपूर्ण हंगाम जवळपास वाया गेला आणि त्याला केवळ काही सामने खेळण्याची संधी मिळाली. या प्रकरणामुळे आयपीएलमधील खेळाडूंच्या मानधनाच्या नियमांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. स्पर्धेच्या काळात किंवा संघाच्या अधिकृत कामगिरीदरम्यान खेळाडू जखमी झाल्यास त्याला पूर्ण करार रक्कम देण्याची तरतूद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सँटनरच्या दाव्यात किती तथ्य आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;दरम्यान, मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सँटनरला उर्वरित मानधन नंतर मिळणार आहे की प्रत्यक्षात रक्कम कपात करण्यात आली आहे, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आरोपांमुळे आयपीएलनंतरचा क्रिकेटमधील सर्वात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/which-mumbai-indians-player-money-was-stolen/articleshow-3q9y2ob"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[विराट कोहली वर्ल्डकपपूर्वी घेणार निवृत्ती, माहिती देत काय म्हणाला?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/when-will-virat-kohli-retire/photoshow-493l72b</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/when-will-virat-kohli-retire/photoshow-493l72b</guid>
            <pubDate>Fri, 15 May 2026 16:20:58 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये केलेल्या एका भावनिक वक्तव्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kq1vz7th47kg1thettjp89ng,imgname-virat-kohli-1777105608529.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये केलेल्या एका भावनिक वक्तव्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या खेळामुळे नव्हे तर निवृत्तीबाबत दिलेल्या संकेतांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. 2027 च्या वनडे वर्ल्डकपपूर्वीच तो क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आलं आहे.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहलीने एक भावनिक वक्तव्य केलं. &ldquo;जर मला स्वतःची योग्यता सिद्ध करण्याची वेळ आली, तर ती माझ्यासाठी योग्य जागा राहणार नाही,&rdquo; असे तो म्हणाला. त्याच्या या विधानामुळे चाहत्यांनी निवृत्तीचे संकेत म्हणून त्याकडे पाहायला सुरुवात केली आहे.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;2027 च्या वनडे वर्ल्डकपबाबत विचारले असता विराटने &ldquo;जर मी तेव्हा खेळत असेन तर...&rdquo; असे उत्तर दिले. त्यामुळे तो आगामी काही वर्षांत क्रिकेटमधून दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तो फक्त वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय असून टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;विराट कोहलीचा जागतिक स्तरावर मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर त्याच्या प्रत्येक पोस्टला लाखो प्रतिक्रिया मिळतात. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये निराशा आणि भावनिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर &ldquo;क्रिकेट विराटशिवाय अपूर्ण वाटेल&rdquo; अशा भावना व्यक्त केल्या.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;गेल्या काही वर्षांपासून विराट पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसोबत अधिक वेळ घालवत आहे. तो लंडनमध्ये स्थायिक झाल्याच्या चर्चाही अनेकदा समोर आल्या आहेत. क्रिकेटबरोबरच आता तो वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देताना दिसत असल्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;विराट कोहलीच्या भविष्यातील निर्णयाकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. फिटनेस, फॉर्म आणि मानसिक तयारी या गोष्टींवर तो नेहमी भर देत आला आहे. त्यामुळे आगामी काळात तो नेमका कोणता निर्णय घेतो, याकडे चाहत्यांसह बीसीसीआयचंही लक्ष असेल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/when-will-virat-kohli-retire/photoshow-493l72b"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[IPL 2026 Final : हस्तांदोलनाऐवजी नमस्कार; विराट कोहलीसमोर वैभव सूर्यवंशीचा संस्कारी अंदाज चर्चेत (Watch Video)]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/virat-kohli-vaibhav-suryavanshi-viral-meeting-ipl-2026-final-rcb-champion/articleshow-fp5q27s</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/virat-kohli-vaibhav-suryavanshi-viral-meeting-ipl-2026-final-rcb-champion/articleshow-fp5q27s</guid>
            <pubDate>Mon, 01 Jun 2026 10:14:43 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;IPL 2026 Final : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सचा पराभव करून सलग दुसरे विजेतेपद पटकावले. मात्र सामन्यानंतर विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी यांच्यातील एक भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kszrsgj5z7097nkb1vbphp22,imgname-vaibhav-sooryavanshi-and-virat-kohli-1780256391749.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;IPL 2026 Final : &lt;/strong&gt;अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यानंतर आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच एक वेगळाच क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यातील भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, वैभवच्या नम्र वागणुकीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;विराट आणि वैभवची भेट; नमस्काराने जिंकली सर्वांची मने&lt;/h2&gt;&lt;p&gt;आरसीबीच्या विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होता. सामना संपल्यानंतर विराट कोहली स्वतः वैभवला भेटण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी वैभव आरसीबीचा फिरकीपटू सुयश शर्मा आणि अन्य खेळाडूंशी संवाद साधत होता.&lt;/p&gt;&lt;p&gt;विराटने हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यानंतर वैभवने अत्यंत नम्रपणे हात जोडून त्याला नमस्कार केला. युवा खेळाडूच्या या संस्कारी कृतीने विराटदेखील प्रभावित झाला. त्याने वैभवच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी काही क्षण संवाद साधला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;King meets Bihari Monster  pic.twitter.com/927R0z8kF3&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; सीतामढ़ी जिला  (@SitamarhiJila) June 1, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;h2&gt;&amp;nbsp;कोहलीची दमदार खेळी; RCB पुन्हा चॅम्पियन&lt;/h2&gt;&lt;p&gt;फायनलमध्ये गुजरात टायटन्सने दिलेले 156 धावांचे आव्हान आरसीबीने पाच गडी राखून पूर्ण केले. विराट कोहलीने पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात जबाबदारी उचलत 42 चेंडूत नाबाद 75 धावांची शानदार खेळी केली.त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. व्यंकटेश अय्यर आणि टिम डेव्हिड यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुजरातकडून रशीद खानने दोन बळी घेतले, मात्र कोहलीसमोर गुजरातचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक आयपीएल हंगाम&lt;/h2&gt;&lt;p&gt;राजस्थान रॉयल्स संघ अंतिम फेरी गाठू शकला नसला तरी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी हा हंगाम अविस्मरणीय ठरला. संपूर्ण स्पर्धेत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने जगातील नामांकित गोलंदाजांना धक्का दिला. 15 सामन्यांत त्याने 48.50 च्या सरासरीने आणि तब्बल 237.70 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या. या धावांमध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता.&lt;/p&gt;&lt;h2&gt;वैभवने जिंकले तब्बल पाच मोठे पुरस्कार&lt;/h2&gt;&lt;p&gt;आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने एकाच हंगामात पाच प्रतिष्ठेचे पुरस्कार जिंकत नवा इतिहास रचला.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;मिळालेले पुरस्कार:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;ऑरेंज कॅप (776 धावा)&lt;/li&gt; &lt;li&gt;मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन&lt;/li&gt; &lt;li&gt;इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन&lt;/li&gt; &lt;li&gt;सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन&lt;/li&gt; &lt;li&gt;सुपर सिक्सर्स ऑफ द सीझन&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;p&gt;या कामगिरीनंतर त्याला भारतीय टी-20 संघात तातडीने संधी देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आता भारत &lsquo;अ&rsquo; संघाकडून मैदानात उतरणार&lt;/h2&gt;&lt;p&gt;आयपीएल संपल्यानंतर वैभवला विश्रांती मिळणार नाही. आगामी भारत &lsquo;अ&rsquo;, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील त्रिकोणी एकदिवसीय मालिकेसाठी त्याची भारत &lsquo;अ&rsquo; संघात निवड झाली आहे. 9 जूनपासून श्रीलंकेत सुरू होणाऱ्या या स्पर्धेत वैभव भारतीय जर्सीत पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची झलक दाखवताना दिसणार आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/virat-kohli-vaibhav-suryavanshi-viral-meeting-ipl-2026-final-rcb-champion/articleshow-fp5q27s"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[टीम इंडियात मोठे फेरबदल, वैभव सूर्यवंशीला वरिष्ठ गटात खेळायची मिळाली संधी]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-got-the-opportunity-to-play-in-a-big-group/articleshow-iylrk6x</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-got-the-opportunity-to-play-in-a-big-group/articleshow-iylrk6x</guid>
            <pubDate>Sat, 06 Jun 2026 17:21:09 +0530</pubDate>
            <description><![CDATA[भारतीय टी-20 संघात मोठे बदल झाले असून, श्रेयस अय्यरला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. माजी कर्णधार सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले असून, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्रथमच संधी मिळाली आहे. हे बदल आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी करण्यात आले आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01krvcmgvcrth5kaeazp70mrpa,imgname-vaibhav-suryawanshi-most-sixes-record-1779035685740.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;टीम इंडियात मोठा बदल; टी-20 संघाला नवा कर्णधार, सूर्यकुमार बाहेर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टी-20 संघात नेतृत्वाची धुरा आता श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील पर्व संपुष्टात आले असून निवड समितीने नव्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने श्रेयस अय्यरची टी-20 कर्णधार म्हणून निवड केली आहे. आयपीएल आणि इतर स्पर्धांमधील त्याच्या नेतृत्वगुणांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तिलक वर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे माजी कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ कर्णधारपदावरून हटवण्यात आले नाही, तर त्याला संघातही स्थान मिळालेले नाही. निवडकर्त्यांनी त्याच्या अलीकडील कामगिरीचा आणि आगामी दोन वर्षांच्या नियोजनाचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक एन्ट्री&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्रथमच भारतीय वरिष्ठ टी-20 संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. त्याला पदार्पणाची संधी मिळाल्यास भारतीय पुरुष संघासाठी खेळणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरण्याची शक्यता आहे. विश्वचषक विजेत्या संघाचा गाभा कायम ठेवत निवडकर्त्यांनी काही नव्या खेळाडूंनाही संधी दिली आहे. युवा प्रतिभेला प्रोत्साहन देत भविष्यातील संघबांधणीवर भर दिला जात असल्याचे या निवडींवरून दिसून येते. काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;भारतीय टी-20 क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;श्रेयस अय्यरचे नेतृत्व, वैभव सूर्यवंशीसारख्या युवा खेळाडूंचा समावेश आणि सूर्यकुमार यादवसारख्या वरिष्ठ खेळाडूची अनुपस्थिती यामुळे भारतीय टी-20 संघ एका नव्या पर्वात प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे. आता या बदलांचा आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर किती सकारात्मक परिणाम होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-got-the-opportunity-to-play-in-a-big-group/articleshow-iylrk6x"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[IPL Match Today : आज कुणाचा सामना? पंजाब-दिल्ली धर्मशाळात भिडणार, एका चुकीने प्लेऑफचं स्वप्न भंगणार!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/ipl-2026-match-55-punjab-kings-vs-delhi-capitals-preview-key-players-and-playoff-scenarios/articleshow-mk287v6</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/ipl-2026-match-55-punjab-kings-vs-delhi-capitals-preview-key-players-and-playoff-scenarios/articleshow-mk287v6</guid>
            <pubDate>Mon, 11 May 2026 08:25:21 +0530</pubDate>
            <description><![CDATA[IPL 2026 मध्ये आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स धर्मशाळात आमनेसामने असतील. सलग तीन पराभवानंतर पंजाबला पुनरागमन करायचंय, तर दिल्लीसाठी एक पराभव प्लेऑफच्या आशा जवळपास संपवू शकतो.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01knfhfn6t2g02vspanrvfm2qh,imgname-ipl-2026-aaj-kiska-match-hai-1775416890585.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;11th May IPL 2026:&lt;/strong&gt; आयपीएल 2026 च्या 55 व्या मॅचमध्ये आज, म्हणजे सोमवार 11 मे रोजी, पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होणार आहे. ही मॅच धर्मशाळात खेळली जाईल. पंजाब किंग्सने (PBKS) आयपीएल 2026 ची सुरुवात तर एकदम झोकात केली होती. एकामागोमाग एक मॅच जिंकत त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये टॉपचं स्थान मिळवलं होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. पंजाब सलग तीन मॅच हरलाय आणि टेबलमध्ये पहिल्या स्थानावरून खाली घसरला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सलग पराभव, पण कारणं वेगवेगळी&lt;/h2&gt;&lt;p&gt;पण एक चांगली गोष्ट म्हणजे, जर पंजाबने आज धर्मशाळात दिल्ली कॅपिटल्सला हरवलं, तर ते पुन्हा टॉपवर पोहोचू शकतात. पण सलग चौथा पराभव झाला, तर टॉप-2 मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसेल. पंजाबच्या पराभवांमध्ये कोणतीही एकच कमजोरी दिसून आलेली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध टीम 222 रन्सचा मोठा स्कोर वाचवू शकली नाही. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध बॅटिंग करताना त्यांना फक्त 163 रन्स करता आले. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 236 रन्सचं टार्गेट चेस करताना ते हरले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;खराब फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी&lt;/h2&gt;&lt;p&gt;या सगळ्या मॅचेसमध्ये टीमची फिल्डिंग ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. रिपोर्ट्सनुसार, पंजाबने आतापर्यंत 16 कॅच सोडले आहेत. एकट्या शशांक सिंगने 5 कॅच टाकले आहेत. या बाबतीत फक्त चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या पुढे आहे, ज्यांनी 17 कॅच सोडले आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;...तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाहेर होणार&lt;/h2&gt;&lt;p&gt;दिल्ली कॅपिटल्सची अवस्थाही फार काही चांगली नाही. टीमने मागच्या सहा मॅचपैकी पाच गमावल्या आहेत. नुकतंच कॅप्टन अक्षर पटेल म्हणाला होता की, टीम पुढच्या सीजनची तयारी आणि बेंच स्ट्रेंथला संधी देण्यावरही लक्ष देऊ शकते. अर्थात, दिल्ली अजूनही अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेली नाही. पण जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला हरवलं आणि दिल्ली पंजाबकडून हरली, तर DC चं स्पर्धेतून बाहेर होणं जवळपास निश्चित होईल. दिल्ली अजूनही शर्यतीत टिकून असल्यामुळे, टीम आपल्या सध्याच्या प्लेइंग XI वरच विश्वास ठेवू शकते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;मागच्या मॅचमध्ये पंजाबने रचला होता विक्रम&lt;/h2&gt;&lt;p&gt;या सीजनच्या सुरुवातीला जेव्हा दोन्ही टीम्स दिल्लीत भिडल्या होत्या, तेव्हा पंजाब किंग्सने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा रन चेस पूर्ण केला होता. पंजाबने 265 रन्सचं मोठं लक्ष्य सात बॉल बाकी असतानाच गाठलं होतं. आता दिल्ली कॅपिटल्स ही मॅच जिंकून हिशोब चुकता करते की नाही, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;PBKS टीममध्ये बदलांचे संकेत&lt;/h2&gt;&lt;p&gt;अजमतउल्ला ओमरजई टीममध्ये आल्यानंतर पंजाबचे बॉलिंग कोच जेम्स होप्स यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. हरप्रीत बरारला दुसरा स्पिनर म्हणून संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पंजाब किंग्स संभाव्य प्लेइंग XI&lt;/h2&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;प्रियांश आर्य&lt;/li&gt; &lt;li&gt;प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)&lt;/li&gt; &lt;li&gt;कूपर कोनोली&lt;/li&gt; &lt;li&gt;श्रेयस अय्यर (कर्णधार)&lt;/li&gt; &lt;li&gt;मार्कस स्टोयनिस&lt;/li&gt; &lt;li&gt;अजमतुल्लाह ओमरजई&lt;/li&gt; &lt;li&gt;शशांक सिंग&lt;/li&gt; &lt;li&gt;मार्को यानसन&lt;/li&gt; &lt;li&gt;हरप्रीत बरार&lt;/li&gt; &lt;li&gt;अर्शदीप सिंग&lt;/li&gt; &lt;li&gt;युजवेंद्र चहल&lt;/li&gt; &lt;li&gt;विजयकुमार वैशाक&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग XI&lt;/h2&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;पथुम निसंका&lt;/li&gt; &lt;li&gt;केएल राहुल (विकेटकीपर)&lt;/li&gt; &lt;li&gt;नीतिश राणा&lt;/li&gt; &lt;li&gt;समीर रिझवी&lt;/li&gt; &lt;li&gt;ट्रिस्टन स्टब्स&lt;/li&gt; &lt;li&gt;अक्षर पटेल (कर्णधार)&lt;/li&gt; &lt;li&gt;आशुतोष शर्मा&lt;/li&gt; &lt;li&gt;विप्रज निगम&lt;/li&gt; &lt;li&gt;मिचेल स्टार्क&lt;/li&gt; &lt;li&gt;कुलदीप यादव&lt;/li&gt; &lt;li&gt;लुंगी एनगिडी&lt;/li&gt; &lt;li&gt;मुकेश कुमार&lt;/li&gt;&lt;/ul&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/ipl-2026-match-55-punjab-kings-vs-delhi-capitals-preview-key-players-and-playoff-scenarios/articleshow-mk287v6"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Mumbai Indians: हार्दिक पंड्या पर्व संपणार? टीम सोडण्यामागची 'आतली' गोष्ट समोर!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/hardik-pandya-reportedly-decides-to-leave-mumbai-indians-after-ipl-2026/articleshow-pg9wu8z</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/hardik-pandya-reportedly-decides-to-leave-mumbai-indians-after-ipl-2026/articleshow-pg9wu8z</guid>
            <pubDate>Fri, 29 May 2026 23:22:14 +0530</pubDate>
            <description><![CDATA[IPL 2027 पूर्वी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडू शकतो का? मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यापैकी प्रबळ दावेदार कोण? आणि IPL 2026 मध्ये हार्दिक पंड्यावर इतका मानसिक दबाव का वाढला होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर आली आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kmg0sv1539ag5xhxvz4weg0p,imgname-gettyimages-2209503212-1774359211045.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;मुंबई इंडियन्स (MI) नेहमीच आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि चर्चेत असलेली टीम राहिली आहे. पण गेल्या दोन सीझनमध्ये टीममधील बदल, दबाव आणि वादाच्या ज्या बातम्या समोर आल्या, त्यामुळे या झगमगत्या फ्रँचायझीची प्रतिमा थोडी बदलली आहे. आता IPL 2026 संपताच एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही गोष्ट त्याने सीझनच्या मध्यातच टीम मॅनेजमेंटला सांगितली होती. जर हा निर्णय अधिकृत झाला, तर हा फक्त एका खेळाडूने टीम सोडण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर मुंबई इंडियन्ससाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो.&lt;/p&gt;&lt;h2&gt;मानसिकरित्या खचला होता हार्दिक पंड्या&lt;/h2&gt;&lt;p&gt;वृत्तसंस्था पीटीआयच्या (PTI) रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्या IPL 2026 दरम्यान मानसिकरित्या प्रचंड तणावात होता आणि पूर्णपणे थकून गेला होता. सततची टीका, खराब निकाल आणि टीममधील वाढत्या दबावाचा त्याच्यावर खोल परिणाम झाला. रिपोर्टमध्ये असाही दावा केला आहे की, पंड्या पाठीच्या दुखापतीशीही झुंजत होता. जशा मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपल्या, तसं हार्दिकने टीम मॅनेजमेंटला स्पष्ट केलं की त्याला पुढच्या सीझनमध्ये टीमसोबत राहायचं नाहीये.&lt;/p&gt;&lt;h2&gt;रोहित शर्माकडून कॅप्टन्सी घेणं ठरलं टर्निंग पॉईंट&lt;/h2&gt;&lt;p&gt;हार्दिक पंड्याला 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनवण्यात आलं होतं. त्यावेळी टीमने पाच वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला हटवून हा मोठा निर्णय घेतला होता. या बदलामुळे चाहते दोन गटांत विभागले गेले. स्टेडियममध्ये अनेकदा हार्दिक पंड्याला प्रेक्षकांच्या टीकेचा (hooting) सामना करावा लागला. चाहत्यांचा एक मोठा वर्ग हा बदल स्वीकारू शकला नाही. हार्दिकने नेहमीच सार्वजनिक ठिकाणी संयम ठेवला आणि या प्रवासाला &quot;अवघड पण इंटरेस्टिंग&quot; म्हटलं. पण आतला दबाव सतत वाढत होता.&lt;/p&gt;&lt;h2&gt;ड्रेसिंग रूममध्येही सगळं आलबेल नव्हतं&lt;/h2&gt;&lt;p&gt;रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्येही पूर्णपणे एकजूट दिसत नव्हती. काही सिनियर खेळाडूंचे टीमची दिशा आणि निर्णयांबद्दल वेगळे मत होते. सूत्रांनुसार, हार्दिक या गोष्टीमुळेही निराश होता की, भारतीय टीममध्ये खेळताना ज्या खेळाडूंकडून 100 टक्के कमिटमेंटची अपेक्षा केली जाते, तेच खेळाडू फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली तसा पाठिंबा देत नव्हते. क्रिकेटमध्ये जेव्हा निकाल विरोधात जातात आणि टीममध्ये मतभेद वाढतात, तेव्हा कॅप्टनवरचा दबाव अनेक पटींनी वाढतो. याच कारणामुळे हार्दिकने सीझनच्या मध्यातच वेगळं होण्याचा निर्णय घेतला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आता मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा परतणार?&lt;/h2&gt;&lt;p&gt;हार्दिक पंड्या टीममधून बाहेर पडण्याच्या शक्यतेनंतर, मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबद्दल सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जर टीमला तात्पुरता तोडगा हवा असेल, तर रोहित शर्मापेक्षा चांगला पर्याय दुसरा कोणी नसेल. रोहित आजही ड्रेसिंग रूममधला सर्वात मोठा चेहरा आहे आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल खिताब जिंकले आहेत. मात्र, असंही मानलं जातंय की 2027 चा वनडे वर्ल्ड कप रोहितच्या करिअरचं शेवटचं मोठं लक्ष्य असू शकतं. त्यामुळे आयपीएलमध्येही त्याचं भविष्य फार लांबचं मानलं जात नाही.&lt;/p&gt;&lt;h2&gt;तिलक वर्मा भविष्याचा चेहरा बनू शकतो&lt;/h2&gt;&lt;p&gt;मुंबई इंडियन्सने जर दूरचा विचार केला, तर युवा फलंदाज तिलक वर्मा सर्वात मजबूत पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. तिलकला आधीपासूनच भारतीय टीमच्या भविष्यातील खेळाडूंमध्ये गणलं जात आहे. फ्रँचायझी त्याला पुढच्या तीन-चार वर्षांसाठी कॅप्टन बनवून एक नवी टीम तयार करण्याच्या दिशेने पाऊल उचलू शकते. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, मुंबई इंडियन्सला आता एका नव्या सुरुवातीची गरज आहे, कारण सततच्या बदलांमुळे आणि वादामुळे टीमच्या स्थिरतेवर परिणाम झाला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;हार्दिकचं पुढचं पाऊल काय असेल?&lt;/h2&gt;&lt;p&gt;सध्या हे स्पष्ट नाही की हार्दिक पंड्या दुसऱ्या कोणत्या फ्रँचायझीसोबत ट्रेड डील करेल की आयपीएल ऑक्शनमध्ये उतरेल. पण रिपोर्ट्समध्ये हे नक्कीच म्हटलं आहे की, त्याला मुंबई इंडियन्ससोबत पुढे जायचं नाही. काही क्रिकेट जाणकारांच्या मते, जर हार्दिकला शांत आणि संतुलित वातावरण हवं असेल, तर चेन्नई सुपर किंग्ससारखी टीम त्याच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. अर्थात, अंतिम निर्णय येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होईल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;मुंबई इंडियन्ससमोर सर्वात मोठं आव्हान&lt;/h2&gt;&lt;p&gt;मुंबई इंडियन्सला 2027 च्या मेगा ऑक्शनपूर्वी आपली संपूर्ण रणनीती पुन्हा तयार करावी लागेल. टीमला हे ठरवावं लागेल की ते जुन्या अनुभवावर विश्वास ठेवणार की नव्या नेतृत्त्वासोबत भविष्याची टीम बनवणार. पण एक नक्की आहे की, IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्समध्ये बदलाची चाहूल स्पष्टपणे ऐकू येऊ लागली आहे. आणि जर हार्दिक पंड्याने खरंच टीम सोडली, तर हा फक्त एक ट्रान्सफर नसेल, तर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या कॅप्टन्सी बदलांपैकी एक मानला जाईल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/hardik-pandya-reportedly-decides-to-leave-mumbai-indians-after-ipl-2026/articleshow-pg9wu8z"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Rishabh Pant: २७ कोटी पाण्यात? खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतने LSG ची कॅप्टन्सी सोडली!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/rishabh-pant-steps-down-as-lsg-captain-after-poor-ipl-2026-season/articleshow-psy8ycm</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/rishabh-pant-steps-down-as-lsg-captain-after-poor-ipl-2026-season/articleshow-psy8ycm</guid>
            <pubDate>Fri, 29 May 2026 20:00:50 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;आयपीएल २०२६ मधील निराशाजनक कामगिरीनंतर ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. २७ कोटी रुपयांची बोली लागलेल्या पंतच्या नेतृत्वाखाली संघाने या सीजनमध्ये अत्यंत खराब खेळ केला. पंतने स्वतःच कॅप्टन्सी सोडण्याची विनंती केली होती, जी फ्रँचायझीने स्वीकारली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01knvrzxvqsgnvaksj9tawem71,imgname-20260409501l-1775827416951.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;आयपीएलमध्ये कॅप्टन्सी म्हणजे फक्त मैदानात निर्णय घेणं नाही, तर अपेक्षांचं मोठं ओझं खांद्यावर घेऊन चालणं असतं. जेव्हा एखाद्या खेळाडूवर २७ कोटी रुपयांसारखी रेकॉर्डब्रेक बोली लागते, तेव्हा त्याच्याकडून फक्त रन्सची नाही, तर टीमला एक नवी ओळख देण्याचीही अपेक्षा असते. पण आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) प्रवास ज्याप्रकारे संपला, त्याने टीम मॅनेजमेंटपासून फॅन्सपर्यंत सगळ्यांनाच निराश केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;सीजन संपताच एक मोठा निर्णय समोर आला. ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्सची कॅप्टन्सी सोडली आहे. फ्रँचायझीने शुक्रवारी एक अधिकृत स्टेटमेंट जारी करून सांगितलं की, पंतने स्वतः कॅप्टन्सीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी तात्काळ मान्य करण्यात आली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;दोन सीजनमध्ये अपेक्षांवर पाणी फेरलं&lt;/h2&gt;&lt;p&gt;आयपीएल २०२५ च्या लिलावात ऋषभ पंतला रेकॉर्ड २७ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. त्यावेळी असं मानलं जात होतं की, पंतच्या येण्याने लखनऊ सुपर जायंट्स यशाची नवी शिखरं गाठेल. पण मागचे दोन सीजन टीमसाठी खूपच खराब ठरले. आयपीएल २०२५ मध्ये टीम सातव्या स्थानावर होती, तर आयपीएल २०२६ मध्ये परिस्थिती आणखीच बिघडली. लखनऊने १४ मॅचमध्ये फक्त ४ मॅच जिंकल्या आणि ८ पॉईंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये तळाला राहिली. टीमची बॅटिंग लाईनअप सतत स्ट्रगल करताना दिसली आणि बॉलिंग युनिटही प्रेशरच्या क्षणी प्रभाव पाडू शकली नाही.&lt;/p&gt;&lt;h2&gt;कॅप्टन म्हणूनही पंतची जादू चालली नाही&lt;/h2&gt;&lt;p&gt;ऋषभ पंतची वैयक्तिक कामगिरीही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने आयपीएल २०२६ मध्ये १४ मॅचमध्ये ३१२ रन्स केले. त्याचा स्ट्राइक रेट १३८.०५ असला तरी, अनेक महत्त्वाच्या मॅचमध्ये तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कॅप्टन्सीदरम्यान टीम कॉम्बिनेशन, बॉलिंगमधील बदल आणि दबावाखाली घेतलेल्या निर्णयांवरूनही सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, सततच्या पराभवाचा दबाव पंतच्या वैयक्तिक खेळावरही दिसत होता.&lt;/p&gt;&lt;h2&gt;LSG ने स्टेटमेंट जारी करून माहिती दिली&lt;/h2&gt;&lt;p&gt;लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे: &ldquo;ऋषभ पंतने फ्रँचायझीकडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि टीम मॅनेजमेंटने त्याचा निर्णय स्वीकारला आहे.&rdquo; फ्रँचायझीने हेही स्पष्ट केलं की, आता टीमचा फोकस नव्या टीमची उभारणी आणि चांगल्या रणनीतीवर असेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Official announcement. pic.twitter.com/7WeOwpkDr6&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 29, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;h2&gt;टॉम मूडी म्हणाले - असे निर्णय सोपे नसतात&lt;/h2&gt;&lt;p&gt;LSG चे डायरेक्टर ऑफ क्रिकेट टॉम मूडी म्हणाले की, कॅप्टन्सी सोडण्यासारखा निर्णय कोणत्याही खेळाडूसाठी सोपा नसतो. त्यांनी सांगितलं की, ऋषभ पंतने स्वतः ही विनंती केली होती आणि टीमने आदराने ती स्वीकारली. मूडींच्या मते, पंतने ड्रेसिंग रूममध्ये कॅप्टन म्हणून खूप योगदान दिलं आणि फ्रँचायझी त्यासाठी आभारी आहे. त्यांनी हेही संकेत दिले की, येत्या काळात टीममध्ये मोठे बदल होऊ शकतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आता LSG चा पुढचा कॅप्टन कोण?&lt;/h2&gt;&lt;p&gt;पंतने कॅप्टन्सी सोडल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, आता लखनऊ सुपर जायंट्सची धुरा कोणाकडे सोपवली जाईल. टीमकडे अनुभवी भारतीय आणि परदेशी खेळाडूंचे अनेक पर्याय आहेत. क्रिकेट वर्तुळात केएल राहुलच्या संभाव्य पुनरागमनापासून ते एखाद्या नव्या तरुण चेहऱ्याला संधी देण्यापर्यंतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थात, फ्रँचायझीने अजून नव्या कॅप्टनच्या नावावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;ऋषभ पंत भारतीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक आणि प्रभावी विकेटकीपर-बॅट्समनपैकी एक मानला जातो. अशा परिस्थितीत, कॅप्टन्सी सोडणं हे त्याच्या करिअरचा शेवट नाही, तर एक नवी सुरुवातही ठरू शकते. अनेकदा कॅप्टन्सीचा दबाव दूर झाल्यावर खेळाडू आपल्या नैसर्गिक खेळात परत येतात. आता पंत पुढच्या सीजनमध्ये फक्त एक बॅट्समन म्हणून आपल्या जुन्या अंदाजात परत येऊ शकेल की नाही, याकडे सर्वांचं लक्ष असेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;आयपीएल २०२६ ने LSG आणि ऋषभ पंत या दोघांसाठीही अनेक अवघड प्रश्न मागे ठेवले आहेत. आता येणारा सीजनच ठरवेल की हा निर्णय बदलाची नांदी ठरेल की टीमच्या संकटाची कहाणी आणखी लांबेल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/rishabh-pant-steps-down-as-lsg-captain-after-poor-ipl-2026-season/articleshow-psy8ycm"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Mohammed Siraj: टीम इंडियातून सिराज अचानक बाहेर, BCCI ने 'या' खेळाडूला दिली संधी]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/mohammed-siraj-rested-for-ireland-england-t20s-prasidh-krishna-named-replacement/articleshow-qbhyquo</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/mohammed-siraj-rested-for-ireland-england-t20s-prasidh-krishna-named-replacement/articleshow-qbhyquo</guid>
            <pubDate>Tue, 09 Jun 2026 16:44:42 +0530</pubDate>
            <description><![CDATA[टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत खेळणार नाही. बीसीसीआयने कामाच्या ताणामुळे (workload management) त्याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात संधी मिळाली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01ktk10m00kd4m7q1xqvpaxhpw,imgname-afp--20260607--b69n86k--v1--midres--cricketindafgtest-1780902547456.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी-२० मालिका खेळणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी ही अधिकृत माहिती दिली. सिराजला कामाच्या ताणामुळे (workload management) विश्रांती देण्यात आल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;सुरुवातीला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यीय संघात सिराजचं नाव होतं. पण, मेडिकल टीम आणि टीम मॅनेजमेंटच्या सल्ल्यानंतर त्याला या मालिकेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघात सामील करण्यात आलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सिराजला विश्रांती देण्याचा निर्णय का घेतला?&lt;/h2&gt;&lt;p&gt;गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद सिराज सतत क्रिकेट खेळत आहे. आयपीएल २०२६ पासून ते आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत, त्याने भारतीय संघ आणि आपल्या फ्रँचायझीसाठी सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, आगामी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेता सिराजच्या कामाचा ताण मॅनेज करणं गरजेचं आहे. भविष्यातील महत्त्वाच्या मालिका आणि स्पर्धांसाठी सिराज पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजेतवाना असावा, अशी बोर्डाची इच्छा आहे. हा निर्णय कोणत्याही दुखापतीमुळे नाही, तर खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;प्रसिद्ध कृष्णाला मोठी संधी&lt;/h2&gt;&lt;p&gt;सिराजच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने प्रसिद्ध कृष्णावर विश्वास दाखवला आहे. बऱ्याच काळानंतर त्याचं टी-२० आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झालं आहे. प्रसिद्धने आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळला होता. नुकतंच त्याने गुजरात टायटन्ससाठी आयपीएल २०२६ मध्ये शानदार प्रदर्शन केलं. याशिवाय, अफगाणिस्तानविरुद्ध मुल्लांपूर कसोटीतही त्याने प्रभावी गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या होत्या. आता आयर्लंड आणि इंग्लंडसारख्या मजबूत संघांविरुद्ध स्वतःला सिद्ध करण्याची त्याच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आयपीएल आणि कसोटीत सिराज सतत सक्रिय&lt;/h2&gt;&lt;p&gt;मोहम्मद सिराज नुकत्याच अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाचा भाग होता. भारताने हा सामना एक डाव आणि ३०० धावांनी जिंकला होता. या सामन्यात सिराजने १३ षटकं टाकून एक विकेट घेतली होती. त्याआधी आयपीएल २०२६ मध्ये त्याने गुजरात टायटन्ससाठी सर्व १७ सामने खेळले आणि संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, फायनलमध्ये गुजरातला पराभव पत्करावा लागला आणि संघ उपविजेता ठरला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;अफगाणिस्तान वनडे मालिकेत सिराज खेळणार&lt;/h2&gt;&lt;p&gt;टी-२० मालिकेतून बाहेर असला तरी मोहम्मद सिराज टीम इंडियापासून पूर्णपणे वेगळा झालेला नाही. तो १३ जूनपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा भाग असेल. याचा अर्थ, क्रिकेट चाहत्यांना सिराजला मैदानावर पाहण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आयर्लंड दौऱ्याने नव्या मिशनची सुरुवात&lt;/h2&gt;&lt;p&gt;भारतीय संघ सर्वात आधी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे २६ आणि २८ जून रोजी दोन टी-२० सामने खेळले जातील. त्यानंतर १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली होणारी ही मालिका टीम इंडियाच्या अनेक युवा खेळाडूंसाठी स्वतःला सिद्ध करण्याचं एक मोठं व्यासपीठ ठरू शकते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आयर्लंड आणि इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ&lt;/h2&gt;&lt;p&gt;श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा.&lt;/p&gt;&lt;h2&gt;टीम इंडियाच्या रणनीतीचा भाग&lt;/h2&gt;&lt;p&gt;आधुनिक क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या कामाचा ताण संतुलित ठेवणं खूप महत्त्वाचं झालं आहे. सतत क्रिकेट खेळल्याने दुखापतीचा धोका वाढतो आणि कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोहम्मद सिराजला विश्रांती देण्याचा निर्णय भविष्यातील मोठ्या मालिका आणि स्पर्धा लक्षात घेऊन उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/mohammed-siraj-rested-for-ireland-england-t20s-prasidh-krishna-named-replacement/articleshow-qbhyquo"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[काव्या मारनचा इशारा, कृणाल पांड्याच्या बॉलिंग स्टाइलवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/someone-raised-a-question-mark-over-krunal-pandya-bowling-style/articleshow-qt7msmi</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/someone-raised-a-question-mark-over-krunal-pandya-bowling-style/articleshow-qt7msmi</guid>
            <pubDate>Sat, 23 May 2026 17:00:22 +0530</pubDate>
            <description><![CDATA[IPL 2026 मध्ये SRH ने RCB वर विजय मिळवला, पण सामन्यापेक्षा काव्या मारनच्या एका प्रतिक्रियेची जास्त चर्चा झाली. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित करत तिने केलेल्या इशाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती 'चकिंग' बद्दल बोलत असल्याचा अंदाज आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kp57va858ckzyah7wpbt6df9,imgname-kavya-maran-1776144984325.jpeg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;IPL 2026 मधील Sunrisers Hyderabad आणि Royal Challengers Bengaluru यांच्यातील सामना रंगतदार ठरला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात SRH ने RCB वर 55 धावांनी मोठा विजय मिळवला. मात्र सामन्यापेक्षा एका व्हायरल क्षणानेच जास्त चर्चा रंगवली आहे. सामन्यादरम्यान हैद्राबाद संघाची मालकीण काव्या मारण हिची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. RCB चा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या गोलंदाजी करत असताना काव्या मारन काहीतरी बोलताना दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती कृणालच्या बॉलिंग अॅक्शनबाबत शंका उपस्थित करत असल्याचा दावा केला जात आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;काव्याने हातवारे का केले?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;विशेष म्हणजे कृणाल पांड्याने टाकलेल्या एका शॉर्ट बॉलनंतर काव्या मारनने शेजारी बसलेल्या लोकांकडे पाहत हातवारे केल्याचं दिसून आलं. अनेकांनी तिच्या ओठांच्या हालचाली पाहून &ldquo;चकिंग&rdquo; असा शब्द वापरल्याचा अंदाज व्यक्त केला. यानंतर हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;आरसीबी संघाचा झाला पराभव&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;क्रिकेटच्या नियमांनुसार &ldquo;चकिंग&rdquo; म्हणजे गोलंदाजी करताना हात चुकीच्या पद्धतीने वाकवणे. मात्र कृणाल पांड्याच्या गोलंदाजीबाबत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पंचांकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा विषय सध्या केवळ चर्चेपुरताच मर्यादित असल्याचं बोललं जात आहे. या सामन्यात हैद्राबाद च्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. हेन्रीक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात RCB ला मोठा पराभव स्वीकारावा लागला, तरी संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;दरम्यान, काव्या मारनच्या या प्रतिक्रियेवर क्रिकेट चाहत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. काहींनी तिच्या भावनांना समर्थन दिलं, तर काहींनी हा फक्त सामन्यातील उत्स्फूर्त क्षण असल्याचं म्हटलं. मात्र या घटनेनंतर SRH आणि RCB यांच्यातील सामना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/someone-raised-a-question-mark-over-krunal-pandya-bowling-style/articleshow-qt7msmi"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाकडून खेळण्याची मिळाली संधी, कोणती मिळाली जबाबदारी?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-got-a-chance-to-play-for-the-indian-team/articleshow-wrv9au8</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-got-a-chance-to-play-for-the-indian-team/articleshow-wrv9au8</guid>
            <pubDate>Sat, 30 May 2026 19:42:44 +0530</pubDate>
            <description><![CDATA[आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी स्फोटक फलंदाजी करणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची भारत अ संघात निवड झाली आहे. श्रीलंकेत होणाऱ्या त्रिराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली असून, या कामगिरीमुळे तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवू शकतो अशी चर्चा आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01krvcmgvcrth5kaeazp70mrpa,imgname-vaibhav-suryawanshi-most-sixes-record-1779035685740.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता भारत अ संघाच्या जर्सीत दिसणार आहे. अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभवची श्रीलंकेत होणाऱ्या त्रिराष्ट्रीय मालिकेसाठी भारत अ संघात निवड करण्यात आली आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे हे मोठे फळ मानले जात आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;कोणत्या संघात वैभवला दिल स्थान?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;श्रीलंका अ, अफगाणिस्तान अ आणि भारत अ या संघांमध्ये जून महिन्यात ही एकदिवसीय त्रिराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात वैभवला स्थान देण्यात आले असून संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रियान पराग याच्याकडे सोपवण्यात आली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;भारतीय संघाच्या दौऱ्याकडे सर्वांचं लागलं लक्ष आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने अनेक विक्रम मोडले. राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना त्याने धडाकेबाज धावा करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. प्लेऑफ सामन्यांमध्येही त्याने आक्रमक खेळी साकारत संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्या कामगिरीमुळे राष्ट्रीय संघाच्या दारात तो पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे. बीसीसीआय निवड समितीने वैभवला भारत अ संघात संधी देऊन त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील तयारी तपासण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. श्रीलंकेतील ही मालिका युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. आगामी वरिष्ठ भारतीय संघाच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेकडे विशेष लक्ष असणार आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;वैभव कशी करणार कामगिरी?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;वैभवच्या निवडीनंतर अनेक माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी त्याच्या भवितव्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीही वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याच्या फलंदाजीतील आत्मविश्वास आणि मोठे फटके मारण्याची क्षमता विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले. आता आयपीएलमधील यशानंतर वैभव सूर्यवंशीसमोर भारत अ संघासाठी दमदार कामगिरी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. श्रीलंका दौऱ्यात तो कशी छाप पाडतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील यश त्याला लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवून देऊ शकते, अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-got-a-chance-to-play-for-the-indian-team/articleshow-wrv9au8"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[IPL 2026: JioHotstar App नाहीये? तरीही RCB vs GT मॅच मोबाईलवर अशी बघा, एकदम सोपी पद्धत!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/how-to-watch-rcb-vs-gt-ipl-2026-qualifier-live-without-jiohotstar-app/articleshow-wuf0nd1</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/how-to-watch-rcb-vs-gt-ipl-2026-qualifier-live-without-jiohotstar-app/articleshow-wuf0nd1</guid>
            <pubDate>Tue, 26 May 2026 19:25:33 +0530</pubDate>
            <description><![CDATA[JioHotstar ॲपशिवाय मोबाईलवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध गुजरात टायटन्सची लाईव्ह मॅच कशी बघायची? खरंच फ्रीमध्ये मॅच बघण्याचा काही सोपा मार्ग आहे का? आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्येच थांबलं तर मॅच चुकण्यापासून कसं वाचायचं? जाणून घ्या.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01ksfqsdvmsm17mj2rxxnxyf7h,imgname-rcb-vs-gt-2-1779718469492.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;RCB vs GT Live Match without JioHotstar App:&lt;/strong&gt; IPL 2026 मध्ये आजची मॅच म्हणजे फायनलचं तिकीटच आहे. एका बाजूला आहे विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, जी सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न बघत आहे. तर दुसरीकडे आहे शुभमन गिलची गुजरात टायटन्स, जिने संपूर्ण सीजनमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आहे. ही मॅच तुम्ही JioHotstar वर लाईव्ह बघू शकता. पण जर तुमच्या फोनमध्ये JioHotstar ॲप नसेल, तर प्रश्न पडतो की लाईव्ह मॅच कुठे आणि कशी बघायची? चला, जाणून घेऊया एकदम सोपी पद्धत आणि योग्य प्लॅटफॉर्म...&lt;/p&gt;&lt;h2&gt;RCB vs GT मॅच कुठे होत आहे?&lt;/h2&gt;&lt;p&gt;बंगळूरु आणि गुजरात यांच्यातील IPL 2026 चा पहिला क्वालिफायर सामना धर्मशाला येथील HPCA स्टेडियमवर खेळवला जात आहे. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासाने, म्हणजे 7:30 वाजता मॅच सुरू होईल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;GT vs RCB: JioHotstar ॲपशिवाय मॅच कशी बघायची?&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;मोबाईल ब्राउझरवरून मॅच बघा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;अनेकांना वाटतं की IPL बघण्यासाठी ॲप डाऊनलोड करणं गरजेचं आहे, पण तसं नाहीये. जर तुमच्या फोनमध्ये जागा कमी असेल किंवा तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं नसेल, तर काही सोपे मार्ग आहेत. यातला पहिला मार्ग म्हणजे मोबाईल ब्राउझर. तुम्ही थेट तुमच्या फोनच्या Chrome, Edge किंवा Safari ब्राउझरमध्ये JioHotstar ची वेबसाईट उघडू शकता. तिथे लॉगिन करून तुम्ही लाईव्ह मॅचचा आनंद घेऊ शकता. याचा फायदा म्हणजे तुमच्या फोनची स्टोरेजही वाचेल आणि वेगळं ॲप इन्स्टॉल करण्याची गरजही पडणार नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर वेब ब्राउझर वापरा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर मॅच बघायची असेल, तर तुम्ही लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीच्या ब्राउझरवरूनही लाईव्ह स्ट्रीमिंग बघू शकता.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;स्टार स्पोर्ट्स चॅनलवर लाईव्ह टेलीकास्ट&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;जर तुमचं इंटरनेट स्लो असेल, स्ट्रीमिंग सारखं अडकत असेल किंवा ॲप नसेल, तर सरळ स्टार स्पोर्ट्स चॅनल लावा. टीव्हीवर कोणत्याही बफरिंगशिवाय मॅच बघण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;RCB vs GT: मॅच फ्रीमध्ये बघता येईल का?&lt;/h2&gt;&lt;p&gt;भारतात अधिकृत लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वरच होणार आहे. काही युजर्सना त्यांच्या टेलिकॉम प्लॅन्ससोबत फ्री ॲक्सेस मिळतो. जर तुमच्याकडे असा कोणताही प्लॅन असेल, तर तुम्ही मोबाईलवर फ्रीमध्ये मॅच बघू शकता. तसेच, जर तुमच्या टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलचा रिचार्ज असेल, तर तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे न देता मॅच बघू शकता.&lt;/p&gt;&lt;h2&gt;RCB vs GT क्वालिफायर 1: आजचा सामना इतका खास का आहे?&lt;/h2&gt;&lt;p&gt;ही मॅच जिंकणारी टीम थेट IPL 2026 च्या फायनलमध्ये पोहोचेल. हरणाऱ्या टीमला आणखी एक संधी मिळेल, पण त्यांच्यावर दबाव खूप जास्त असेल. RCB ची नजर सलग दुसऱ्या ट्रॉफीवर आहे, तर GT पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचून इतिहास घडवू इच्छिते. चाहत्यांच्या नजरा विशेषतः विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यावर असतील. दोघेही या सीजनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/how-to-watch-rcb-vs-gt-ipl-2026-qualifier-live-without-jiohotstar-app/articleshow-wuf0nd1"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[अर्जुन तेंडुलकरची दमदार एन्ट्री! पहिल्याच सामन्यात घेतली विकेट; सचिनची भावनिक पोस्ट चर्चेत]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/arjun-tendulkar-ipl-debut-sachin-tendulkar-emotional-post/articleshow-yb4sg0m</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/arjun-tendulkar-ipl-debut-sachin-tendulkar-emotional-post/articleshow-yb4sg0m</guid>
            <pubDate>Sun, 24 May 2026 10:06:22 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;IPL 2026 &lt;/strong&gt;: लखनौ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करताना अर्जुन तेंडुलकरने पंजाब किंग्सविरुद्ध प्रभावी गोलंदाजी केली. चार षटकांत ३६ धावा देत त्याने प्रभसिमरन सिंगची महत्त्वाची विकेट घेतली. अर्जुनच्या या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मुलाच्या संयम, मेहनत आणि सकारात्मकतेचे कौतुक केले.&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01knv4embab6hbs7w8h2082eyf,imgname-mukul-choudhary-arjun-tendulkar-1775805878634.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Sachin Tendulkar on Arjun Tendulkar&lt;/strong&gt; : आयपीएलच्या रंगतदार हंगामात अखेर अर्जुन तेंडुलकरला मोठी संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं करून दाखवलं. लखनौ सुपर जायंट्सकडून पंजाब किंग्सविरुद्ध पदार्पण करताना अर्जुनने आपल्या नियंत्रित आणि शिस्तबद्ध गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांनी मुलासाठी केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पदार्पणात अर्जुनची प्रभावी गोलंदाजी&lt;/h2&gt;&lt;p&gt;२३ मे रोजी एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने चारही षटके पूर्ण करत ४-०-३६-१ अशी कामगिरी नोंदवली. पंजाब किंग्सच्या आक्रमक फलंदाजांविरुद्ध त्याने सुरुवातीपासूनच अचूक लाईन-लेंथ ठेवली. विशेषतः प्रभसिमरन सिंगला टाकलेला भेदक यॉर्कर हा सामन्याचा आकर्षणबिंदू ठरला. त्या चेंडूवर प्रभसिमरन ६९ धावांवर पायचीत झाला आणि अर्जुनच्या खात्यात पहिली आयपीएल विकेट जमा झाली.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट व्हायरल&lt;/h2&gt;&lt;p&gt;सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुलगा अर्जुनसाठी खास संदेश लिहिला. सार्वजनिकरित्या क्वचितच अर्जुनबद्दल बोलणाऱ्या सचिन यांनी त्याच्या संयमाचे आणि मेहनतीचे भरभरून कौतुक केले.&lt;/p&gt;&lt;p&gt;सचिन यांनी लिहिले की, &ldquo;या संपूर्ण हंगामात तू स्वतःवर विश्वास ठेवला, शांतपणे मेहनत केली आणि शेवटपर्यंत सकारात्मक राहिलास, याचा मला अभिमान आहे. क्रिकेटमध्ये कौशल्याइतकाच संयमही महत्त्वाचा असतो आणि तू दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे हाताळल्या.&rdquo; सचिनची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेक क्रिकेट चाहत्यांनी अर्जुनच्या मेहनतीला आणि सचिनच्या शब्दांना भावनिक प्रतिक्रिया दिल्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;p&gt;Well done, Arjun. ❤️Proud of the way you&rsquo;ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.Cricket tests patience as much&hellip; pic.twitter.com/3RdiGkXbfT&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Sachin Tendulkar (@sachin_rt) May 23, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;&lt;h2&gt;ऋषभ पंतने सोडला झेल; अर्जुनला सुरुवातीलाच मिळू शकली असती विकेट&lt;/h2&gt;&lt;p&gt;अर्जुनच्या पहिल्याच स्पेलमध्ये त्याला विकेट मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली होती. प्रभसिमरन सिंगने चुकीचा फटका मारल्यानंतर चेंडू थेट ऋषभ पंतच्या दिशेने गेला, मात्र एलएसजी कर्णधाराने तो झेल सोडला. त्या वेळी प्रभसिमरन अवघ्या २० धावांवर होता. नंतर त्याने मोठी खेळी करत पंजाबला मजबूत स्थितीत नेले. तरीही अर्जुनने आत्मविश्वास गमावला नाही. त्याने पुन्हा अचूक गोलंदाजी करत अखेरीस प्रभसिमरनला यॉर्करवर बाद केले आणि स्वतःची छाप उमटवली.&lt;/p&gt;&lt;h2&gt;दबावातही दाखवला संयम&lt;/h2&gt;&lt;p&gt;अर्जुनचे दुसरे षटक थोडे महागडे ठरले. श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन यांनी त्याच्यावर आक्रमक फटकेबाजी करत १५ धावा वसूल केल्या. मात्र, दबावाखाली न खचता अर्जुनने आपल्या गोलंदाजीत बदल केले. शेवटच्या षटकांमध्ये त्याने केवळ पाच धावा दिल्या आणि पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले.एकूणच, पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि संयम यामुळे क्रिकेट तज्ज्ञांकडून त्याचे कौतुक होत आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/arjun-tendulkar-ipl-debut-sachin-tendulkar-emotional-post/articleshow-yb4sg0m"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Happy Birthday Rohit Sharma : हॅप्पी बर्थ डे रोहित शर्मा; वाढदिवसानिमित्त वाचा 'हिटमॅन'ची रेकॉर्डब्रेक कारकीर्द]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/rohit-sharma-birthday-special-a-look-at-the-hitmans-record-breaking-career/articleshow-yy996gz</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/rohit-sharma-birthday-special-a-look-at-the-hitmans-record-breaking-career/articleshow-yy996gz</guid>
            <pubDate>Thu, 30 Apr 2026 09:21:41 +0530</pubDate>
            <description><![CDATA[&lt;p&gt;Happy Birthday Rohit Sharma : भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वनडेमधील २६४ धावांच्या विक्रमी खेळीपासून ते वनडेतील सर्वाधिक द्विशतकं आणि २०२४ मध्ये भारताला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यापर्यंतच्या त्याच्या शानदार कारकिर्दीवर एक नजर टाकूया.&lt;/p&gt;]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kmxb6xp8e589wz9rcfy0gkwn,imgname-rohit-sharma-2-1774806333128.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Happy Birthday Rohit Sharma : &lt;/strong&gt;टीम इंडियाचा माजी कॅप्टन, जबरदस्त बॅट्समन आणि सगळ्यांचा लाडका 'हिटमॅन' रोहित शर्मा आज, गुरुवारी (३० एप्रिल) आपला ३९ वा वाढदिवस साजरा करतोय. २३ जून २००७ रोजी बेलफास्टमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केल्यापासून त्यानं अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. तो आजही नव्या पिढीच्या क्रिकेटर्ससाठी एक प्रेरणास्थान आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;तिन्ही फॉरमॅटमधील दमदार कारकीर्द&lt;/h2&gt;&lt;p&gt;गेल्या वर्षी टेस्ट क्रिकेटमधून आणि टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर 'हिटमॅन' आता वनडे क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवत आहे. रोहितने २०१३ मध्ये टेस्ट डेब्यू केला होता. त्याने ६७ मॅचेसमध्ये ४,३०१ रन्स केले. यात १२ शतकं आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१२ रन्स ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तर, २००७ मध्ये टी-२० डेब्यू करणाऱ्या रोहितने १५९ मॅचेसमध्ये ४२३१ रन्स केले. २०२४ मध्ये तो या फॉरमॅटमधील बेस्ट स्कोरर होता. त्याच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ५ शतकं करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने दोन टी-२० वर्ल्ड कप जिंकले आहेत - एक २००७ मध्ये खेळाडू म्हणून आणि दुसरा २०२४ मध्ये कॅप्टन म्हणून. २०२४ मध्ये १५० पेक्षा जास्त टी-२० सामने खेळणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. भारताच्या टी-२० वर्ल्ड कप विजयानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.&lt;/p&gt;&lt;h2&gt;वनडेमधील 'हिटमॅन'गिरी आणि रेकॉर्ड्स&lt;/h2&gt;&lt;p&gt;वनडेमध्ये तर रोहितची बॅट नेहमीच तळपली आहे. त्याने २८२ मॅचेसमध्ये जवळपास ४९ च्या सरासरीने ११,५७७ रन्स केले आहेत. यात ३३ शतकं आणि ६१ अर्धशतकं आहेत. एवढंच नाही, तर वनडेमध्ये एकाच मॅचमध्ये सर्वाधिक २६४ रन्स करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही 'हिटमॅन'च्याच नावावर आहे. वनडेमध्ये सर्वाधिक तीन द्विशतकं करण्याचा विक्रमही त्याचाच आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे&lt;/h2&gt;&lt;p&gt;रोहितच्या नावावर अनेक मोठे टप्पे आहेत. वनडेमध्ये द्विशतकं तर त्यानं सहज केली. पहिल्या १५ आयपीएल सिझनमध्ये ६ वेळा ट्रॉफी जिंकली. २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं ठोकली. आणि २०१९ मध्ये जेव्हा त्याला टेस्टमध्ये ओपनिंग करण्याची संधी मिळाली, तेव्हा पहिल्याच सिरीजमध्ये त्याने तीन शतकं झळकावली, ज्यात एका द्विशतकाचा समावेश होता.&lt;/p&gt;&lt;h2&gt;कॅप्टन्सी आणि नेतृत्व&lt;/h2&gt;&lt;p&gt;रोहितच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची आणि त्याच वर्षी वनडे वर्ल्ड कपची फायनल गाठली. दोन्ही वेळा विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. पण, २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकून देत त्याने १३ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. त्यानंतर २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असलेला रोहित, क्रिकेट जगताने पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो.&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचे शीर्षक वगळता, अन्य मजकूर एशियनेट न्यूजेबल इंग्रजी स्टाफने संपादित केलेला नाही आणि सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आला आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/rohit-sharma-birthday-special-a-look-at-the-hitmans-record-breaking-career/articleshow-yy996gz"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; सर्वात जलद १००० धावांचा टप्पा केला पूर्ण]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-set-a-world-record/articleshow-zgwf2gc</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-set-a-world-record/articleshow-zgwf2gc</guid>
            <pubDate>Sat, 25 Apr 2026 23:37:53 +0530</pubDate>
            <description><![CDATA[भारताच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्याने अवघ्या 473 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठून ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ओवेनला मागे टाकले. या कामगिरीमुळे वैभव भारतीय क्रिकेटचा नवा स्टार म्हणून उदयास येत आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01knrzr83kmafzsj2tx0mgan3n,imgname-vaibhav-suryavanshi-ank-jyotish-01-1775733842035.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता भारताच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे. अवघ्या 473 चेंडूंमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करत त्याने जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या कामगिरीमुळे क्रिकेटविश्वात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;लवकर धावा केल्या पूर्ण&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ओवेनच्या नावावर होता. त्याने 533 चेंडूंमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र वैभव सूर्यवंशीने तब्बल 60 चेंडू आधी हा टप्पा गाठत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीची आता सर्वत्र प्रशंसा होत आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स आहे. सायमंड्सने 558 चेंडूंमध्ये 1000 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर भारताचा आशुतोष शर्मा असून त्याने 570 चेंडूंमध्ये हा टप्पा पार केला होता. यावरून भारतीय खेळाडूंची दमदार उपस्थिती दिसून येते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;वैभवने कोणाला टाकले मागे?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा फिन अॅलन आहे. त्याने 573 चेंडूंमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. फिन अॅलन हा आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो, पण वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीने त्यालाही मागे टाकले आहे. वैभव सूर्यवंशीची ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. एवढ्या कमी चेंडूंमध्ये 1000 धावा करणे म्हणजे सातत्य, आत्मविश्वास आणि स्फोटक फलंदाजीचे मोठे उदाहरण आहे. आगामी काळात तो भारतीय क्रिकेटचा नवा स्टार ठरू शकतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category>Sports</category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/vaibhav-suryavanshi-has-set-a-world-record/articleshow-zgwf2gc"/>
        </item>
    </channel>
</rss>
