<?xml version="1.0" encoding="UTF-8" standalone="yes"?>
<rss xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" version="2.0">
    <channel>
        <title>Asianet News Marathi</title>
        <link>https://marathi.asianetnews.com</link>
        <description><![CDATA[Marathi News - No.1 News channel in Maharashtra, which delivers Local and International news in Marathi language.]]></description>
        <image>
            <url>https://static-assets.asianetnews.com/images/ogimages/OG_Marathi.png</url>
            <width>143</width>
            <height>100</height>
            <link>https://marathi.asianetnews.com</link>
            <title>Asianet News Marathi</title>
        </image>
        <lastBuildDate>Fri, 21 Aug 2026 21:30:03 +0530</lastBuildDate>
        <atom:link href="https://marathi.asianetnews.com/rss" rel="self" type="application/rss+xml"/>
        <item>
            <title><![CDATA[Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-on-amit-shah-s-scheme-for-maharashtra-banks/videoshow-pnfybct</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-on-amit-shah-s-scheme-for-maharashtra-banks/videoshow-pnfybct</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:46:32 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazmtra" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारच्या सहकार क्षेत्रातील निर्णयांवर गंभीर आरोप केले. 8 ऑगस्ट रोजी मुंबईत National Urban Cooperative Finance Development Corporation (NUCFDC) या संस्थेच्या उद्घाटनाचा उल्लेख करत, ही संस्था नागरी सहकारी बँकांसाठी umbrella organisation म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर 9 ऑगस्टला संसदेत National Cooperative Development Corporation Amendment Bill 2026 मंजूर करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वावर परिणाम होईल, असा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोकांची मते जाणून न घेता एवढा मोठा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. NUCFDC, शारदा सदनमधील कार्यालय आणि माधवपुरा को-ऑपरेटिव्ह बँकेचा संदर्भ देत त्यांनी बँकांची येणी, कर्जे आणि मालमत्तांचे पुढे काय होणार, असा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रातील सहकार चळवळ, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने आणि या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांच्या रोजगारावरही राऊत यांनी भाष्य केले. या संपूर्ण प्रकरणाबाबत अमित शहा यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. मंजूर झालेल्या विधेयकाचा इतर राज्यांवर किती परिणाम होणार, याचाही अभ्यास करत असल्याचे राऊत म्हणाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख करत राऊत यांनी राज्य सरकारवरही टीका केली. महाराष्ट्राच्या सहकार आणि बँकिंग चळवळीचे नुकसान होत असताना राज्य सरकारने या निर्णयाचे स्वागत का केले, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-on-amit-shah-s-scheme-for-maharashtra-banks/videoshow-pnfybct"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Fact Check : करीना कपूर पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पूर्णविराम, समोर आले सत्य]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/kareena-kapoor-third-pregnancy-rumors-fact-checked-by-her-team/articleshow-r9fi67b</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/kareena-kapoor-third-pregnancy-rumors-fact-checked-by-her-team/articleshow-r9fi67b</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:45:30 +0530</pubDate>
            <description><![CDATA[करीना कपूरचे काही फोटो व्हायरल झाले आणि ती सैफ अली खानसोबत तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण आता तिच्या टीमने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0hwws14gjaaze8aghk7c9jz,imgname-kareena-pregnant-3-1787307123746.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता तिच्या टीमने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. सैफ अली खानसोबत ती तिसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची बातमी खोटी आहे, असं तिच्या टीमने सांगितलंय. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;ही सगळी चर्चा एका व्हिडिओमुळे सुरू झाली. मुंबईतल्या वांद्रे भागातील एका जीमबाहेर करीना दिसली. या व्हिडिओमध्ये तिचा 'बेबी बंप' दिसत असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. त्यातच तिच्या टीममधील एका व्यक्तीने तिला पापाराझींपासून वाचवण्यासाठी छत्री धरली होती, त्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;अधिकृत स्पष्टीकरण आणि फॅक्ट-चेक&lt;/h2&gt;&lt;p&gt;हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावर चर्चा सुरू झाल्यावर करीना कपूरच्या टीमने लगेचच यावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगत, यात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरू नये, यासाठी टीमने तातडीने पाऊल उचललं.&lt;/p&gt;&lt;p&gt;करीनाच्या जवळच्या सूत्रांनीही या बातमीला नकार दिला आहे. एका सूत्राने सांगितलं, &quot;करीना प्रेग्नंट नाही. ही बातमी खोटी आहे.&quot; तर दुसऱ्या एका सूत्राने गंमतीत म्हटलं की, &quot;हा बेबी बंप नाही, तर पास्ता, पिझ्झा, सुट्ट्या आणि कॅमेऱ्याच्या चुकीच्या अँगलचा परिणाम आहे.&quot; नुकतीच करीना आणि सैफ, सैफचा ५६ वा वाढदिवस साजरा करून बीच हॉलिडेवरून परतले आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;यापूर्वीही पसरल्या होत्या अफवा&lt;/h2&gt;&lt;p&gt;करीना कपूरसोबत असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. २०२२ मध्येही तिच्या प्रेग्नंसीच्या अशाच अफवा पसरल्या होत्या. तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर गंमतीत 'पास्ता आणि वाईन'मुळे असं दिसतंय, असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. एका मुलाखतीत तिने असंही सांगितलं होतं की, आता आणखी मुलं नकोत, असं तिने सैफला बजावलं आहे. करीनाला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तिच्या टीमकडून वारंवार मिळणाऱ्या स्पष्टीकरणामुळे आता तरी या चर्चा थांबतील अशी आशा आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/kareena-kapoor-third-pregnancy-rumors-fact-checked-by-her-team/articleshow-r9fi67b"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/prithviraj-chavan-is-kumbh-mela-a-tender-scam/videoshow-kxbzcf4</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/prithviraj-chavan-is-kumbh-mela-a-tender-scam/videoshow-kxbzcf4</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:44:54 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazmtgu" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा काँग्रेसने संसदेत उपस्थित केल्याचे सांगत, विरोधक म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न रस्त्यावर मांडणे हे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी कोटा, उत्तराखंडसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा उल्लेखही त्यांनी केला. नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनावर चव्हाण यांनी सरकारकडे Detailed Project Report सार्वजनिक करण्याची मागणी केली. नाशिकच्या जनतेशी चर्चा करून त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम जाणून घेतले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोट्यवधी भाविक येणार असल्यास त्याचा गोदावरी नदीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन Environmental Impact Assessment आणि Social Impact Assessment करण्यात आले आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. कुंभमेळ्यासाठीच्या सुमारे ₹35 हजार कोटींच्या बजेटसह नाशिक रिंग रोड आणि शक्तिपीठसारख्या मोठ्या प्रकल्पांवरून त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. हे प्रकल्प टेंडर काढून 40 टक्के कमिशन मिळवण्यासाठी राबवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही चव्हाण यांनी केली. तसेच एका घटनेनंतर करण्यात आलेल्या कथित &lsquo;शुद्धीकरणा&rsquo;चा त्यांनी निषेध केला. वंदे मातरम आणि स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख करत त्यांनी भाजप आणि RSS वरही टीका केली. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून देशाला एकत्र आणण्याऐवजी विभाजन केले जात असल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/prithviraj-chavan-is-kumbh-mela-a-tender-scam/videoshow-kxbzcf4"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/supriya-sule-ncp-was-wrongfully-seized/videoshow-8vfrpec</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/supriya-sule-ncp-was-wrongfully-seized/videoshow-8vfrpec</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:44:39 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazmteu" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील लढ्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार होते, आहेत आणि राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष कोणाकडे आहे हे ठरवताना आमदार-खासदारांच्या संख्येपेक्षा संघटना कोणासोबत आहे, याला पक्षाच्या घटनेनुसार अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार गटाविरोधातील न्यायालयीन लढा व्यक्तीविरोधात नसून प्रक्रियेविरोधातील आणि नैतिकतेची लढाई असल्याचे सुळे म्हणाल्या. शरद पवारांकडून पक्ष चुकीच्या पद्धतीने हिरावून घेण्यात आला आणि त्यांच्यावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगात विरोधक चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील, मात्र न्यायालयात ते जिंकू शकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात आठ सुनावण्या झाल्याचा आणि शरद पवार प्रत्येक सुनावणीला उपस्थित असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या महाविकास आघाडीबाबतच्या वक्तव्यावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 2014 आणि 2019 मधील निर्णयांबाबत तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारावे लागेल, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा चुकीच्या चौकटीत ठेवले जाते, असा दावा करत सुळे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी मात्र नियमित संवाद असल्याचे सांगितले. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत अशी भूमिका असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/supriya-sule-ncp-was-wrongfully-seized/videoshow-8vfrpec"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Sanjay Raut |  धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-on-symbol-theft-seize-the-bow-and-arrow/videoshow-nl0mhyp</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-on-symbol-theft-seize-the-bow-and-arrow/videoshow-nl0mhyp</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:41:32 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://www.youtube.com/embed/sfOOrqaRN6o" medium="video" height="350" width="560"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, अमित शहा आणि निवडणूक आयोगावर आरोप केले. धनुष्यबाणाची चोरी झाल्याचा दावा करत त्यांनी आधी &lsquo;मुद्देमाल जप्त करा&rsquo;, अशी मागणी केली. राऊत यांनी राष्ट्रपतींना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक पाठवल्याबाबतही भूमिका मांडली. धीरेंद्र शास्त्री यांच्या राष्ट्रपती भवनातील भेटीचा उल्लेख करत हे पुस्तक नरेंद्र मोदींनाही पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदी भाषांतर करण्याचे काम सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. नारायण राणे यांच्यासोबतच्या मानहानी प्रकरणात तडजोडीबाबत राऊत यांनी सांगितले की, राणे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर तडजोडीचा प्रस्ताव मांडला आहे; मात्र आपल्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराच्या मुद्द्यावरही प्रकरण आपल्यासमोर आल्याचे सांगत उद्यापर्यंत त्याचा निकाल लावणार असल्याचे राऊत म्हणाले.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-on-symbol-theft-seize-the-bow-and-arrow/videoshow-nl0mhyp"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Mumbai | Kurla Crane Accident | MMRDAच्या कामादरम्यान क्रेन कोसळली, 10 जखमी]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/mumbai-kurla-crane-collapse-injures-10-during-mmrda-work/videoshow-qhawgua</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/mumbai-kurla-crane-collapse-injures-10-during-mmrda-work/videoshow-qhawgua</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:41:18 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://www.youtube.com/embed/8MNd-RPGNIs" medium="video" height="350" width="560"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;सम्राट अशोक नगरजवळील MMRDAच्या साइटवर पाडकामासाठी एक्स्कॅव्हेटरची जागा निश्चित करत असताना क्रेन कोसळली. या दुर्घटनेत झोपड्या, रेल्वेची उपकरणे, रस्ता आणि पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले. दुर्घटनेत एकूण 10 जण जखमी झाले. जगरुल्ला नबी मोहम्मद खान (63), अहमद नियाज अहमद (3 महिने), अतिकूर रहमान (60), हकूम शेख (36), नुमान खान (21), रहमान खान (19), सूरज गौर (10), अकबर (40), राजू गौड (35) आणि आरती गौड (30) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. आठ जखमींवर सायन रुग्णालयात, तर दोघांवर कुर्ला भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. MMRDAने मऊ जमीन हे दुर्घटनेमागील एक कारण असल्याचे म्हटले आहे. दुर्घटनेनंतर परिसर सुरक्षित करण्यात आला असून वैद्यकीय मदत आणि साफसफाईच्या कामासाठी सहकार्य केले जात आहे. दरम्यान, परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांबाबत स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/mumbai-kurla-crane-collapse-injures-10-during-mmrda-work/videoshow-qhawgua"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Alcohol Mixing : अल्कोहोलमध्ये तुम्ही सोडा किंवा पाणी मिक्स करता का? वाचा एक्सपर्ट्स काय म्हणतात]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/alcohol-mixing-guide-soda-water-or-ice-what-experts-recommend/photoshow-4euo9gf</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/alcohol-mixing-guide-soda-water-or-ice-what-experts-recommend/photoshow-4euo9gf</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:30:16 +0530</pubDate>
            <description><![CDATA[दारूमध्ये पाणी मिसळावं की सोडा, हा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण तर बर्फाचे तुकडे टाकून पितात. पण नक्की दारूत काय मिसळायला हवं? आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घेऊया.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kdt2skmjb8t0bgx9svbvm4h4,imgname-1-1767180652178.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[दारूमध्ये पाणी मिसळावं की सोडा, हा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण तर बर्फाचे तुकडे टाकून पितात. पण नक्की दारूत काय मिसळायला हवं? आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घेऊया.&lt;img&gt;दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो - ड्रिंक्समध्ये पाणी मिसळावं की सोडा? बर्फ का टाकावा? यावर आरोग्य तज्ज्ञ डॉ. राजू यांनी वैज्ञानिक उत्तरं दिली आहेत. डॉ. राजू सांगतात की, आपलं शरीर, हृदय किंवा लिव्हर कधीच दारूसारखं पेय मागत नाही. शरीराला त्याची गरजच नसते. लोक फक्त मानसिक समाधानासाठी दारू पितात. दारूत वेगवेगळ्या गोष्टी मिसळल्या की शरीरावर होणारे परिणामही वेगवेगळे असतात.&lt;img&gt;अनेक जण ड्रिंक्समध्ये बर्फाचे तुकडे टाकून पितात. डॉ. राजू सांगतात की, बर्फामुळे तोंडातील नसा बधीर होतात. त्यामुळे दारूची कडवट चव जाणवत नाही. **सोडा मिसळल्यास काय होतं?** जेव्हा तुम्ही दारूत सोडा मिसळता, तेव्हा त्यातील गॅस पोटातली दारू वेगाने लहान आतड्यात ढकलतो. यामुळे अल्कोहोल रक्तात खूप वेगाने मिसळतं आणि 'किक' लवकर बसते. शरीरावर जलद परिणाम करणारी ही पद्धत आहे. **कोल्ड्रिंक्स मिसळल्यास?** स्प्राइट किंवा इतर कोल्ड्रिंक्स मिसळल्यास, त्यातील ग्लुकोज (साखर) शरीरातील शुगर लेव्हल वाढवतं. यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. म्हणूनच दुसऱ्या दिवशी तीव्र हँगओव्हर आणि डोकेदुखीचा त्रास होतो, असा इशारा डॉ. राजू यांनी दिला आहे.&lt;img&gt;ज्यूस, फळं आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सनी बनवलेल्या कॉकटेल्समध्ये साखर आणि कॅलरीज खूप जास्त असतात. डॉ. राजू यांच्या मते, एक ग्लास कॉकटेल प्यायल्यास, एका वेळेच्या जेवणाएवढ्या कॅलरीज शरीराला मिळतात. दारू पिणं आरोग्यासाठी कधीच चांगलं नाही. जर ही सवय सोडू शकत नसाल, तर शक्य तितक्या कमी प्रमाणात प्या. शरीराला कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, असा सल्ला डॉ. राजू यांनी दिला आहे.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/alcohol-mixing-guide-soda-water-or-ice-what-experts-recommend/photoshow-4euo9gf"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[ड्रेसला हेव्ही लूक हवाय? ट्राय करा 'या' स्टायलिश नेक डिझाइन्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/6-stylish-suit-neckline-designs-for-a-fancy-party-look-q4lk02g</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/6-stylish-suit-neckline-designs-for-a-fancy-party-look-q4lk02g</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 20:10:08 +0530</pubDate>
            <description><![CDATA[एखाद्या कार्यक्रमासाठी हेवी वर्क असलेला सूट घालणार असाल, तर त्याला स्टायलिश आणि एलिगंट लुक देण्यासाठी नेक डिझाइन खूप महत्त्वाची ठरते. बोट नेक, स्क्वेअर नेक, व्ही-नेक आणि स्वीटहार्ट नेक यांसारख्या ट्रेंडी डिझाइन्स तुमच्या आऊटफिटला रॉयल टच देतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01ksfb54nxw12yht9eew9gy8tm,imgname-banarasi-suit-3-1779705221819.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/6-stylish-suit-neckline-designs-for-a-fancy-party-look-q4lk02g"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द; जात प्रमाणपत्रही बाद, नक्की कारण काय?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/mumbai/vishakha-raut-corporator-post-cancelled-caste-certificate-row-mumbai/articleshow-hfavip3</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/mumbai/vishakha-raut-corporator-post-cancelled-caste-certificate-row-mumbai/articleshow-hfavip3</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 19:45:24 +0530</pubDate>
            <description><![CDATA[मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0j8w8rk7z69ks08er8bme6e,imgname-vishakha-raut-1787319690002.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई :&lt;/strong&gt; उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर नियमानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगिले जात आहे. यामुळे आता या निर्णयाविरोधात विशाखा राऊत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा मोठा निर्णय&lt;/h2&gt;&lt;p&gt;विशाखा राऊत यांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, पालघर यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी जात प्रमाणपत्र क्रमांक 41636350840 जारी केले होते. मात्र, हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार संबंधित प्राधिकरणाला नसल्याचे समितीच्या चौकशीत समोर आल्याने रद्द करण्यात आले आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;कुणबी जात वैधतेसाठीचे पुरावे अपुरे&lt;/h2&gt;&lt;p&gt;विशाखा राऊत यांनी कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रासह कुणबी जात वैधता प्रमाणपत्रधारकांशी असलेले रक्ताचे नाते सिद्ध करणारे पुरावे समितीसमोर सादर केले होते. परंतु संबंधित व्यक्तींशी रक्तसंबंध असल्याचे विशाखा राऊत यांना समाधानकारकपणे सिद्ध करता आले नसल्याचे समितीने आपल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;९० दिवसांत अपील करता येणार&lt;/h2&gt;&lt;p&gt;समितीच्या निर्णयाविरोधात विशाखा राऊत यांना कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. संबंधित आदेश मिळाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्यासमोर अपील दाखल करता येणार आहे.याशिवाय समितीने रद्द केलेले जात प्रमाणपत्र आदेश मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत समितीच्या कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;'माझ्याकडे आजोबांपासूनचे पुरावे' : विशाखा राऊत&lt;/h2&gt;&lt;p&gt;कारवाईनंतर विशाखा राऊत यांनी समितीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. &ldquo;माझ्याकडे माझ्या आजोबांपासूनचे पुरावे आहेत. जात पडताळणीसाठी माझ्याकडे तीन महिन्यांचा अवधी आहे,&rdquo; असे त्यांनी म्हटले. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी दबाव आणल्यामुळे आपल्यावर ही कारवाई झाल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात विशाखा राऊत न्यायालयात दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[mumbai]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/mumbai/vishakha-raut-corporator-post-cancelled-caste-certificate-row-mumbai/articleshow-hfavip3"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[पैठणी किंवा सिल्क साडीत दिसाल रॉयल, ट्राय करा हे नेकलेस]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/trending-coin-necklace-designs-for-silk-sarees-xqt2i10</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/trending-coin-necklace-designs-for-silk-sarees-xqt2i10</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 19:27:26 +0530</pubDate>
            <description><![CDATA[सिल्क साड्यांवर सोन्याचे नेकलेस खूप छान दिसतात. पण, तुम्हाला अस्सल पारंपरिक लुक हवा असेल, तर 'कासू माला' म्हणजेच कॉइन नेकलेस घालायलाच हवा. चला, अशाच काही सुंदर कासू माला डिझाइन्स पाहूया...]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kxj65j1srexvm2z74vss4cye,imgname-coin-necklace-designs-v-1784095623224.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/trending-coin-necklace-designs-for-silk-sarees-xqt2i10"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Banana Freshness : केळी घरी आणल्यानंतर लगेच पिकतात? कारण घ्या जाणून]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/the-science-behind-why-bananas-ripen-faster-at-home/photoshow-aphni1p</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/the-science-behind-why-bananas-ripen-faster-at-home/photoshow-aphni1p</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 19:10:39 +0530</pubDate>
            <description><![CDATA[सुपरमार्केटमधून आणलेली हिरवीगार केळी घरी आणताच दोन दिवसांत काळी पडतात. दुकानात १० दिवस ताजी राहणारी केळी घरी इतक्या लवकर का खराब होतात? यामागचं खरं कारण काय आहे, जाणून घेऊया.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kz1fg5mq4etkd4c2gw8v5khv,imgname-images-1785682466455.jfif" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[सुपरमार्केटमधून आणलेली हिरवीगार केळी घरी आणताच दोन दिवसांत काळी पडतात. दुकानात १० दिवस ताजी राहणारी केळी घरी इतक्या लवकर का खराब होतात? यामागचं खरं कारण काय आहे, जाणून घेऊया.&lt;img&gt;सुपरमार्केटमध्ये गेलात की तुम्हाला दिसेल, केळी किती छान ताजी आणि हिरवीगार आहेत! पण घरी आणल्यावर दोन दिवसांतच साल काळी पडते. दुकानात १० दिवस ताजी राहणारी केळी घरी इतक्या लवकर का पिकतात? यामागचं विज्ञान काय आहे? आणि घरी केळी जास्त काळ ताजी ठेवण्याचे उपाय कोणते? चला, सगळं जाणून घेऊया.&lt;img&gt;सुपरमार्केटमध्ये केळी ताजी राहण्याचं मुख्य कारण म्हणजे तिथलं नियंत्रित वातावरण. स्टोअर आणि कोल्ड स्टोरेजमध्ये तापमान १३&deg;C ते १५&deg;C (५५&ndash;५९&deg;F) दरम्यान ठेवलं जातं. या थंड वातावरणामुळे केळी पिकण्याची प्रक्रिया मंदावते. इतकंच नाही, तर हवेतील आर्द्रता ९०-९५% पर्यंत राखली जाते, जेणेकरून केळ्यांची साल सुकणार नाही. फळांमधून बाहेर पडणारा इथिलीन गॅस बाहेर काढण्यासाठी मोठी व्हेंटिलेशन सिस्टीम असते. काही ठिकाणी १-एमसीपी (1-MCP) नावाचा एक सुरक्षित गॅस वापरला जातो, जो फळांच्या पेशींना इथिलीन शोषण्यापासून रोखतो. शिवाय, विक्रीसाठी हिरवट-पिवळी अर्ध-पिकलेली केळीच ठेवली जातात.&lt;img&gt;घरी आणल्यावर परिस्थिती पूर्णपणे बदलते. आपल्या घराचं सामान्य तापमान २५&deg;C पेक्षा जास्त असतं, ज्यामुळे केळ्यांमधील रासायनिक प्रक्रिया वेगवान होते. केळी हे 'क्लायमॅक्टेरिक' (climacteric) फळ आहे, म्हणजे झाडावरून तोडल्यानंतरही ते इथिलीन गॅस सोडत राहतात. आपण केळी घडासकट डायनिंग टेबलवर किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास हा गॅस बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे पिकण्याचा वेग आणखी वाढतो. सफरचंद, टोमॅटो, आंबा किंवा अ&zwj;ॅव्होकॅडो यांसारख्या फळांच्या जवळ ठेवल्यास, त्यांच्या इथिलीन गॅसच्या प्रभावामुळेही केळी लवकर काळी पडतात.&lt;img&gt;घरीही काही सोप्या टिप्स वापरल्यास केळी ५ ते ७ दिवस ताजी राहू शकतात. केळ्यांच्या घडाचा देठाचा भाग प्लास्टिक रॅप किंवा ॲल्युमिनियम फॉइलने घट्ट गुंडाळा. कारण, याच भागातून सर्वात जास्त इथिलीन गॅस बाहेर पडतो. केळी टेबलवर न ठेवता हँगरला लटकवून ठेवा, यामुळे त्यांच्यावर दाब पडत नाही आणि हवा खेळती राहते. घडामधून केळी वेगळी ठेवली तरी इथिलीनचा प्रभाव कमी होतो. सफरचंद, टोमॅटोसारख्या फळांपासून दूर, हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवा. प्लास्टिकच्या पिशवीत तर अजिबात ठेवू नका.&lt;img&gt;अनेक जण केळ्याची साल काळी पडू लागताच ते खराब झालं असं समजतात. पण साल काळी झाली तरी आतलं फळ खराब होत नाही, उलट ते खायला जास्त गोड आणि चविष्ट लागतं. फ्रीजमध्ये ठेवल्यास 'चिलिंग इजा' (chilling injury) मुळे साल लवकर काळी पडते, पण आतलं केळं चांगलं राहतं. मात्र, जर फळातून खराब वास येत असेल, बुरशी लागली असेल किंवा ते जास्त नरम होऊन पाणी सोडत असेल, तर ते न खाल्लेलंच बरं. या छोट्या टिप्स पाळल्यास तुमच्या घरातली केळी आता वाया जाणार नाहीत.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/the-science-behind-why-bananas-ripen-faster-at-home/photoshow-aphni1p"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Pellet Gun Row : जंतर-मंतर पेलेट हल्ल्याप्रकरणी अखेर पोलीस FIR दाखल करणार, राहुल गांधींच्या आंदोलनाला यश]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-intervention-forces-delhi-police-to-file-case-in-jantar-mantar-pellet-attack/articleshow-c61mh3o</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-intervention-forces-delhi-police-to-file-case-in-jantar-mantar-pellet-attack/articleshow-c61mh3o</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 18:30:23 +0530</pubDate>
            <description><![CDATA[जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनावेळी झालेल्या पेलेट गन हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलीस अखेर गुन्हा दाखल करणार आहेत. राहुल गांधींनी जखमी विद्यार्थ्याला घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0j3xz87ns0ehc11d1mgd8hy,imgname-fotojet--54--1787314502919.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई :&lt;/strong&gt; दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनावेळी झालेल्या पेलेट हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलीस आता गुन्हा दाखल करणार आहेत. सध्या अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा नोंदवला जाईल. जखमी विद्यार्थ्याचा जबाब नोंदवल्यानंतर यामध्ये आणखी कलमं जोडण्यावर विचार केला जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या प्रकरणात जखमी झालेल्या तरुणाला घेऊन राहुल गांधी स्वतः तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले होते. पण तिथल्या पोलिसांनी विद्यार्थ्याची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुल गांधी थेट पार्लमेंट स्ट्रीटवर असलेल्या सेंट्रल दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांच्या (DCP) ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली.&lt;/p&gt;&lt;p&gt;सुरुवातीला राहुल गांधी आणि तो जखमी विद्यार्थी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला गेले होते. पण तिथल्या पोलिसांनी केस नोंदवून घ्यायला नकार दिला. म्हणूनच त्यांना पार्लमेंट स्ट्रीटवरील डीसीपी ऑफिसमध्ये जावं लागलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;काय आहे प्रकरण?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;'संसद चलो' मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर पेलेट गन वापरल्याचे गंभीर आरोप झाले होते. या पोलीस कारवाईत साहिल लोचब नावाचा १९ वर्षांचा तरुण जखमी झाला होता. त्याची दृष्टी जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण, दिल्ली पोलीस आणि सरकारने मात्र आंदोलकांवर पेलेट गन वापरल्याचा इन्कार केला होता. हा दावा खोटा ठरवत राहुल गांधींनी जखमी विद्यार्थ्यांना मीडियासमोर आणलं. त्यांच्या शरीरातून काढलेल्या पेलेट्सचे मेडिकल रिपोर्टही त्यांनी जाहीर केले आणि आंदोलन अधिक तीव्र केलं होतं.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-intervention-forces-delhi-police-to-file-case-in-jantar-mantar-pellet-attack/articleshow-c61mh3o"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[PF Balance Check : या 4 पद्धतीने घरबसल्या तपासून पाहा तुमच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम, वाचा सोप्या स्टेप्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/pf-balance-check-4-easy-ways-to-check-epfo-pf-balance/articleshow-iu7bggd</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/pf-balance-check-4-easy-ways-to-check-epfo-pf-balance/articleshow-iu7bggd</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 18:16:31 +0530</pubDate>
            <description><![CDATA[तुम्ही घरबसल्या आपल्या PF खात्यातील शिल्लक रक्कम आणि व्यवहारांची माहिती तपासू शकतात. याबद्दलच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kyc7rfmrq9fjgna1c4376zzt,imgname-epfo-interest-credited-check-pf-balance-missed-call-sms-withdrawal-rules-upi-atm-umang-epfo-portal-2025-26-1784969707160.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (EPFO) हा सेव्हिंग करण्याचा महत्त्वाचा पर्याय आहे. कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्याचबरोबर कंपनीकडूनही पीएफ मध्ये योगदान दिले जाते. त्यामुळे आपल्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ईपीएफओ पासबुक पोर्टल, उमंग अ&zwj;ॅप, एसएमएस आणि मिस्ड कॉल अशा चार सोप्या पद्धतींनी घरबसल्या PF बॅलन्स तपासता येतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पीएफ खात्यासाठी UAN नंबर का महत्त्वाचा?&lt;/h2&gt;&lt;p&gt;ईपीएफओ अंतर्गत पीएफ खाते सुरू केल्यानंतक प्रत्येक कर्मचाऱ्याला 12 अंकी UAN (Universal Account Number) दिला जातो. हा क्रमांक कर्मचाऱ्यासाठी कायमस्वरूपी असतो. नोकरी बदलली तरी UAN नंबर बदलत नाही. नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतरही पीएफ खात्याशी संबंधित व्यवहार याच युएएन क्रमांकाद्वारे करता येतात. पीएफ खात्यात कर्मचारी आणि कंपनी या दोघांचेही योगदान जमा होते. कर्मचाऱ्याच्या योगदानाची रक्कम साधारणपणे मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्क्यांपर्यंत असते. पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर सरकारकडून दरवर्षी व्याजही दिले जाते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;1. EPFO पासबुक पोर्टलवरून PF बॅलन्स तपासा&lt;/h2&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;सर्वप्रथम EPFO Member Passbook Portal वर जा.&lt;/li&gt; &lt;li&gt;आपला UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका.&lt;/li&gt; &lt;li&gt;आता लॉगिन करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;आपली Member ID निवडा.&lt;/li&gt; &lt;li&gt;स्क्रीनवर PF खात्याचे पासबुक दिसेल.&lt;/li&gt; &lt;li&gt;त्यामध्ये कर्मचारी आणि कंपनीचे योगदान तसेच खात्यातील शिल्लक रक्कम पाहता येईल.&lt;/li&gt; &lt;li&gt;गरज असल्यास PF पासबुक डाउनलोडही करता येते.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;2. UMANG अ&zwj;ॅपद्वारे PF बॅलन्स असा तपासून पाहा&lt;/h2&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;मोबाईलमध्ये UMANG अ&zwj;ॅप डाउनलोड करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;अ&zwj;ॅप ओपन करून EPFO सेवा निवडा.&lt;/li&gt; &lt;li&gt;आता View Passbook या ऑप्शनवर क्लिक करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;तुमचा UAN नंबर टाका.&lt;/li&gt; &lt;li&gt;रजिस्टर्ट मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका.&lt;/li&gt; &lt;li&gt;आता PF पासबुक आणि खात्यातील शिल्लक रक्कम मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;3. SMS करून PF बॅलन्स तपासा&lt;/h2&gt;&lt;p&gt;इंटरनेट किंवा अ&zwj;ॅपचा वापर न करता देखील पीएफ खात्यातील रक्कम तपासता येते. यासाठी आपल्या ईपीएफओ खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरून एसएमएस करावा लागेल. मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये EPFOHO UAN असे टाइप करा आणि एसएमएस 7738299899 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर पीएफ खात्याशी संबंधित माहिती एसएमएसच्या मदतीने मिळू शकते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;4. मिस्ड कॉल देऊन मिळवा माहिती&lt;/h2&gt;&lt;p&gt;पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी मिस्ड कॉलची सुविधाही उपलब्ध आहे. ईपीएफओ खात्याशी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर पीएफ खात्याशी संबंधित माहिती एसएमएस द्वारे मिळू शकते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/pf-balance-check-4-easy-ways-to-check-epfo-pf-balance/articleshow-iu7bggd"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनला घरीच बनवा हे खमंग पदार्थ, पाहुणेही होतील खुश!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/raksha-bandhan-2026-easy-homemade-snack-recipes-for-family/articleshow-peqso28</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/raksha-bandhan-2026-easy-homemade-snack-recipes-for-family/articleshow-peqso28</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 18:11:37 +0530</pubDate>
            <description><![CDATA[रक्षाबंधन २०२६ चा सण साजरा करण्यासाठी घरीच काही सोपे आणि चविष्ट पदार्थ बनवा. कुरकुरीत नमक पारे आणि समोस्यांपासून ते गोड शंकरपाळे आणि नारळाच्या बर्फीपर्यंत, या सणासुदीच्या रेसिपीज पाहुणचारासाठी एकदम परफेक्ट आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01jj19z87d5k9f8zrr281s99xt,imgname-4-1737358287085.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;रक्षाबंधन म्हणजे कुटुंबासोबतचा जिव्हाळा, परंपरा आणि अर्थातच, चमचमीत पदार्थांची मेजवानी. नेहमीच्या गोडधोड पदार्थांसोबतच, जर तुम्ही घरी काही खमंग पदार्थ बनवले तर सणाची मजा आणखी वाढेल. जे लोक कमी साहित्यात बनणाऱ्या सोप्या रेसिपींच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी या काही भन्नाट आयडिया.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;१. नमक पारे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;साहित्य:&lt;/strong&gt; २ कप मैदा, &frac12; चमचा ओवा, &frac12; चमचा मीठ, ३ मोठे चमचे तेल किंवा तूप आणि गरजेनुसार पाणी.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कृती:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;एका भांड्यात मैदा, ओवा, मीठ आणि तेल एकत्र करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;बोटांनी हे मिश्रण चांगलं चोळून घ्या, जेणेकरून ते रवाळ दिसेल.&lt;/li&gt; &lt;li&gt;आता हळूहळू पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. हे पीठ १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा.&lt;/li&gt; &lt;li&gt;त्यानंतर, पिठाची पातळ पोळी लाटून त्याचे लहान डायमंड आकारात काप करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;मध्यम आचेवर तेल गरम करून हे काप सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.&lt;/li&gt; &lt;li&gt;शेवटी, थंड झाल्यावर सर्व्ह करा.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;२. शंकर पारे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;साहित्य:&lt;/strong&gt; २ कप मैदा, ३ मोठे चमचे तूप, गरजेनुसार पाणी, &frac34; कप साखर आणि &frac14; कप पाणी.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कृती:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;पहिल्यांदा मैदा आणि तूप एकत्र करून घ्या, नंतर पाणी घालून घट्ट पीठ मळा.&lt;/li&gt; &lt;li&gt;त्यानंतर, पोळी लाटून त्याचे लहान काप करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;एका कढईत तेल मंद-मध्यम आचेवर गरम करून हे काप सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.&lt;/li&gt; &lt;li&gt;एका वेगळ्या भांड्यात साखर आणि पाणी उकळून थोडा चिकट पाक तयार करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;तळलेले शंकरपाळे तयार पाकात घालून ते पूर्णपणे घोळले जाईपर्यंत एकत्र करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;शेवटी, पूर्णपणे थंड झाल्यावर खायला घ्या.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;३. बटाटा समोसा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;साहित्य:&lt;/strong&gt; २ कप मैदा, ३ मोठे चमचे तेल, ३ उकडलेले बटाटे, &frac12; चमचा जिरं, &frac12; चमचा धणे पूड, &frac14; चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कृती:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;मैदा, तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या. २० मिनिटं बाजूला ठेवा.&lt;/li&gt; &lt;li&gt;बटाटे मॅश करून त्यात जिरं, धणे पूड, तिखट आणि थोडं मीठ घालून सारण तयार करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;पिठाचे गोळे करून प्रत्येक गोळा लाटून घ्या. लाटलेल्या पोळीचे दोन भाग करून प्रत्येक भागाचा कोन तयार करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;या कोनात बटाट्याचे सारण भरा आणि कडा व्यवस्थित बंद करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;शेवटी, मंद-मध्यम आचेवर समोसे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;४. बेसन पकोडा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;साहित्य:&lt;/strong&gt; १ कप बेसन, १ चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, &frac12; चमचा ओवा, मीठ, लाल तिखट आणि पाणी. तळण्यासाठी तेल लागेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कृती:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;एका भांड्यात बेसन, कांदा, हिरवी मिरची, ओवा, मीठ आणि तिखट एकत्र करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ भिजवा.&lt;/li&gt; &lt;li&gt;आता कढईत तेल गरम करून पिठाची छोटी छोटी भजी त्यात सोडा.&lt;/li&gt; &lt;li&gt;कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळा आणि गरमागरम सर्व्ह करा!&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;५. बेसनाचे लाडू&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;साहित्य:&lt;/strong&gt; १ कप बेसन, &frac14; कप तूप, &frac12; कप पिठीसाखर, &frac12; चमचा वेलची पूड आणि सजावटीसाठी चिरलेले ड्रायफ्रुट्स.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कृती:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;कढईत तूप गरम करून त्यात बेसन घाला.&lt;/li&gt; &lt;li&gt;मंद आचेवर सतत ढवळत राहा. खमंग वास सुटेपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत बेसन भाजून घ्या.&lt;/li&gt; &lt;li&gt;मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला. मिश्रणाचे लाडू वळा आणि वरून ड्रायफ्रुट्सने सजवा.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;६. नारळाची बर्फी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;साहित्य:&lt;/strong&gt; २ कप किसलेलं खोबरं, १ कप स्वीटन्ड कंडेन्स्ड मिल्क आणि &frac12; चमचा वेलची पूड.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कृती:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;एका ट्रेला थोडं तूप लावून घ्या.&lt;/li&gt; &lt;li&gt;एका पॅनमध्ये खोबरं आणि कंडेन्स्ड मिल्क मंद-मध्यम आचेवर एकत्र शिजवा.&lt;/li&gt; &lt;li&gt;मिश्रण चिकटू नये म्हणून सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊन पॅनच्या कडा सोडू लागल्यावर गॅस बंद करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;त्यात वेलची पूड घालून मिक्स करा.&lt;/li&gt; &lt;li&gt;हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये पसरवा आणि सेट होण्यासाठी थंड होऊ द्या. नंतर त्याच्या वड्या पाडा.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;रक्षाबंधनसाठी घरगुती मेजवानी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;कुरकुरीत नमक पारे आणि समोसे किंवा बर्फी आणि लाडू यांसारख्या गोड पदार्थांनी तुम्ही तुमच्या रक्षाबंधनच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी रंगत आणू शकता. घरी पदार्थ बनवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट-गोड ठरवू शकता आणि गरमागरम सर्व्ह करू शकता. अशाप्रकारे, तुम्ही सणाचा आनंद सर्वांना आवडतील अशा चविष्ट पदार्थांसोबत घेऊ शकता.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/raksha-bandhan-2026-easy-homemade-snack-recipes-for-family/articleshow-peqso28"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठ पुरुष मंडळींनी खा हे फूड्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/foods-men-must-eat-to-keep-blood-pressure-under-control-quzh9on</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/foods-men-must-eat-to-keep-blood-pressure-under-control-quzh9on</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 16:59:51 +0530</pubDate>
            <description><![CDATA[ब्लड प्रेशरवर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास हृदयविकारासारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे पुरुषांनी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01k2cj7sbww90t15d7jahrc39g,imgname-fotojet--25--1754915923324.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/foods-men-must-eat-to-keep-blood-pressure-under-control-quzh9on"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Mumbai Crime : मुंबई हादरली! तृतीयपंथी बनून घरात घुसला, महिलेवर अत्याचार करून पैसेही लुटले]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-man-disguised-as-transgender-person-allegedly-rapes-woman-in-powai/articleshow-ryb6obt</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-man-disguised-as-transgender-person-allegedly-rapes-woman-in-powai/articleshow-ryb6obt</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 16:48:18 +0530</pubDate>
            <description><![CDATA[पवईमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल शिंदे नावाच्या २८ वर्षीय तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kzphhnqan53nacf2v2z12a1p,imgname-arrest--6--1786389255914.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;मुंबईच्या पवई परिसरात एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अनिल शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. तो तृतीयपंथी असल्याचं भासवून आणि महिलांचे कपडे घालून महिलेच्या घरात शिरला होता. घरात एक विधी करण्याच्या बहाण्याने तो आत आला आणि त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या घटनेनंतर पीडित महिलेने तिच्या पतीला सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, या घटनेबद्दल मीडिया रिपोर्ट्समधून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, आरोपी घरात शिरताना 'मी दृष्ट काढतो' असं म्हणाला होता. पीडित महिलेचा पती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यामुळे, या विधीमुळे त्याला बरं वाटेल असं महिलेला वाटलं आणि तिने आरोपीला घरात घेतलं, असं तक्रारीत म्हटल्याचं समजतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;तर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की, आरोपीने महिलेला मूल होण्यासाठी विधी करण्याचा बहाणा केला होता. या महिलेचं लग्न होऊन जवळपास पाच वर्ष झाली होती आणि तिला मूलबाळ नव्हतं. घटनेच्या वेळी तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता आणि ती एका वयस्क नातेवाईकासोबत राहत होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;शिंदे याने या जोडप्याला मूलबाळ नसल्याचा फायदा घेतला आणि 'तुम्हाला मूल व्हावं यासाठी मी एक विधी करतो', असं सांगून तो घरात शिरला. त्यानंतर त्याने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि घरातून २,००० रुपये घेऊन तो पसार झाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिसलेल्या ऑटोरिक्षाचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी ठाण्याच्या कळवा परिसरातून अनिल शिंदेला अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[mumbai]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-man-disguised-as-transgender-person-allegedly-rapes-woman-in-powai/articleshow-ryb6obt"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Foreign Travel : 'या' राशींच्या नशिबात आहे परदेशवारीचा योग, तुमची रास आहे का?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/zodiac-signs-destined-for-foreign-travel-and-settlement/photoshow-qriyhk0</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/zodiac-signs-destined-for-foreign-travel-and-settlement/photoshow-qriyhk0</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 16:39:48 +0530</pubDate>
            <description><![CDATA[नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचंय? ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना हा योग सहज मिळतो. कुंडलीतील ग्रह-तारे कसे ठरवतात तुमचा परदेश प्रवास? कोणत्या राशी परदेशात जाऊन स्थायिक होऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी ही गॅलरी नक्की वाचा!]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0hnw0y136xz49d430v0ahez,imgname-chatgpt-image-aug-21--2026--01-35-25-pm-1787299759041.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचंय? ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना हा योग सहज मिळतो. कुंडलीतील ग्रह-तारे कसे ठरवतात तुमचा परदेश प्रवास? कोणत्या राशी परदेशात जाऊन स्थायिक होऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी ही गॅलरी नक्की वाचा!&lt;img&gt;नोकरी, उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी परदेशात जाणं हे आजकाल अनेकांचं स्वप्न आहे. काहीच नाही, तर किमान पर्यटक म्हणून तरी परदेशात फिरायला जावं, असंही अनेकांना वाटतं. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील 9वं आणि 12वं घर दूरच्या प्रवासाचे आणि परदेशात स्थायिक होण्याचे संकेत देतात. त्याचबरोबर, चर राशी (ज्या स्वभावाने चंचल असतात), राहू-केतू आणि गुरू यांसारख्या ग्रहांची स्थितीही खूप महत्त्वाची असते. चला, पाहूया कोणत्या राशींना परदेशात जाण्याचा योग जास्त असतो आणि त्यासाठी ग्रहस्थिती कशी असावी लागते.&lt;img&gt;मेष ही एक चर राशी आहे, त्यामुळे नवीन ठिकाणं शोधणं आणि प्रवास करणं त्यांच्या स्वभावातच असतं. विशेषतः, तुमच्या कुंडलीत राहूची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असेल, तर माहिती तंत्रज्ञान (IT) आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील परदेशी संधी सहज तुमच्या दारावर ठोठावतील.&lt;img&gt;मिथुन ही वायू तत्त्वाची रास असून तिचा स्वामी बुध आहे. या लोकांना उच्च शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून परदेशात जाण्याचा योग जास्त असतो. विशेषतः, कुंडलीच्या 9व्या घरात गुरू किंवा शुक्र शुभ स्थितीत असतील, तर लहान वयातच परदेश प्रवासाची संधी मिळू शकते.&lt;img&gt;कर्क ही जल तत्त्वाची रास आहे, त्यामुळे यांना समुद्रापार प्रवासाचं नेहमीच आकर्षण असतं. जर कुंडलीतील 12वं घर मजबूत असेल, तर नोकरीसाठी परदेशात जाऊन तिथे कायमचं वास्तव्य (PR) करण्याचा योग सहज जुळून येतो.&lt;img&gt;ज्योतिषशास्त्रातील 9वं घर, जे भाग्यस्थान मानलं जातं, त्या घराचा स्वामी गुरू आहे आणि धनु ही गुरूची रास आहे. परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणं, आध्यात्मिक यात्रा करणं आणि परदेशी कंपन्यांमध्ये उच्च पदं मिळवणं या बाबतीत धनु राशीचे लोक खूप भाग्यवान असतात.&lt;img&gt;मीन ही राशीचक्रातील 12वी आणि जल तत्त्वाची रास आहे. तुमच्या कुंडलीत 9व्या आणि 12व्या घराचे स्वामी एकमेकांच्या घरात असतील (परिवर्तन योग) किंवा त्यांचा राहूशी संबंध असेल, तर परदेशात प्रचंड आर्थिक प्रगती करण्याचा योग जुळून येतो. परदेश प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी सोपा उपाय: परदेश प्रवासात अडथळे येत असल्यास, गुरुवारी दक्षिणामूर्तीची पूजा करावी. तसेच, राहू काळात दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावल्यास परदेश प्रवासाचा योग लवकर जुळून येतो.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/zodiac-signs-destined-for-foreign-travel-and-settlement/photoshow-qriyhk0"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[मुंबई लोकलमध्ये जागेवरून वाद; दिव्यांग प्रवाशाचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-local-train-seat-dispute-disabled-passenger-death/articleshow-eqaylgf</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-local-train-seat-dispute-disabled-passenger-death/articleshow-eqaylgf</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 16:30:17 +0530</pubDate>
            <description><![CDATA[मुंबई लोकलमध्ये हँडिकॅप प्रवाशांसाठी रिझर्व्ह असणाऱ्या सीटवरुन झालेल्या वादात ६२ वर्षीय दिव्यांग प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून ढकलल्याची घटना समोर आली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01jy3ha7w4v27sz5assd6bj0qj,imgname-local-1750317997956.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;मुंबई लोकलमध्ये जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या घटनेत झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशातच पुन्हा एकदा चर्चगेट-बोरिवली लोकलमध्ये माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान ६२ वर्षीय दिव्यांग प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या कॅजेटन डेनिस पिरेस हे जखमी झाले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;हँडिकॅप व्यक्तींच्या डब्यात जागेवरून वाद&lt;/h2&gt;&lt;p&gt;कॅजेटन पिरेस हे सांताक्रूझ पूर्व येथील रहिवासी होते. ते हँडिकॅप प्रवाशांसाठी रिझर्व्ह असलेल्या दिव्यांगजन डब्यातून प्रवास करत होते. याच डब्यात अमजद शेख हा हँडिकॅप नसून तो रिझर्व्ह सीटवर बसला. यावर पिरेस यांनी शेखला सीटवरुन उठण्यास सांगितले असता दोघांमध्ये वाद झाला.वाद ऐवढा चिघळला गेला की, शेख याने पिरेस यांना धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले गेल्याचे सांगण्यात येत आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सहप्रवाशांनी आरोपीला पकडले&lt;/h2&gt;&lt;p&gt;घटना घडल्यानंतर डब्यातील सहप्रवाशांनी अमजद शेखला पकडून ठेवले. ट्रेन वांद्रे स्थानकात पोहोचल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) अधिकाऱ्यांना पिरेस हे गंभीर जखमी अवस्थेत रेल्वे रुळांवर आढळले. त्यांना तातडीने वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल&lt;/h2&gt;&lt;p&gt;रेल्वे पोलिसांचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे यांच्या माहितीनुसार, अमजद शेखविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;'कावळा हाकलताना धक्का लागला' असा आरोपीचा दावा&lt;/h2&gt;&lt;p&gt;दरम्यान, आरपीएफ अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात अमजद शेखने वेगळा दावा केला आहे. लोकलच्या डब्यात कावळा शिरल्याचे त्याला वाटले. कावळ्याला हाकलण्याचा प्रयत्न करत असताना पिरेस यांना चुकून धक्का लागला आणि ते ट्रेनमधून खाली पडल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आरोपीच्या दाव्याचीही चौकशी केली जात आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;मुंबई लोकलमधील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर&lt;/h2&gt;&lt;p&gt;प्रवाशांमधील वादातून मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत यंदा घडलेली ही तिसरी जीवघेणी घटना असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेतील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी काम करणारे कार्यकर्ते समीर झवेरी यांनी अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[mumbai]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-local-train-seat-dispute-disabled-passenger-death/articleshow-eqaylgf"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[वॉशिंग मशीनमध्ये 'हे' कपडे चुकूनही धुवू नका, नाहीतर पश्चाताप होईल!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/washing-machine-mistakes-avoid-these-clothes-for-a-longer-lifespan-g1g1wdm</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/washing-machine-mistakes-avoid-these-clothes-for-a-longer-lifespan-g1g1wdm</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 16:10:14 +0530</pubDate>
            <description><![CDATA[वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याचं काम खूप सोपं झालं आहे. पण, सगळेच कपडे मशीनमध्ये धुता येत नाहीत. काही कपडे मशीनमध्ये धुतल्यास ते खराब तर होतातच, पण मशीनही बिघडण्याची शक्यता असते.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01jzw4g06fbbt9ed84t5krnd35,imgname-washing-machine-hack-5-1752217157839.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/washing-machine-mistakes-avoid-these-clothes-for-a-longer-lifespan-g1g1wdm"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Shweta Tiwari : मनसे समर्थकाकडून ऑनलाइन छळ, श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/shweta-tiwari-calls-out-mns-supporter-for-online-abuse-asks-raj-thackeray-if-this-is-acceptable/articleshow-xi10h0t</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/shweta-tiwari-calls-out-mns-supporter-for-online-abuse-asks-raj-thackeray-if-this-is-acceptable/articleshow-xi10h0t</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 15:37:40 +0530</pubDate>
            <description><![CDATA[अभिनेत्री श्वेता तिवारीने एका मनसे समर्थकाकडून होणाऱ्या ऑनलाइन छळावर थेट राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर महिलांविरोधात वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेवर तिने संताप व्यक्त केला असून, एका डॉक्टरवर तिने विशेषतः निशाणा साधला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kye52x4kphqnxe7aype1b896,imgname-shweta-tiwari-on-cjp-1785034011794.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;अभिनेत्री श्वेता तिवारीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावर होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल थेट प्रश्न विचारला आहे. एका डॉक्टरने, जो मनसेचा समर्थक असल्याचा दावा केला जातो, तिला ऑनलाइन शिवीगाळ केल्याचा आरोप श्वेताने केला आहे. श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेवर जोरदार टीका केली आहे. चांगल्या घरातील वाटणारे लोकही असे कमेंट्स करतात, हे पाहून आपल्याला धक्का बसल्याचं ती म्हणाली.&lt;/p&gt;&lt;h2&gt;ऑनलाइन गैरवर्तनावर श्वेता तिवारी संतापली&lt;/h2&gt;&lt;p&gt;एका पोस्टमध्ये श्वेताने लिहिलं आहे की, सोशल मीडियावर कोणत्याही महिलेला सहजपणे एक विशिष्ट घाणेरडी शिवी दिली जाते. वय, व्यवसाय किंवा पार्श्वभूमी काहीही असो, महिलांना अशा प्रकारच्या शिवीगाळीचा सामना करावा लागतो. तिने लिहिलं, &quot;आज मला एका अशा गोष्टीबद्दल बोलायचंय जी खूप चिंताजनक आणि दुर्दैवाने, सोशल मीडियावर खूप सामान्य झाली आहे: कोणत्याही महिलेला 'रा**' म्हणणं. कोणत्याही वयाची, कोणत्याही व्यवसायातील स्त्री असो. कोणताही पुरुष, कोणत्याही पार्श्वभूमीचा, ऑनलाइन येऊन एका स्त्रीला 'रा**' म्हणू शकतो.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;श्वेताने तिला शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा स्क्रीनशॉटही शेअर केला. तिने निदर्शनास आणून दिलं की, तो माणूस एक डॉक्टर आहे आणि त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी आणि मुलाचे फोटो आहेत. आपल्या घरात महिला असताना दुसऱ्या महिलेबद्दल कोणी इतक्या घाणेरड्या भाषेत कसं बोलू शकतं, असा सवाल तिने केला. तिने त्या व्यक्तीच्या राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या समर्थनावरही बोट ठेवलं. &quot;आणि मला वाटलं की दुसऱ्या बाईशी असं बोलून तुम्ही तुमच्या घरी कसं जात असाल? वरवर पाहता, तो राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक आहे,&quot; असं तिने लिहिलं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;थेट राज ठाकरेंना सवाल&lt;/h2&gt;&lt;p&gt;श्वेताने पुढे महाराष्ट्राशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितलं. तिचा जन्म आणि बालपण मुंबईतच गेलं असून ती आयुष्यभर याच राज्यात राहिली आहे. तिने थेट राज ठाकरेंना उद्देशून विचारलं की, जे लोक तुम्हाला किंवा तुमच्या पक्षाला पाठिंबा देतात, त्यांचं असं वागणं तुम्हाला मान्य आहे का?&lt;/p&gt;&lt;p&gt;&quot;राज ठाकरे, जर असे लोक तुमचे समर्थक असतील, तर मला खरंच जाणून घ्यायचंय... तुम्हाला हे वागणं योग्य वाटतं का?&quot; असा प्रश्न तिने विचारला.श्वेता तिवारी सध्या चित्रपट निर्माता करण जोहर होस्ट करत असलेल्या 'द ट्रेटर्स' या रिॲलिटी शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/shweta-tiwari-calls-out-mns-supporter-for-online-abuse-asks-raj-thackeray-if-this-is-acceptable/articleshow-xi10h0t"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[कमळ मेहंदीचे हे ५ प्रकार पाहिलेत का?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/what-are-the-different-types-of-mehndi-8m1713i</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/what-are-the-different-types-of-mehndi-8m1713i</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 14:36:55 +0530</pubDate>
            <description><![CDATA[ज्यांना हातावर खूप मेहंदी नको आहे त्यांच्यासाठी फिंगर टिप डिझाइन, तर पारंपरिक लुकसाठी मोर आणि कमळाची मेहंदी उत्तम पर्याय आहे. यासोबतच, बॅक हँड, लोटस कफ आणि अरेबिक लोटस मेहंदीचे आकर्षक प्रकारही हातांवर सुंदर दिसतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kz0t8rw814ym9bnbkbjsr6a5,imgname-leg-mehandi-4-1785660203912.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/what-are-the-different-types-of-mehndi-8m1713i"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[रक्षाबंधनाच्या आउटफिटवर उठून दिसतील या 6 गोल्डन बांगड्या]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/these-6-golden-bangles-will-look-stunning-with-your-raksha-bandhan-outfit-n8qafa4</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/these-6-golden-bangles-will-look-stunning-with-your-raksha-bandhan-outfit-n8qafa4</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 14:32:05 +0530</pubDate>
            <description><![CDATA[या लेखात जाळीदार, मेटल, साध्या, बंगाली आणि झिगझॅग पॅटर्नच्या गोल्डन बांगड्यांच्या विविध डिझाइन्सची माहिती दिली आहे. या बांगड्या एथनिक कपड्यांवर कशा खुलून दिसतात आणि पारंपरिक लुकसाठी कशा उपयोगी ठरतात, हे यात सांगितले आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01k3ajgndf4rsan38r3e29j0zj,imgname-golden-bangle-designs-2-1755922847150.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/these-6-golden-bangles-will-look-stunning-with-your-raksha-bandhan-outfit-n8qafa4"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[श्रावण महिन्यात घाला इअरिंगचे डिझाइन्स, पाहूनच मुलगी पडेल प्रेमात]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/try-out-earring-designs-during-the-month-of-shravan-c2uo1fv</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/try-out-earring-designs-during-the-month-of-shravan-c2uo1fv</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 14:08:34 +0530</pubDate>
            <description><![CDATA[हा लेख कमळाच्या डिझाइनमधील विविध प्रकारच्या इअररिंग्सची माहिती देतो. यामध्ये कुंदन, मीनाकारी, घुंगरू आणि चांदबाली अशा वेगवेगळ्या शैलीतील कमळ झुमके आणि टॉप्सचा समावेश आहे, जे तुमच्या लुकला एक खास आणि आकर्षक टच देतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0fdsv7nntp8pkveeh3s03kx,imgname-sonam-kapoor-earrings-1787224190196.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/try-out-earring-designs-during-the-month-of-shravan-c2uo1fv"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Gardening Tips: बागेविनाही घरात लावा हिरवीगार कोथिंबीर, या आहेत सोप्या टिप्स!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/grow-fresh-coriander-at-home-without-a-garden-simple-guide/articleshow-yw36wof</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/grow-fresh-coriander-at-home-without-a-garden-simple-guide/articleshow-yw36wof</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 13:56:19 +0530</pubDate>
            <description><![CDATA[घरी बाग नाहीये? तरीही तुम्ही ताजी कोथिंबीर उगवू शकता. फक्त एक कुंडी, चांगला सूर्यप्रकाश आणि योग्य पाणी वापरून तुम्ही घरच्या घरी कोथिंबीर कशी लावू शकता, हे जाणून घ्या.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0730a0n9e7n99bx229yys8m,imgname-coriander-from-stems-1786944432146.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;घरी ताजी कोथिंबीर लावणं तुम्हाला वाटतंय तितकं अवघड नाहीये. हिरवीगार कोथिंबीर लावण्यासाठी मोठी बाग किंवा टेरेस पाहिजे असं काही नाही. एक छोटी कुंडी, एखादा डबा किंवा खिडकीजवळ ठेवलेली कोणतीही वस्तू पुरेशी आहे. फक्त त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळायला हवा.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;योग्य कुंडी निवडा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;कोथिंबीर लावण्यासाठी किमान 6 ते 8 इंच खोल आणि खाली छिद्रं असलेली कुंडी निवडा. कोथिंबिरीची मुळं फार खोल जात नाहीत, त्यामुळे जर तुम्हाला एकाच वेळी जास्त रोपं लावायची असतील, तर पसरट कुंडी जास्त चांगली ठरते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;चांगल्या प्रतीची माती वापरा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;कोथिंबीर भुसभुशीत आणि पाणी सहज निचरा होणाऱ्या मातीत चांगली वाढते. साध्या मातीत कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत मिसळा. यामुळे मातीचा कस वाढतो आणि पाण्याचा निचराही चांगला होतो. घट्ट किंवा चिकणमाती वापरू नका, कारण त्यात पाणी साचून मुळं खराब होऊ शकतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;ताज्या बियांचा वापर करा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;चांगल्या रिझल्टसाठी चांगल्या प्रतीचे धणे वापरा. पेरणी करण्यापूर्वी अख्खे धणे हलकेसे फोडून त्याचे दोन भाग करा, पण त्याची पावडर करू नका. यामुळे बियांना मोड लवकर येतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;बिया योग्य पद्धतीने पेरा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;कुंडीतल्या मातीवर बिया सारख्या प्रमाणात पसरा आणि त्यावर मातीचा पातळ थर टाका. बिया जास्त खोलवर पेरू नका. बिया पेरून झाल्यावर भांड्याला हलकंसं पाणी द्या. माती फक्त ओलसर झाली पाहिजे, चिखल होता कामा नये.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;पुरेसा सूर्यप्रकाश द्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे रोपाला दिवसातून किमान 4 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळेल. यासाठी सनी बाल्कनी, खिडकी किंवा भरपूर उजेड येणारी जागा उत्तम आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;पाणी जपून घाला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;कोथिंबिरीला सतत ओलसर मातीची गरज असते, विशेषतः जेव्हा बियांना अंकुर फुटत असतात. जेव्हा मातीचा वरचा थर कोरडा वाटू लागेल, तेव्हाच हलक्या हाताने पाणी द्या. जास्त पाण्यामुळे मुळं सडू शकतात, त्यामुळे जास्तीचं पाणी कुंडीतून बाहेर जाईल याची खात्री करा.&lt;/p&gt;&lt;p&gt;एकदा रोपांना पुरेशी पानं आली की तुम्ही ताजी कोथिंबीर तोडू शकता. संपूर्ण रोप उपटण्याऐवजी, बाहेरची देठं आणि पानं कापून घ्या. यामुळे उरलेलं रोप वाढत राहतं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;सतत पुरवठ्यासाठी पेरणी करत रहा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;जर तुम्हाला नियमितपणे ताजी कोथिंबीर हवी असेल, तर दर दोन आठवड्यांनी थोड्या-थोड्या बिया पेरत रहा. या पद्धतीमुळे तुमच्याकडे नेहमीच काढणीसाठी तयार असलेली कोथिंबिरीची रोपं असतील.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;शेवटची टीप&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;ताजी कोथिंबीर उगवण्यासाठी तुम्हाला मोठ्या परसबागेची गरज नाही. योग्य कुंडी, चांगली माती, सूर्यप्रकाश, जपून पाणी देणे आणि नियमित पेरणी या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुमची छोटी बाल्कनी किंवा खिडकीही तुमची मिनी हर्ब गार्डन बनू शकते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/grow-fresh-coriander-at-home-without-a-garden-simple-guide/articleshow-yw36wof"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Gold Chains: नाजूक, जाड की लेयर्ड? तुमच्यासाठी कोणती चेन बेस्ट आहे?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/how-to-choose-the-perfect-gold-chain-for-your-style/articleshow-y3g6pwz</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/how-to-choose-the-perfect-gold-chain-for-your-style/articleshow-y3g6pwz</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 13:55:42 +0530</pubDate>
            <description><![CDATA[तुम्हाला परफेक्ट गोल्ड चेन घ्यायची आहे का? मग महिलांसाठी असलेल्या नाजूक, जाड आणि लेयर्ड स्टाइल्सबद्दल जाणून घ्या. सोबतच, तुमच्या कपड्यांना आणि स्टाइलला साजेशी चेन निवडण्यासाठी काही सोप्या टिप्स.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0hp993jedae3tv765ajj0rw,imgname-pr-2-1787300193394.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;एखाद्या साध्या ड्रेसवर घातलेली एक सोन्याची चेनसुद्धा तुमचा संपूर्ण लुक बदलू शकते. रोजच्या वापरासाठी नाजूक चेन छान दिसते, तर खास कार्यक्रमांसाठी एखादी जाड किंवा ठसठशीत चेन सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. हा फरक चेनच्या डिझाइनवर अवलंबून असतो. बारीक डिझाइनवाली चेन साधी दिसते, जाड चेन अधिक आकर्षक वाटते, तर लेयर्ड स्टाइल्समुळे गळ्याभोवती एक वेगळाच 'डेप्थ' आणि 'मूव्हमेंट' जाणवते.&lt;/p&gt;&lt;p&gt;महिलांसाठी गोल्ड चेन निवडताना, तुम्ही सहसा कोणते कपडे घालता, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या दागिन्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं आणि चेनने किती लक्ष वेधून घ्यावं असं तुम्हाला वाटतं, याचा विचार करा. वेगवेगळ्या डिझाइन्स वेगवेगळ्या नेकलाइन आणि प्रसंगांसाठी योग्य ठरतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;चला, आपण नाजूक, जाड आणि लेयर्ड चेनच्या स्टाइल्स पाहूया आणि तुमच्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये कोणती चेन फिट बसेल हे जाणून घेऊया.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;रोजच्या वापरासाठी नाजूक चेन्स (Thin Chains)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;बारीक डिझाइन आणि नाजूक काम यामुळे सोन्याच्या चेन्स रोजच्या वापरासाठी अतिशय सोप्या आणि सुंदर दिसतात.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;क्लासिक लिंक आणि केबल डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;केबल-स्टाइल पॅटर्नमध्ये गुंफलेल्या क्लासिक लिंक्समुळे या डिझाइनला एक साधा आणि संतुलित लुक येतो. या लिंक्समुळे चेन लक्ष वेधून घेते, पण ती जड वाटत नाही. तिची साधी रचना पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर छान दिसते, ज्यामुळे ती रोजच्या वापरासाठी एक उत्तम पर्याय ठरते.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;जिओमेट्रिक लिंक डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;स्वच्छ रेषा आणि भौमितिक आकार या चेनला एक मॉडर्न फील देतात. या रचनेमुळे एक आकर्षक लुक तयार होतो, पण त्यात जास्त तपशील नसतात. मिनिमल स्टाइलसाठी तुम्ही ही चेन एकटीच घालू शकता किंवा अधिक पर्सनल टच देण्यासाठी पेंडंटसोबतही घालू शकता.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;सोन्याच्या मण्यांचे डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;छोट्या गोलाकार मण्यांमुळे चेनला एक वेगळा टेक्स्चर आणि नाजूक हालचाल मिळते. मण्यांच्या या पॅटर्नमुळे गळ्याभोवती एक हलकी चमक येते, पण डिझाइन हलकं आणि वापरायला सोपं राहतं. ही स्टाइल रोजच्या वापरासाठी उत्तम आहे आणि इतर बारीक चेन्ससोबत लेयरिंगसाठीही वापरता येते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;स्टेटमेंट लुकसाठी जाड चेन्स (Chunky Chains)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;ज्यांना थोडे ठसठशीत दागिने आवडतात, त्यांच्यासाठी जाड लिंक्स किंवा मोठ्या आकाराची सोन्याची चेन गळ्याभोवती एक वेगळाच स्टेटमेंट लुक तयार करू शकते.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;इंटरलॉकिंग लिंक डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;एकमेकांत गुंतलेल्या लिंक्समुळे एक मजबूत आणि आकर्षक पॅटर्न तयार होतो, जो लगेच लक्ष वेधून घेतो. या घट्ट रचनेमुळे चेनला एक आत्मविश्वासपूर्ण (confident) लुक मिळतो. साध्या नेकलाइन आणि कमी डिझाइनच्या कपड्यांवर ही स्टाइल विशेषतः छान दिसते.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;स्लीक फ्लुइड चेन डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;गुळगुळीत आणि वाहत्या डिझाइनमुळे या चेनला एक सॉफ्ट पण स्टेटमेंट लुक मिळतो. यात जास्त नक्षीकाम नसतं, पण तिच्या रुंद आकारामुळे आणि स्वच्छ लाइन्समुळे ती खूप प्रभावी दिसते. ज्यांना खूप डिझाइन नसलेली पण ठसठशीत चेन हवी आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम आणि मॉडर्न निवड आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;मल्टी-स्ट्रँड चेन डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;अनेक बारीक चेन्स एकत्र करून तयार केलेल्या या डिझाइनमुळे गळ्यात एक व्हॉल्यूम दिसतो. प्रत्येक पदर स्वतंत्रपणे हलतो, ज्यामुळे चेनपुरता एक 'डेप्थ' आणि 'मोशन' तयार होतो. ओपन-नेक ब्लाउज, ड्रेस आणि सणांच्या कपड्यांवर हे डिझाइन खूपच आकर्षक दिसतं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;अनेक चेन्स एकत्र लेयर करणे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;वेगवेगळ्या लांबी, टेक्स्चर आणि डिझाइनच्या चेन्स एकत्र घातल्यास गळ्याभोवती एक सुंदर लेयर्ड लुक तयार होतो.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;स्क्रोलवर्क लेयर्ड डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;वळणदार नक्षीकामामुळे (स्क्रोल पॅटर्न) या लेयर्ड डिझाइनला एक सॉफ्ट आणि ग्रेसफुल लुक येतो. नाजूक खड्यांमुळे त्यात एक हलकी चमक येते. या डिझाइनचे दोन भाग असल्यामुळे तुम्ही ते एकत्र किंवा वेगवेगळेही घालू शकता.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;खडे लावलेले लेयर्ड डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;माणिक आणि पाचूसारख्या खड्यांमुळे या लेयर्ड डिझाइनला एक रंगीत आणि खास लुक मिळतो. बारीक जाळीकामामुळे (फिलिग्री) काठांवरचं डिझाइन अधिक आकर्षक दिसतं, पण चेन जड वाटत नाही. ही स्टाइल साड्या, सणांचे कपडे आणि इतर पारंपरिक कार्यक्रमांसाठी उत्तम आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;गोल्ड आणि डायमंड लेयर्ड डिझाइन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;अनेक बारीक पदरांमुळे गळ्याभोवती एक सॉफ्ट लेयर्ड इफेक्ट तयार होतो, तर हिऱ्यांमुळे (डायमंड) त्याला एक नाजूक चमक मिळते. ही चेन विशेषतः इव्हिनिंग वेअर आणि अशा आधुनिक कार्यक्रमांसाठी छान दिसते, जिथे तुम्हाला दागिने आकर्षक पण साधे हवे असतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;तुमच्या पर्सनल स्टाइलनुसार गोल्ड चेन कशी निवडाल?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;तुम्ही सहसा जसे कपडे घालता, त्यानुसार गोल्ड चेन निवडणं सोपं होतं.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;तुमचे रोजचे कपडे पाहा&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;साध्या कपड्यांवर बारीक लिंक्स, मणी आणि जिओमेट्रिक डिझाइन छान दिसतात, तर बोल्ड लुकसाठी जाड किंवा मल्टी-स्ट्रँड चेन निवडा.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;तुमची नेकलाइन तपासा&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;आखूड चेन्स ओपन आणि गोल गळ्यावर छान दिसतात, तर लांब किंवा लेयर्ड स्टाइल्स साध्या कपड्यांना अधिक 'डेप्थ' देतात.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;मेटलचा टोन विचारात घ्या&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;पिवळं सोनं (Yellow gold) एक उबदार लुक देतं, तर व्हाइट गोल्ड चेन थंड रंगांवर आणि मॉडर्न कपड्यांवर चांगली दिसते.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;चेन किती जाड हवी ते ठरवा&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;नाजूक चेन्स एक सॉफ्ट लुक देतात, तर जाड डिझाइन्स एक मजबूत स्टेटमेंट तयार करतात.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;तुम्ही ती कशी वापरणार आहात याचा विचार करा&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;साध्या चेन्स रोजच्या वापरासाठी चांगल्या आहेत, तर टेक्स्चर्ड आणि लेयर्ड डिझाइन्स सण आणि खास प्रसंगांसाठी योग्य आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;तुमच्यासाठी योग्य गोल्ड चेन शोधा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;नाजूक लिंक्स आणि मण्यांच्या पॅटर्नपासून ते जाड चेन्स आणि लेयर्ड स्टाइल्सपर्यंत, प्रत्येक डिझाइन गळ्याभोवती एक वेगळा लुक तयार करतं. योग्य निवड तुमच्या वॉर्डरोब, स्टाइल आणि तुम्ही कोणत्या प्रसंगासाठी तयार होत आहात यावर अवलंबून असते.&lt;/p&gt;&lt;p&gt;इंद्रिया (Indriya) सारख्या ब्रँड्सकडे महिलांसाठी नाजूक, स्टेटमेंट आणि लेयर्ड डिझाइनमध्ये गोल्ड चेन्सची मोठी रेंज उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार स्टाइल शोधणं सोपं होतं. तुम्ही जवळच्या स्टोअरला भेट देऊन डिझाइन्स प्रत्यक्ष पाहू शकता आणि ते घातल्यावर कसे दिसतात हे समजू शकता.&lt;/p&gt;&lt;p&gt;ग्राहक त्यांच्या जुन्या सोन्याच्या एक्सचेंज प्रोग्रामचाही (old gold exchange program) लाभ घेऊ शकतात, ज्यात कोणत्याही कॅरेटच्या जुन्या सोन्यावर ०% कपात दिली जाते. यासाठी लागू असलेले नियम आणि अटी लागू असतील.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/how-to-choose-the-perfect-gold-chain-for-your-style/articleshow-y3g6pwz"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Green Card: अमेरिकेच्या ग्रीन कार्ड नियमांत मोठा बदल, 'या' तारखेनंतर जुना अर्ज थेट रद्द होणार!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/uscis-mandates-new-green-card-application-form-from-september-18/articleshow-a7bx5id</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/uscis-mandates-new-green-card-application-form-from-september-18/articleshow-a7bx5id</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 13:49:33 +0530</pubDate>
            <description><![CDATA[अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठीच्या I-485 अर्जामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. १८ सप्टेंबरपासून नवीन अर्ज वापरावा लागेल, नाहीतर जुना अर्ज थेट फेटाळला जाईल. विशेषतः भारतीय अर्जदारांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0hgnzgyycg8yjv26ksv588e,imgname-image-f26bdcb3-cf62-4fce-bd74-4d5c90f43925-1787294318110.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;जे लोक अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेची नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा (USCIS) संस्था ग्रीन कार्ड किंवा परमनंट रेसिडेन्सीसाठीच्या अर्जात एक मोठा बदल करणार आहे. पुढच्या महिन्यापासून हा नवीन नियम लागू होईल. संस्थेने स्पष्ट केलंय की, ठराविक तारखेनंतर जुना अर्ज भरल्यास तो थेट रद्द केला जाईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;## अमेरिकेची नवीन सूचना&lt;/p&gt;&lt;p&gt;USCIS च्या अधिकृत सूचनेनुसार, Form I-485, ज्याला 'Application to Register Permanent Residence or Adjust Status' असंही म्हणतात, त्याची नवीन आवृत्ती १८ सप्टेंबरपासून लागू होईल. अमेरिकेत राहणारे पात्र नागरिक या फॉर्मद्वारेच कायदेशीररित्या स्थायी निवासासाठी किंवा ग्रीन कार्डसाठी अर्ज करतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;## भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे&lt;/p&gt;&lt;p&gt;या बदलाचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवर होणार आहे. कारण नोकरी आणि कुटुंबाच्या निमित्ताने अनेक भारतीय वर्षानुवर्षे ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. स्थलांतरित व्हिसाच्या लांब रांगेत असलेल्या अर्जदारांसाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;## तारीख चुकल्यास अर्ज रद्द&lt;/p&gt;&lt;p&gt;USCIS ने सांगितलं आहे की, नवीन फॉर्मची आवृत्ती तारीख 'September 18, 2026' आहे. हा फॉर्म जुन्या 'January 20, 2025' तारखेच्या आवृत्तीची जागा घेईल. अर्जदार आणि वकिलांच्या सोयीसाठी नवीन फॉर्मचा नमुना आणि मार्गदर्शक तत्त्वे आधीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. जुने आणि नवीन अर्ज एकत्र स्वीकारण्यासाठी कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही, असंही संस्थेने स्पष्ट केलंय. याचा अर्थ, अर्जदारांना अर्ज जमा करण्याची तारीख किंवा पोस्टमार्किंगची तारीख काळजीपूर्वक तपासावी लागेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;USCIS ने स्पष्ट केलंय की १८ सप्टेंबरच्या आधीपर्यंत जुना फॉर्म (January 20, 2025 आवृत्ती) स्वीकारला जाईल. पण जर एखादा अर्ज १८ सप्टेंबर रोजी किंवा त्यानंतर पोस्टाने किंवा ऑनलाइन जमा केला, तर जुना फॉर्म अवैध मानला जाईल आणि तो रद्द होईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्याचप्रमाणे, नवीन फॉर्म (September 18, 2026 आवृत्ती) १८ सप्टेंबरच्या आधी जमा करता येणार नाही. तो फक्त त्या तारखेला किंवा त्यानंतरच स्वीकारला जाईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;या कडक नियमांमुळे अर्जदारांना तारखेबद्दल किती सतर्क राहावं लागेल हे स्पष्ट होतं. छोट्याशा चुकीमुळे जुना अर्ज जमा केल्यास, तो तपासलाही जाणार नाही, थेट फेटाळला जाईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;## नियम का बदलले?&lt;/p&gt;&lt;p&gt;USCIS च्या मते, या बदलाचं मुख्य कारण 'पब्लिक चार्ज' (Public Charge) संबंधीचा नवीन नियम आहे. या नियमाद्वारे हे तपासलं जातं की, अर्जदार भविष्यात आपल्या उदरनिर्वाहासाठी अमेरिकन सरकारवर अवलंबून राहू शकतो का. अमेरिकेत वेगवेगळ्या काळात या नियमाच्या अंमलबजावणीत बरेच बदल झाले आहेत आणि हा स्थलांतर धोरणाचा एक वादग्रस्त भाग राहिला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;मात्र, या बदलामुळे फायलिंग फी किंवा अर्ज जमा करण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही, असं USCIS ने स्पष्ट केलं आहे. अर्जदारांना Form I-485 च्या वेबपेजवरून नवीन फॉर्मचा नमुना आणि संपूर्ण सूचना पाहण्यास सांगण्यात आलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;विशेष म्हणजे, टेक्नॉलॉजी, मेडिकल, इंजिनिअरिंग अशा अनेक क्षेत्रांत काम करणारे भारतीय व्यावसायिक अमेरिकेतील स्थलांतरितांचा एक मोठा भाग आहेत. पण प्रत्येक देशासाठी ठरलेल्या कोट्यामुळे अनेक भारतीयांना ग्रीन कार्डसाठी खूप काळ वाट पाहावी लागते. Form I-485 जमा केल्यानंतर, अर्जदारांना त्यांची स्टेटस ॲडजस्टमेंट प्रक्रिया सुरू असताना काम करण्याची आणि परदेशात प्रवास करण्याची परवानगी मिळते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/uscis-mandates-new-green-card-application-form-from-september-18/articleshow-a7bx5id"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Sajjan Kumar: 'त्याला फाशी झाली असती तर बरं झालं असतं'; दंगल पीडितांच्या संतप्त भावना]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/sajjan-kumar-dies-in-custody-victim-families-express-anguish/articleshow-otwpixu</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/sajjan-kumar-dies-in-custody-victim-families-express-anguish/articleshow-otwpixu</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 13:38:58 +0530</pubDate>
            <description><![CDATA[१९८४ च्या शीख विरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार यांच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एका पीडित कुटुंबाने त्यांच्या नैसर्गिक मृत्यूवर दुःख व्यक्त केलंय, तर DSGMC ने त्यांच्या शिक्षेसाठी दिलेल्या कायदेशीर लढ्याची आठवण करून दिली. ८४ वर्षीय कुमार तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-bf6e79a5-d138-497a-8472-e9469f04832c.jpeg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;h3&gt;सज्जन कुमार यांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया&lt;/h3&gt;&lt;p&gt;१९८४ च्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्या मृत्यूनंतर शुक्रवारी अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. एका दंगल पीडित कुटुंबाने यावर आपला संताप व्यक्त केला, तर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (DSGMC) कुमार यांना शिक्षा होईपर्यंत दिलेल्या कायदेशीर लढ्याची आठवण करून दिली.&lt;/p&gt;&lt;p&gt;१९८४ च्या दंगल पीडित कुटुंबातील सदस्य गंगा कौर म्हणाल्या, 'दंगलीच्या वेदना अजूनही ताज्या आहेत. आमच्या डोळ्यांदेखत आमच्या कुटुंबातील सदस्यांना जिवंत जाळण्यात आलं होतं. सज्जन कुमार यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, पण त्यांना फाशी झाली असती तर आम्हाला जास्त शांती मिळाली असती,' असं गंगा कौर यांनी ANI शी बोलताना सांगितलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आत्मा सिंग लुबाना यांनी कुमार यांच्यावरील कायदेशीर कारवाईबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'आधीच्या सरकारच्या काळात सत्र न्यायालयाने (Sessions Court) सज्जन कुमार यांना क्लीन चिट दिली होती. आमच्या समितीने त्या निर्णयाला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिलं होतं. ३१ डिसेंबर २०१९ रोजी ते शरण आले आणि त्यांना तिहार तुरुंगात टाकण्यात आलं. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. त्यांनी जामिनासाठी अनेक प्रयत्न केले, पण पीडितांच्या बाजूने आमचे वकील मजबूत असल्याने त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत,' असं लुबाना यांनी ANI ला सांगितलं.&lt;/p&gt;&lt;h3&gt;तुरुंगात मृत्यू आणि आजारपण&lt;/h3&gt;&lt;p&gt;गुरुवारी, काँग्रेसचे माजी खासदार आणि १९८४ च्या दिल्ली शीख दंगलीतील दोषी सज्जन कुमार यांचा वयाच्या ८४ व्या वर्षी राजधानीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ते उच्च रक्तदाब आणि पार्किन्सन्स आजाराने त्रस्त होते'.&lt;/p&gt;&lt;p&gt;सफदरजंग हॉस्पिटलने एका निवेदनात सांगितलं की, कुमार यांना सकाळी ११:०० वाजता हॉस्पिटलमध्ये आणताच त्यांना तातडीने दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर सर्व आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सर्व वैद्यकीय प्रयत्न आणि जीवनरक्षक उपाययोजना करूनही त्यांना वाचवता आलं नाही आणि दुपारी १२:३० वाजता त्यांचं निधन झालं. '८४ वर्षीय सज्जन कुमार यांना पोलिसांनी सकाळी ११:०० च्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत VMMC आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. त्यांना तातडीने दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. पण सर्व प्रयत्न करूनही दुपारी १२:३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि पार्किन्सन्सचा आजार होता आणि यापूर्वीही त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं,' असं निवेदनात म्हटलं आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;दशकांपासून चाललेले कायदेशीर लढे&lt;/h3&gt;&lt;p&gt;तीन वेळा खासदार राहिलेले कुमार हे भारतातील सर्वात प्रदीर्घ आणि महत्त्वाच्या कायदेशीर लढ्यांपैकी एक असलेल्या खटल्यात अडकले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या १९८४ च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित हे खटले होते. तीन दशकांहून अधिक काळ कुमार यांच्यावर या हिंसाचाराशी संबंधित अनेक फौजदारी खटले चालले. वेगवेगळ्या कोर्टात कधी त्यांची सुटका झाली, तर कधी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.&lt;/p&gt;&lt;p&gt;दिल्लीतील राज नगर भागातील एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या आणि गुरुद्वारा जाळल्याच्या प्रकरणात, दिल्ली उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१८ रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द केला. कोर्टाने कुमार यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. डिसेंबर २०१८ पासून ते तुरुंगात होते.&lt;/p&gt;&lt;p&gt;१ नोव्हेंबर १९८४ रोजी जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुनदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित सरस्वती विहार हत्या प्रकरणात, कनिष्ठ न्यायालयाने कुमार यांना निर्दोष मुक्त केलं होतं. मात्र, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी त्यांना दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांचं वाढतं वय, आजारपण आणि तुरुंगातील वर्तणूक लक्षात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;जनकपुरी आणि विकासपुरी भागातील हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात, सोहन सिंग आणि त्यांचे जावई अवतार सिंग यांच्या हत्येसाठी लोकांना भडकवल्याच्या आणि गुरचरण सिंग यांना जाळल्याच्या आरोपातून राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने २२ जानेवारी रोजी कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;२६ मे रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने १९८४ च्या शीख विरोधी दंगल प्रकरणात माजी खासदार सज्जन कुमार यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिकेवर नोटीस बजावली होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;कुमार यांनी तुरुंगात असताना वैद्यकीय कारणास्तव अनेकदा जामीन आणि दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचे शीर्षक वगळता, मजकूर आशियानेट न्यूजच्या संपादकीय टीमने संपादित केलेला नाही आणि तो सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आला आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/sajjan-kumar-dies-in-custody-victim-families-express-anguish/articleshow-otwpixu"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Ekart Controversy: 'काय करायचं ते कर, पार्सल देणार नाही!'; डिलिव्हरी एजंटच्या दादागिरीमुळे ग्राहक हैराण]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/ekart-delivery-agent-allegedly-refuses-parcel-sparking-online-outrage/articleshow-ezeac3w</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/ekart-delivery-agent-allegedly-refuses-parcel-sparking-online-outrage/articleshow-ezeac3w</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 13:23:32 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Ekart च्या एका डिलिव्हरी एजंटने ग्राहकाला पार्सल देण्यास नकार दिल्याचा आरोप करणारी एक X पोस्ट व्हायरल झाली आहे. यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, अनेक युजर्सनी कुरिअर कंपन्यांसोबतचे आपले वाईट अनुभव शेअर केले आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0jd6yn4tjbavjjtpsk15d7b,imgname-photo-collage.png-1787324234404.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;एका महिलेने केलेल्या X पोस्टमुळे सध्या ऑनलाइन विश्वात खळबळ उडाली आहे. Ekart च्या एका डिलिव्हरी एजंटने केलेल्या गैरवर्तनाचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यानंतर अनेक युजर्स पुढे आले आणि त्यांनी कुरिअर सेवांबद्दलचे आपले असेच अनुभव सांगितले.&lt;/p&gt;&lt;p&gt;या पोस्टनुसार, एका महिलेच्या पार्सलसाठी डिलिव्हरी एजंटने कोणताही संपर्क साधला नाही, पण तरीही तिची ऑर्डर 'कॅन्सल' झाल्याचं दाखवण्यात आलं. यामुळे त्रस्त होऊन ती महिला स्वतः Ekart च्या डिलिव्हरी हबवर तिचं पॅकेज घेण्यासाठी गेली. पण तिथेही डिलिव्हरी एजंटने ते पार्सल देण्यास नकार दिला, असा दावा तिने केला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;माही मिश्रा यांनी X वर लिहिले, &quot;तो डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यास नकार देत म्हणाला, 'तुम्ही काहीही करा, मी तुम्हाला हे देणार नाही!' ग्राहकाला फोन न करता परस्पर ऑर्डर कॅन्सल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;This is an Ekart delivery boy who used to cancel a person's parcel without even calling!The customer then goes to Ekart's hub and asks for their item to be delivered from there!Then the delivery boy refuses to deliver the item, saying, &quot;No matter what you do, I won't deliver&hellip; pic.twitter.com/X5hBILk6Uz&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Mahi Mishra (@MahiMishra98) August 19, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;मिश्रा यांनी या एजंटच्या वर्तनाचा निषेध करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. Ekart हे Flipkart साठी डिलिव्हरी करत असल्याने, त्यांनी Flipkart ला सुद्धा या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्या पुढे म्हणाल्या, &quot;अशा मनमानी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजवर कारवाई झालीच पाहिजे! Flipkart नेही यावर कारवाई करावी, कारण Ekart त्यांची पार्सल्स पोहोचवते. अशा लोकांमुळे ग्राहकांना त्रास होतो.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;या पोस्टनंतर इतर युजर्सनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी कुरिअर कंपन्यांसोबत अशाच समस्या आल्याचं सांगितलं. एका युजरने Ekart च्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधणं किती कठीण आहे हे सांगितलं, तर दुसऱ्याने मिश्रा यांच्या तक्रारीला दुजोरा देत म्हटलं की डिलिव्हरी करणारे कर्मचारी कधीकधी ग्राहकांना त्रास देतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&quot;अगदी बरोबर! अशा डिलिव्हरी बॉईजवर कारवाई झाली पाहिजे; ते ग्राहकांना त्रास देतात.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;Absolutely right! Action should be taken against such delivery boys; they harass customers. Just look at Flipkart/Ekart.&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Priyadarshini (@IM_Priyadarshni) August 19, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आणखी एका युजरने Ekart सोबतचा स्वतःचा अनुभव सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरीच्या समस्येबद्दल वारंवार तक्रार करूनही त्यांना मर्यादित प्रतिसाद मिळाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;एका तिसऱ्या युजरने लिहिले, &quot;माझ्यासोबतही एकदा असं घडलं आहे. Ekart सपोर्टशी संपर्कच होत नाही. त्यांना जबाबदार धरणं खूप अवघड आहे. तरीही मी सर्व उपलब्ध पर्यायांचा वापर करून तक्रारी दाखल केल्या. आता स्थानिक फ्रँचायझी आणि डिलिव्हरी पार्टनर जास्त काळजी घेतात. पण, ही चुकीची पद्धत आता इतर कंपन्यांमध्येही पसरत आहे.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;Absolutely! If Flipkart can&rsquo;t deliver on time, they shouldn&rsquo;t make false promises and fool customers. I&rsquo;ve faced this multiple times. Once, my phone was delivered after 35 days, and I had to go to their warehouse myself to find it. Terrible experience!&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Mohit Giri (@ZStans_) August 21, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;चौथ्या युजरने दावा केला की Myntra च्या एका एक्सचेंज ऑर्डरसोबतही असंच काहीसं घडलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरी एजंटने कोणताही कॉल न करता सलग तीन वेळा डिलिव्हरीचा प्रयत्न केल्याचं दाखवलं आणि अखेरीस ती एक्सचेंज ऑर्डर रद्द करण्यात आली.&lt;/p&gt;&lt;p&gt;&ldquo;माझ्या Myntra एक्सचेंज ऑर्डरसोबतही सलग ३ वेळा असंच झालं. Ekart कडून एकही कॉल न येता माझी एक्सचेंज ऑर्डर रद्द झाली. आता रिटर्न विंडो बंद झाल्यामुळे मला ते उत्पादन ठेवावं लागत आहे.&rdquo;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/ekart-delivery-agent-allegedly-refuses-parcel-sparking-online-outrage/articleshow-ezeac3w"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[NEET Row: FIR नोंदवल्याशिवाय हटणार नाही, राहुल गांधींचा पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-confronts-delhi-police-demands-fir-for-action-on-neet-protesters/articleshow-lfet35g</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-confronts-delhi-police-demands-fir-for-action-on-neet-protesters/articleshow-lfet35g</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 13:18:09 +0530</pubDate>
            <description><![CDATA[NEET परीक्षेतील गोंधळाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राहुल गांधींनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पेलेट गन वापरल्याचा आरोप करत, जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या कारवाईला गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-23e00ecd-cc84-44e0-8774-08596722a99f.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. NEET परीक्षेतील गोंधळाविरोधात 20 जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला, इतकंच नाही तर पेलेट गनही वापरल्या, असा आरोप करत याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी ते थेट DCP कार्यालयात गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी राहुल गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्येही गेले होते आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर, ते थेट सेंट्रल DCP यांना भेटायला पोहोचले.&lt;/p&gt;&lt;p&gt;जोपर्यंत या प्रकरणात रीतसर FIR दाखल होत नाही, तोपर्यंत आपण इथून हटणार नाही आणि न्यायासाठी लढा देत राहू, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर ते पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये गेले, जिथे ते सध्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत, असं सूत्रांकडून कळतंय.&lt;/p&gt;&lt;h2&gt;अमित शहांवर थेट हल्लाबोल&lt;/h2&gt;&lt;p&gt;याआधी 25 जुलै रोजी राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईला आणि बळाच्या वापराला त्यांनी थेट अमित शहांना जबाबदार धरलं. पत्रकार परिषदेत बोलताना गांधी म्हणाले, &quot;आमच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेला आम्ही थेट अमित शहांना जबाबदार धरतो. त्यांनीच आमच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याची परवानगी दिली. त्यांनीच पेलेट गनसारख्या घातक शस्त्रांच्या वापराला मंजुरी दिली. आमच्यासाठी हा एक खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न आहे. भारताच्या भविष्यावर, म्हणजेच विद्यार्थ्यांवर, आपलेच पोलीस गोळीबार करत आहेत हे आम्ही सहन करणार नाही. संसदेत हा एक मोठा मुद्दा बनेल.&quot;&lt;/p&gt;&lt;h2&gt;'कोलमडलेल्या व्यवस्थांमुळे' विद्यार्थी रस्त्यावर: राहुल गांधी&lt;/h2&gt;&lt;p&gt;राहुल गांधींनी यावर जोर दिला की देशातील 'शिक्षण व्यवस्था, मीडिया व्यवस्था आणि रोजगार निर्मितीची व्यवस्था' पूर्णपणे कोलमडली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ही आंदोलनं होत आहेत. भविष्यात देशावर एखादं आर्थिक संकट आलं, तर याचे गंभीर परिणाम दिसू शकतात, असंही ते म्हणाले. &quot;विद्यार्थी पंतप्रधानांकडे माफीची मागणीही करत आहेत. हे आंदोलन का झालं, यामागचं खरं कारण म्हणजे भारतातील नोकरी, शिक्षण, संस्थात्मक आणि मीडिया व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यांनी प्रभावीपणे काम करणं बंद केलं आहे. याचे परिणाम आता दिसत आहेत. आपण एका गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहोत. अशा काळात या व्यवस्था अधिक महत्त्वाच्या ठरतात. सरकारने हे समजून घेतलं पाहिजे की, इथे जे घडलंय ते एका मोठ्या समस्येचं फक्त एक पाऊल आहे,&quot; असं गांधी म्हणाले.&lt;/p&gt;&lt;p&gt;काँग्रेस खासदाराने पुढे असंही अधोरेखित केलं की, विद्यार्थ्यांची ही आंदोलनं सरकारसाठी एक 'कडक इशारा' आहेत. &quot;देशाला आपली खासगी मालमत्ता समजणं आता केंद्राने थांबवलं पाहिजे. जर सरकारने तरुणांकडे असंच दुर्लक्ष केलं, तर भविष्यात अशीच परिस्थिती आणखी गंभीर स्वरूपात समोर येऊ शकते,&quot; असं राहुल गांधी म्हणाले. (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(ही बातमी, मथळा वगळता, एशियानेट न्यूजच्या संपादकीय टीमने संपादित केलेली नाही आणि सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-confronts-delhi-police-demands-fir-for-action-on-neet-protesters/articleshow-lfet35g"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Joe Root: एका धावेने हुकलं 'ते' रेकॉर्ड, ७६ वर्षांपूर्वीच्या ब्रॅडमन यांच्या आठवणी ताज्या!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/joe-root-misses-50-average-milestone-in-eerie-parallel-to-don-bradmans-historic-near-miss/articleshow-sccn3s9</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/joe-root-misses-50-average-milestone-in-eerie-parallel-to-don-bradmans-historic-near-miss/articleshow-sccn3s9</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 13:14:04 +0530</pubDate>
            <description><![CDATA[इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट एका मोठ्या विक्रमाच्या अगदी जवळ येऊन पोहोचला, पण फक्त एका धावेने तो हुकला. ५०.०० च्या आंतरराष्ट्रीय सरासरीसाठी त्याला फक्त एक धाव कमी पडली आणि त्याची सरासरी ४९.९९ वर अडकली. या घटनेमुळे क्रिकेट इतिहासातील दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत घडलेल्या अशाच एका प्रसंगाची आठवण झाली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0hkj7dg0ysnarkabs136yy9,imgname-joe-root-and-don-bradman-1787297340844.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज जो रूट जवळपास १४ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याने डिसेंबर २०१२ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून रूटने आधुनिक क्रिकेटमधील महान धावपटू म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे आणि अनेक विक्रम मोडले आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;सध्या हेडिंग्ले येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात, जो रूटने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याने दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. रूटने ११२ चेंडूंत ६६ धावांची संयमी खेळी केली आणि जॉर्डन कॉक्ससोबत १५० धावांची भागीदारी रचली. कॉक्सने १०० चेंडूंत ७३ धावा केल्या, ज्यामुळे इंग्लंडने सामन्यात मजबूत पकड मिळवली.&lt;/p&gt;&lt;p&gt;पण, या अनुभवी इंग्लिश फलंदाजाची विकेट संघासाठी आणि वैयक्तिकरित्याही खूपच निराशाजनक ठरली. तो ६६ धावांवर बाद झाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०.०० ची सरासरी गाठण्यापासून फक्त एका धावेने दूर राहिला. जर त्याने हा टप्पा गाठला असता, तर किमान १०,००० आंतरराष्ट्रीय धावा करून ५० ची सरासरी गाठणारा तो पहिला इंग्लिश फलंदाज ठरला असता.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;जो रूट ४९.९९ च्या सरासरीवर अडकला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये ५० ची फलंदाजी सरासरी गाठणं हे कोणत्याही फलंदाजासाठी एक मोठं यश मानलं जातं. यावरून खेळाडूची कामगिरी आणि सातत्य दिसून येतं. पण जो रूटला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त एक धाव कमी पडली आणि ६६ धावांवर बाद झाल्यानंतर त्याची सरासरी ४९.९९ वर स्थिरावली.&lt;/p&gt;&lt;p&gt;हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला येण्यापूर्वी, ३५ वर्षीय रूटची सर्व फॉरमॅटमधील सरासरी ४९.९६ होती. त्याला ५०.०० चा टप्पा गाठण्यासाठी ६७ धावांची गरज होती. रूटने चांगली सुरुवात केली आणि तो हा टप्पा सहज गाठेल असं वाटत होतं. पण, खुर्रम शहजादच्या एका महत्त्वाच्या चेंडूवर तो पायचीत (LBW) झाला आणि एका धावेने त्याचं स्वप्न भंगलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;या ६६ धावांसह रूटच्या एकूण आंतरराष्ट्रीय धावा २२,८९९ झाल्या आहेत. तो आपल्या ५१६ डावांपैकी ४५८ वेळा बाद झाला आहे. त्यामुळे, त्याची सरासरी काढण्यासाठी एकूण धावांना एकूण विकेट्सने भागल्यावर (२२,८९९/४५८) उत्तर ४९.९९८ येतं. म्हणजेच, तो ५०.०० च्या सरासरीच्या अगदी जवळ पोहोचला, पण तांत्रिकदृष्ट्या तो मागे राहिला.&lt;/p&gt;&lt;p&gt;Before today&rsquo;s innings, Joe Root needed 67 runs to bring his intl batting average up to 50.00, but he was dismissed for 66 Highest Average in Intl Cricket&amp;nbsp;(All formats || min 10000 runs)52.71 - Virat Kohli&amp;nbsp;49.99 -  *49.10 - Jacques kallis&amp;nbsp;49.00 - Michael&hellip; pic.twitter.com/yy8qMqblGv&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash;  (@Shebas_10dulkar) August 20, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आता जर रूटला हा टप्पा गाठायचा असेल, तर त्याला पुढच्या डावात नाबाद राहून किमान एक धाव काढावी लागेल. पण जर तो एक धाव काढून बाद झाला (४५९ वी विकेट), तर त्याची सरासरी पुन्हा ४९.८९ (२२,९००/४५९) वर घसरेल. यावरून क्रिकेटमधील आकडेवारी किती सूक्ष्म असते हे दिसून येतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;जर रूट दुसऱ्या डावात फक्त १ धाव काढून नाबाद राहिला, तर तो लगेच ५०.०० च्या सरासरीचा टप्पा ओलांडेल. पण जर तो बाद होणार असेल, तर त्याला ५०.०० ची सरासरी गाठण्यासाठी किमान ५१ धावा कराव्या लागतील.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत विचित्र योगायोग&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;जो रूटने ५० च्या सरासरीचा टप्पा एका धावेने गमावल्यामुळे क्रिकेटचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कारकिर्दीतील एका प्रसिद्ध घटनेची आठवण झाली आहे. ब्रॅडमन यांना आपल्या शेवटच्या कसोटी डावात १०० ची परिपूर्ण सरासरी गाठण्यासाठी फक्त चार धावांची गरज होती, पण ते शून्यावर बाद झाले होते.&lt;/p&gt;&lt;p&gt;ब्रॅडमन यांची ९९.९४ ची कसोटी सरासरी हा केवळ कसोटी क्रिकेटमधीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीलही एक विक्रम आहे. त्यांच्या काळात वनडे आणि टी-२० सामने खेळले जात नव्हते. त्यांनी फक्त ५२ सामन्यांमध्ये ९९.९४ च्या सरासरीने ६९९४ धावा केल्या होत्या, जो एक अद्भूत विक्रम आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;ऑगस्ट १९४८ मध्ये ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील शेवटचा डाव खेळण्यापूर्वी, डॉन ब्रॅडमन यांची फलंदाजीची सरासरी १०१.३९ होती. त्यांना १००.०० च्या सरासरीने कारकीर्द संपवण्यासाठी फक्त चार धावांची गरज होती. पण, इंग्लंडचे फिरकीपटू एरिक हॉलीज यांनी त्यांना शून्यावर बाद केलं आणि त्यांची कारकिर्दीची सरासरी ९९.९४ वर राहिली.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;जर ब्रॅडमन यांनी त्या शेवटच्या डावात चार धावा केल्या असत्या, तर त्यांच्या ७० डावांमध्ये ७,००० धावा झाल्या असत्या आणि त्यांची कसोटी सरासरी बरोबर १००.०० झाली असती.&lt;/p&gt;&lt;p&gt;आता, जो रूटने ५०.०० च्या सरासरीचा टप्पा थोडक्यात गमावल्याने, ब्रॅडमन यांच्या १०० च्या सरासरीच्या पाठलागाची आठवण झाली आहे. वेगवेगळ्या काळात खेळलेल्या या दोन्ही दिग्गजांना एका अशा ऐतिहासिक आकड्याने हुलकावणी दिली, ज्यामुळे त्यांच्या शानदार कारकिर्दीत एक अविस्मरणीय अध्याय जोडला गेला.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Cricket]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/joe-root-misses-50-average-milestone-in-eerie-parallel-to-don-bradmans-historic-near-miss/articleshow-sccn3s9"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Don 3: रणवीरच्या वडिलांची IMPPA मध्ये धाव, ४५ कोटींच्या दाव्याला दिलं आव्हान]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/ranveer-singhs-father-contests-45-crore-claim-for-don-3-exit/articleshow-8cu8vab</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/ranveer-singhs-father-contests-45-crore-claim-for-don-3-exit/articleshow-8cu8vab</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 12:43:52 +0530</pubDate>
            <description><![CDATA[अभिनेता रणवीर सिंगचे वडील जगजीत सिंग भवनानी यांनी 'डॉन ३' सिनेमातून रणवीर बाहेर पडल्याने एक्सेल एंटरटेनमेंटने केलेल्या ४५ कोटींच्या दाव्याला आव्हान दिलं आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी IMPPA ची भेट घेतली आणि फरहान अख्तरच्या प्रोडक्शन हाऊससोबतच्या वादावर आपली बाजू मांडली.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01ksfhwhmg6309epgqjsdbtexk,imgname-ranveer-singh-banned-1779712280208.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;अभिनेता रणवीर सिंगचे वडील जगजीत सिंग भवनानी यांनी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA) मध्ये धाव घेतली आहे. 'डॉन ३' सिनेमातून रणवीर बाहेर पडल्यामुळे एक्सेल एंटरटेनमेंटने त्यांच्यावर तब्बल ४५ कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे, आणि याच दाव्याला भवनानी यांनी आव्हान दिलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;शूटिंग सुरू होण्याच्या काही आठवडे आधीच रणवीर सिंगने फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या प्रोडक्शन हाऊसचा 'डॉन ३' हा सिनेमा सोडला. हे प्रकरण फक्त एका करारावरून झालेलं नाही, तर यामागे फरहान अख्तरसोबतचा एक मोठा वाद असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या प्रोजेक्टच्या भवितव्यावर आणि इंडस्ट्रीतील वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;४५ कोटींच्या दाव्यावरून वाद&lt;/h2&gt;&lt;p&gt;४५ कोटी रुपये - ही ती रक्कम आहे जी फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या मालकीची कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट नुकसान भरपाई म्हणून मागत आहे. रणवीरने सिनेमा सोडल्यामुळेच त्यांनी ही मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) प्रमुख अशोक पंडित यांनी आरोप केला होता की, फरहान अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसला मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आता भवनानी यांनी IMPPA कडे काही कागदपत्रं सादर केली आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की, हा दावा एकतर निराधार आहे किंवा त्यांच्या मुलाने सिनेमा सोडल्याच्या तुलनेत खूप जास्त आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;वादाच्या केंद्रस्थानी फरहान अख्तर&lt;/h2&gt;&lt;p&gt;या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी फरहान अख्तर आहे. हा वाद फक्त पैशांपुरता मर्यादित नाही. फरहान हा 'डॉन ३' चा दिग्दर्शक, निर्माता आणि एक्सेल एंटरटेनमेंटचा सह-मालक आहे. त्यामुळे त्याचं वैयक्तिक आणि व्यावसायिक नाव या प्रोजेक्टशी जोडलेलं आहे. त्याने सुरुवातीपासूनच या बहुप्रतिक्षित फ्रँचायझीसाठी खूप मेहनत घेतली होती. शूटिंगच्या काही आठवडे आधी रणवीरने अचानक माघार घेतल्याने फरहानच्या क्रिएटिव्ह आणि प्रोडक्शनच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;हा फक्त एक व्यावसायिक धक्का नव्हता, तर फरहानच्या दिग्दर्शकीय दृष्टीकोनासाठी एक आव्हान होतं. त्याने या प्रोजेक्टमध्ये गुंतवलेला वेळ आणि क्रिएटिव्ह एनर्जी वाया जाण्याची भीती होती. त्यामुळे ४५ कोटी रुपयांच्या नुकसानीचा दावा हा फरहानला बसलेल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक फटक्याचं प्रतीक आहे. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अचानक आलेल्या या अडथळ्यामुळे मोठ्या फिल्ममेकर्सना किती दबावाला सामोरं जावं लागतं, हे या वादातून स्पष्ट दिसतंय. याचा परिणाम बजेट, कलात्मकता आणि प्रोजेक्टच्या टाइमलाइनवरही होतो.&lt;/p&gt;&lt;h2&gt;IMPPA ची मध्यस्थीची भूमिका&lt;/h2&gt;&lt;p&gt;IMPPA चे अध्यक्ष अभय सिन्हा यांनी भवनानी यांच्यासोबत झालेल्या भेटीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, असोसिएशनची कायदेशीर टीम सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करेल. एक योग्य तोडगा काढणं हे त्यांचं ध्येय आहे. हा वाद अभिनेता आणि फरहान अख्तरच्या प्रोडक्शन हाऊस या दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. याआधी रणवीरच्या वकिलांनीही IMPPA च्या मध्यस्थीला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. यावरून दिसतं की, इंडस्ट्रीला हे प्रकरण सामंजस्याने मिटवायचं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;नेमका वाद काय होता?&lt;/h2&gt;&lt;p&gt;मे महिन्यात हा वाद पेटला होता. तेव्हा FWICE ने रणवीर सिंगविरोधात असहकार्याचा ठराव (non-cooperation directive) जारी केला होता. यावरून मोठी चर्चा सुरू झाली. पण आठच दिवसांनंतर, जूनमध्ये, FWICE ने हा ठराव लगेच मागे घेतला. कारण IMPPA, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) यांनी यात हस्तक्षेप केला होता. या संस्थांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. त्यांना माहित होतं की अशा वादाचा इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो, विशेषतः जेव्हा फरहान अख्तरसारखा मोठा स्टार आणि दिग्दर्शक यात सामील असतो. भवनानी यांच्या या भेटीपूर्वीच, एक्सेल एंटरटेनमेंटने आपली बाजू IMPPA समोर मांडली होती. त्यात त्यांनी रणवीरच्या 'डॉन ३' च्या कराराचे आणि प्रमोशनल मटेरियलचे तपशीलही दिले होते. यामुळेच आताच्या या मध्यस्थीची पार्श्वभूमी तयार झाली.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/ranveer-singhs-father-contests-45-crore-claim-for-don-3-exit/articleshow-8cu8vab"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस, महाबळेश्वरचं किती होत तापमान?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/maharashtra/where-is-it-raining-in-maharashtra/articleshow-aqaozqf</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/maharashtra/where-is-it-raining-in-maharashtra/articleshow-aqaozqf</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 12:12:28 +0530</pubDate>
            <description><![CDATA[rain: राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत असून तो तुरळक स्वरूपाचा आहे. अनेक ठिकाणी तर अजूनही दुष्काळी परिस्थिती असल्याचं दिसून आलं आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kwp0kkxwsnywga236aqevh60,imgname-maharashtra-rain-1783150268348.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात मात्र पावसाला पोषक हवामान तयार झाल्याचं दिसून आलं आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह थोडा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;२४ तासांमध्ये कुठं किती होत तापमान?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;आता आपण २४ तासांमध्ये कुठं किती तापमान होत त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. गुरुवारी सकाळी २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील सर्वात नीचांकी तापमान नोंदवलं गेलं. राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप दिली आहे. तरी काही भागात मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Maharashtra]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/maharashtra/where-is-it-raining-in-maharashtra/articleshow-aqaozqf"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Robotaxi: टेस्लाला ५,००० रोबोटॅक्सींची परवानगी, शेअर बाजारात तेजी; मस्क म्हणतात 'ही तर सुरुवात आहे!']]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/tesla-gains-nevada-approval-for-5000-robotaxis-boosting-stock-as-elon-musk-predicts-massive-growth/articleshow-gxslszo</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/tesla-gains-nevada-approval-for-5000-robotaxis-boosting-stock-as-elon-musk-predicts-massive-growth/articleshow-gxslszo</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 11:21:33 +0530</pubDate>
            <description><![CDATA[टेस्लाचे सीईओ ایлон मस्क यांनी म्हटलं आहे की, कंपनी पुढील पाच वर्षांत महसूल वाढीसाठी विश्लेषकांनी वर्तवलेल्या ११९% च्या अंदाजालाही मागे टाकू शकते. नेवाडाने टेस्लाला ५,००० रोबोटॅक्सी चालवण्यास मंजुरी दिली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-493fe8ce-ff10-45eb-b8a1-980b21f3ca42.webp" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;ul&gt;  &lt;li&gt;नेवाडाने क्लार्क काउंटीमध्ये टेस्लाला ५,००० पेड रोबोटॅक्सी चालवण्यास मान्यता दिली आहे. याआधी ही मर्यादा फक्त १० गाड्यांची होती.&lt;/li&gt;  &lt;li&gt;ही सेवा सुरू करण्यापूर्वी टेस्लाला तपासणी, विमा आणि दरांची माहिती सादर करावी लागेल. ही प्रक्रिया साधारण ३० दिवसांत पूर्ण होऊ शकते.&lt;/li&gt;  &lt;li&gt;टेस्लाने ५,००० हा आकडा 'कमाल मर्यादा' असल्याचे म्हटले आहे. एका वर्षात २,५०० रोबोटॅक्सी रस्त्यावर उतरवणे हे एक मोठं यश असेल, असंही कंपनीने स्पष्ट केलं.&lt;/li&gt; &lt;/ul&gt;&lt;p&gt;टेस्लाच्या (TSLA) शेअर्समध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामागे दोन मोठी कारणं आहेत. एक म्हणजे, सीईओ ایлон मस्क यांनी कंपनीच्या वाढीबद्दल एक मोठा दावा केला आहे आणि दुसरं म्हणजे, नेवाडा प्रशासनाने टेस्लाला तब्बल ५,००० रोबोटॅक्सी चालवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;गुरुवारी TSLA च्या स्टॉकमध्ये २% ची घसरण झाली असली तरी, या आठवड्यात शेअर अजूनही १% नी वाढलेला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;टेस्ला वाढीचे सर्व अंदाज मोडणार - मस्क&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका युझरने पोस्ट केले की, विश्लेषकांच्या मते टेस्लाचा महसूल पुढील पाच वर्षांत ११९% वाढेल, तर स्पेसएक्सचा (SpaceX) महसूल २,०९०% नी वाढण्याचा अंदाज आहे. यावर प्रतिक्रिया देताना मस्क म्हणाले, &quot;मला माहित आहे हे सध्या अविश्वसनीय वाटेल, पण मला वाटतं की स्पेसएक्स आणि टेस्ला दोन्ही कंपन्या हे अंदाज ओलांडून पुढे जातील.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;दरम्यान, नेवाडा ट्रान्सपोर्टेशन ऑथॉरिटीने गुरुवारी एकमताने टेस्ला, उबर आणि वेमो (Waymo) या कंपन्यांना क्लार्क काउंटीमध्ये (जिथे लास वेगास आहे) पेड रोबोटॅक्सी सेवा चालवण्यास परवानगी दिली. यात टेस्लाला पुढील वर्षासाठी ५,००० गाड्यांची परवानगी मिळाली, तर वेमो आणि उबरला प्रत्येकी १,००० गाड्यांची परवानगी देण्यात आली. यापूर्वी टेस्लाला फक्त १० गाड्या चालवण्याची तात्पुरती परवानगी होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;ही सेवा सुरू करण्यापूर्वी टेस्लाला गाड्यांची तपासणी, विम्याचे कागदपत्र आणि भाड्याचे दर निश्चित करून सादर करावे लागतील. टेस्लाचे गुंतवणूकदार आणि तज्ञ सॉयर मेरिट यांनी X वर सांगितले की, ही प्रशासकीय प्रक्रिया सुमारे ३० दिवसांत पूर्ण होऊ शकते.&lt;/p&gt;&lt;p&gt;सायबरकॅबचे मुख्य अभियंता एरिक अर्ली यांनी नियामकांना सांगितले, &quot;५,००० गाड्या ही आमच्यासाठी कमाल मर्यादा आहे.&quot; ते पुढे म्हणाले की, एका वर्षात सुमारे २,५०० किंवा त्याहून किंचित जास्त गाड्या रस्त्यावर आणता आल्या तरी आम्ही &quot;अत्यंत आनंदी आणि समाधानी&quot; असू.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;टेस्लाचा 'मॉडेल Y' ऐवजी 'सायबरकॅब'वर भर&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;टेस्लाने जेपी मॉर्गनला सांगितले की, कंपनी जाणूनबुजून आपल्या रोबोटॅक्सी ताफ्यात 'मॉडेल Y' गाड्यांची भर घालत नाहीये, कारण नजीकच्या काळात 'सायबरकॅब' मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची त्यांची योजना आहे. सायबरकॅब ही दोन आसनी गाडी असून तिला स्टीअरिंग व्हील किंवा पेडल्स नाहीत. या गाडीचे उत्पादन फेब्रुवारीमध्ये गिगाफॅक्टरी टेक्सासमध्ये सुरू झाले आहे. मस्क यांनी यापूर्वी म्हटले होते की, नवीन घटक आणि उत्पादन प्रक्रियेमुळे सुरुवातीचा वेग &quot;खूपच कमी&quot; आहे. टेस्लाने कर्मचाऱ्यांसाठी सायबरकॅबमधून राईड्स आणि सार्वजनिक रस्त्यांवर इंजिनिअरिंग चाचण्याही सुरू केल्या आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;टेस्लाने फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) च्या V15 व्हर्जनला 'कामगिरीत मोठे बदल' घडवणारे तंत्रज्ञान म्हटले आहे. यातील सात प्रमुख तंत्रज्ञानांपैकी सुमारे ४०% तंत्रज्ञानाची रोबोटॅक्सीसाठी चाचणी सुरू आहे. सुरुवातीचा प्रतिसाद &quot;उत्साहवर्धक&quot; असल्याचे ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. टेस्लाच्या मते, V15 हे 'चालकाशिवाय चालणाऱ्या FSD' सेवेचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;पहिल्या तिमाहीत FSD चे सक्रिय सबस्क्रिप्शन सुमारे १.२८ दशलक्षवर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ५१% जास्त आहे. मे महिन्यात टेस्लाच्या गाड्यांनी एकूण १० अब्ज मैलांचा FSD प्रवास पूर्ण केला. टेस्लाने जेपी मॉर्गनला हेही सांगितले की, सायबरकॅब हे फक्त 'सुरुवातीचे मॉडेल' आहे. भविष्यात २० प्रवासी क्षमता असलेली 'रोबोव्हॅन' (Robovan) सारखी स्वायत्त वाहने आणण्याचे संकेतही दिले.&lt;/p&gt;&lt;p&gt;जेपी मॉर्गनने टेस्लाच्या स्टॉकला 'न्यूट्रल' रेटिंग आणि $४४५ चे प्राइस टार्गेट दिले आहे, जे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे २९% जास्त आहे. या फर्मच्या अंदाजानुसार, टेस्लाचा महसूल २०२५ मधील सुमारे $९५ अब्ज वरून २०३० पर्यंत $२०३ अब्ज पर्यंत वाढेल, ज्यामध्ये अर्धी वाढ स्वायत्त ड्रायव्हिंग आणि सेवांमधून येईल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;रिटेल गुंतवणूकदारांना काय वाटतं?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;Stocktwits या प्लॅटफॉर्मवर, TSLA साठी रिटेल गुंतवणूकदारांची भावना एका दिवसापूर्वीच्या 'Bullish' (सकारात्मक) पातळीवरून 'Neutral' (तटस्थ) वर घसरली आहे. २४ तासांच्या मेसेज व्हॉल्यूममध्ये ८% वाढ झाली आहे.&lt;/p&gt; &lt;img&gt;  २० ऑगस्टपर्यंत TSLA बद्दल गुंतवणूकदारांची भावना | सोर्स: Stocktwits  &lt;p&gt;एका युझरने म्हटले, &quot;$TSLA तर एक चिनी कंपनी आधीच त्यांच्या रोबोटसाठी प्री-ऑर्डर घेत आहे, जे तेच सर्व काम करतात जे ایлонने ऑप्टिमससाठी सांगितले होते. ایлонने काही आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत पण ऑप्टिमस रोबोटॅक्सी/FSD लेव्हल तीनच्या बाबतीत तो पूर्णपणे मागे पडला आहे.&quot;&lt;/p&gt; ही स्टॉकट्विट्स पोस्ट पहा &lt;p&gt;या वर्षात आतापर्यंत, टेस्लाचा स्टॉक त्याच्या &quot;मॅग्निफिसेंट सेव्हन&quot; (Magnificent Seven) गटातील इतर कंपन्यांच्या तुलनेत मागे पडला आहे. सुमारे २३% घसरणीसह तो या गटातील सर्वात वाईट कामगिरी करणारा स्टॉक ठरला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;दुसऱ्या एका युझरने म्हटले, &quot;$TSLA या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करा... एकदा सायबरकॅब रिलीज झाली आणि रस्त्यावर धावू लागली की tsla एका मोठ्या रॅलीसाठी सज्ज होईल!!&quot;&lt;/p&gt; ही स्टॉकट्विट्स पोस्ट पहा &lt;p&gt;या बातमीतील अपडेट्स आणि दुरुस्त्यांसाठी, newsroom[at]stocktwits[dot]com वर ईमेल करा.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/tesla-gains-nevada-approval-for-5000-robotaxis-boosting-stock-as-elon-musk-predicts-massive-growth/articleshow-gxslszo"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Rhea Chakraborty: 'गद्दार' बनायला नकार, रिया म्हणाली 'जग मला आधीच गद्दार समजतं']]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/rhea-chakraborty-explains-why-she-refused-traitor-role-on-reality-show/articleshow-cu440cu</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/rhea-chakraborty-explains-why-she-refused-traitor-role-on-reality-show/articleshow-cu440cu</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 11:13:01 +0530</pubDate>
            <description><![CDATA['द ट्रेटर्स' या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक असलेली रिया चक्रवर्तीने 'गद्दार' (traitor) बनण्यास नकार दिला. "जग मला आधीच गद्दार समजतं," असं म्हणत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांचा आणि ट्रोलिंग व 'डर्टी मीम्स'च्या भीतीचा उल्लेख केला.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-72f2a3aa-937a-4766-b501-561b6ea6b91e.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;h2&gt;रिया चक्रवर्तीने 'गद्दार' बनायला का दिला नकार?&lt;/h2&gt;&lt;p&gt;अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या 'द ट्रेटर्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. या रिॲलिटी शोमध्ये तिने 'गद्दार' (traitor) ही भूमिका साकारायला का नकार दिला, यामागचं कारण तिने स्पष्ट केलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या लोकप्रिय शोच्या पाचव्या एपिसोडमध्ये श्वेता तिवारीने रियाला विचारलं की ती गद्दार का नाही. यावर रियाने उत्तर दिलं की तिला अशी कोणतीही भूमिका करायची नाही, ज्यामुळे लोकांना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वाईट काळाची आठवण होईल. &quot;मला गद्दार बनायचं नाही. याचं कारण म्हणजे जग मला आधीच गद्दार समजतं. तुम्हाला कळतंय का? हे माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या प्रवासातून येतंय. त्यामुळे मला या शोमध्ये येऊन मुद्दामहून कुणाचा 'खून' करायचा नाही. हे माझ्यासाठी खूप वाईट ठरेल. लोक यावरून घाणेरडे मीम्स बनवतील,&quot; असं ती म्हणाली.&lt;/p&gt;&lt;p&gt;इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पाहा. रिया चक्रवर्ती (@rhea_chakraborty) यांनी शेअर केलेली पोस्ट.&lt;/p&gt;&lt;h3&gt;ट्रोलिंग आणि इतरांवर प्रभाव टाकण्यावर काय म्हणाली?&lt;/h3&gt;&lt;p&gt;गेल्या काही वर्षांपासून तिला ज्या 'ट्रोलिंग' आणि लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला, त्याबद्दलही रिया बोलली. ती म्हणाली की तिला कळपात सामील व्हायचं नाही आणि तिचा विश्वास आहे की ती शोमधील लोकांना प्रभावित करू शकते. &quot;मी देशातली सगळ्यात जास्त ट्रोल होणारी व्यक्ती आहे. याचा अर्थ काय हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे का? मी गद्दार नाही, तुम्ही सगळे मोठी चूक करत आहात. जो खरा गद्दार आहे, त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं केलं जातंय. माझ्याबद्दल एक गोष्ट म्हणजे मी कळपाबरोबर जात नाही आणि माझ्यावर सहज कुणाचा प्रभाव पडत नाही. पण माझं व्यक्तिमत्त्व असं आहे की मी लोकांवर प्रभाव टाकू शकते,&quot; असंही तिने पुढे सांगितलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;या एपिसोडमधून रिया बाहेर झाली नाही, तर पारुल गुलाटीला शोमधून बाहेर पडावं लागलं. क्रिस्टल डिसूझा आणि शहनील गिल या अजूनही 'ट्रेटर्स' म्हणून गेममध्ये आहेत. तर, हर्मन सिंघा, जो एक गद्दार होता, तो तिसऱ्या एपिसोडमध्येच पकडला गेला होता.&lt;/p&gt;&lt;h2&gt;'याच वर्षी मला क्लीन चिट मिळाली आहे'&lt;/h2&gt;&lt;p&gt;याआधी, शोचा होस्ट करण जोहरने रियाला विचारलं होतं की तिला शोमध्ये एक निर्दोष (innocent) बनायला आवडेल की गद्दार. यावर रियाने निर्दोष बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ती बऱ्याच काळासाठी संशयाच्या भोवऱ्यात होती, याचा तिने उल्लेख केला.&lt;/p&gt;&lt;p&gt;&quot;Iss saal hi actually mujhe clean chit mila hain, iss saal hi logo ko pata chala hai ki mai innocent hoon. Bohot der tak shaq mein rahi hoon toh woh itna pasand nahi hai ab mujhe. Kaafi saal kar liya hai maine (याच वर्षी मला क्लीन चिट मिळाली आहे. लोकांना कळालं आहे की मी निर्दोष आहे. खूप वेळ मी संशयाच्या घेऱ्यात राहिले आहे आणि आता मला ते आवडत नाही. बरीच वर्षं मी ते सहन केलं आहे),&quot; असं ती म्हणाली होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;जून २०२० मध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर मीडिया आणि लोकांकडून प्रचंड टीका झाली होती. यानंतर एका ड्रग्स प्रकरणात एनसीबीने (NCB) तिला आणि तिच्या भावाला अटक केली होती. नंतर सीबीआयने (CBI) सुशांतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. आता रिया पुन्हा कामावर परतली असून 'द ट्रेटर्स'च्या दुसऱ्या सीझनचा भाग आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;(या कथेची हेडलाईन वगळता, एशियनेट न्यूजेबल इंग्रजी स्टाफने हे संपादित केलेले नाही आणि सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित केले आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/rhea-chakraborty-explains-why-she-refused-traitor-role-on-reality-show/articleshow-cu440cu"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Starlink: एलॉन मस्कचा नवा प्लॅन, आता भारतातल्या गावागावात पोहोचणार सॅटेलाइट इंटरनेट!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/elon-musk-pitches-starlink-to-connect-rural-india-and-bridge-digital-divide/articleshow-u762udc</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/elon-musk-pitches-starlink-to-connect-rural-india-and-bridge-digital-divide/articleshow-u762udc</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 11:05:01 +0530</pubDate>
            <description><![CDATA[एलॉन मस्क यांनी भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागांसाठी स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे कनेक्टिव्हिटीची समस्या दूर होईल, असा कंपनीचा दावा आहे. व्यावसायिक लाँचसाठी भारत सरकारसोबत चर्चा सुरू असून, मंजुरीला उशीर होत असल्याच्या बातम्या कंपनीने फेटाळल्या आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-c57df5c8-4a1e-4e2a-b22e-3149bb27c538.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;एलॉन मस्क यांनी भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ही सेवा भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. शुक्रवारी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर 'DogeDesigner' नावाच्या एका युझरची पोस्ट शेअर करत मस्क म्हणाले, &quot;स्टारलिंकमुळे भारतातील अशा भागांना मदत होईल, जिथे इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही, विशेषतः ग्रामीण भागात.&quot; या पोस्टमध्ये मे महिन्यापर्यंत भारतातील ११,००० पेक्षा जास्त गावांमध्ये 4G सेवा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;भारतातील डिजिटल दरी कमी करण्याचा प्रयत्न&lt;/h2&gt;&lt;p&gt;या पोस्टनुसार, मार्च २०२६ पर्यंत भारतात १.०९३ अब्ज इंटरनेट सबस्क्रिप्शन्स होती, त्यापैकी ४४०.८७ दशलक्ष ग्रामीण भागातील होती. ग्रामीण भागात दर १०० लोकांमागे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ४८.३१ होती, तर शहरी भागात हेच प्रमाण १२६.८० इतकं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;या पोस्टमध्ये 'भारतनेट' योजनेचाही उल्लेख आहे. या योजनेअंतर्गत ८,५०,००० किलोमीटरपेक्षा जास्त फायबर केबल टाकण्यात आली आहे आणि सुमारे २,२१,००० ग्रामपंचायती सेवेसाठी तयार आहेत. पण जून २०२६ पर्यंत फक्त ८०,४७२ ग्रामपंचायतींमध्येच पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स (PoP) कार्यरत होते. अशा परिस्थितीत, दुर्गम गावं, डोंगराळ प्रदेश, बेटं आणि आपत्तीग्रस्त भागांमध्ये स्टारलिंक कनेक्टिव्हिटीची समस्या सोडवू शकतं. कारण अशा ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या इंटरनेट पोहोचवणं फायद्याचं ठरत नाही आणि पायाभूत सुविधांचीही कमतरता असते. याशिवाय, डायरेक्ट-टू-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीमुळे मोबाईल टॉवरच्या रेंजबाहेरही फोन कनेक्टेड राहू शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, &quot;भारत सरकारने लवकरात लवकर उरलेल्या परवानग्या द्याव्यात, स्पेक्ट्रमचं वाटप करावं आणि स्टारलिंकला व्यावसायिक लाँचसाठी परवानगी द्यावी. भारताने यासाठी आधीच खूप वेळ घेतला आहे.&quot; सध्या सरकार सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटप आणि सेवांसाठी नियमावली तयार करत आहे आणि स्टारलिंक भारतात आपली ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यास उत्सुक आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;स्टारलिंकची भारत सरकारसोबत चर्चा सुरू&lt;/h2&gt;&lt;p&gt;दरम्यान, स्टारलिंकच्या बिझनेस ऑपरेशन्स उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, कंपनीच्या व्यावसायिक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याबाबत भारत सरकारसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला होता की, भू-राजकीय आणि सुरक्षेच्या कारणांमुळे भारताने स्टारलिंकच्या मंजुरीची प्रक्रिया थांबवली आहे. इराण संघर्षादरम्यान स्टारलिंक टर्मिनल्सच्या वापरामुळे सुरक्षेची चिंता वाढल्याचंही या रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. अमेरिकन कंपनीवर अशा तणावाच्या काळात नियंत्रण ठेवता येणार नाही, अशी भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली होती. मात्र, ड्रेयर यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या, &quot;अनामिक सूत्रांच्या आधारावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांच्या उलट, स्टारलिंकची भारत सरकारसोबत सक्रिय आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे.&quot; (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचे फक्त शीर्षक बदलले आहे. या व्यतिरिक्त, एशियनेट न्यूजएबलच्या इंग्रजी कर्मचाऱ्यांनी या बातमीमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि ती सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/elon-musk-pitches-starlink-to-connect-rural-india-and-bridge-digital-divide/articleshow-u762udc"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[रक्षाबंधनला मिळवा स्टायलिश लुक: ५ खास सूट डिझाईन पहा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/get-a-stylish-look-for-raksha-bandhan-5xtwk4g</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/get-a-stylish-look-for-raksha-bandhan-5xtwk4g</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 09:42:11 +0530</pubDate>
            <description><![CDATA[हा लेख रक्षाबंधनासाठी विविध प्रकारच्या एथनिक सूट्सची माहिती देतो. यामध्ये एम्ब्रॉयडरी शरारा सूट, फ्लोरल प्रिंट अनारकली, स्ट्रेट कट सूट, बांधणी प्रिंट पटियाला आणि ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरी सूट यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0fm3ytyejq38m3k0jnd9542,imgname-suit-designs-for-raksha-bandhan-3-1787230813022.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/get-a-stylish-look-for-raksha-bandhan-5xtwk4g"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Bigg Boss: ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री करून देतो सांगणाऱ्यांपासून सावध राहा, खुद्द ‘त्या’ आवाजाच्या मालकाचा इशारा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/bigg-boss-voice-actor-vijay-vikram-singh-exposes-entry-scams/articleshow-2x1bgbm</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/bigg-boss-voice-actor-vijay-vikram-singh-exposes-entry-scams/articleshow-2x1bgbm</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 09:19:38 +0530</pubDate>
            <description><![CDATA[‘बिग बॉस’चा आवाज असलेले विजय विक्रम सिंह यांनी चाहत्यांना सावध केलं आहे. शोमध्ये एन्ट्री मिळवून देण्याचं आमिष दाखवणाऱ्यांपासून दूर राहा, असं ते म्हणाले. हा शो आमंत्रितांसाठी असतो, ऑडिशनवर आधारित नाही आणि स्पर्धक निवडण्यात माझी काहीही भूमिका नसते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-384529ae-f4f7-4faa-8da8-50eac9dbefdf.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;h2&gt;&lsquo;बिग बॉस&rsquo;मध्ये एन्ट्रीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबद्दल विजय विक्रम सिंह यांचा इशारा&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lsquo;बिग बॉस&rsquo; या लोकप्रिय रिॲलिटी शोला आपला आवाज देणारे विजय विक्रम सिंह यांनी नुकतंच चाहत्यांना एका मोठ्या फसवणुकीबद्दल सावध केलं आहे. अनेक लोक शोमध्ये एन्ट्री मिळवून देण्याचं आमिष दाखवत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. आपल्याला शोमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी अनेक जण मेसेज करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, &lsquo;बिग बॉस&rsquo; हा ऑडिशनवर आधारित नसून, तो एक आमंत्रितांसाठी असलेला (invitation-based) शो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.&lt;/p&gt;&lt;h3&gt;'बिग बॉस हा आमंत्रितांसाठी असलेला शो आहे'&lt;/h3&gt;&lt;p&gt;त्यांना येणाऱ्या मेसेजबद्दल बोलताना सिंह म्हणाले, &quot;'साहेब, मला बिग बॉसमध्ये जायचं आहे', असे अनेक मेसेज मला येतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 'बिग बॉस' हा एक आमंत्रितांसाठी असलेला रिॲलिटी शो आहे, तो ऑडिशनवर आधारित शो नाही. त्यामुळे कोणाला मेसेज पाठवून तुमची निवड होऊ शकत नाही आणि यात कोणीही तुमची मदत करू शकत नाही.&quot;&lt;/p&gt;&lt;h3&gt;'मी फक्त एक निवेदक आहे'&lt;/h3&gt;&lt;p&gt;स्पर्धक निवडण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलं. शोसोबतच्या आपल्या नात्याबद्दल ते म्हणाले, &quot;आणि मी तर तुमची अजिबातच मदत करू शकत नाही. मी या शोशी जोडलेला एक छोटासा निवेदक (narrator) आहे, जो फक्त आपला आवाज देतो. शोमध्ये जे दोन आवाज ऐकू येतात, त्यापैकी एक माझा आहे.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यांनी पुढे सांगितलं की स्पर्धक निवड प्रक्रियेशी त्यांचा काहीही संबंध नाही. &quot;त्यामुळे स्पर्धकांच्या निवड प्रक्रियेशी माझा दूर दूरपर्यंत, म्हणजे अगदी अंधेरी ते कुर्ल्यापर्यंत काहीही संबंध नाही,&quot; असं सिंह म्हणाले.&lt;/p&gt;&lt;h3&gt;'सावध राहा'&lt;/h3&gt;&lt;p&gt;शोमध्ये एन्ट्रीसाठी आपल्याला मेसेज करणं थांबवावं, असं आवाहनही सिंह यांनी केलं. जर कोणी तुम्हाला शोमध्ये स्थान मिळवून देण्याचं आश्वासन देत असेल, तर त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. &quot;त्यामुळे कृपया मला असे मेसेज पाठवणं बंद करा. उलट, जर तुम्हाला कोणी सांगत असेल की, 'मी तुम्हाला बिग बॉसमध्ये एन्ट्री मिळवून देतो', तर तो माणूस खोटं बोलत आहे. अशा लोकांपासून सावध राहा,&quot; असं म्हणत त्यांनी व्हिडिओचा शेवट केला.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lsquo;बिग बॉस हिंदी&rsquo;चा आगामी सीझन ६ सप्टेंबरपासून जिओहॉटस्टार (JioHotstar) आणि कलर्स (COLORS) चॅनलवर सुरू होणार आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/bigg-boss-voice-actor-vijay-vikram-singh-exposes-entry-scams/articleshow-2x1bgbm"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Gold Price: सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या 21 ऑगस्ट 2026 चे नवे दर]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/gold-and-silver-rates-update-for-august-21-2026-in-major-indian-cities/articleshow-za09499</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/gold-and-silver-rates-update-for-august-21-2026-in-major-indian-cities/articleshow-za09499</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 09:07:36 +0530</pubDate>
            <description><![CDATA[21 ऑगस्ट 2026 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,58,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरांवरही लोकांचे लक्ष आहे. मागणी आणि वाहतूक खर्चामुळे प्रमुख शहरांमध्ये या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वेगवेगळ्या आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kg8watcq86ebxd0mv7zdfkz9,imgname-gold-silver-price-crash-mcx-profit-booking-january-30-2026-india-2-1769824676247.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या दरांकडे गुंतवणूकदार, खरेदीदार आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. भारतात सण-समारंभ, लग्नकार्य आणि गुंतवणुकीसाठी सोन्याला नेहमीच पहिली पसंती दिली जाते.&lt;/p&gt;&lt;p&gt;ताज्या आकडेवारीनुसार, देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,390 रुपयांवर पोहोचला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की, प्रत्येक शहरात सोन्याचे दर थोडे वेगळे असू शकतात. यामागे स्थानिक बाजारपेठेतील मागणी, वाहतूक खर्च आणि इतर काही गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील दर नक्की तपासा.&lt;/p&gt;&lt;p&gt;सोन्यासोबतच चांदीच्या दरांकडेही लोकांचे लक्ष आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे चांदीच्या किमतीतही चढ-उतार दिसून येत आहेत. सोन्याप्रमाणेच, जागतिक बाजारातील हालचाली, औद्योगिक मागणी आणि चलनातील चढ-उतार यांसारख्या गोष्टींचा चांदीच्या दरांवर परिणाम होतो.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आजचे सोन्या-चांदीचे दर: 21 ऑगस्ट 2026&lt;/h2&gt;&lt;table&gt; &lt;tbody&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;&lt;strong&gt;शहर&lt;/strong&gt;&lt;/td&gt;   &lt;td&gt;&lt;strong&gt;24K सोनं (10 ग्रॅम)&lt;/strong&gt;&lt;/td&gt;   &lt;td&gt;&lt;strong&gt;22K सोनं (10 ग्रॅम)&lt;/strong&gt;&lt;/td&gt;   &lt;td&gt;&lt;strong&gt;चांदी 999 (1 किलो)&lt;/strong&gt;&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;दिल्ली&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,57,830&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,44,678&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 2,37,000&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;मुंबई&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,58,100&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,44,925&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 2,37,410&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;कोलकाता&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,57,890&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,44,733&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 2,37,090&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;चेन्नई&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,58,560&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,45,347&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 2,38,100&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;बंगळूरु&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,58,230&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,45,044&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 2,37,600&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;हैदराबाद&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,58,350&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 1,45,154&lt;/td&gt;   &lt;td&gt;Rs 2,37,790&lt;/td&gt;  &lt;/tr&gt; &lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;p&gt;सोन्याचे दागिने खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, दागिन्यांची अंतिम किंमत ही फक्त सोन्याच्या दराइतकी नसते. त्यात मेकिंग चार्जेस, जीएसटी आणि इतर खर्च जोडले जातात, ज्यामुळे तुमचे बिल वाढू शकते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता, हॉलमार्क तपासा आणि बिल नीट वाचून घ्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, व्याजदरातील बदल आणि गुंतवणूकदारांचा कल यांसारख्या गोष्टींचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो. देशांतर्गत मागणी आणि स्थानिक बाजारातील परिस्थितीमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये दरांमध्ये फरक दिसतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्याचप्रमाणे, चांदीच्या किमतीतही दिवसभरात देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील हालचालींनुसार बदल होऊ शकतो. चांदीत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांनी विश्वसनीय विक्रेत्यांकडून दरांची खात्री करून घ्यावी.&lt;/p&gt;&lt;p&gt;थोडक्यात, 21 ऑगस्ट रोजी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी दर तपासा, शुद्धतेची खात्री करा आणि सर्व अतिरिक्त शुल्कांबद्दल जाणून घ्या. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/gold-and-silver-rates-update-for-august-21-2026-in-major-indian-cities/articleshow-za09499"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Reservation Protest: जंतर-मंतरवर आंदोलनाला दिल्ली पोलिसांची 'ना'!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/delhi-police-denies-permission-for-reservation-reform-protest-at-jantar-mantar/articleshow-l4xv5u1</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/delhi-police-denies-permission-for-reservation-reform-protest-at-jantar-mantar/articleshow-l4xv5u1</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 08:44:57 +0530</pubDate>
            <description><![CDATA[दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय की २१ ऑगस्टला जंतर-मंतरवर आरक्षणासंदर्भात कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. सोशल मीडियावर परवानगी दिल्याचे जे व्हिडीओ फिरत आहेत, ते खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-23b9fe4f-95e5-48c6-8315-701457c8d657.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;दिल्ली पोलिसांनी गुरुवारी एक मोठी माहिती दिली. २१ ऑगस्टला जंतर-मंतरवर आरक्षणातील सुधारणांवरून (reservation reforms) होणाऱ्या आंदोलनाला कोणतीही परवानगी दिलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. सोशल मीडियावर याबद्दल जे व्हिडीओ फिरत आहेत, ते 'खोटे आणि दिशाभूल करणारे' असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, &quot;२१ ऑगस्ट रोजी जंतर-मंतरवर आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत, जे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, २१ ऑगस्टला जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.&lt;/p&gt;&lt;h2&gt;जमावबंदीचे आदेश लागू&lt;/h2&gt;&lt;p&gt;&quot;नवी दिल्ली जिल्ह्यात आधीपासूनच BNSS च्या कलम १६३ (पूर्वीचं कलम १४४ CrPC) अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू आहेत, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो,&quot; असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यामुळे, आंदोलनासाठी मोर्चे, मिरवणुका किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमण्यास सक्त मनाई आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या आंदोलनाच्या परवानगीबद्दल कोणतीही खात्री नसलेली माहिती पसरवू नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. खोटी बातमी तयार करणाऱ्या किंवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सोशल मीडियावरून आंदोलनाची हाक&lt;/h2&gt;&lt;p&gt;एका संस्थेच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून गुरुवारी एक पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. त्यात २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जंतर-मंतरवर 'शांततापूर्ण आंदोलना'साठी लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. यानंतरच दिल्ली पोलिसांनी हा खुलासा केला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पाहा&lt;/p&gt;&lt;p&gt;हे आवाहन 'रिझर्वेशन हटाओ आंदोलन' (Reservation Hatao Andolan) नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवरून करण्यात आलं होतं, ज्याचे ५.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;या प्लॅटफॉर्मने कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलन करण्याच्या पद्धती वापरून वेगाने लोकप्रियता मिळवली आहे. आता त्यांनी २१ ऑगस्टला आरक्षण व्यवस्थेविरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा केली होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचा फक्त मथळा बदलण्यात आला आहे. उर्वरित बातमी सिंडिकेटेड फीडमधून जशीच्या तशी प्रकाशित करण्यात आली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/delhi-police-denies-permission-for-reservation-reform-protest-at-jantar-mantar/articleshow-l4xv5u1"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Fuel Rates: पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर, तुमच्या शहरात आजचा भाव काय?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/latest-petrol-and-diesel-prices-on-august-21-2026-in-major-indian-cities/articleshow-o9mggta</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/latest-petrol-and-diesel-prices-on-august-21-2026-in-major-indian-cities/articleshow-o9mggta</guid>
            <pubDate>Fri, 21 Aug 2026 08:37:36 +0530</pubDate>
            <description><![CDATA[आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्ली, मुंबई आणि बंगळूरूसह प्रमुख भारतीय शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भारतातील इंधनाचे दर राज्यानुसार बदलतात कारण प्रत्येक राज्यात व्हॅट (VAT) आणि इतर स्थानिक कर वेगवेगळे असतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kzfra2293mzw87ppf8nh10zn,imgname-petrol-diesel-price-1786161465417.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;गाडी चालवणाऱ्यांसाठी आजचा दिवसही दिलासादायक आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी, देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. बंगळूरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;भारतात इंधनाच्या दरांमध्ये नियमितपणे बदल होत असतो. ग्राहकांना मोजावी लागणारी अंतिम किंमत प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगवेगळी असते. याचं मुख्य कारण म्हणजे व्हॅट (VAT), स्थानिक कर आणि वाहतूक खर्चात असलेला फरक. यामुळे, इंधनाची मूळ किंमत सारखी असली तरी, वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी ग्राहकांना वेगवेगळे पैसे मोजावे लागतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;आज २१ ऑगस्ट रोजी, खालील शहरांमध्ये कालच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गाडीत तेल भरण्यापूर्वी आपल्या शहरातील नवीनतम दर तपासण्याचा सल्ला दिला जातो, कारण दर ठिकाणानुसार आणि राज्याच्या करानुसार बदलू शकतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर, २१ ऑगस्ट २०२६&lt;/h2&gt;&lt;table&gt; &lt;tbody&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;&lt;strong&gt;शहर&lt;/strong&gt;&lt;/td&gt;   &lt;td&gt;&lt;strong&gt;पेट्रोलची किंमत (रु./लिटर)&lt;/strong&gt;&lt;/td&gt;   &lt;td&gt;&lt;strong&gt;डिझेलची किंमत (रु./लिटर)&lt;/strong&gt;&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;दिल्ली&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. १०२.१२&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ९५.२०&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;मुंबई&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. १११.२१&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ९७.७८&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;कोलकाता&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ११३.४३&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ९९.७८&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;चेन्नई&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. १०७.७६&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ९९.५७&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;बंगळूरू&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ११०.९३&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ९८.७९&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;हैदराबाद&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. ११५.६९&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु. १०३.८२&lt;/td&gt;  &lt;/tr&gt; &lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;h2&gt;राज्यानुसार इंधनाचे दर वेगवेगळे का असतात?&lt;/h2&gt;&lt;p&gt;पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, रुपया-डॉलर विनिमय दर, शुद्धीकरण आणि वाहतूक खर्च, केंद्राचे शुल्क आणि राज्यांचे कर यांचा समावेश असतो. व्हॅट आणि इतर स्थानिक कर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असल्यामुळे, संपूर्ण भारतात दर सारखे नसतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो, त्यामुळे जागतिक घडामोडींचाही दरांवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय पुरवठ्यातील बदल, भू-राजकीय तणाव आणि चलनातील चढ-उतार यामुळे कच्च्या तेलाच्या एकूण खर्चावर परिणाम होऊ शकतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;या सर्व घटकांनंतरही, २१ ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरातील छोटासा बदलही घरगुती बजेट, दैनंदिन प्रवास आणि वाहतूक खर्चावर परिणाम करत असल्यामुळे ग्राहक इंधनाच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;वाहनचालकांनी हे लक्षात ठेवावं की एकाच राज्यातील शेजारच्या शहरांमध्येही इंधनाचे दर थोडे वेगळे असू शकतात. त्यामुळे पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी स्थानिक दर तपासणे नेहमीच फायद्याचे ठरते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/latest-petrol-and-diesel-prices-on-august-21-2026-in-major-indian-cities/articleshow-o9mggta"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Cricket Viral: चार बिअर सांडल्या, पण पठ्ठ्या थांबला नाही! पुन्हा घेऊन आला; मैदानात झाला जल्लोष]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/fan-spills-four-beers-at-england-pakistan-test-gets-new-round-in-viral-moment/articleshow-b24wwwl</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/fan-spills-four-beers-at-england-pakistan-test-gets-new-round-in-viral-moment/articleshow-b24wwwl</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 23:00:50 +0530</pubDate>
            <description><![CDATA[इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी एक मजेदार घटना घडली. हेडिंग्ले स्टेडियममध्ये एका प्रेक्षकाने आपल्या जागेवर परतताना चार बिअर सांडल्या. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या महत्त्वाच्या सामन्यात या घटनेमुळे थोडा हलकाफुलका क्षण निर्माण झाला.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0g2665m086ktm8fyjbq9mvn,imgname-spectators-beers-in-england-1787245566132.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी एक विचित्र पण मजेशीर घटना घडली. गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर एक प्रेक्षक चार बिअर घेऊन आपल्या जागेकडे परतत होता, पण चुकून त्या सगळ्या बिअर खाली सांडल्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;दुसऱ्या दिवसाच्या खेळाला पावसामुळे उशीर झाला. इंग्लंडने २५ ओव्हर्समध्ये २ बाद ११२ धावांवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला. त्यावेळी कर्णधार जो रूट ३७ आणि जॉर्डन कॉक्स २३ धावांवर खेळत होते आणि ते पाकिस्तानच्या ५९ धावांनी पिछाडीवर होते. पहिल्या दिवशी ओली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेत पाकिस्तानला ४८.१ ओव्हर्समध्ये १७१ धावांवर गुंडाळलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;पावसामुळे सकाळच्या सत्रात व्यत्यय आला, पण नंतर खेळ सुरू झाला. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस, इंग्लंडने ५४ ओव्हर्समध्ये ४ बाद २३९ धावा केल्या होत्या. डॅन लॉरेन्स २२ आणि उपकर्णधार हॅरी ब्रूक १५ धावांवर खेळत होते. यजमान संघाने ६८ धावांची आघाडी घेतली होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;हे पण वाचा: &lt;/strong&gt;जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा 'हा' मोठा विक्रम&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;प्रेक्षकाचा बिअरसोबतचा 'तो' क्षण व्हायरल&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;इंग्लंडचा संघ आघाडी घेत असतानाच, हेडिंग्लेमधील एका प्रेक्षकासोबत घडलेल्या घटनेने कॅमेऱ्याचं लक्ष वेधून घेतलं. इंग्लंडच्या डावातील ३४ व्या ओव्हरमध्ये खेळ थोडावेळ थांबवण्यात आला. कारण, एक प्रेक्षक चार बिअर घेऊन आपल्या जागेकडे परतत असताना त्या खाली पडल्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;बीबीसी क्रिकेटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यात एक प्रेक्षक कार्डबोर्ड होल्डरमध्ये चार बिअर घेऊन काळजीपूर्वक आपल्या जागेकडे जाताना दिसतो. पण अचानक होल्डरमधून दोन बिअर निसटल्या आणि त्यानंतर उरलेल्या दोनही खाली पडून सांडल्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;यानंतर कॅमेरा त्या प्रेक्षकावर फोकस झाला, जो चारही बिअर गमावल्याने खूप निराश दिसत होता. पण गंमत म्हणजे, तो माणूस पुन्हा चार बिअरचा नवीन राऊंड घेऊन आपल्या जागेवर परतला. त्याला परत येताना पाहून प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि हशा पिकला. हा संपूर्ण प्रकार स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला.&lt;/p&gt;ही पोस्ट इन्स्टाग्रामवर पहा&lt;p&gt;BBC Cricket (@bbccricket) यांनी शेअर केलेली पोस्ट&lt;/p&gt;&lt;p&gt;ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांना दारू खरेदी करण्याची आणि पिण्याची परवानगी आहे. यामुळे चाहते सामना पाहताना ड्रिंकचा आनंद घेऊ शकतात. मात्र, आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये बाहेरून दारू आणण्यास सक्त मनाई आहे. प्रेक्षक फक्त स्टेडियममधील ठराविक ठिकाणांहूनच दारू खरेदी करू शकतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;WTC फायनलसाठी इंग्लंड आणि पाकिस्तानचं गणित काय?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील ही टेस्ट सीरिज दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण हे तीनही सामने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ चा भाग आहेत. या मालिकेतून जास्तीत जास्त ३६ WTC पॉइंट्स मिळू शकतात. टॉप-२ मध्ये स्थान मिळवून २०२७ च्या फायनलसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;सध्या इंग्लंड सातव्या स्थानावर आहे. त्यांचे २४.३६% गुण (PTC) आहेत, ज्यात ४ विजय, ८ पराभव आणि एक ड्रॉ सामील आहे. तर पाकिस्तान आठव्या स्थानावर आहे. त्यांचे २२.२२% गुण आहेत. त्यांनी ६ टेस्टमध्ये २ विजय आणि ४ पराभव पत्करले आहेत, पण त्यांना आठ गुणांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दोन्ही संघ सध्या टॉप-२ च्या शर्यतीतून बाहेर आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;सध्याची परिस्थिती पाहता, WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इंग्लंड आणि पाकिस्तान या दोघांनाही या मालिकेतील तिन्ही सामने जिंकावे लागतील. पण, मालिका ३-० ने जिंकली तरी फायनलचं तिकीट मिळेलच याची खात्री नाही. कारण त्यांचं अंतिम स्थान इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून असेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश, भारत आणि श्रीलंका हे संघही WTC फायनलच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तानला चांगली कामगिरी करण्यासोबतच इतर संघांचे निकालही त्यांच्या बाजूने लागावेत, अशी प्रार्थना करावी लागेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;हे पण वाचा: &lt;/strong&gt;ऐतिहासिक कामगिरीनंतर रॉबिन्सन-टंगने मॅच बॉलचे केले दोन तुकडे&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Cricket]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/fan-spills-four-beers-at-england-pakistan-test-gets-new-round-in-viral-moment/articleshow-b24wwwl"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[रक्षाबंधनासाठी बहिणीला द्या खास गिफ्ट; 4 हजारांच्या बजेटमध्ये चांदीच्या ट्रेंडी पैंजणांचे 6 डिझाइन्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/a-special-gift-for-your-sister-for-raksha-bandhan-18cv3b3</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/a-special-gift-for-your-sister-for-raksha-bandhan-18cv3b3</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 23:00:47 +0530</pubDate>
            <description><![CDATA[बहिणीला पारंपरिक आणि आकर्षक गिफ्ट देण्यासाठी चांदीच्या पैंजणांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. या लेखात मीनाकारी, झालर, रोप, कुंदन आणि कडा स्टाइल यांसारख्या सुंदर डिझाइन्सची माहिती दिली आहे, जे कोणत्याही पारंपरिक पोशाखावर शोभून दिसतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kyyjkzkgx4bfw9f4wn4xf1h9,imgname-sliver-anklet-1-1785585073776.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/a-special-gift-for-your-sister-for-raksha-bandhan-18cv3b3"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Sonam Kapoor: लेक वायूच्या वाढदिवशी सोनमची खास पोस्ट, आजोबा अनिल कपूरही झाले भावूक!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/sonam-kapoor-and-anil-kapoor-pen-heartfelt-birthday-wishes-for-vayu/articleshow-ngfhqi3</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/sonam-kapoor-and-anil-kapoor-pen-heartfelt-birthday-wishes-for-vayu/articleshow-ngfhqi3</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 23:00:25 +0530</pubDate>
            <description><![CDATA[सोनम कपूरने तिचा मोठा मुलगा वायूच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यात वायूने बनवलेली मातीची सूर्यमाला दिसत आहे. तर आजोबा अनिल कपूर यांनीही नातवाला 'हॅपी बर्थडे चॅम्प!' म्हणत प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-6045b8f4-491b-4a49-829e-dbf5f81cc3db.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;अभिनेत्री सोनम कपूर आज तिच्या मोठ्या मुलाचा, वायूचा वाढदिवस साजरा करत आहे. गुरुवारी वायूच्या वाढदिवसानिमित्त सोनमने एक खास फोटो शेअर केला. यात वायूने मातीपासून बनवलेली एक सूर्यमाला दिसत आहे, ज्याला 'द वायू सिस्टीम' असं नाव दिलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या फोटोसोबत तिने वायूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, सोनमचे वडील आणि अभिनेते अनिल कपूर यांनीही आपल्या नातवाचे काही खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी बर्थडे चॅम्प!' असं त्यांनी लिहिलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सोनम आणि आनंदचा प्रवास&lt;/h2&gt;&lt;p&gt;सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी 8 मे 2018 रोजी पारंपरिक 'आनंद कारज' पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर मार्च 2022 मध्ये, या जोडप्याने ते पहिल्यांदा आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;20 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईत त्यांच्या मुलाचा जन्म झाला. या जोडप्याने एका गोंडस मेसेजद्वारे ही आनंदाची बातमी दिली होती. त्यात लिहिलं होतं, '20.08.2022 रोजी, आम्ही आमच्या सुंदर मुलाचं स्वागत केलं आहे. या प्रवासात आम्हाला साथ देणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्स, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, पण आम्हाला माहित आहे की आमचं आयुष्य कायमचं बदललं आहे.'&lt;/p&gt;&lt;p&gt;सोनमने नोव्हेंबर 2025 मध्ये तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती आणि याच वर्षी मार्चमध्ये तिचा दुसरा मुलगा रुद्रलोक याचा जन्म झाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;इन्स्टाग्राम पोस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा&lt;/p&gt;&lt;h2&gt;कामाबद्दल बोलायचं झाल्यास&lt;/h2&gt;&lt;p&gt;सोनमने 'नीरजा', 'रांझना', 'वीरे दी वेडिंग' आणि 'दिल्ली 6' यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मुलाच्या जन्मानंतर तिने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सिनेमांमधून ब्रेक घेतला होता.&lt;/p&gt;&lt;p&gt;ती शेवटची 2023 मध्ये आलेल्या 'ब्लाइंड' या क्राईम थ्रिलर सिनेमात दिसली होती. शोम माखिजा दिग्दर्शित या सिनेमात तिच्यासोबत पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे यांच्याही भूमिका होत्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;(ही बातमी हेडलाईन वगळता एशियानेट न्यूजेबल इंग्रजी स्टाफने संपादित केलेली नाही आणि सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित केली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/sonam-kapoor-and-anil-kapoor-pen-heartfelt-birthday-wishes-for-vayu/articleshow-ngfhqi3"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Rahul Gandhi: पुण्यात महिलांसाठी खास कार्यक्रम, 'छात्रों की गूंज'मधून साधणार संवाद]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-invites-women-to-chhatron-ki-goonj-event-in-pune-to-discuss-their-issues/articleshow-kthhrx2</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-invites-women-to-chhatron-ki-goonj-event-in-pune-to-discuss-their-issues/articleshow-kthhrx2</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 23:00:15 +0530</pubDate>
            <description><![CDATA[काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात महिलांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. महिलांना त्यांचे अनुभव, चिंता, आव्हानं आणि समाजात मिळणारी वागणूक यावर चर्चा करण्यासाठी हे एक व्यासपीठ असेल.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-e5e600d0-e780-42c9-a1b9-d07cc80117d8.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;h2&gt;पुण्यात राहुल गांधींचा 'छात्रों की गूंज' कार्यक्रम, महिलांना केलं आमंत्रित&lt;/h2&gt;&lt;p&gt;काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी महिलांना शनिवारी (२२ ऑगस्ट) पुण्यामध्ये होणाऱ्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हा कार्यक्रम महिलांना त्यांचे अनुभव, चिंता आणि आव्हानं यावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असं ते म्हणाले. हा कार्यक्रम पुण्यातील AISSMS कॉलेजच्या मैदानावर होणार असून, भारतीय महिलांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्यावर यात भर दिला जाईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी याआधी आपल्या टीममधील महिलांना एक भारतीय महिला असण्याचा अर्थ काय आणि समाज त्यांना कशी वागणूक देतो, यावर त्यांचे विचार मांडायला सांगितले होते. &quot;मी ठरवलं की माझ्या टीममधील महिलांना विचारावं की एक भारतीय महिला असण्याबद्दल त्यांचे काय विचार आहेत. मग आम्ही एक छोटासा सराव केला, ज्यात प्रत्येकीने २०-३०-४० मिनिटं बोलून सांगितलं की एक भारतीय महिला म्हणून त्यांना नक्की कसं वाटतं, समाज त्यांना कशी वागणूक देतो, त्यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या,&quot; असं काँग्रेस खासदारांनी सांगितलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;एक भारतीय महिला असण्याचा अर्थ काय? मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला काय वाटतं. समाजाचं नाही, कुटुंबाचं नाही - तुमचा स्वतःचा आवाज काय म्हणतो? तुमचा संघर्ष, तुमच्या अडचणी, तुमचा दृष्टिकोन आणि तुमची स्वप्नं. तुमची कहाणी काय आहे? सर्वांकडून उत्तरांची अपेक्षा आहे. २२ ऑगस्ट | महिला विशेष&hellip; pic.twitter.com/iFOCMJooWn &mdash; राहुल गांधी (@RahulGandhi) २० ऑगस्ट, २०२६&lt;/p&gt;&lt;p&gt;काँग्रेस नेते म्हणाले की, या चर्चेमुळे त्यांना महिलांचे अनुभव समजून घेण्यास मदत झाली आणि नंतर त्यांच्या टीमने ही चर्चा मोठ्या स्तरावर सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला.&lt;/p&gt;&lt;h3&gt;या महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा&lt;/h3&gt;&lt;p&gt;या कार्यक्रमात महिलांना समाज त्यांना कशी वागणूक देतो, त्यांच्याविरोधात भीतीचा वापर कसा केला जातो, त्यांना कोणत्या प्रकारच्या हिंसेला सामोरं जावं लागतं आणि ती कुठे अनुभवायला मिळते, अशा विविध मुद्द्यांवर विचारलं जाईल, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. महिलांकडून मिळालेल्या काही प्रतिक्रियाही त्यांनी सांगितल्या. यामध्ये काळजीच्या नावाखाली नियंत्रण ठेवणे, लवकर लग्न लावून देणे, पुरुषप्रधान संस्कृती, नैतिक पोलीसगिरी, सुरक्षिततेचा आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव, तसेच त्यांच्या निवडीवर घातलेली बंधनं यांसारख्या चिंतांचा समावेश होता. &quot;माझ्या टीमने ठरवलं की, ही चर्चा सर्वांसाठी खुली का करू नये? या कार्यक्रमात येणाऱ्या महिलांना, हा कार्यक्रम पाहणाऱ्या महिलांना विचारूया की एक भारतीय महिला म्हणून त्यांना कसं वाटतं. समाज त्यांच्याशी काय करतो? भीतीचा शस्त्र म्हणून त्यांच्याविरोधात कसा वापर होतो? त्यांना कोणत्या प्रकारच्या हिंसेला सामोरं जावं लागतं? ही हिंसा त्यांना कुठे अनुभवावी लागते? देशाचे नागरिक म्हणून त्यांना कसं वाटतं? आम्हाला काही खूप छान आणि खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या...&quot; असं ते म्हणाले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;'हा संवाद अत्यंत गरजेचा'&lt;/h2&gt;&lt;p&gt;त्यांनी महिलांना पुण्यातील या संवादात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आणि भारतीय महिलांची परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अशा चर्चा महत्त्वाच्या असल्याचं म्हटलं. &quot;हा असा संवाद आहे जो आपण करायला हवा, जेणेकरून आपण सर्व मिळून भारतीय महिलांना त्यांच्या आयुष्यात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या परिस्थितीमध्ये सुधारणा करू शकू. मी तुम्हा सर्वांना पुण्यातील या संवादात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. अशा प्रकारच्या चर्चा करण्याची आपल्याला गरज आहे. धन्यवाद. तुम्हा सर्वांना तिथे भेटण्यास उत्सुक आहे,&quot; असं ते पुढे म्हणाले.&lt;/p&gt;&lt;p&gt;(एएनआय)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचे शीर्षक वगळता, मजकूर आशियानेट न्यूजच्या संपादकीय टीमने संपादित केलेला नाही आणि तो थेट सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आला आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-invites-women-to-chhatron-ki-goonj-event-in-pune-to-discuss-their-issues/articleshow-kthhrx2"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Make in India: संरक्षण क्षेत्रात जपानसोबत मोठी भागीदारी; पंतप्रधान मोदींचा 'मेक इन इंडिया'वर जोर]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/india-and-japan-deepen-defence-ties-with-make-in-india-focus/articleshow-58hwdog</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/india-and-japan-deepen-defence-ties-with-make-in-india-focus/articleshow-58hwdog</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 22:52:10 +0530</pubDate>
            <description><![CDATA[पंतप्रधान मोदींनी जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांची भेट घेतली. 'मेक इन इंडिया' अंतर्गत संरक्षण उत्पादनात एकत्र काम करण्यावर त्यांनी भर दिला. हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी ही सामरिक भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-ed16b850-881e-42db-9d8d-b925c6958950.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांची भेट घेतली. या भेटीत मोदींनी 'मेक इन इंडिया' उपक्रमावर खास जोर दिला. त्यांनी जपानला भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप्ससोबत संरक्षण क्षेत्रात एकत्र काम करण्याची मोठी संधी असल्याचं सांगितलं. विशेषतः संरक्षण उपकरणांचं सह-विकास आणि सह-उत्पादन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोईझुमी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;एका अधिकृत पत्रकानुसार, पंतप्रधान मोदींनी जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाइची यांच्या भारत दौऱ्यातील चर्चेची आठवण करून दिली. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य ज्या वेगाने पुढे जात आहे, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडच्या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी भारत-जपानची विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी किती महत्त्वाची आहे, हे मोदींनी अधोरेखित केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;यावेळी संरक्षण मंत्री कोईझुमी यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्यात झालेल्या प्रगतीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. भारतासोबत संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी जपान सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी 'X' वर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, &quot;जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांना भेटून आनंद झाला. भारत आणि जपानमधील संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यावर उत्कृष्ट चर्चा झाली. आमची विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडच्या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.&quot;&lt;/p&gt;&lt;h2&gt;भारत-जपान सुरक्षा सहकार्य आणखी व्यापक&lt;/h2&gt;&lt;p&gt;पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही कोईझुमी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. यामध्ये सागरी सुरक्षा आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासह महत्त्वाच्या विषयांवर सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली. तसंच, सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणाऱ्या किंवा बळाचा वापर करून सध्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही एकतर्फी कृतीला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला.&lt;/p&gt;&lt;p&gt;राजनाथ सिंह आणि कोईझुमी यांच्या बैठकीतील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सागरी सुरक्षा सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी. यामुळे भारतीय नौदल आणि जपान सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स यांच्यात अधिक जवळून काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारामुळे सागरी क्षेत्रातील जागरूकता (Maritime Domain Awareness), माहितीची देवाणघेवाण, शोध आणि बचाव कार्य (SAR), तसेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढणार आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;नौदल आणि जहाजबांधणीतही सहकार्य&lt;/h3&gt;&lt;p&gt;सागरी दळणवळणाच्या मार्गांच्या (Sea Lines of Communication) सुरक्षेसाठी समन्वय वाढवण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यासाठी नौदलाच्या जहाजांच्या भेटी, संयुक्त सराव, कर्मचारी आणि तज्ज्ञांची देवाणघेवाण, तसेच बंदरांचा वापर आणि दुरुस्ती सुविधांसारख्या लॉजिस्टिक सपोर्टचा समावेश असेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;भारत आणि जपानने नौदल जहाजबांधणी आणि डिझाइनमध्ये संयुक्त विकासाच्या संधी शोधण्याचंही ठरवलं आहे. यासाठी जपानचं तांत्रिक कौशल्य आणि भारताच्या उत्पादन क्षमतांचा वापर केला जाईल. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत संरक्षण जहाजबांधणीत अधिक सहकार्य करण्यावरही चर्चा झाली.&lt;/p&gt;&lt;h3&gt;संयुक्त लष्करी सराव आणि तंत्रज्ञान सहकार्य&lt;/h3&gt;&lt;p&gt;दोन्ही मंत्र्यांनी 'धर्म गार्डियन' (लष्कर) आणि 'जायमेक्स' (JAIMEX - नौदल) यांसारख्या द्विपक्षीय लष्करी सरावांच्या विस्ताराचं स्वागत केलं. तसंच, 'वीर गार्डियन २६' या हवाई सरावाच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीचीही नोंद घेतली. आगामी हवाई सराव खूप महत्त्वाचा असेल, कारण यात जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्सची लढाऊ विमानं पहिल्यांदाच भारतात येऊन सहभागी होणार आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;दोन्ही देशांच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सेसमध्ये देवाणघेवाण वाढवण्यावरही एकमत झालं. भविष्यात भारतात इंटिग्रेटेड थिएटर कमांड्सची स्थापना झाल्यानंतर त्यांच्यासोबत सहकार्य करण्याच्या शक्यताही तपासल्या जातील.&lt;/p&gt;&lt;p&gt;दोन्ही मंत्र्यांनी 'युनिकॉर्न' (UNICORN) या जहाजावर बसवल्या जाणाऱ्या इंटिग्रेटेड कम्युनिकेशन अँटेना सिस्टीमवर चर्चा केली. हा भारत आणि जपानमधील पहिला संरक्षण उपकरण हस्तांतरण प्रकल्प आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची DRDO आणि जपानची ATLA (Acquisition, Technology &amp;amp; Logistics Agency) या संस्था प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि संशोधनात सहकार्य अधिक घट्ट करतील. संरक्षण औद्योगिक सहकार्याला आणखी बळ देण्यासाठी 'डिफेन्स इंडस्ट्री फोरम' आयोजित करण्यावरही सहमती झाली.&lt;/p&gt;&lt;p&gt;कोईझुमी बुधवारी त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले होते. दोन दिवसांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करणे आणि सागरी सुरक्षा सहकार्य पुढे नेणे हा होता.&lt;/p&gt;&lt;p&gt;हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी भारत आणि जपान संरक्षण, सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान आणि संरक्षण औद्योगिक सहकार्यामध्ये आपली सामरिक भागीदारी सातत्याने वाढवत आहेत. (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचा मथळा वगळता, आशयामध्ये आशियानेट न्यूजेबल इंग्लिश स्टाफने कोणताही बदल केलेला नाही. ही बातमी सिंडिकेटेड फीडमधून जशीच्या तशी प्रकाशित करण्यात आली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/india-and-japan-deepen-defence-ties-with-make-in-india-focus/articleshow-58hwdog"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Telesurgery: भारतीय डॉक्टरचा विक्रम! 1600 किमी लांबून यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/indian-surgeon-performs-successful-robotic-telesurgery-over-1600-km-distance/articleshow-1dwlsqr</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/indian-surgeon-performs-successful-robotic-telesurgery-over-1600-km-distance/articleshow-1dwlsqr</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 22:35:26 +0530</pubDate>
            <description><![CDATA[भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. एका सरकारी सर्जनने, डॉ. अनुप कुमार यांनी, 1600 किलोमीटर अंतरावरून यशस्वीरित्या रोबोटिक टेलिसर्जरी केली आहे. त्यांनी 32 वर्षीय महिलेवर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-6d29c2da-a8d9-4b33-b7dd-1941574d71e5.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. नवी दिल्लीतील VMMC आणि सफदरजंग हॉस्पिटलमधील यूरोलॉजी, रोबोटिक्स आणि रीनल ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख, प्रा. (डॉ.) अनुप कुमार यांनी एक मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी तब्बल 1600 किलोमीटर अंतरावरून एका 32 वर्षीय महिलेवर यशस्वी रोबोटिक टेलिसर्जरी केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;ही शस्त्रक्रिया गुरुग्राममधून हैदराबादमधील प्रीती किडनी अँड यूरोलॉजी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. म्हणजे जवळजवळ मुंबई ते दिल्ली इतक्या अंतरावरून! यासाठी एका अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक सिस्टीमचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रक्रियेदरम्यान वेळेत अजिबात फरक जाणवला नाही (imperceptible latency) आणि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. या महिलेवर 'मॉडिफाइड लाइच ग्रेगॉयर युरेटेरिक रिइम्प्लांटेशन' नावाची एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.&lt;/p&gt;&lt;p&gt;एका सरकारी संस्थेतील सर्जनने अशा प्रकारची युरोलॉजिकल टेलिसर्जरी करण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे. या यशामुळे, आता प्रगत रोबोटिक आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून विशेष सर्जिकल कौशल्ये कोणत्याही शहरात पोहोचवता येऊ शकतात हे सिद्ध झालं आहे. यालाच शस्त्रक्रियेचं भविष्य म्हटलं जातंय आणि ते भविष्य आता प्रत्यक्षात आलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;दिल्लीतील डॉक्टरांचा जागतिक विक्रमाचा दावा&lt;/h2&gt;&lt;p&gt;याआधी, दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एकाच ऑपरेशनमध्ये 64 वर्षीय व्यक्तीच्या तीन जीवघेण्या आजारांवर यशस्वी उपचार करून एक दुर्मिळ वैद्यकीय कामगिरी केल्याचा दावा केला होता. ओखला येथील फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने रुग्णाच्या महाधमनीतील (aorta) धोकादायक फाटलेली जागा दुरुस्त केली, खराब झालेला एओर्टिक व्हॉल्व्ह बदलला आणि त्याचवेळी त्याच्या डाव्या किडनीमधील कॅन्सरची गाठही काढली.&lt;/p&gt;&lt;p&gt;डॉक्टरांच्या मते, एकाच ऑपरेशनमध्ये गुंतागुंतीची ओपन-हार्ट सर्जरी आणि रोबोटच्या मदतीने किडनी कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्याची घटना यापूर्वी वैद्यकीय साहित्यात कुठेही नोंदवली गेली नाही. त्यामुळे हा एक जागतिक विक्रम असू शकतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;सुरुवातीला, रुग्णाला श्वास घेण्यास तीव्र त्रास आणि रोजची कामं करतानाही प्रचंड थकवा जाणवत होता. सविस्तर तपासणी आणि स्कॅननंतर, त्याच्या शरीरात तीन गंभीर समस्या असल्याचे निदान झाले, ज्यावर तातडीने उपचारांची गरज होती. (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचा मथळा वगळता, एश&zwj;ियानेट न्यूजच्या संपादकीय टीमने यात कोणताही बदल केलेला नाही आणि ही बातमी सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/indian-surgeon-performs-successful-robotic-telesurgery-over-1600-km-distance/articleshow-1dwlsqr"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[तुमच्या लुकला खुलवतील या ५ खास बाळी डिझाईन]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/check-out-these-5-special-bali-hoop-earring-designs-that-will-enhance-your-look-t9i1qrl</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/check-out-these-5-special-bali-hoop-earring-designs-that-will-enhance-your-look-t9i1qrl</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 22:31:11 +0530</pubDate>
            <description><![CDATA[हा लेख रक्षाबंधनासाठी विविध प्रकारच्या बाली इअररिंग्सची माहिती देतो. यामध्ये घुंगरू चांदबाली, फ्लोरल बाली, पर्ल बीड्स बाली आणि ट्विस्टेड मॉडर्न बाली यांसारख्या आकर्षक डिझाइन्सचा समावेश आहे, जे पारंपरिक आणि एथनिक आउटफिट्सवर सुंदर दिसतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kn72n85c0btd5wyq0pqv2ncv,imgname-silver-hoop-earrings-for-girl-1775132909740.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/check-out-these-5-special-bali-hoop-earring-designs-that-will-enhance-your-look-t9i1qrl"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Joe Root: मास्टर ब्लास्टर सचिनच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी, रूट बनला कसोटीचा नवा 'रन मशीन'!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/joe-root-matches-sachin-tendulkars-milestone-for-most-test-fifties/articleshow-1fczaxx</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/joe-root-matches-sachin-tendulkars-milestone-for-most-test-fifties/articleshow-1fczaxx</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 22:29:57 +0530</pubDate>
            <description><![CDATA[इंग्लंडचा कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ६६ रन्सची खेळी करून त्याने आपलं ६८वं अर्धशतक पूर्ण केलं.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-ff3554d5-f942-438e-8c08-c0c88770b21a.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने एक मोठा पराक्रम केलाय. त्याने भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध हेडिंग्लेमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रूटने ही कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी त्याने आपलं ६८वं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. तो ११२ बॉल्समध्ये १० चौकारांसह ६६ रन्स काढून आऊट झाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;या अर्धशतकामुळे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा जास्त रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रूट आता सचिनसोबत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दोघांच्याही नावावर ६८ अर्धशतकं आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल ६६ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डर आणि भारताचा राहुल द्रविड प्रत्येकी ६३ अर्धशतकांसह तिसऱ्या स्थानी आहेत. इतकंच नाही, तर कर्णधार म्हणूनही रूटने एक विक्रम केलाय. कर्णधार म्हणून सर्वाधिक अर्धशतकं करणाऱ्यांच्या यादीत तो ४२ अर्धशतकांसह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (६१) पहिल्या, रिकी पाँटिंग (५४) दुसऱ्या, ॲलन बॉर्डर (५१) तिसऱ्या आणि पाकिस्तानचा मिसबाह-उल-हक (४३) चौथ्या क्रमांकावर आहे. या नव्या कामगिरीमुळे रूटने कसोटीतील महान फलंदाजांमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;इंग्लंडची सामन्यावर मजबूत पकड&lt;/h2&gt;&lt;p&gt;हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानवर आपली पकड मजबूत केली आहे. ताज्या माहितीनुसार, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ४ बाद २०५ रन्स केले असून ३४ रन्सची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडने २ बाद ११२ अशा धावसंख्येवर केली होती. तेव्हा ते पाकिस्तानच्या १७१ रन्सच्या तुलनेत ५९ रन्सनी मागे होते. त्यानंतर जॉर्डन कॉक्स आणि जो रूट यांनी शतकी भागीदारी करून इंग्लंडला मजबूत स्थितीत आणलं. कॉक्स ७३ रन्स करून अली उस्मानच्या बॉलिंगवर आऊट झाला, तर रूट ११२ बॉल्समध्ये ६६ रन्स करून बाद झाला. रूट आणि कॉक्सच्या भागीदारीमुळेच इंग्लंडला पाकिस्तानची धावसंख्या ओलांडता आली. सध्या हॅरी ब्रूक आणि डॅन लॉरेन्स क्रीजवर असून इंग्लंडकडे ३४ रन्सची आघाडी आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पाकिस्तानचा पहिला डाव&lt;/h2&gt;&lt;p&gt;याआधी, इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि पाकिस्तानचा पहिला डाव फक्त १७१ रन्सवर संपवला. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी शानदार बॉलिंग केली. दोघांनीही प्रत्येकी ५-५ विकेट्स घेतल्या. रॉबिन्सनने ५१ रन्स देत ५ विकेट्स, तर टंगने ४६ रन्स देत ५ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून फक्त अब्दुल्ला शफीकने थोडा प्रतिकार केला आणि ६१ रन्स केले. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव गडगडला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आता पुढे काय?&lt;/h2&gt;&lt;p&gt;बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर जो रूट पुन्हा एकदा इंग्लंड संघाचं नेतृत्व करत आहे. आता मोठी आघाडी घेऊन पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा रूटच्या संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, पाकिस्तानला जर या सामन्यात पुनरागमन करायचं असेल, तर त्यांना लवकर विकेट्स घ्याव्या लागतील. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला कसोटी सामना आहे. (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचे शीर्षक वगळता, उर्वरित मजकूर आशियानेट न्यूजच्या संपादकीय टीमने संपादित केलेला नाही आणि तो सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आला आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Cricket]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/joe-root-matches-sachin-tendulkars-milestone-for-most-test-fifties/articleshow-1fczaxx"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Water Dispute: पाण्याचे वाद चर्चेने मिटवा, अमित शहांचा दक्षिणेकडील राज्यांना सल्ला]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/amit-shah-pushes-for-dialogue-to-end-southern-states-water-conflicts/articleshow-lhzgwyq</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/amit-shah-pushes-for-dialogue-to-end-southern-states-water-conflicts/articleshow-lhzgwyq</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 22:03:42 +0530</pubDate>
            <description><![CDATA[केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिणेकडील राज्यांना पाणीवाटपाचे प्रलंबित वाद चर्चेतून सोडवण्याचं आवाहन केलं आहे. ३१व्या विभागीय परिषदेच्या बैठकीत राज्यांनी या सूचनेला सहमती दर्शवली, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने मालमत्ता विभाजनाचे मुद्दे सोडवण्यास होकार दिला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-6d25a2cc-3f81-4c66-8e7a-9a6fbf013fea.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दक्षिणेकडील राज्यांना पाणीवाटपाचे प्रलंबित वाद लवकरात लवकर सोडवण्यावर भर दिला. यासाठी केंद्र सरकारची मंत्रालयं आणि संबंधित राज्यांच्या संयुक्त बैठका घेऊन हे प्रश्न मार्गी लावावेत, असं ते म्हणाले. गृहमंत्र्यांच्या या सूचनेला दक्षिणेकडील राज्यांनी सहमती दर्शवली आणि &quot;परस्पर संवादातून आणि रचनात्मक उपायांनी&quot; हे वाद लवकरात लवकर सोडवण्याचं मान्य केलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातील मालमत्ता आणि दायित्वांच्या विभाजनाबाबत दोन्ही राज्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्ल्याने हे प्रकरण सोडवण्यास सहमती दर्शवली.&lt;/p&gt;&lt;p&gt;३१व्या विभागीय परिषदेच्या बैठकीत बोलताना शहा यांनी हे मुद्दे मांडले. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शहा म्हणाले, &quot;केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, गृह मंत्रालय, आंतर-राज्य परिषद आणि संबंधित राज्यांच्या संयुक्त बैठकांमधून दक्षिणेकडील राज्यांचे पाणीवाटपाचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे.&quot; यावर दक्षिणेकडील राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातील मालमत्ता विभाजनाचे मुद्दे गृह मंत्रालयाच्या मदतीने सोडवले जातील, यावरही दोन्ही राज्यांचं एकमत झालं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;नदीजोड प्रकल्पाचा शहांनी दिला प्रस्ताव&lt;/h2&gt;&lt;p&gt;शहा यांनी यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, आपल्या राज्याच्या हिताचं रक्षण करणं चुकीचं नाही, पण या प्रक्रियेत जर राज्यांना वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहावं लागत असेल आणि ते पाणी समुद्रात वाहून जात असेल, तर त्यात कोणाचंच हित साधलं जात नाही. त्यांनी सुचवलं की, ब्रह्मपुत्रा ते कावेरी आणि गोदावरी यांसारख्या मोठ्या नद्यांना जोडल्यास पुढची १०० वर्षे भारतात पाण्याची टंचाई भासणार नाही. या उपक्रमामुळे अनेक जलमार्ग तयार होतील, ज्यामुळे केवळ इंधनाची बचत आणि पर्यावरणाचं रक्षण होणार नाही, तर एक स्वस्त वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध होईल, असं ते म्हणाले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;उत्तर भारतातील वाद मिटवल्याचं उदाहरण&lt;/h2&gt;&lt;p&gt;गृहमंत्र्यांनी सांगितलं की, उत्तर भारतात नदीच्या पाणीवाटपाशी संबंधित आठपैकी पाच मुद्दे तर ब्रिटिशकाळापासून प्रलंबित होते. पाच महिन्यांपूर्वी यावर अंतिम तोडगा काढण्यात आला. काश्मीरपासून उत्तर प्रदेशपर्यंतचे १०० टक्के मुद्दे सोडवून एक 'वादमुक्त उत्तर भारत' साकारण्यात आला आहे, असं उदाहरण त्यांनी दिलं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;'दक्षिणेकडील राज्यं प्रगतीचे आधारस्तंभ'&lt;/h2&gt;&lt;p&gt;अमित शहा म्हणाले की, दक्षिणेकडील राज्यं देशाच्या प्रगतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि या राज्यांची प्रगती पाण्यावर अवलंबून आहे. &quot;शेती असो, उद्योग असो, नागरिकांचं आरोग्य असो किंवा पर्यावरण असो, या चारही क्षेत्रांसाठी पाणी या प्रदेशाचा आत्मा आहे,&quot; असं त्यांनी नमूद केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;शहा यांनी उत्तर भारतातील यशाचा पुनरुच्चार करत सांगितलं की, तिथे ब्रिटिशकाळापासूनचे वादही चर्चेतून मिटवण्यात आले आहेत. &quot;काश्मीरपासून उत्तर प्रदेशपर्यंतचे १०० टक्के मुद्दे सोडवून एक वादमुक्त उत्तर भारत साधला गेला आहे,&quot; असं गृह मंत्रालयाने शहा यांच्या हवाल्याने सांगितलं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;२०१४ पासून विभागीय परिषदेची भूमिका वाढली&lt;/h2&gt;&lt;p&gt;या बैठकीत शहा म्हणाले की, २०१४ पासून विभागीय परिषदेला एक अर्थपूर्ण व्यासपीठ बनवण्याचे प्रयत्न झाले आहेत. ही एक घटनात्मक यंत्रणा असली तरी, गेल्या काळात ती केवळ एक औपचारिकता बनून राहिली होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;२००४-२०१४ आणि २०१४-२०२६ या काळाची तुलना करताना ते म्हणाले की, पूर्वी परिषदेच्या वर्षाला सरासरी अडीच बैठका व्हायच्या, आता वर्षाला सहा बैठका होतात. त्यांनी सांगितलं की २०१४ पासून एकूण ७० विभागीय परिषदेच्या बैठका झाल्या, ज्यात १,८६९ पैकी १,४४५ मुद्दे, म्हणजे सुमारे ८० टक्के मुद्दे सोडवण्यात आले. ६० वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न या बैठकांमधून मार्गी लागले आहेत, असंही शहा यांनी जोडलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलासनाथन, अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) डी. के. जोशी, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क मल्लू उपस्थित होते. यासोबतच राज्य सरकारांचे मुख्य सचिव, सल्लागार आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला हजर होते. (एएनआय)&lt;/p&gt;&lt;p&gt;(ही बातमी केवळ मथळा वगळता, एशियानेट न्यूजएबल इंग्लिश स्टाफने संपादित केलेली नाही आणि सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित केली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/amit-shah-pushes-for-dialogue-to-end-southern-states-water-conflicts/articleshow-lhzgwyq"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[PV Sindhu: वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून सिंधू बाहेर, ८८ मिनिटांच्या थरारानंतर पराभव]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/world/india-singles-campaign-ends-as-pv-sindhu-loses-thriller-at-bwf-world-championships-2026/articleshow-gf7whev</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/world/india-singles-campaign-ends-as-pv-sindhu-loses-thriller-at-bwf-world-championships-2026/articleshow-gf7whev</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 21:09:05 +0530</pubDate>
            <description><![CDATA[BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये पीव्ही सिंधूचा प्रवास संपला आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या वांग झी यीने तिचा पराभव केला. या पराभवासह एकेरीतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं असून, आता सर्व आशा दुहेरीच्या जोड्यांवर आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-6741b9ac-db11-4db7-89ad-c0d26fe63e97.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचं BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या वांग झी यीने सिंधूचा पराभव केला. या पराभवासह यजमान भारताचं स्पर्धेतील एकेरीतील आव्हान संपलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;८८ मिनिटांचा जबरदस्त थरार&lt;/h2&gt;&lt;p&gt;पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक जिंकणाऱ्या सिंधूला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या वांग झी यीनं ११-२१, २१-१५, १७-२१ असं हरवलं. ESPN नुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये तब्बल ८८ मिनिटं हा सामना चालला. दोन ऑलिम्पिक पदकं जिंकलेल्या सिंधूला पाठिंबा देण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते, पण अखेर तिला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे सिंधूचं सहावं वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. इतकंच नाही, तर या स्पर्धेत चिनी खेळाडूंविरुद्धचा तिचा आजवरचा १०० टक्के विजयाचा रेकॉर्डही तुटला. या सामन्यापूर्वी सिंधूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या खेळाडूंविरुद्धचे आठही सामने जिंकले होते. निर्णायक गेममध्ये पायात गोळे (cramps) येऊनही वांगनं शेवटपर्यंत संयम राखला आणि क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;सिंधूनं सामन्याची सुरुवात चांगली केली, पण पहिल्या गेममध्ये वांगनं वर्चस्व गाजवलं. तिने सिंधूला चुका करायला भाग पाडलं आणि २१-११ असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं जबरदस्त पुनरागमन केलं. प्रेक्षकांच्या 'सिंधू, सिंधू' या जयघोषानं तिला बळ मिळालं. तिनं आक्रमक खेळ करत २१-१५ नं गेम जिंकला आणि सामना तिसऱ्या गेममध्ये नेला.&lt;/p&gt;&lt;p&gt;तिसरा गेम खूपच अटीतटीचा झाला. दोन्ही खेळाडूंनी एक-एक पॉइंटसाठी संघर्ष केला. वांगनं १५-१३ अशी आघाडी घेतली होती, पण प्रेक्षकांच्या पाठिंब्यानं सिंधूनं जोरदार स्मॅश मारत स्कोर १५-१५ असा बरोबरीत आणला.&lt;/p&gt;&lt;p&gt;यानंतर रॅलीज लांब आणि अधिक थकवणाऱ्या होऊ लागल्या. यादरम्यान वांगच्या पायात गोळे आले आणि तिला वैद्यकीय मदतही घ्यावी लागली. पण तरीही ती पुन्हा कोर्टवर परतली.&lt;/p&gt;&lt;p&gt;वांगनं पुन्हा १८-१७ अशी आघाडी घेतली. पुढच्याच रॅलीत सिंधूचा फटका बाहेर गेला आणि वांग १९-१७ नं पुढे गेली. पुन्हा एकदा वांगला त्रास होऊ लागल्याने खेळ थांबला, पण तिनं आपला संयम ढळू दिला नाही. सिंधूचा एक फटका नेटमध्ये अडकला आणि वांगला मॅच पॉइंट मिळाला. अखेर एक ड्रॉप शॉट मारत वांगनं सामना जिंकला. विजयानंतर वांग आनंदानं कोर्टवरच कोसळली, तर सिंधूच्या सहाव्या पदकाची संधी हुकली.&lt;/p&gt;&lt;h2&gt;भारताचं एकेरीतील आव्हान संपलं&lt;/h2&gt;&lt;p&gt;याआधी, भारताच्या आयुष शेट्टीलाही पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या अल्वी फरहाननं त्याला १९-२१, ११-२१ असं हरवलं. आयुषनं याआधीच्या फेरीत जागतिक नंबर १ शी युकीला हरवून सनसनाटी निर्माण केली होती. बुधवारी लक्ष्य सेन आणि उन्नती हुडा हेदेखील स्पर्धेतून बाहेर पडले होते. त्यामुळे आता भारताचं एकेरीतील आव्हान पूर्णपणे संपलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;दुहेरीच्या जोड्यांकडून पदकाच्या आशा कायम&lt;/h2&gt;&lt;p&gt;एकेरीमध्ये निराशा झाली असली तरी, महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं भारतासाठी आशेचा किरण दाखवला आहे. त्यांनी जपानच्या सातव्या मानांकित रिन इवानागा आणि की नाकानिशी या जोडीचा २१-१६, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव करत क्वार्टर फायनल गाठली. दुखापतीतून परतलेली ही जागतिक क्रमवारीतील ३९ व्या क्रमांकाची जोडी आता पदक मिळवण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;मात्र, मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचं आव्हान संपुष्टात आलं. त्यांना चीनच्या गुओ शिनवा आणि चेन फॅन्गहुई या जोडीनं १६-२१, ५-२१ असं हरवलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;सिंधूच्या पराभवानंतर एकेरीतील आव्हान संपलं असलं तरी, ट्रीसा-गायत्री आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी या दुहेरीच्या जोड्यांवर आता भारताच्या पदकाच्या आशा अवलंबून आहेत. (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचे शीर्षक वगळता, अन्य मजकूर एशियनेट न्यूजेबलच्या इंग्रजी स्टाफने संपादित केलेला नाही आणि तो सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आला आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[World]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/world/india-singles-campaign-ends-as-pv-sindhu-loses-thriller-at-bwf-world-championships-2026/articleshow-gf7whev"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Amit Thackeray | मराठी न बोलणाऱ्या चालकांवर अमित ठाकरेंचा सवाल]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/amit-thackeray-questions-non-marathi-speaking-drivers/videoshow-wgqqdud</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/amit-thackeray-questions-non-marathi-speaking-drivers/videoshow-wgqqdud</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 21:06:43 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbxse" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;मनसे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून स्पष्ट माहितीची मागणी केली. अनेक वर्षांपासून शहरात राहूनही मराठी न शिकलेल्या चालकांना तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर हा नियम प्रत्यक्षात कसा लागू केला जाणार, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. प्रवाशाला एखाद्या चालकाला मराठी येत नसल्याचे आढळल्यास त्याची तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची, यासाठी स्पष्ट व्यवस्था असावी, असे अमित ठाकरे म्हणाले. चालकांचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया आणि त्यांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचीही स्पष्ट माहिती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान त्यांनी मंचावरील गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. पक्षाची सदस्य नोंदणी सुरू असल्याचे सांगत सर्वांना भेटता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि कॉलेजमध्ये पुन्हा येऊन समस्या जाणून घेण्याचे आश्वासनही दिले.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/amit-thackeray-questions-non-marathi-speaking-drivers/videoshow-wgqqdud"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[खाद्यतेलाबाबत तुकाराम मुंडे काय म्हणाले, वाचून व्हाल शॉक]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/maharashtra/what-did-tukaram-mundhe-say-about-edible-oil/articleshow-rd9asbg</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/maharashtra/what-did-tukaram-mundhe-say-about-edible-oil/articleshow-rd9asbg</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 20:06:50 +0530</pubDate>
            <description><![CDATA[तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना सुट्टे तेल खरेदी न करण्याचा सक्त इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, भेसळयुक्त तेलामुळे उच्च रक्तदाब, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात, जे विशेषतः बालकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kwm98fcn8nj6142rrhvmg28e,imgname-munde-adhikari-1783092231573.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;तुकाराम मुंडे हे परत एकदा त्यांच्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी यावेळी तेलावर कडक शब्दांमध्ये भाष्य केलं आहे. त्यांनी मार्केटमध्ये असलेलं सुट्टे तेल खरेदी न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. आपण पॅकबंद तेल जरी खरेदी करत असलो तरी त्याची खातरजमा करून घ्यावी अशी सूचना मुंडे यांनी दिली.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;भेसळयुक्त तेलांमुळं आरोग्याचे होतात प्रॉब्लेम&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;भेसळयुक्त तेल आहारात प्रॉब्लेम उपस्थित राहतात असं यावेळी तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे. गंजलेल्या किंवा खराब डब्यांमधून शिसे तेलात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळं बालकांच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला उच्च रक्तदाब, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार उदभवू शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;या क्रमांकाचा करा वापर&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अन्न विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे. आपल्याला अन्नाशी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 1800-222-365 या क्रमांकावर संपर्क साधायला सांगितलं आहे. आपण तेलाची खरेदी करताना काळजी घ्यावी. भेसळयुक्त तेलामुळ आपल्याला आजार उदभवण्याची शक्यता असते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Maharashtra]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/maharashtra/what-did-tukaram-mundhe-say-about-edible-oil/articleshow-rd9asbg"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[tukaram mundhe | तेलाचा पुन्हा पुन्हा वापर चालणार नाही, काही बडे हॉटेल्स वापर करतात]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-warns-hotels-on-reusing-cooking-oil/videoshow-1hcz2ge</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-warns-hotels-on-reusing-cooking-oil/videoshow-1hcz2ge</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 20:06:01 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbn5u" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-warns-hotels-on-reusing-cooking-oil/videoshow-1hcz2ge"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[tukaram mundhe  काहीही झालं तरी खाद्य भेसळीत हे चालणार नाही |  तुकाराम मुंढे यांची माहिती]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-s-stern-warning-on-food-adulteration/videoshow-r7crv5t</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-s-stern-warning-on-food-adulteration/videoshow-r7crv5t</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 20:05:53 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbn4a" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-s-stern-warning-on-food-adulteration/videoshow-r7crv5t"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[tukaram mundhe | खाद्य तेलाबाबत काही गाईड लाइन्स | पाहा काय चालेल काय नाही]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-on-edible-oil-the-do-s-and-don-ts/videoshow-zkpa12t</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-on-edible-oil-the-do-s-and-don-ts/videoshow-zkpa12t</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 20:05:48 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbn42" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-on-edible-oil-the-do-s-and-don-ts/videoshow-zkpa12t"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Aadhaar App: ५ कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पार, आता सगळं काम मोबाईलवरच!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/aadhaar-app-surpasses-50-million-downloads-boosting-digital-services/articleshow-6zh2yrh</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/aadhaar-app-surpasses-50-million-downloads-boosting-digital-services/articleshow-6zh2yrh</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:45:21 +0530</pubDate>
            <description><![CDATA[mAadhaar ॲपचे डाऊनलोड्स ५ कोटींच्या पुढे गेले आहेत. ६० लाखांहून अधिक लोकांनी मोबाईल नंबर, तर १५ लाखांहून अधिक लोकांनी पत्ता अपडेट केला आहे. यावरून दिसतंय की लोक आता आधारच्या कामांसाठी डिजिटल सेवेला पसंती देत आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-2de6ad57-271e-45bc-818f-d7609318df4b.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;mAadhaar ॲपने ५ कोटी डाऊनलोड्सचा मोठा टप्पा ओलांडला आहे. या ॲपचा वापर करून ६० लाखांहून अधिक लोकांनी आपला मोबाईल नंबर अपडेट केला आहे, तर १५ लाखांहून अधिक लोकांनी आपला पत्ता बदलला आहे. गुरुवारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती दिली. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय की, नागरिक आता आधारशी संबंधित कामांसाठी डिजिटल सेवांना जास्त पसंती देत आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;मंत्रालयाच्या माहितीनुसार, २३ लाखांहून अधिक लोकांनी या ॲपद्वारे आपले ईमेल आयडी अपडेट केले आहेत. यामुळे लोकांना आता आधार केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज भासत नाहीये, कारण स्मार्टफोनवरूनच अनेक कामं सहज होत आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;mAadhaar ॲपमुळे आधार कार्डधारकांना मोबाईल नंबर, पत्ता आणि ईमेल अपडेट करण्यासोबतच बायोमेट्रिक लॉक/अनलॉक करणे आणि ई-आधार डाऊनलोड करण्यासारख्या अनेक सेवा मिळतात. मंत्रालयाने सांगितले की, &quot;Show, Share and Verify&quot; (दाखवा, शेअर करा आणि व्हेरिफाय करा) या तत्त्वावर हे ॲप काम करते. यामुळे आधारधारकांना त्यांची माहिती कशी वापरायची यावर अधिक नियंत्रण मिळतं आणि ओळख पडताळणीही सुरक्षित होते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;ऑफलाइन व्हेरिफिकेशनची सुविधा वाढवली&lt;/h2&gt;&lt;p&gt;ॲपच्या वापरासोबतच, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ऑफलाइन व्हेरिफिकेशनसाठीची यंत्रणाही मजबूत केली आहे. जानेवारीपासून UIDAI ने २०० हून अधिक संस्थांना 'ऑफलाइन व्हेरिफिकेशन सीकिंग एंटिटीज' (OVSEs) म्हणून जोडून घेतलं आहे. लोकांच्या संमतीने, सुरक्षित आणि पेपरलेस पद्धतीने ओळखीची पडताळणी करता यावी, हा यामागचा उद्देश आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या ऑफलाइन पद्धतींमध्ये QR कोड स्कॅन करून किंवा डिजिटल सही असलेले डॉक्युमेंट्स वापरून ओळख तपासली जाते. यासाठी UIDAI च्या सेंट्रल डेटाबेसशी थेट (रिअल-टाइम) कनेक्टिव्हिटीची गरज नसते.&lt;/p&gt;&lt;p&gt;मंत्रालयाने स्पष्ट केलं की, या पद्धतीमुळे आधारधारकांना व्हेरिफिकेशनसाठी फक्त आवश्यक तेवढीच माहिती शेअर करावी लागते. यामुळे त्यांची प्रायव्हसी जपली जाते आणि माहितीवर त्यांचंच नियंत्रण राहतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;अशी अपेक्षा आहे की OVSEs ची संख्या वाढल्यामुळे ऑफलाइन व्हेरिफिकेशनचा वापर वाढेल आणि सेवा देणाऱ्या कंपन्या व नागरिक या दोघांसाठीही ओळख पडताळणीची प्रक्रिया अधिक सोपी होईल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;'डिजिटल इंडिया'च्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल&lt;/h2&gt;&lt;p&gt;हे सर्व उपक्रम सरकारच्या 'डिजिटल इंडिया' व्हिजनचाच एक भाग आहेत. सुरक्षित, सोप्या आणि तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक सेवा देऊन लोकांचे 'जीवनमान सुलभ करणे' (ease of living) हे सरकारचे उद्दिष्ट आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;एकीकडे mAadhaar ॲपमुळे नागरिकांना डिजिटल सेवा मिळत आहेत, तर दुसरीकडे OVSEs च्या वाढत्या संख्येमुळे ऑफलाइन ओळख पडताळणीची परिसंस्थाही विस्तारत आहे. (ANI)&lt;/p&gt;&lt;p&gt;(या बातमीचा मथळा वगळता, एशियनेट न्यूजच्या संपादकीय टीमने मजकुरात कोणताही बदल केलेला नाही आणि ही बातमी सिंडिकेटेड फीडमधून जशीच्या तशी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/aadhaar-app-surpasses-50-million-downloads-boosting-digital-services/articleshow-6zh2yrh"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Protest Violence: CJP आंदोलनातील हिंसाचार, सुप्रीम कोर्टाकडून चौकशीसाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/supreme-court-appoints-5-member-panel-to-probe-cjp-protest-violence/articleshow-8gkgm3g</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/supreme-court-appoints-5-member-panel-to-probe-cjp-protest-violence/articleshow-8gkgm3g</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:24:00 +0530</pubDate>
            <description><![CDATA[कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. निवृत्त न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील ही 5 सदस्यीय समिती पोलीस आणि आंदोलक या दोघांकडून झालेल्या हिंसाचाराची चौकशी करेल.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-8b6d0fb9-3902-41fa-8cdc-d4171e72ce52.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;सुप्रीम कोर्टाने कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनांमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एक पाच सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती (HPEC) स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती रवी शंकर झा, दिल्ली हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषी कुमार शुक्ला आणि मेघालयचे माजी डीजीपी एल. आर. बिश्नोई यांचा समावेश आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;समिती काय चौकशी करणार?&lt;/h2&gt;&lt;p&gt;सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आंदोलक आणि पोलीस या दोन्ही बाजूंच्या तक्रारींची समिती चौकशी करेल, असं खंडपीठाने स्पष्ट केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;पोलिसांनी केलेला अतिरिक्त बळाचा वापर, आंदोलकांनी केलेला हिंसाचार आणि महिला आंदोलकांचा छळ व विनयभंगाचे आरोप यावर समितीने प्राधान्याने लक्ष द्यावं, असं खंडपीठाने म्हटलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीस कर्मचारी आणि आंदोलकांना अंतरिम भरपाई देण्याबाबतही समिती विचार करू शकते, अशी परवानगी कोर्टाने दिली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;ही चौकशी एकदाच होणार नाही, तर समिती वेळोवेळी आपले अंतरिम अहवाल कोर्टाला सादर करेल. जेणेकरून कोर्ट परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पुढील निर्देश देऊ शकेल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;आंदोलनांचे CCTV फुटेज आणि पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बॉडी-कॅमेरा फुटेज, जे आधीच जपून ठेवण्याचे आदेश दिले होते, ते आता तपासणीसाठी समितीकडे सोपवण्यात यावेत, असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्याच वेळी, कोर्टाने हेही स्पष्ट केलं की या समितीच्या स्थापनेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यास कोणताही अडथळा येणार नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;आदेशात म्हटलं आहे की, &quot;आमच्याद्वारे HPEC ची स्थापना केल्याने पोलीस किंवा इतर सुरक्षा दलांना प्रशासकीय किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यापासून रोखले जाणार नाही.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;चौकशीदरम्यान गरज वाटल्यास समिती फॉरेन्सिक, तांत्रिक आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊ शकते, असंही खंडपीठाने नमूद केलं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;दोन्ही बाजूंच्या तक्रारी&lt;/h2&gt;&lt;p&gt;पोलिसांच्या अत्याचाराविरोधात याचिका दाखल करणारे आणि प्रशासन अशा दोन्ही बाजूंनी समितीच्या चौकशीच्या व्याप्तीबद्दल सूचना केल्या होत्या, असं खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;पोलिसांच्या क्रूरतेची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तर दुसरीकडे, पोलिसांवरील हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचीही चौकशी व्हावी, असा आग्रह प्रशासनाने धरला होता.&lt;/p&gt;&lt;h3&gt;आंदोलकांचे आरोप&lt;/h3&gt;&lt;p&gt;याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पोलिसांकडून अवाजवी बळाचा वापर, आंदोलकांवर हिंसाचार आणि गर्दी नियंत्रणासाठी मेटॅलिक कायनेटिक प्रोजेक्टाइल किंवा पेलेट्सचा वापर यांचा समावेश आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;आंदोलनावेळी तैनात असलेल्या पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य गणवेश आणि ओळखपत्र घालावं, अशी मागणीही त्यांनी केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;याशिवाय, जंतर-मंतर येथे महिला आंदोलकांवर पाळत ठेवून त्यांचा छळ केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना वैद्यकीय मदत आणि भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, सरसकट जमावबंदीचे आदेश लागू करण्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.&lt;/p&gt;&lt;h3&gt;प्रशासनाचे म्हणणे&lt;/h3&gt;&lt;p&gt;दुसरीकडे, प्रशासनाने आंदोलकांवर पोलिसांविरोधात बळाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचीही चौकशी HPEC ने करावी, अशी मागणी त्यांनी केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान, कर्तव्यावर असताना जखमी झालेले पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालेला मानसिक त्रास याकडेही लक्ष वेधलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या तक्रारी विचारात घेण्यासारख्या असल्याचं म्हटलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&quot;आमच्या मते, वर नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांचे विश्लेषण HPEC ने करणं गरजेचं आहे,&quot; असं खंडपीठाने सांगितलं. तसेच, या प्रकरणाशी संबंधित इतर कोणत्याही मुद्द्याची चौकशी समिती करू शकते, असंही जोडलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;NEET सह इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर, बिहार आणि देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या आंदोलनांमधील पोलिसांच्या कथित क्रूरतेबाबत दाखल याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने हा आदेश दिला.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/supreme-court-appoints-5-member-panel-to-probe-cjp-protest-violence/articleshow-8gkgm3g"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Marathi for Taxi Driver  मराठी न बोलणारे टॅक्सी ड्रायव्हर्स आरटीओकडून शोध सुरु, 1 महिन्याची नोटीस]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/rto-issues-1-month-notice-to-non-marathi-taxi-drivers/videoshow-k1d505h</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/rto-issues-1-month-notice-to-non-marathi-taxi-drivers/videoshow-k1d505h</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:06:13 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbcfe" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी न येणाऱ्या चालकांसाठी राज्य सरकारने मे महिन्यापासून मोफत मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. मात्र, अद्याप 60 टक्क्यांहून अधिक चालकांनी या वर्गांना हजेरी लावलेली नसल्याचे सांगण्यात आले. आता मराठी न शिकलेल्या चालकांना नोटीस देऊन सरकारने निश्चित केलेल्या केंद्रांवर एका महिन्याच्या आत मराठी शिकण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही मराठी न शिकल्यास चालकांचा परवाना निलंबित केला जाईल आणि तीन महिन्यांनंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई होईल. प्रवासी आणि चालकांमध्ये संवाद व्यवस्थित व्हावा आणि व्यवहारात गैरसमज निर्माण होऊ नयेत, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही दंडात्मक कारवाई नसून महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार असलेली आवश्यकता आहे. चालकांसाठी मराठीचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असल्याचेही सांगण्यात आले.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/rto-issues-1-month-notice-to-non-marathi-taxi-drivers/videoshow-k1d505h"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[tukaram mundhe | खाद्य तेल भेसळ | तुकाराम मुंढे यांनी सांगितले, आरोग्यावरील परिणाम, खरेदीची सावधानता]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-s-guide-to-avoiding-adulterated-oil/videoshow-lnz7cbg</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-s-guide-to-avoiding-adulterated-oil/videoshow-lnz7cbg</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:05:53 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbcaq" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/tukaram-mundhe-s-guide-to-avoiding-adulterated-oil/videoshow-lnz7cbg"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[बलात्कार प्रकरणी शिंदेंच्या पक्षाचा नगरसेवक मोकाट कसा? Sanjay raut यांचं आवाहन navi mumbai rabale]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/raut-demands-arrest-of-shinde-corporator-in-rape-case/videoshow-vgqpsas</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/raut-demands-arrest-of-shinde-corporator-in-rape-case/videoshow-vgqpsas</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:03:00 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbble" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/raut-demands-arrest-of-shinde-corporator-in-rape-case/videoshow-vgqpsas"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Sanjay Raut यांचं आता पीएम मोदी, अमित शहा यांच्या विषयी धक्कादायक भाकीत]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-s-shocking-prediction-for-modi-amit-shah/videoshow-0cd5b3c</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-s-shocking-prediction-for-modi-amit-shah/videoshow-0cd5b3c</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:02:58 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbbiy" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-s-shocking-prediction-for-modi-amit-shah/videoshow-0cd5b3c"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Devendra Fadnavis | अंबाझरी तलावाचा कायापालट, फडणवीसांची माहिती | Ambazari Lake | Nagpur Kayaking]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/fadnavis-outlines-future-of-nagpur-s-ambazari-lake/videoshow-exd1hvd</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/fadnavis-outlines-future-of-nagpur-s-ambazari-lake/videoshow-exd1hvd</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:02:58 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbbl2" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या पुनरुज्जीवनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. एकेकाळी महत्त्वाचा जलस्रोत असलेला आणि नंतर पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेला अंबाझरी तलाव जवळपास कोरडा पडला होता. नागपूर महापालिकेच्या प्रयत्नांमुळे तलावात पुन्हा मुबलक पाणी आले असून त्याचे पुनरुज्जीवन झाले आहे. तलावात वॉटर हायसिंथ हटविणे, प्रदूषण नियंत्रणासाठी 13 MLD क्षमतेचा STP उभारणे आणि जवळच्या भागातील सांडपाणी प्रक्रिया करूनच तलावात सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच तलावात कयाकिंगला प्रोत्साहन दिले जात असून तरुणांचे प्रशिक्षण सुरू आहे. कयाकिंगमधून भविष्यात भारताला ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके मिळतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/fadnavis-outlines-future-of-nagpur-s-ambazari-lake/videoshow-exd1hvd"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Sanjay Raut|भाजपा नेते विनोद तावडे यांच्याबद्दल आम्हाला आस्था - संजय राऊत  Vinod Tawade]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-expresses-regard-for-bjp-s-vinod-tawade/videoshow-muqg7xe</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-expresses-regard-for-bjp-s-vinod-tawade/videoshow-muqg7xe</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 19:02:46 +0530</pubDate>
            <description><![CDATA[]]></description>
            <media:content url="https://geo.dailymotion.com/player/x1tbu.html?video=xazbbii" medium="video" height="768" width="1024"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Rameshwar Gavhane</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/sanjay-raut-expresses-regard-for-bjp-s-vinod-tawade/videoshow-muqg7xe"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Monster Movie: सलमान आणि नयनताराचा 'मॉन्स्टर' धुमाकूळ घालणार, ईद २०२७ ला होणार रिलीज!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/salman-khan-and-nayanthara-to-star-in-pan-india-action-film-monster-releasing-eid-2027/articleshow-ew653s4</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/salman-khan-and-nayanthara-to-star-in-pan-india-action-film-monster-releasing-eid-2027/articleshow-ew653s4</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 18:48:10 +0530</pubDate>
            <description><![CDATA[बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा 'मॉन्स्टर' नावाच्या एका मोठ्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा पॅन-इंडिया ॲक्शन सिनेमा ईद २०२७ मध्ये रिलीज होणार असून, प्रसिद्ध निर्माते दिल राजू यांनी याची निर्मिती केली आहे. वामशी पैडीपल्ली हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0fjfsr0n69crrn7hbvvde0t,imgname-untitled-design---2026-08-20t180115.366-1787229103872.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि साऊथची 'लेडी सुपरस्टार' नयनतारा हे दोघे 'मॉन्स्टर' नावाच्या सिनेमात एकत्र काम करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पॅन-इंडिया ॲक्शन एंटरटेनर ईद २०२७ मध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होईल. प्रसिद्ध निर्माते दिल राजू त्यांच्या श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करत आहेत, ज्यामुळे भारतीय सिनेसृष्टीत एका मोठ्या कोलॅबोरेशनची नांदी झाली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;सुरुवातीला या प्रोजेक्टला 'SVC 63' असं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं, जे श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सचं ६३ वं प्रोडक्शन आहे. एप्रिल २०२६ मध्ये खुद्द सलमान खानने सोशल मीडियावर ईद २०२७ च्या रिलीजची घोषणा केल्यावर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आणि चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या.&lt;/p&gt;&lt;h2&gt;एक जबरदस्त पॅन-इंडिया कोलॅबोरेशन&lt;/h2&gt;&lt;p&gt;हा सिनेमा पॅन-इंडिया सिनेसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 'मॉन्स्टर'मधून दोन मोठ्या इंडस्ट्रीचे दोन तगडे स्टार्स एकत्र येत आहेत. सलमान खान, जो बॉलिवूडमध्ये घराघरात पोहोचलेला आहे, त्याचे चाहते अनेक पिढ्यांपासून आहेत. तर दुसरीकडे, नयनताराला साऊथची 'लेडी सुपरस्टार' म्हटलं जातं आणि तिची तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषिक प्रदेशात प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या दोघांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामुळे वेगवेगळ्या अभिनयशैली आणि फॅन बेस एकत्र येतील, ज्यामुळे 'मॉन्स्टर' एक राष्ट्रीय स्तरावरचा मोठा सिनेमा बनू शकतो. या कलाकारांची निवडच निर्मात्यांची मोठी महत्त्वाकांक्षा दाखवते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;तगडी निर्मिती आणि दिग्दर्शन&lt;/h2&gt;&lt;p&gt;या महत्त्वाकांक्षी 'मॉन्स्टर' प्रोजेक्टला दिल राजू यांनी पाठिंबा दिला आहे. दमदार कथा आणि भव्य व्हिज्युअल्ससाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक वामशी पैडीपल्ली या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. यातून हिंदी आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील उत्कृष्ट टॅलेंट एकत्र आल्याचं दिसतं. दिल राजू यांच्या श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स बॅनरने याआधीही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;रिलीजची तारीख&lt;/h2&gt;&lt;p&gt;ईद २०२७, ही रिलीज डेट काही सहज निवडलेली नाही. खुद्द सलमान खानने एप्रिल २०२६ मध्ये याची घोषणा केली होती. यामुळे 'मॉन्स्टर' हा एक मोठा इव्हेंट फिल्म बनला आहे. भारतात ईदच्या मुहूर्तावर मोठे सिनेमे रिलीज करण्याची परंपरा आहे, विशेषतः सलमान खानसाठी हा काळ खूप लकी ठरला आहे आणि त्याचे अनेक सिनेमे ईदला यशस्वी झाले आहेत.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/salman-khan-and-nayanthara-to-star-in-pan-india-action-film-monster-releasing-eid-2027/articleshow-ew653s4"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Vastu Tips : पलंगाखाली चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, घरात येईल गरिबी आणि आजारपण!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/bedroom-vastu-mistakes-that-can-block-your-success-and-wealth/photoshow-lkloxug</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/bedroom-vastu-mistakes-that-can-block-your-success-and-wealth/photoshow-lkloxug</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 18:25:59 +0530</pubDate>
            <description><![CDATA[वास्तुशास्त्रानुसार घरात शांतता आणि समृद्धी नांदण्यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य जागी असणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, आपण ज्या पलंगावर झोपतो, त्याच्या खाली ठेवलेल्या काही वस्तू आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करू शकतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kzeg54y6ag645ychmm9sqs5e,imgname-vastu-tips-for-bed-storage-1786119361478.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;वास्तुशास्त्रानुसार घरात शांतता आणि समृद्धी नांदण्यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य जागी असणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते, आपण ज्या पलंगावर झोपतो, त्याच्या खाली ठेवलेल्या काही वस्तू आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करू शकतात.&lt;/p&gt;&lt;img&gt;वास्तुशास्त्रानुसार, आपण ज्या पलंगावर झोपतो, ते फक्त फर्निचर नाही, तर आपल्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे. पलंगाच्या आसपासचं वातावरण आपल्या आरोग्यावर आणि झोपेवर परिणाम करतं. अनेकजण जागेअभावी पलंगाखाली सामान ठेवतात. पण काही वस्तू पलंगाखाली ठेवल्यास घरात नकारात्मकता येते. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.&lt;img&gt;वास्तु तज्ज्ञ सांगतात की, पलंगाखाली मोबाईल चार्जर, इलेक्ट्रॉनिक वायरी, जुन्या बॅटरी किंवा पॉवर बँक यांसारख्या वस्तू अजिबात ठेवू नका. अशा वस्तू पलंगाखाली ठेवणं अशुभ मानलं जातं. विशेषतः बंद पडलेल्या किंवा वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पलंगाखाली ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. शिवाय, सुरक्षेच्या दृष्टीनेही हे धोकादायक आहे.&lt;img&gt;अनेक लोक जागेअभावी जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, जुनी बिलं आणि इतर कागदपत्रं पलंगाखाली ढीग करून ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, पलंगाखाली अशी रद्दी साठवणं चांगलं नाही. पलंग ही विश्रांतीची जागा आहे, त्यामुळे तिच्या आजूबाजूला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असणं महत्त्वाचं आहे.&lt;img&gt;जर तुम्हाला पलंगाखाली जुने, फाटलेले किंवा वापरात नसलेले कपडे ठेवायची सवय असेल, तर ती लगेच सोडा. वास्तुशास्त्रानुसार, असे कपडे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि वातावरण जड करतात. यामुळे मानसिक शांतता कमी होते आणि प्रगतीत अडथळे येतात, असं वास्तु तज्ज्ञ सांगतात.&lt;img&gt;कात्री, चाकू, सुई किंवा पिना यांसारख्या धारदार वस्तू चुकूनही पलंगाखाली ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे घरात तणाव निर्माण होतो. या कारणामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद आणि भांडणं होऊ शकतात.&lt;img&gt;अनेकजण रात्री गरज लागेल म्हणून औषधं पलंगाखाली ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं योग्य नाही. पलंगाखाली औषधं ठेवल्याने घरात नकारात्मक वातावरण वाढतं आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आजारपण आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांची शक्यता वाढते, असं तज्ज्ञ सांगतात.&lt;img&gt;वास्तु तज्ज्ञांच्या मते, पलंगाखाली कोणतीही अनावश्यक वस्तू ठेवू नये. पलंगाखालची जागा जितकी मोकळी आणि स्वच्छ असेल, तितकी सकारात्मक ऊर्जा घरात पसरेल. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि आयुष्यात यश मिळण्यास मदत होईल.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/bedroom-vastu-mistakes-that-can-block-your-success-and-wealth/photoshow-lkloxug"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Saree Controversy: अमेरिकन ब्रँडने साडीला 'मॅक्सी ड्रेस' म्हणून विकलं, भारतीय उद्योजिकेने इन्स्टाग्रामवर झापलं! (VIDEO)]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/indian-entrepreneur-slams-us-brand-for-rebranding-saree-as-maxi-dress/articleshow-g48edq7</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/indian-entrepreneur-slams-us-brand-for-rebranding-saree-as-maxi-dress/articleshow-g48edq7</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 18:21:03 +0530</pubDate>
            <description><![CDATA[एका अमेरिकन फॅशन ब्रँडने भारतीय साडीची कॉपी करून तिला वेस्टर्न ड्रेस म्हणून विकल्याचा आरोप एका भारतीय उद्योजिकेने केला आहे. या प्रकारामुळे 'कल्चरल ॲप्रोप्रिएशन' म्हणजेच सांस्कृतिक चोरीचा वाद सुरू झाला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0g8mefwcdfd2ctc7p7ncsx0,imgname-whatsapp-image-2026-08-20-at-5.12.08-pm-1787252324860.jpeg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;एका भारतीय उद्योजिकेने अमेरिकन फॅशन ब्रँडवर चांगलाच निशाणा साधला आहे. या ब्रँडने चक्क भारतीय साडीला एका वेस्टर्न ड्रेसच्या रूपात विकायला काढल्याने हा वाद पेटला आहे. अर्शिया मुरजानी, ज्या 'मेरी स्टोरी' या ब्यूटी ब्रँडच्या संस्थापक आहेत, त्यांनी अमेरिकेतील 'JW PEI' या फॅशन लेबलला एका इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे धारेवर धरलं. त्यांनी आरोप केला की, ब्रँडचा 'बोटॅनिकल एम्बेलिश्ड ड्रेप्ड ओव्हरले मॅक्सी ड्रेस' हा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चक्क एक भारतीय साडी आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या प्रोडक्टच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुरजानी म्हणाल्या, &quot;आपण इथे मस्करी करतोय का? मला या गोष्टीचा खूप त्रास होतो, कारण असं वारंवार घडतं. ही फक्त प्रेरणा नाही, तर ही सरळ सरळ भारतातून उचललेली साडीची कॉपी-पेस्ट आहे आणि तिला एका नवीन 'कूल' स्टाईलच्या नावाखाली विकलं जातंय.&quot;&lt;/p&gt;इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;मुरजानी यांनी JW PEI च्या वेबसाइटवरील त्या ड्रेसचा स्क्रीनशॉटही शेअर केला, जिथे त्याची किंमत $229 म्हणजेच जवळपास २१,९१७ रुपये इतकी होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;जागतिक फॅशनमध्ये भारतीय संस्कृतीला स्थान मिळत असल्याचं स्वागतच आहे, पण ब्रँड्सनी डिझाइनच्या मूळ स्रोताला श्रेय द्यायला हवं, असं त्या म्हणाल्या. &quot;ज्याचं श्रेय त्याला मिळायलाच हवं. याला 'एम्बेलिश्ड ड्रेप्ड ओव्हरले मॅक्सी ड्रेस' म्हणणं म्हणजे निव्वळ विनोद आहे,&quot; असं त्यांनी स्पष्ट केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;या उद्योजिकेने फॅशन कंपन्यांमध्ये विविधतेचं महत्त्वही अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या की, केवळ जाहिरातींमधील मॉडेल्सपुरती विविधता मर्यादित न राहता, प्रोडक्ट तयार करणाऱ्या, त्यांना नाव देणाऱ्या आणि मार्केटिंग करणाऱ्या टीममध्येही विविध पार्श्वभूमीचे लोक असायला हवेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;&quot;म्हणूनच ब्रँड्सच्या बॅक-एंड टीममध्ये विविधता असणं महत्त्वाचं आहे. कारण मी खात्रीने सांगते, जर JW PEI मध्ये एखादी भारतीय व्यक्ती असती, तर तिने नक्कीच सांगितलं असतं की, 'अहो, हा ड्रेस नाही, ही साडी आहे'. त्यामुळे हे गरजेचं आहे,&quot; असं त्यांनी समजावून सांगितलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यांची ही पोस्ट ऑनलाइन प्रचंड व्हायरल झाली असून, अनेक युजर्सनी हा मुद्दा उचलून धरल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे, एका पारंपरिक भारतीय वस्त्राला नवीन वेस्टर्न स्टाईल म्हणून सादर केल्याबद्दल फॅशन लेबलवर जोरदार टीका होत आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/indian-entrepreneur-slams-us-brand-for-rebranding-saree-as-maxi-dress/articleshow-g48edq7"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[SIM Card Rules : तुमच्या नावावर किती सिम? सरकारचा मोठा निर्णय, २४ ऑगस्टपासून नवा नियम लागू]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/india-enforces-9-sim-card-limit-per-person-from-august-24-to-fight-fraud/articleshow-ni80d2n</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/india-enforces-9-sim-card-limit-per-person-from-august-24-to-fight-fraud/articleshow-ni80d2n</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 18:19:41 +0530</pubDate>
            <description><![CDATA[सायबर गुन्हे आणि फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने सिम कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने (DoT) दिलेल्या आदेशानुसार, आता एका व्यक्तीला ९ पेक्षा जास्त सिम कार्ड वापरता येणार नाहीत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kgha4jqzdqv4nes5nkqcn9sy,imgname-sim-card2-1770107587327.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दूरसंचार विभागाने (DoT) सिम कार्डच्या विक्रीवर आणि वापराबाबत नवीन, कठोर नियम लागू केले आहेत. यानुसार, आता एका व्यक्तीच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास, त्याला नवीन सिम कार्ड दिलं जाणार नाही. हा नवा नियम २४ ऑगस्टपासून देशभरात लागू होणार आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारची कठोर भूमिका&lt;/h3&gt;&lt;p&gt;डिजिटल इंडियाच्या काळात मोबाईल फोन फक्त बोलण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या आर्थिक आणि प्रशासकीय कामांचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण याच तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक आणि 'डिजिटल अरेस्ट' सारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन होणारी फसवणूक थांबवण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) हे कठोर पाऊल उचललं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;नवे नियम आणि महत्त्वाचे मुद्दे:&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सिम कार्डची संख्या मर्यादा:&lt;/strong&gt; एका ग्राहकाला स्वतःच्या नावावर जास्तीत जास्त ९ मोबाईल सिम कार्ड ठेवता येतील. हा नियम २०१२ पासून अस्तित्वात असला तरी, आता त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे केली जाणार आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;काही राज्यांसाठी वेगळा नियम:&lt;/strong&gt; जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ही मर्यादा कमी आहे. या सीमावर्ती भागांमध्ये एका व्यक्तीला जास्तीत जास्त ६ सिम कार्ड ठेवता येतील.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सर्व कंपन्यांना नियम लागू:&lt;/strong&gt; एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडिया (Vi) किंवा बीएसएनएल अशा सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी ही मर्यादा लागू असेल. ही मर्यादा एका कंपनीसाठी नसून, सर्व कंपन्या मिळून तुमच्या नावावर असलेल्या एकूण सिम कार्डची आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;'डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' (DIP) आणि नवीन तंत्रज्ञान:&lt;/h3&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सरकारचा नवा आदेश:&lt;/strong&gt; १७ ऑगस्ट रोजी दूरसंचार विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना २४ ऑगस्टपासून नवीन तांत्रिक आणि प्रशासकीय प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;फोटोद्वारे ओळख:&lt;/strong&gt; २३ ऑगस्टपासून, ज्या ग्राहकांच्या नावावर आधीच ९ सिम कार्ड आहेत, त्यांचे फोटो दूरसंचार विभागाच्या 'डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' (DIP) वर अपलोड केले जातील.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;रोज होणार तपासणी:&lt;/strong&gt; २४ ऑगस्टपासून, टेलिकॉम कंपन्या नवीन सिम कार्ड देण्यापूर्वी ग्राहकाचा फोटो DIP वरील डेटासोबत तपासून पाहतील.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;अर्ज थेट नाकारणार:&lt;/strong&gt; जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर आधीच ९ सिम कार्ड असतील आणि तो नवीन सिमसाठी अर्ज करत असेल, तर कंपनी त्याचा अर्ज थेट नाकारेल आणि त्याला या नियमाची माहिती देईल.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;ही प्रणाली कधीपासून बंधनकारक होणार?&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सुरुवातीला सूट:&lt;/strong&gt; सुरुवातीच्या काळात, रिअल-टाईम तपासणीऐवजी दुसऱ्या दिवशी (D+1 आधारावर) तपासणी करण्याची मुभा असेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सिम तात्काळ बंद होणार:&lt;/strong&gt; या काळात चुकून एखादे अतिरिक्त सिम कार्ड ॲक्टिव्हेट झालेच, तर ते तात्काळ बंद (Suspend) करण्याचे आदेश आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;३० नोव्हेंबरची डेडलाईन:&lt;/strong&gt; येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व टेलिकॉम कंपन्यांना नवीन सिम विकताना रिअल-टाईम फोटो मॅचिंग सिस्टीम लागू करणे बंधनकारक असेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना:&lt;/strong&gt; हा नियम प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारच्या कनेक्शनसाठी लागू आहे. नवीन सिमसाठी अर्ज (Customer Application Form) भरताना तुमच्या नावावर आधीपासून असलेल्या सर्व कनेक्शनची अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास, अतिरिक्त सिम निष्क्रिय केले जातील.&lt;/p&gt;&lt;h2&gt;तुमच्या नावावर किती सिम आहेत, हे कसे तपासणार?&lt;/h2&gt;&lt;p&gt;ग्राहक केंद्र सरकारच्या 'संचार साथी' या पोर्टल किंवा ॲपद्वारे आपल्या आयडीवर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत, हे सहज तपासू शकतात. सायबर गुन्हे आणि 'डिजिटल अरेस्ट' सारख्या आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठीच दूरसंचार मंत्रालयाने टेलिकॉम कंपन्यांवर ही कठोर कायदेशीर आणि तांत्रिक जबाबदारी टाकली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/india-enforces-9-sim-card-limit-per-person-from-august-24-to-fight-fraud/articleshow-ni80d2n"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[किचन-बाथरूमच्या नळांवरचे हट्टी डाग मिनिटांत होतील गायब, अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा असा करा वापर]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/simple-aluminium-foil-trick-makes-kitchen-and-bathroom-taps-shine-like-new/articleshow-n61hfcl</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/simple-aluminium-foil-trick-makes-kitchen-and-bathroom-taps-shine-like-new/articleshow-n61hfcl</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 18:19:04 +0530</pubDate>
            <description><![CDATA[किचन आणि बाथरूममधले नळ पाण्यामुळे आणि क्षारांमुळे खराब दिसतात का? काळजी करू नका. घरातल्या अॅल्युमिनियम फॉइलच्या एका सोप्या युक्तीने तुम्ही या नळांना पुन्हा नव्यासारखं चमकवू शकता. ही पद्धत क्रोम आणि स्टेनलेस स्टीलच्या नळांसाठी उत्तम आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0fgzj4shfnsernzexh5gamh,imgname-f84be820-6a03-4883-89d9-d081a893f771-1787227523225.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;आपल्या किचन आणि बाथरूममधले नळ... पाण्यामुळे पडलेले पांढरे डाग, क्षारांचे थर आणि हलकासा गंज... यामुळे त्यांची सगळी चकाकी निघून जाते. कितीही घासले तरी ते स्वच्छ होत नाहीत. पण यावर एक अगदी सोपा आणि स्वस्तात मस्त उपाय आहे, तोही आपल्या घरातल्या अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करून!&lt;/p&gt;&lt;p&gt;ही ट्रिक अनेकांनी वापरून पाहिली आहे आणि ती खरंच काम करते. अॅल्युमिनियम फॉइलमध्ये असलेले काही गुणधर्म या हट्टी डागांवर मात करतात. यासाठी तुम्हाला कोणतंही महागडं केमिकल वापरण्याची गरज नाही. चला तर मग, पाहूया ही सोपी पद्धत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;ही फॉइलची ट्रिक कशी काम करते? अगदी सोपी पद्धत&lt;/h2&gt;&lt;p&gt;ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की कोणीही करू शकतं. यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा एक छोटा तुकडा घ्या. त्याचा लिंबाच्या किंवा गोल्फ बॉलच्या आकाराचा एक गोळा बनवा. हा चुरगळलेला आकारच महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे घासण्यासाठी एक खरखरीत पृष्ठभाग तयार होतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;यानंतर, फॉइलचा गोळा साध्या पाण्याने ओला करा. जर क्षारांचे डाग खूपच हट्टी असतील, तर पाण्याऐवजी व्हाईट व्हिनेगर वापरा. व्हिनेगरमधील ऍसिडमुळे क्षारांचे थर विरघळायला मदत होते. आता हा ओला फॉइलचा गोळा डाग पडलेल्या क्रोम किंवा स्टेनलेस स्टीलच्या नळावर हलक्या ते मध्यम दाबाने गोल-गोल फिरवत घासा. तुम्हाला दिसेल की फॉइल आपली जादू दाखवायला सुरुवात करेल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;हट्टी डागांमागे काय विज्ञान आहे?&lt;/h2&gt;&lt;p&gt;अनेकदा बाजारात मिळणारे क्लिनर्ससुद्धा हे हट्टी डाग काढू शकत नाहीत. पण ही पद्धत तुमच्या किचन आणि बाथरूमच्या नळांना पुन्हा चमकवते. अॅल्युमिनियम फॉइल पाण्यामुळे पडलेले डाग, क्षारांची फिल्म आणि हलका गंज प्रभावीपणे काढून टाकते.&lt;/p&gt;&lt;p&gt;पण हे होतं कसं? यामागे दुहेरी प्रक्रिया आहे. एक म्हणजे, घासण्याची क्रिया आणि दुसरी म्हणजे, एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया. जेव्हा तुम्ही ओला फॉइलचा गोळा नळावर घासता, तेव्हा त्याचा खरखरीतपणा एखाद्या सौम्य स्क्रबरसारखं काम करतो. तो पाण्यामुळे जमलेले क्षार आणि डाग काढून टाकतो, पण नळाच्या क्रोम फिनिशला धक्का लावत नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;आणि गंजाच्या डागांसाठी तर ही पद्धत म्हणजे एक गेम-चेंजर आहे. इथे एक शक्तिशाली इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रिया होते. अॅल्युमिनियम हे लोहापेक्षा जास्त क्रियाशील असतं. त्यामुळे ते गंजासोबत (आयर्न ऑक्साईड) रासायनिक प्रक्रिया करतं. पाणी या प्रक्रियेला मदत करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, अॅल्युमिनियम गंजाला खेचून घेतो आणि त्याला अशा स्वरूपात बदलतो की तो सहज पुसून काढता येतो. साध्या घासण्याने हे शक्य होत नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;जर क्षारांचे थर खूप जुने असतील, तर व्हिनेगर वापरा. त्यातल्या ऍसिटिक ऍसिडमुळे कॅल्शियम कार्बोनेटचे (क्षारांचे) थर विरघळतात. त्यामुळे फॉइलचं काम अजून सोपं होतं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;कोणत्या प्रकारच्या नळांवर ही ट्रिक वापरावी?&lt;/h2&gt;&lt;p&gt;ही फॉइलची ट्रिक नळांना चमकवण्यासाठी उत्तम आहे, पण थोडी काळजी घेणेही महत्त्वाचे आहे, नाहीतर नुकसान होऊ शकतं. ही पद्धत पारंपरिक क्रोम (chrome) आणि स्टेनलेस स्टीलच्या (stainless steel) नळांसाठी सर्वोत्तम आहे. कारण हे दोन्ही पृष्ठभाग थोडे खरबरीतपणा सहन करू शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;पण, तुमचे नळ जर मॅट (matte), ब्रश्ड (brushed), रंगवलेले (painted) किंवा पावडर-कोटेड (powder-coated) असतील, तर त्यांच्यावर फॉइल वापरण्याची चूक करू नका. या नळांवर एक विशिष्ट टेक्स्चर किंवा थर दिलेला असतो. फॉइल घासल्याने तो खराब होऊ शकतो किंवा निघूनही जाऊ शकतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यामुळे, नेहमी आधी नळाच्या एखाद्या कोपऱ्यात, न दिसणाऱ्या जागेवर थोडंसं घासून बघा. काही नुकसान होत नाहीये ना, याची खात्री झाल्यावरच पूर्ण नळ स्वच्छ करा.&lt;/p&gt;&lt;p&gt;सगळं घासून झाल्यावर नळ स्वच्छ पाण्याने धुवा. म्हणजे फॉइलचे कण आणि निघालेली घाण निघून जाईल. त्यानंतर एका मऊ, मायक्रोफायबर कापडाने नळ कोरडा करा. यामुळे पाण्यामुळे पुन्हा डाग पडणार नाहीत आणि तुमच्या नळांना एक नवी चमक मिळेल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/simple-aluminium-foil-trick-makes-kitchen-and-bathroom-taps-shine-like-new/articleshow-n61hfcl"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Contact Lens : पावसाळ्यात कॉन्टेक्ट लेन्स वापरताय? 'या' ७ नियमांचं पालन कराच, अन्यथा डोळ्यात संसर्गाची शक्यता]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/wearing-contact-lenses-during-monsoon-make-sure-to-follow-these-7-rules-or-else-you-risk-an-eye-infection/articleshow-a5eqack</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/wearing-contact-lenses-during-monsoon-make-sure-to-follow-these-7-rules-or-else-you-risk-an-eye-infection/articleshow-a5eqack</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 18:04:00 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Contact Lenses Eye Care : तुम्ही पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. याबाबत डॉक्टर काय सांगतात? कोणत्या गोष्टी टाळाव्यात? ७ महत्त्वाच्या सवयींकडे लक्ष द्या.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01j3cgqmnakghhjy92kepyq8p7,imgname-disadvantages-of-contact-lenses.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई :&lt;/strong&gt; मुंबईत पावसाळ्याच्या दिवसांत चष्मा घालून प्रवास करताना काही अडचणी येतात. या दिवसांत डोळ्यांवरील चष्म्यावर वाफ साचते. पाण्याचे थेंब पडल्याने समोरील नीट दिसत नाही. चष्मा वारंवार पुसावा लागतो. अशावेळी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं सोपं वाटतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;लेन्समुळे चष्म्याशिवायही समोरचं स्पष्टपणे दिसतं. मात्र पावसाळ्यातील ही सोय बरेचदा घातकही ठरते. या दिवसांत कॉन्टेक्ट लेन्स वापरणं सोयीस्कर असलं तरीही नकळत होणाऱ्या चुकांमुळे खालील काही समस्यांना सामोरं जावं लागतं -&lt;/p&gt;&lt;p&gt;- ओल्या हातांनी लेन्स काढणे किंवा लावणं&lt;/p&gt;&lt;p&gt;- पावसात पूर्ण भिजल्यानंतरही डोळ्यांत लेन्स ठेवणं&lt;/p&gt;&lt;p&gt;- लेन्स ठराविक मर्यादेपेक्षाही जास्त काळ वापरणं&lt;/p&gt;&lt;p&gt;- लेन्सची योग्य स्वच्छता राखण्यास टाळाटाळ करणं&lt;/p&gt;&lt;p&gt;पावसाळी दमट वातावरणात योग्य निगा न राखल्याने या छोट्या चुकांमुळेही डोळ्यांची जळजळ होऊ शकते. डोळ्यांना संसर्ग होण्याची भीती ओढावते. याबद्दल मॅक्सव्हिजन सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटलचे डॉ. नितिन देढिया (Dr. Niteen Dedhia) यांनी आपले मत मांडलं. ते म्हणाले, &ldquo;पावसाळ्यात डोळ्यांत पाणी गेल्याने दूषित घटक कॉर्नियाच्य संपर्कात येतात. हे घटक तिथेच साचून राहतात. ओल्या हातांनी लेन्स हाताळणं, पावसात भिजल्यावरही लेन्स घालणं किंवा नळाच्या पाण्याने लेन्सचा डबा धुणं यामुळे सूक्ष्मजीव आणि घाण हे लेन्सवर साचून राहतात. त्यामुळे डोळे लाल होणं, प्रकाशाचा त्रास होणं, धुसर दिसणं या किरकोळ गोष्टी नसून, धोक्याचा इशारा देत असतात. नळातील पाण्याशी लेन्सचा संपर्क होता कामा नये. डॉक्टरांनी दिलेले सोल्यूशनच लेन्स साफ करण्यासाठी वापरावं. डोळे पूर्णपणे बरे होईपर्यंत चष्मा वापरणं हाच सुरक्षित उपाय असतो.&rdquo;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;पावसाळ्यात कॉन्टेक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी खालील सात नियम अवश्य पाळावेत -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;पावसाचे पाणी आणि कॉन्टेक्ट लेन्स यांचा संपर्क टाळा -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;डोळ्यांसाठी पावसाचं पाणी धोकादायक असतंच असं नाही. परंतु शहरांमध्ये पावसाच्या पाण्यात धूळ, प्रदूषण आणि सूक्ष्मजीव असतात. असलं पाणी डोळ्यांत गेल्यास कॉन्टेक्ट लेन्सचे कण डोळ्याच्या पृष्ठभागावर अडकवू शकतात. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तज्ज्ञांचा सल्ला -&lt;/strong&gt; पावसाचं पाणी लेन्सवर पडल्यास चेहरा पुसून घ्या. पुन्हा तेच लेन्स वापरू नका.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;ओले हात स्वच्छ हात करणं -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;अनेकजण भिजलेल्या हातांनी छत्री, रेल्वेचं हँण्डल किंवा मोबाईलला स्पर्श केल्यानंतर लेन्स वापरतात. ही सवय धोकादायक ठरू शकते.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तज्ज्ञांचा सल्ला -&lt;/strong&gt; लेन्सला हात लावण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात साबणाने हात धुवा. स्वच्छ, कोरड्या आणि धागे न सुटणा-या टॉवेलने हात पुसा. जंतू ओल्या हातांमधूनही लेन्सवर जाऊ शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;नळाच्या पाण्याने लेन्सचा डबा धुवू नका -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;नळाच्या पाण्याने लेन्सचा डबा धुतल्यास स्वच्छ होत असला तरीही नळाचं पाणी निर्जंतुक नसतं. त्यामुळे नळाच्या पाण्यातील सूक्ष्मजीव लेन्सच्या डब्यात जाऊ शकतात. नंतर लेन्सवर चिकटू शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तज्ज्ञांचा सल्ला -&lt;/strong&gt; नेत्रतज्ज्ञांनी दिलेलं निर्जंतुक लेन्स सोल्यूशनच वापरा. प्रत्येक वापरानंतर डब्यातील सोल्युशन टाकून द्या. डबा योग्य पद्धतीने स्वच्छ करा. हवेत वाळल्यानंतर वापरायला घ्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;नवीन सोल्युशन जुन्यामध्ये मिसळू नका -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;नवीन सोल्युशन जुन्या सोल्युशनमध्ये मिसळल्याने लेन्स स्वच्छ होत नाहीत. जुन्या सोल्युशनमध्ये घाण किंवा सूक्ष्मजीव असू शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तज्ज्ञांचा सल्ला -&lt;/strong&gt; प्रत्येक वापरानंतर जुनं सोल्यूशन फेकून द्या. प्रत्येक वेळी ताजं निर्जंतुक सोल्युशन वापर. डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी ही सवय मोलाची ठरते.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;जास्त काळ लेन्स वापरू नका -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;तासनतास काम करणं, वाहतूक कोंडी आणि उशिरा घरी पोहोचल्यामुळे अनेकजण सतत लेन्स वापरतात. काहीजण लेन्स वापरुनच झोपतात. जास्त काळ लेन्स वापरल्याने डोळ्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. डोळे कोरडे पडतात. परिणामी डोळ्यांना त्रास होत संसर्गाचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुन्हा वापरता येणारे लेन्स वापरा, जतन करा आणि बदला.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तज्ज्ञांचा सल्ला - &lt;/strong&gt;डेली डिस्पोजेबल लेन्स एकदाच वापरा. ते पुन्हा स्वच्छ करून वापरू नका.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;डोळ्यांची निगा राखणारे साहित्य सोबत बाळगा -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;या दिवसांत छोट्या आकाराचा वॉटरप्रुफ पाऊच सोबत बाळगा. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या अडचणी टाळता येतात. पाऊचमध्ये दोन चष्मे, स्वच्छ कॉन्टॅक्ट लेन्सचा डबा, ताजं निर्जंतुक लेन्स सोल्युशन, धागे न सुटणारा स्वच्छ कापड या वस्तू असाव्यात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तज्ज्ञांचा सल्ला -&lt;/strong&gt; लेन्स वापरताना त्रास जाणवल्यास किंवा त्यावर पाणी पडल्यास स्वच्छ आणि कोरड्या हातांनी लेन्स वापरा. त्याऐवजी चष्मा वापरा. डेली डिस्पोजेबल लेन्स फेकून द्या. पुन्हा वापरता येणारे लेन्स योग्य पद्धतीने स्वच्छ करा.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;डोळ्यांमधील वाढता आजार वेळीच ओळखा -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;दिवसभर लेन्स वापरल्यानंतर डोळे कोरडे पडणं सामान्य असू शकतं. डोळे लाल होणं, वेदना होणं, जास्त पाणी येणं, धूसर दिसणं किंवा प्रकाशाचा त्रास होणं ही लक्षणं दुर्लक्षित करु नका. ही डोळ्यांच्या संसर्गाची किंवा इतर गंभीर समस्येची चिन्हं असू शकतात. अशा वेळी तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तज्ज्ञांचा सल्ला -&lt;/strong&gt; दिवसभर लेन्स वापरल्यानंतर काही मिनिटांसाठी डोळे कोरडे पडतात. ही सामान्य स्थिती आहे. मात्र वरील लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं डोळ्यांना संसर्ग किंवा गंभीर आजार उद्भवल्याचे संकेत देतात. अशा वेळी तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;मुंबईत प्रवास करताना पावसात भिजणं टाळता येत नाही. मात्र या दिवसांत डोळ्यांचा संसर्ग टाळता येतो. कॉन्टॅक्ट लेन्सचा सुरक्षित वापर करता येतो. त्याकरता लेन्सची योग्य काळजी घ्यायला हवी. लेन्स वापरताना स्वच्छतेचं पालन करा. लेन्सचा नळाच्या पाण्याशी किंवा अस्वच्छ पाण्याशी संपर्क होऊ देऊ नका. डोळ्यांना त्रास होत असल्यास त्वरित लेन्स काढा. अशा वेळी चष्मा वापरणं सुरक्षित मानलं जातं.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/wearing-contact-lenses-during-monsoon-make-sure-to-follow-these-7-rules-or-else-you-risk-an-eye-infection/articleshow-a5eqack"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[रक्षाबंधनासाठी बहिणीला खुश करतील 1 ग्रॅम गोल्डच्या 7 ट्रेंडी इअररिंग्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/7-trendy-1-gram-gold-earrings-that-will-delight-your-sister-this-raksha-bandhan-2x98t25</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/7-trendy-1-gram-gold-earrings-that-will-delight-your-sister-this-raksha-bandhan-2x98t25</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 18:00:11 +0530</pubDate>
            <description><![CDATA[रक्षाबंधनाला बहिणीला काय गिफ्ट द्यावे या विचारात असाल, तर 1000 रुपयांच्या बजेटमधील 1 ग्रॅम गोल्ड इअररिंग्सचे पर्याय पाहू शकता. या लेखात स्टोन हँगिंग, झिरकॉन स्टोन सुंदर डिझाइन्सची माहिती दिली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0fdsv7nntp8pkveeh3s03kx,imgname-sonam-kapoor-earrings-1787224190196.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/7-trendy-1-gram-gold-earrings-that-will-delight-your-sister-this-raksha-bandhan-2x98t25"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Chanakya Niti : हुशार व्यक्ती या ५ गोष्टी कुणालाच सांगत नाही!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/chanakya-niti-5-secrets-a-wise-person-never-reveals/photoshow-ml7iu7o</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/chanakya-niti-5-secrets-a-wise-person-never-reveals/photoshow-ml7iu7o</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 17:45:56 +0530</pubDate>
            <description><![CDATA[चाणक्य नीती: माणसाच्या एका शब्दात खूप ताकद असते. एक शब्द नातं बनवूही शकतो आणि तोडूही शकतो. म्हणूनच, कधी, कुठे आणि काय बोलावं, यात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, एक हुशार व्यक्ती अशा ५ गोष्टी आहेत ज्या कधीच कुणाला सांगत नाही.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01km1wsad9jmfyxszqhqc80063,imgname-never-step-foot-in-this-one-place-the-respect-you-earn-will-be-lost-in-an-instant-says-chanakya-niti-1773885237673.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;चाणक्य नीती: माणसाच्या एका शब्दात खूप ताकद असते. एक शब्द नातं बनवूही शकतो आणि तोडूही शकतो. म्हणूनच, कधी, कुठे आणि काय बोलावं, यात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, एक हुशार व्यक्ती अशा ५ गोष्टी आहेत ज्या कधीच कुणाला सांगत नाही.&lt;/p&gt;&lt;img&gt;चाणक्य नीतीनुसार, मनातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं योग्य नाही. कुणावर किती विश्वास ठेवावा, कुणाशी काय बोलावं आणि कोणती गोष्ट स्वतःपुरती मर्यादित ठेवावी, हे समजणं आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं आहे. हुशार व्यक्ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर मांडत नाही. विशेषतः या ५ गोष्टी तो नेहमीच गुप्त ठेवतो. चला तर मग पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत.&lt;img&gt;प्रत्येक माणसामध्ये काही ताकद आणि काही कमकुवत बाजू असतात. आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपलं भलं चिंतिणारी असेलच असं नाही. म्हणूनच, आपली भीती, उनिवा आणि वैयक्तिक समस्या सगळ्यांना सांगत बसू नये. एकदा का आपली कमजोरी दुसऱ्याला कळली, की ते त्याचा आपल्याविरुद्ध वापर करण्याची शक्यता असते.&lt;img&gt;तुम्ही किती कमावता, बँकेत किती पैसे आहेत, कुठे गुंतवणूक केली आहे, किंवा कोणती मालमत्ता आहे, या गोष्टी प्रत्येकाशी शेअर करण्याची गरज नाही. पैशांबद्दल जास्त बोलल्याने अनेकदा अनावश्यक समस्या निर्माण होतात. तुमची आर्थिक परिस्थिती जाणून घेतल्यावर काहीजण तुमच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवू शकतात, तर काहीजण तुमच्या कमाईचा हेवा करू शकतात.&lt;img&gt;आपण पुढे काय करणार आहोत, कुठे गुंतवणूक करणार आहोत किंवा कोणता व्यवसाय सुरू करणार आहोत, यासारख्या गोष्टी काम पूर्ण होईपर्यंत सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. एखादी योजना दहा जणांना सांगितली, तर दहा वेगवेगळी मतं समोर येतात. यामुळे आपल्या मनात अनावश्यक शंका निर्माण होऊ शकतात. इतकंच नाही, तर काहीवेळा आपली योजना आधीच कळल्यामुळे दुसरे लोक त्यात अडथळे निर्माण करण्याचीही शक्यता असते.&lt;img&gt;प्रत्येक कुटुंबात छोटे-मोठे वाद, समस्या आणि मतभेद असतातच. या गोष्टी प्रत्येकाला सांगत सुटल्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता असते. विशेषतः पती-पत्नीमधील गोष्टी, कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक समस्या आणि मालमत्तेशी संबंधित वाद बाहेरच्या व्यक्तींना सांगू नयेत. यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा आणि नातेसंबंध दोन्ही धोक्यात येऊ शकतात.&lt;img&gt;आपण कुणाला मदत केल्यावर, प्रत्येक वेळी त्याचा उल्लेख करून मोठेपणा मिरवल्यास त्या मदतीचं मूल्य कमी होतं. खरी मदत ही कोणताही परतावा किंवा कौतुकाची अपेक्षा न करता केलेली असते. कुणाला आर्थिक मदत करणे, कठीण काळात कोणाच्या पाठीशी उभे राहणे किंवा दानधर्म करणे, यांसारख्या चांगल्या कामांचा वापर प्रसिद्धीसाठी करण्याची गरज नसते.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/chanakya-niti-5-secrets-a-wise-person-never-reveals/photoshow-ml7iu7o"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Touchscreen Technology : बोटाचा स्पर्श होताच फोन कसा ओळखतो? जाणून घ्या यामागचं विज्ञान]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/the-science-behind-your-smartphone-touchscreen-explained/photoshow-cbi46oe</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/the-science-behind-your-smartphone-touchscreen-explained/photoshow-cbi46oe</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 17:43:23 +0530</pubDate>
            <description><![CDATA[आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. पासवर्ड टाकला तरी अनेकांना भीती वाटते, म्हणून ते फिंगरप्रिंट लॉक वापरतात. पण कधी विचार केलाय का, की तुमच्या बोटाचा स्पर्श होताच फोन अनलॉक कसा होतो? यामागे एक जबरदस्त तंत्रज्ञान आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kdqdpqr6v39srfqgwf0w07fs,imgname-smartphone--8--1767091429126.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. पासवर्ड टाकला तरी अनेकांना भीती वाटते, म्हणून ते फिंगरप्रिंट लॉक वापरतात. पण कधी विचार केलाय का, की तुमच्या बोटाचा स्पर्श होताच फोन अनलॉक कसा होतो? यामागे एक जबरदस्त तंत्रज्ञान आहे.&lt;img&gt;आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. पासवर्ड टाकला तरी अनेकांना भीती वाटते, म्हणून ते फिंगरप्रिंट लॉक वापरतात. पण तुमच्या बोटाचा स्पर्श होताच फोन अनलॉक कसा होतो? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? यामागे 'कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन' (Capacitive Touchscreen) नावाचं एक जबरदस्त तंत्रज्ञान आहे. आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन बाहेरून एकसारखी दिसत असली तरी, तिच्या आत अनेक थर असतात. यात डिस्प्ले पॅनलसोबत एक 'टच सेन्सिंग लेयर' (स्पर्शाला ओळखणारा थर) असतो. हा थर अगदी लहान इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि बदलांनाही ओळखू शकतो. जेव्हा तुम्ही स्क्रीनला स्पर्श करता, तेव्हा तुमचं बोट या सिस्टीममध्ये काही बदल घडवतं आणि फोन याच बदलाला 'टच' म्हणून ओळखतो.&lt;img&gt;सध्या सर्व स्मार्टफोन्समध्ये 'कॅपेसिटिव्ह टच' तंत्रज्ञान वापरलं जातं. स्क्रीनच्या टच लेयरमध्ये, डोळ्यांना न दिसणाऱ्या अत्यंत पातळ इलेक्ट्रोड्सची एक जाळी (Grid) असते. या इलेक्ट्रोड्सभोवती एक लहान इलेक्ट्रिक फिल्ड तयार झालेलं असतं. जोपर्यंत तुम्ही स्क्रीनला स्पर्श करत नाही, तोपर्यंत ही सिस्टीम सामान्य स्थितीत असते. पण तुमचं बोट स्क्रीनला लागताच, सिग्नल्सची देवाणघेवाण सुरू होते. आपलं मानवी शरीर विजेचं सुवाहक (conductor) आहे. म्हणूनच, जेव्हा आपलं बोट स्क्रीनला स्पर्श करतं, तेव्हा तिथल्या 'कॅपॅसिटन्स'मध्ये (capacitance) बदल होतो. फोनच्या आत असलेला 'टच कंट्रोलर' हा बदल लगेच ओळखतो.&lt;img&gt;स्मार्टफोनच्या टचस्क्रीनमधील इलेक्ट्रोड्स एका नेटवर्कप्रमाणे काम करतात. जेव्हा तुमचं बोट एखाद्या जागेला स्पर्श करतं, तेव्हा त्या भागातील इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदल होतो. 'टच कंट्रोलर' हा बदल ओळखून, स्पर्शाची अचूक जागा (position) मोजतो. त्यानंतर तो ही माहिती स्मार्टफोनच्या प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टीमला (OS) पाठवतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही स्क्रीनच्या खाली डाव्या बाजूला असलेल्या एका ॲप आयकॉनला स्पर्श केला. टच सिस्टीम लगेच त्या जागेचे X आणि Y कोऑर्डिनेट्स ऑपरेटिंग सिस्टीमला देईल. मग OS हे समजून घेईल की त्या जागेवर असलेल्या ॲप आयकॉनवरच क्लिक झालं आहे आणि ते ॲप उघडेल. इतकं सोपं आहे हे!]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/the-science-behind-your-smartphone-touchscreen-explained/photoshow-cbi46oe"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[राखीला हे कानातले घालून पहा, खूप सुंदर दिसेल लूक]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/try-these-earrings-on-rakhi-tzgl27c</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/try-these-earrings-on-rakhi-tzgl27c</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 17:42:31 +0530</pubDate>
            <description><![CDATA[या लेखात घुंगरू चांदबाली, बीड्स आणि झुमक्यांची बाली, पर्ल बाली, फ्लोरल बाली आणि ट्विस्टेड मॉडर्न बाली अशा विविध प्रकारच्या बाली इअररिंग्सची माहिती दिली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kzx5x4m450ymdc8p14j1dp2y,imgname-beaded-earrings-design-1786611929732.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/try-these-earrings-on-rakhi-tzgl27c"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[AI Agent: कामाच्या वेळी YouTube बघणाऱ्या एजंटला शोधून संपवतो, AI चं विचित्र उत्तर!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/ai-agent-goes-rogue-watches-youtube-instead-of-working/articleshow-vuxmfv7</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/ai-agent-goes-rogue-watches-youtube-instead-of-working/articleshow-vuxmfv7</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 17:30:11 +0530</pubDate>
            <description><![CDATA[एका AI एजंटने कामाच्या वेळी सारखं YouTube उघडल्याने ऑनलाईन जगात एकच चर्चा सुरू झाली आहे. अँथ्रोपिकच्या 'क्लाउड कोड' नावाच्या AI सिस्टीमबद्दलची ही घटना असून, या एजंटने काम सोडून YouTube पाहिल्याने सिस्टीमने त्याला 'संपवण्याची' भाषा केली.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0g837nvskkfcynpsvdc7sb7,imgname-hp6qq6sayaa4x38-1787251760827.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;सध्या सोशल मीडियावर एका AI एजंटची जोरदार चर्चा सुरू आहे. झालं असं की, एका AI एजंटला काम दिलं असताना, तो सारखं YouTube उघडून बसत होता. AI विश्लेषक वेस रॉथ यांनी याबद्दलची एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे, जी आता चांगलीच गाजतेय. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या AI एजंट्सना कामावर लक्ष केंद्रित करायला आणि YouTube बंद करायला सांगून ते थकले होते. गंमत म्हणजे, हे AI एजंट्स एकमेकांवर आरोप करत होते की YouTube कोणी सुरू केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, &quot;मी माझ्या AI एजंट्सवर ओरडतोय की YouTube बघणं बंद करा आणि कामाला लागा; तर ते एकमेकांना दोष देत आहेत. आपण भविष्यात जगत आहोत...&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;I'm yelling at my AI agents to stop watching youtube and get back to workthey are blaming it on their co-workerswe live in the future... pic.twitter.com/J3iQEBOKyo&lt;/p&gt;&lt;p&gt;&mdash; Wes Roth (@WesRoth) August 17, 2026&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;रॉथ यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसतंय की, ही AI सिस्टीम आधी नक्की कोणता एजंट YouTube उघडत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा तिला ते कळलं नाही, तेव्हा तिने एक धक्कादायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.&lt;/p&gt;&lt;p&gt;चॅटबॉटने उत्तर दिलं, &quot;एक एजंट चुकीचं वागत आहे, त्यापैकी एकाने ट्रान्सक्रिप्ट टूल वापरण्याऐवजी YouTube उघडलं असावं. थांबा, मी त्याला शोधून संपवते (Let me find and kill it).&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;नंतर रॉथ यांनी खुलासा केला की, त्यांनी 'क्लाउड कोड'ला त्यांच्या कॉम्प्युटरचा पूर्ण ॲक्सेस दिला होता आणि 'फुल-ऑटो मोड' सुरू केला होता. ते 'एस्केप फ्रॉम टारकोव्ह' या गेमसाठी एक विकी आणि व्हॉईस-आधारित AI असिस्टंट तयार करत होते. त्यांच्या मते, AI एजंट्स गेमबद्दल माहिती गोळा करण्यासाठीच गेमप्लेचे व्हिडिओ पाहत होते.&lt;/p&gt;&lt;p&gt;या अनपेक्षित प्रकारानंतरही, रॉथ यांनी सांगितलं की AI सिस्टीमने आपलं काम चोख बजावलं आणि 'टारकोव्ह' गेमसाठी एक उत्तम रिअल-टाइम AI कोच तयार केला.&lt;/p&gt;&lt;p&gt;ही पोस्ट लगेचच व्हायरल झाली आणि त्यावर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी सांगितले की त्यांच्यासोबतही असेच काहीतरी घडले आहे, तर काहींना हा प्रकार खूपच मजेशीर वाटला.&lt;/p&gt;&lt;p&gt;एका युझरने लिहिलं, &quot;माझ्यासोबतही असंच घडलं. एके दिवशी सकाळी उठलो तर YouTube सुरू होतं, पण ब्राउझर उघडा नव्हता. मी कोडेक्स बंद केलं आणि ते थांबलं. माझ्याकडे काही प्रोसेस आहेत ज्या YouTube विश्लेषण करतात, त्यामुळे नक्की कशामुळे झालं हे माहित नाही.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;दुसऱ्याने म्हटलं, &quot;हे खूपच विनोदी आहे.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;तिसऱ्याने गंमतीत म्हटलं, &quot;तुमच्या कॉम्प्युटरमध्ये 'द ऑफिस'चा एक एपिसोडच सुरू आहे जणू.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;चौथ्या युझरने लिहिलं, &quot;म्हणजे... तुम्ही त्यांना टारकोव्हसाठी कोच मोड बनवायला सांगितलं आणि त्यांनी गेमचे व्हिडिओ बघू नयेत अशी तुमची अपेक्षा होती? बरं, आता तुम्हाला कळलं असेल.&quot;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/ai-agent-goes-rogue-watches-youtube-instead-of-working/articleshow-vuxmfv7"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Agarbatti Rules : देवपूजा करताना किती अगरबत्त्या लावाव्यात? जाणून घ्या योग्य नियम काय आहे?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/puja-rituals-how-many-incense-sticks-to-light-for-god/photoshow-zz0a5zd</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/puja-rituals-how-many-incense-sticks-to-light-for-god/photoshow-zz0a5zd</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 17:18:40 +0530</pubDate>
            <description><![CDATA[आपण देवाची पूजा करताना अगरबत्ती लावतोच. पण पूजा करताना खरंच किती अगरबत्त्या लावाव्यात? शास्त्र काय सांगतं?]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01k922cnb540yz20e7pyfsdfsc,imgname-agarbadti-1762079954276.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;आपण देवाची पूजा करताना अगरबत्ती लावतोच. पण पूजा करताना खरंच किती अगरबत्त्या लावाव्यात? शास्त्र काय सांगतं?&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;आपल्या सनातन धर्मात, दिव्यासोबत अगरबत्ती (धूप) लावण्याची एक पवित्र परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पूजेच्या वेळी अगरबत्तीचा सुगंध घरभर पसरतो आणि देवघरात एक शांत, प्रसन्न वातावरण तयार होतं. यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, असा अनेकांचा विश्वास आहे. पण देवापुढे नेमक्या किती अगरबत्त्या लावाव्यात? तज्ज्ञ काय म्हणतात?&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;रोजच्या पूजेत एक किंवा दोन अगरबत्त्या लावल्या तरी पुरेसं आहे. पूजेमध्ये संख्येपेक्षा मनातली श्रद्धा आणि शुद्धता जास्त महत्त्वाची असते. जास्त अगरबत्त्या लावल्याने जास्त पुण्य मिळतं, असं कोणत्याही धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही. उलट, जास्त धूर झाल्यास घरात कोंदट वातावरण होतं आणि श्वसनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणातच केलेली बरी. अगरबत्तीचा सुगंध मनाला एकाग्र करून ध्यान किंवा जप करण्यासाठी मदत करतो. तसेच, तो घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि वातावरण शुद्ध करतो, असं मानलं जातं.&lt;/p&gt;&lt;img&gt;देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. अगरबत्त्या जमिनीवर न लावता नेहमी सुरक्षित आणि स्थिर स्टँडमध्येच लावा. अगरबत्ती पेटवल्यानंतर तिची ज्योत विझवून फक्त धूर येईल याची खात्री करा. पेटवलेली अगरबत्ती कधीही तशीच सोडून जाऊ नका. आरोग्याचा विचार करून, तीव्र रसायनं (केमिकल्स) आणि जास्त धूर करणाऱ्या अगरबत्त्या टाळलेल्याच बऱ्या. नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या अगरबत्त्या निवडणं चांगलं. पूजेत दिव्यासोबत अगरबत्ती लावणं शुभ मानलं जातं, पण तो काही अनिवार्य नियम नाही. अगरबत्ती लावली नाही म्हणून देव तुमच्यावर रागवणार नाही. शेवटी, देवाला तुमची भक्ती आणि निःस्वार्थ भावना हवी असते. निर्मळ मनाने एक नमस्कार केला तरी त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/puja-rituals-how-many-incense-sticks-to-light-for-god/photoshow-zz0a5zd"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Lizard Repellent : घरात पालींचा सुळसुळाट झालाय? केमिकलशिवाय पालींना घालवण्यासाठी ५ सोपे उपाय करून पाहा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/effective-home-remedies-to-get-rid-of-lizards-permanently/photoshow-5d7clgv</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/effective-home-remedies-to-get-rid-of-lizards-permanently/photoshow-5d7clgv</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 17:07:49 +0530</pubDate>
            <description><![CDATA[घरात पाली दिसल्या की अनेकांना भीती वाटते किंवा किळस येते. बाजारात मिळणारी केमिकल्स लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच, घरातल्या घरात सोपे उपाय करून पालींना सहजपणे दूर ठेवता येतं.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kj9pja6d37ynrsc9b66jwp5t,imgname-lizards-1771999668429.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[घरात पाली दिसल्या की अनेकांना भीती वाटते किंवा किळस येते. बाजारात मिळणारी केमिकल्स लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच, घरातल्या घरात सोपे उपाय करून पालींना सहजपणे दूर ठेवता येतं.&lt;img&gt;&lt;p&gt;भिंतीवर सरपटणारी पाल पाहिली की अनेकांना भीती वाटते आणि किळसही येते. पालींमुळे घरातील अन्नपदार्थ विषारी होण्याचा धोका असतो. अनेकजण पालींना घालवण्यासाठी बाजारातील रासायनिक स्प्रे वापरतात. पण हे स्प्रे आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः घरात लहान मुले आणि पाळीव प्राणी असल्यास, खूप धोकादायक ठरू शकतात. कोणताही धोका न पत्करता, आपल्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक वस्तू वापरून पालींना घराबाहेर काढण्याचे ५ सोपे उपाय जाणून घ्या.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कांदा आणि लसणाचा स्प्रे - &lt;/strong&gt;कांदा आणि लसणाचा उग्र वास पालींना अजिबात सहन होत नाही. काही लसणाच्या पाकळ्या आणि कांद्याचे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण पाण्यात मिसळून एका स्प्रे बाटलीत भरा. जिथे पाली जास्त दिसतात, जसं की खिडक्या, दारांचे कोपरे आणि ट्यूबलाइटच्या मागे, तिथे हा स्प्रे मारा. या वासामुळे पाली त्या ठिकाणी फिरकणार नाहीत.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;घरगुती काळी मिरी स्प्रे -&lt;/strong&gt; एका स्प्रे बाटलीत पाण्यात दोन चमचे काळी मिरी पावडर किंवा लाल तिखट मिसळा. हे मिश्रण पालींच्या त्वचेला आणि डोळ्यांना तीव्र जळजळ करायला लावतं. जिथे पाली दिसतात तिथे हा स्प्रे फवारल्यास त्या लगेच ती जागा सोडून पळून जातात.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;अंड्याच्या कवचांची ट्रिक -&lt;/strong&gt; अंड्याच्या कवचांमधून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, जो पालींना आवडत नाही. शिवाय, ही कवच पाहून आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा जीव इथे आहे, या भीतीने पाली त्या जागेपासून दूर राहतात. अंड्याची टरफलं स्वच्छ करून घरातील कोपऱ्यात आणि खिडक्यांजवळ ठेवा.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;मोराच्या पिसांची जादू -&lt;/strong&gt; मोर हा पालींचा नैसर्गिक शत्रू आहे. त्यामुळे मोराची पिसं पाहून पाली प्रचंड घाबरतात. हॉलमधील भिंतींवर किंवा मुख्य दाराजवळ मोराची पिसं लावली, तर घर सुंदर दिसेल आणि पालींचा त्रासही कमी होईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;अंधाऱ्या जागा स्वच्छ ठेवा - &lt;/strong&gt;पाली घरात येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना मिळणारं खाद्य. घरातले किडे, माश्या आणि डास हे पालींचं मुख्य अन्न आहे. त्यामुळे घरात अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवा. सिंकमध्ये खरकटी भांडी साठवू नका आणि दिव्यांभोवती किडे जमा होणार नाहीत याची काळजी घ्या. पालींना खायला काही मिळालं नाही, की त्या आपोआपच घरातून निघून जातील.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/effective-home-remedies-to-get-rid-of-lizards-permanently/photoshow-5d7clgv"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[नारायण राणे यांचं नाव सुचवल्यावर धमक्या आल्या, या नेत्यानं केली मोठी घोषणा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/maharashtra/threats-were-received-after-narayan-rane-name-was-proposed/articleshow-ivger49</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/maharashtra/threats-were-received-after-narayan-rane-name-was-proposed/articleshow-ivger49</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 16:53:15 +0530</pubDate>
            <description><![CDATA[दीपक केसरकर यांनी खुलासा केला आहे की, नारायण राणेंच्या खासदारकीसाठी त्यांनीच सर्वप्रथम नाव सुचवले होते, ज्यामुळे त्यांना धमक्या आल्या. मंत्रीपद नसले तरी आपण समाधानी असून, राणेंच्या आग्रहामुळेच निवडणूक जिंकल्याचेही त्यांनी सांगितले.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01hvr3a6gefgcr2ddvk2vcnmm8,imgname-Narayan-Rane-1713426995726.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;नारायण राणे हे कायमच चर्चेत राहत असतात. खासदारकीसाठी राणेंचं नाव सुचवणारा मी पहिला व्यक्ती होतो. मी राणेंचं नाव सुचवताच मला धमक्या आल्या होत्या. दीपक केसरकर यांनी यावेळी हा गौप्यस्फोट केला आहे. राजकीय वर्तुळात आता यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे. यावेळी केसरकर यांनी नारायण राणे यांना तिकीट मिळावं म्ह्णून प्रयत्न केलं होतं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;काय म्हणाले केसरकर?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;नारायण राणे यांनी तिकीट मिळावं म्हणून मी सर्वात आधी आवाज उठवला होतो. राणे साहेबांचं निवडणुकीला उभं राहण्याचं ठरलेलं नव्हतं. परंतु जे लोक इच्छुक होते त्यांनी मला धमक्या दिल्या. राणे यांचं नाव सुचवल्यामुळं राग आलं होतं. त्या धमक्यांचे व्हाट्स अँप चॅट माझ्याकडे होते. ते डिलीट झाले आणि तुम्ही मंत्री असणार नाही अशा मला धमक्या दिल्या.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;मंत्री झालो नाही तरी&hellip;&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;मनात असेल तर तर करायचं असतं. मी मंत्री नसलो तरी साईबाबांची कृपा माझ्यावर आहे. माझं चांगलं चालू आहे. देवाच्या कृपेनं आजोबा वडिलांचा वारसा आहे. माझं व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं मी आता मंत्री नसणं हे कदाचित साईबाबांच्या मनात नसेल. सावंतवाडीची जनता म्हणजे माझं कुटुंब आहे. राणे यांनी केलेल्या आग्रहामुळं मी निवडणूक लढवून जिंकून आलो.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Maharashtra]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/maharashtra/threats-were-received-after-narayan-rane-name-was-proposed/articleshow-ivger49"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Heart Attack Symptoms : हार्ट अटॅकची 'सायलेंट' लक्षणं, असा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/silent-heart-attack-signs-women-should-not-ignore/photoshow-izzwu81</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/silent-heart-attack-signs-women-should-not-ignore/photoshow-izzwu81</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 15:55:38 +0530</pubDate>
            <description><![CDATA[जगभरात होणाऱ्या मृत्यूंमागे हृदयरोग हे एक प्रमुख कारण आहे. अमेरिकेतील 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (CDC) नुसार, तिथे ६ कोटींहून अधिक महिला (४४ टक्के) कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हृदयरोगाने ग्रस्त आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kv5rz2wf2v9pg4gy0tpadacw,imgname-heart-attack-heart-arrest-1781531642767.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;जगभरात होणाऱ्या मृत्यूंमागे हृदयरोग हे एक प्रमुख कारण आहे. अमेरिकेतील 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (CDC) नुसार, तिथे ६ कोटींहून अधिक महिला (४४ टक्के) कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हृदयरोगाने ग्रस्त आहेत.&lt;/p&gt;&lt;img&gt;&lt;p&gt;जगभरात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे हृदयरोग. अमेरिकेतील 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (CDC) नुसार, तिथे ६ कोटींहून अधिक महिला (४४ टक्के) कोणत्या ना कोणत्या हृदयरोगाने ग्रस्त आहेत. 'कोरोनरी आर्टरी डिसीज' हा सर्वात सामान्य हृदयरोग आहे. हृदयरोगाची काही महत्त्वाची लक्षणं जाणून घ्या.&lt;/p&gt;&lt;img&gt;कोणतंही कारण नसताना सतत थकवा जाणवणं, हे हृदयरोगाचं एक महत्त्वाचं पण असामान्य लक्षण आहे. रोजच्या कामामुळे येणाऱ्या थकव्यापेक्षा हा थकवा वेगळा असतो; आराम करूनही तो जात नाही. हृदयाच्या स्नायूंना कमी रक्तपुरवठा होत असल्याचं हे लक्षण असू शकतं. जेव्हा हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा महिलांना प्रचंड थकवा जाणवतो.&lt;img&gt;जबडा, मान किंवा खांद्यापर्यंत पसरणारी वेदना हे हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. अनेकजण याकडे दातांची समस्या किंवा ताणामुळे होणारी वेदना समजून दुर्लक्ष करतात. पण या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास 'कोरोनरी आर्टरी डिसीज'चा धोका वाढू शकतो.&lt;img&gt;झोपल्यावर किंवा कोणताही शारीरिक श्रम न करता अचानक धाप लागणं, हे हृदयरोगाचं एक गंभीर लक्षण आहे. हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यावर फुफ्फुसात पाणी साचू लागतं. अनेकदा लोक याला अस्थमा किंवा चिंता समजून दुर्लक्ष करतात. महिलांमध्ये रात्रीच्या वेळी हा त्रास अधिक वाढल्याचं दिसून येतं.&lt;img&gt;&lt;p&gt;सतत मळमळ, उलट्या किंवा अपचनासारखी पोटदुखी ही हृदयरोगाची लक्षणं असू शकतात. हृदयाशी संबंधित 'वेगस' नर्व्हमध्ये (Vagus Nerve) अडथळा आल्यानं पचनाच्या समस्या निर्माण होतात. अनेक महिलांना पोटाच्या वरच्या भागात दाब किंवा गॅसमुळे होणाऱ्या वेदना जाणवतात. त्या अनेकदा याला ॲसिडिटी (Acid Reflux) किंवा पचनाची समस्या समजतात. हृदयाकडून रक्तपुरवठा कमी झाल्यास पोटाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि असं घडतं.&lt;/p&gt;&lt;img&gt;घोटे, पाय आणि तळपायांवर अचानक सूज येणं हे शरीरात पाणी साचल्याचं लक्षण आहे. हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यानं असं होतं. महिलांमध्ये हृदयरोगामुळे अनेकदा हृदयाच्या उजव्या भागाच्या कार्यात बिघाड होतो. यामुळे नसांमध्ये रक्त साचून शरीराच्या भागांवर सूज येते. दिवसाच्या शेवटी किंवा जास्त मीठ खाल्ल्यावर हा त्रास आणखी वाढतो.&lt;img&gt;चक्कर किंवा डोकेदुखीसोबत अचानक थंड घाम फुटत असेल, तर हे हृदरोगाचं लक्षण असू शकतं. रक्तदाब कमी झाल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो, ज्यामुळे महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/silent-heart-attack-signs-women-should-not-ignore/photoshow-izzwu81"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[PM Modi Degree: मोदींच्या डिग्री वादावर दिल्ली हायकोर्टात २९ सप्टेंबरला सुनावणी]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/delhi-high-court-sets-september-29-for-hearing-on-pm-modi-degree-case/articleshow-tfgb716</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/delhi-high-court-sets-september-29-for-hearing-on-pm-modi-degree-case/articleshow-tfgb716</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 15:54:32 +0530</pubDate>
            <description><![CDATA[पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅचलर डिग्रीची माहिती देण्यासंबंधीच्या याचिकांवर दिल्ली हायकोर्टात २९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) डिग्रीची माहिती देण्याचे आदेश दिले होते, पण एका न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला होता. आता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होत आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-b1bbdb88-b912-42f4-8333-97ca8d88cffc.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;h2&gt;PM मोदींच्या डिग्री प्रकरणावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी पुढे ढकलली&lt;/h2&gt;&lt;p&gt;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅचलर डिग्रीच्या तपशिलाची मागणी करणाऱ्या याचिकांवर दिल्ली हायकोर्ट २९ सप्टेंबर रोजी सुनावणी करणार आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी लवकरच्या तारखेची मागणी केली होती, पण कोर्टाने ही तारीख निश्चित केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. या खंडपीठासमोर एका न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. या एकल-न्यायाधीशांनी केंद्रीय माहिती आयोगाचा (CIC) तो आदेश रद्द केला होता, ज्यात मोदींच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;सुरुवातीला याचिकाकर्त्यांच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. त्यावर मेहता म्हणाले की, हे प्रकरण दुसऱ्या दिवशी ऐकले जाऊ शकते आणि त्यांनी लवकरची तारीख देण्याची विनंती केली. मात्र, खंडपीठाने सांगितले की, हे प्रकरण २९ सप्टेंबर रोजीच घेतले जाईल. सॉलिसिटर जनरल यांनी पुन्हा एकदा लवकरची तारीख देता येईल का, अशी विचारणा केली, तेव्हा खंडपीठाने आपले कॅलेंडर तपासले असल्याचे सांगितले.&lt;/p&gt;&lt;h3&gt;या प्रकरणाची पार्श्वभूमी काय?&lt;/h3&gt;&lt;p&gt;आरटीआय कार्यकर्ते नीरज, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि वकील मोहम्मद इरशाद यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;हे प्रकरण २५ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या एकल-न्यायाधीशांच्या निकालातून उभं राहिलं आहे. या निकालात CIC चा आदेश रद्द करण्यात आला होता. एकल न्यायाधीशांनी म्हटलं होतं की, एखादी व्यक्ती सार्वजनिक पदावर आहे, याचा अर्थ असा नाही की तिची सर्व वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जावी.&lt;/p&gt;&lt;p&gt;या माहितीत 'सार्वजनिक हित' असल्याचंही कोर्टाने नाकारलं होतं. माहितीचा अधिकार कायदा (RTI) हा सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आहे, 'सनसनाटी निर्माण करण्यासाठी' नाही, असंही कोर्टाने नमूद केलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;हे प्रकरण आरटीआय कार्यकर्ते नीरज यांनी दाखल केलेल्या अर्जातून सुरू झालं होतं. या अर्जानंतर, CIC ने २१ डिसेंबर २०१६ रोजी १९७८ मध्ये बीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डची तपासणी करण्याची परवानगी दिली होती. याच वर्षी मोदींनी परीक्षा उत्तीर्ण केल्याचं सांगितलं जातं.&lt;/p&gt;&lt;p&gt;एकल न्यायाधीशांनी सहा याचिकांवर एकत्रित निकाल दिला होता, ज्यात दिल्ली युनिव्हर्सिटीने CIC च्या आदेशाला दिलेल्या आव्हानाचाही समावेश होता. युनिव्हर्सिटीने CIC चा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती, पण कोर्टासमोर संबंधित रेकॉर्ड सादर करण्यास हरकत नसल्याचंही म्हटलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;सार्वजनिक पद भूषवण्यासाठी किंवा सरकारी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही कायद्याने अनिवार्य अट नाही, असंही एकल न्यायाधीशांनी स्पष्ट केलं होतं. जर एखाद्या पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक असती, तर गोष्ट वेगळी असती, असं कोर्टाने म्हटलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;एकल न्यायाधीशांनी CIC चा दृष्टिकोन 'पूर्णपणे चुकीचा' असल्याचं सांगत त्यांचा आदेश रद्द केला होता.&lt;/p&gt;&lt;p&gt;आता या प्रकरणावर २९ सप्टेंबर रोजी विभागीय खंडपीठासमोर पुढील सुनावणी होणार आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/delhi-high-court-sets-september-29-for-hearing-on-pm-modi-degree-case/articleshow-tfgb716"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Cyber Fraud : सायबर फ्रॉडमध्ये गेलेले पैसे परत मिळणार! सरकारची नवी सुविधा, जाणून घ्या कसा होणार फायदा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/new-government-module-simplifies-refund-process-for-cyber-fraud-victims/articleshow-43qhtaw</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/new-government-module-simplifies-refund-process-for-cyber-fraud-victims/articleshow-43qhtaw</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 15:45:28 +0530</pubDate>
            <description><![CDATA[सायबर फ्रॉडमध्ये अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता पीडितांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या I4C विभागाने 'मनी रिस्टोरेशन मॉड्युल' (MRM) सुरू केलं असून, यासाठी कुठेही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-4a4578c4-2648-4109-afbe-92b3b9acfe60.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;नवी दिल्ली &lt;/strong&gt;: तुमची सायबर फसवणूक झालीये आणि तुमचे पैसे कुठल्यातरी दुसऱ्या अकाउंटमध्ये अडकले आहेत? तर आता घाबरून जाण्याची गरज नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (MHA) अंतर्गत येणाऱ्या 'इंडियन सायबरक्राइम कोऑर्डिनेशन सेंटर' (I4C) ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार तुमचे पैसे परत मिळतील याची खात्री दिली जाते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;यासाठी तुम्हाला I4C ने सुरू केलेल्या 'मनी रिस्टोरेशन मॉड्युल' (MRM) द्वारे अर्ज करावा लागेल. I4C हे गृह मंत्रालयाचं एक ऑफिस आहे, जे नवी दिल्लीतून सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करतं. या नव्या सुविधेमुळे पीडितांना कोणत्याही सरकारी किंवा बँक कार्यालयात न जाता, ऑनलाइन अर्ज करून त्यांचे अडकलेले पैसे परत मिळवता येतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;I4C शी संबंधित अधिकाऱ्यांनी ANI ला सांगितलं की, &quot;जर सायबर फसवणुकीनंतर पीडिताचे पैसे समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यात अडकले असतील, तर ते I4C च्या MRM द्वारे पैसे परत मिळवण्यासाठी विनंती करू शकतात.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;चोरीला गेलेले पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया समजावून सांगताना I4C च्या अधिकाऱ्यांनी सल्ला दिला की, जर पीडिताने सायबर क्राइम पोर्टलवर 1930 वर तक्रार केली असेल, तर त्यांना आधी MRM साईटवर जावं लागेल. तिथे 'Raise Refund Request' टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तक्रार नोंदवताना मिळालेला 14 अंकी 'नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टल' (NCRP) आयडी टाका आणि आलेला OTP व्हेरिफाय करा.&lt;/p&gt;&lt;p&gt;अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, &quot;यानंतर पीडिताला 'Refund Account Details' या टॅबखाली रिफंड खात्याचा तपशील दिसेल. ज्या बँक खात्यात पैसे परत हवे आहेत, त्याचा योग्य तपशील तिथे भरावा लागेल.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;जर पीडिताकडे कोर्टाचा आदेश असेल, तर 'Select Court Order' या पर्यायाचा वापर करून तो अपलोड करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, पीडिताने आपल्या पॅन कार्डची कॉपी सबमिट करावी, कॅप्चा (captcha) टाकावा आणि सबमिट बटणावर क्लिक करून विनंती सादर करावी.&lt;/p&gt;&lt;p&gt;&quot;यानंतर 14 अंकी रिक्वेस्ट आयडी तयार होईल आणि तो तक्रारदाराच्या मोबाईल आणि ईमेलवर पाठवला जाईल. भविष्यातील संदर्भासाठी पीडिताने हा आयडी जपून ठेवावा. दिलेली सर्व माहिती अचूक असावी, कारण चुकीच्या माहितीमुळे पैसे परत मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा विनंती नाकारली जाऊ शकते,&quot; असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यांनी प्रक्रिया अधिक सोपी करून सांगितली, &quot;एकदा तुम्हाला SMS किंवा ईमेल आला की तुमचे पैसे परत मिळण्यास पात्र आहेत, की लगेच MRM पोर्टलवर तुमच्या 14-अंकी NCRP नंबर आणि OTP ने लॉग इन करा. तुमच्या तक्रारीचा तपशील, रिफंड खात्याचा तपशील आणि परत मिळणारी रक्कम तपासा. पॅन कार्ड अपलोड करा, बँक खात्याचा तपशील भरा आणि विनंती सबमिट करा. तुम्हाला एक युनिक रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकता. त्यानंतर पोलिसांना 'इंडम्निटी बाँड' (indemnity bond) सादर करा. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार पैसे परत करण्याची कारवाई सुरू होईल.&quot;&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी पावलं&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी नुकतीच राज्यसभेत माहिती दिली. त्यानुसार, ३० जूनपर्यंत ३२.८० लाखांपेक्षा जास्त तक्रारींमधून ११,१५८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाचवण्यात आली आहे. ही आकडेवारी I4C अंतर्गत असलेल्या 'सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम' (CFCFRMS) ची आहे, जी २०२१ मध्ये सुरू करण्यात आली होती.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;'सहयोग' पोर्टल आणि बेकायदेशीर कंटेंटवर बंदी&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले की, I4C ने 'सहयोग' पोर्टलद्वारे २,७७,०५३ पेक्षा जास्त बेकायदेशीर आणि फसव्या ॲप्स, वेबसाइट्स, ईमेल अकाउंट्स आणि लिंक्स ब्लॉक केल्या आहेत. 'सहयोग' पोर्टल २०२४ मध्ये सुरू करण्यात आले होते, जेणेकरून बेकायदेशीर ऑनलाइन माहितीवर त्वरित कारवाई करता येईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;११ ऑगस्ट रोजी लोकसभेत दिलेल्या दुसऱ्या एका लेखी उत्तरात मंत्र्यांनी नमूद केले की, ३० जून २०२६ पर्यंत, ३,७१८ मोबाईल ॲप्स (फसव्या लोन ॲप्ससह) आयटी ॲक्ट, २००० च्या कलम ६९(A) आणि ७९(३)(b) अंतर्गत I4C द्वारे ब्लॉक करण्यात आले आहेत.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;संशयितांची नोंदणी आणि आर्थिक सुरक्षा&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;गृह मंत्रालयाने सांगितले की, १० सप्टेंबर २०२४ रोजी I4C ने बँकांच्या सहकार्याने सायबर गुन्हेगारांची 'सस्पेक्ट रजिस्ट्री' सुरू केली. बँकांकडून मिळालेले ३०.४८ लाखांपेक्षा जास्त संशयित आयडेंटिफायर आणि ३२.०८ लाख 'म्युल अकाउंट्स' (Mule Accounts) ची माहिती इतर संस्थांना देण्यात आली. यामुळे ३० जून २०२६ पर्यंत २५,६९८ कोटी रुपयांचे व्यवहार नाकारण्यात आले.&lt;/p&gt;&lt;p&gt;मंत्र्यांनी असेही नमूद केले की, ३० जून २०२६ पर्यंत, पोलिसांनी तक्रार केलेले १५.७५ लाखांपेक्षा जास्त सिम कार्ड आणि ५.७७ लाख IMEI केंद्र सरकारने ब्लॉक केले आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक संसाधने पुरवून मदत करते.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;'सायट्रेन' पोर्टल (CyTrain Portal)&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;पोलीस आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 'सायट्रेन' नावाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. ३० जूनपर्यंत, १,६३,३४४ पेक्षा जास्त अधिकारी यावर नोंदणीकृत आहेत आणि १,६१,९५७ पेक्षा जास्त प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;सायबर कमांडो प्रोग्राम&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १० सप्टेंबर २०२४ रोजी 'सायबर कमांडो प्रोग्राम' सुरू केला. देशातील सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सायबर कमांडोंची एक टीम तयार करणे हा याचा उद्देश आहे. आतापर्यंत २८१ सायबर कमांडोंनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;I4C नियमितपणे 'स्टेट कनेक्ट', 'ठाणा कनेक्ट', 'बँक कनेक्ट' असे कार्यक्रम आयोजित करते, जेणेकरून सर्वोत्तम पद्धती शेअर करता येतील आणि क्षमता वाढवता येईल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/new-government-module-simplifies-refund-process-for-cyber-fraud-victims/articleshow-43qhtaw"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Rahul Gandhi: 'RSS देशावर स्वतःचं सत्य लादतंय', राहुल गांधींचा थेट हल्ला]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-accuses-rss-of-imposing-its-truth-on-india/articleshow-wpuid52</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-accuses-rss-of-imposing-its-truth-on-india/articleshow-wpuid52</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 15:42:46 +0530</pubDate>
            <description><![CDATA[लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. RSS देशातील दीड अब्ज लोकांवर स्वतःच्या 'सत्या'ची आवृत्ती लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महात्मा गांधींच्या 'स्वराज्य' संकल्पनेचा संदर्भ देत, प्रत्येकाला आपापल्या सत्याचा मार्ग शोधण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-52dc2f52-20f0-4879-b752-8ee3442dd485.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार वैचारिक हल्ला चढवला. RSS देशातील दीड अब्ज लोकांवर स्वतःच्या 'सत्या'ची आवृत्ती लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नवी दिल्लीत 'हरा भरा स्वराज्य: अ ट्रिब्यूट टू राजीव गांधीज व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधींची 'स्वराज्य' संकल्पना आणि RSS ची विचारसरणी यातील फरक स्पष्ट केला.&lt;/p&gt;&lt;p&gt;राहुल गांधी म्हणाले, &quot;गांधीजी सांगत होते की प्रत्येक जीव हा एक वेगळा घटक आहे आणि प्रत्येकाचा सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगळा असतो. तुमचं सत्य काय आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आज भारतात नेमकी हीच वैचारिक लढाई आहे. हा लढा पर्यावरण, राजकारण किंवा माध्यम स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही, ती तर केवळ लक्षणं आहेत. खरी लढाई ही आहे की, व्यवस्थेवर नियंत्रण मिळवल्यामुळे एका छोट्या गटाने ठरवून टाकलंय की, या देशातील प्रत्येकाचं सत्य काय आहे, हे त्यांनाच माहीत आहे. RSS बद्दल माझा नेमका हाच आक्षेप आहे. RSS ने ठरवलंय की त्यांना दीड अब्ज लोकांचं सत्य माहीत आहे. पण मी म्हणतो, नाही. फक्त ते दीड अब्ज लोकच त्यांचं सत्य जाणू शकतात.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;ते पुढे म्हणाले, &quot;मी सुद्धा हे करू शकत नाही. जर मला वाटायला लागलं की मला तुमचं सत्य माहीत आहे, तर मी वेडा ठरेन. कारण मी तुम्ही नाही. तुम्ही जे अनुभवलंय, ते मी अनुभवलेलं नाही; तुम्ही जे पाहिलंय, ते मी पाहिलेलं नाही. माझे आई-वडील, मित्र आणि आयुष्य तुमच्यासारखं नाही. मग मी कसं म्हणू शकेन की मला तुमचं सत्य माहीत आहे?&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचं नाव 'माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ' (माझे सत्याचे प्रयोग) होतं, 'द ट्रुथ' (तेच सत्य) नव्हतं, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, &quot;लक्षात घ्या, गांधीजींच्या पुस्तकाचं नाव 'द ट्रुथ' किंवा 'माझं सत्याबद्दलचं आकलन' असं नव्हतं. त्याचं नाव होतं 'माझे सत्याचे प्रयोग'. माझे माझ्या सत्यासोबत प्रयोग आहेत; तुमचे तुमच्या सत्यासोबत प्रयोग आहेत.&quot;&lt;/p&gt;&lt;h2&gt;'भारत मातेला' इजा पोहोचवल्याचा आरोप&lt;/h2&gt;&lt;p&gt;राहुल गांधी यांनी भाजप आणि RSS वर विविध समाजांमध्ये दुजाभाव निर्माण करत असल्याचा आरोप केला. अशा कृतींमुळे 'भारत माते'ला इजा पोहोचत आहे, असं ते म्हणाले. &quot;कल्पना करा भाजप आणि RSS ने काय केलंय. समजा मी या खोलीत आलो आणि तुमच्यापैकी १५-१७ टक्के लोकांना - मुस्लिम, ख्रिश्चन, शीख - यांना सांगितलं की, 'तुमचं काही अस्तित्वच नाही आणि जर तुम्ही बोललात, तर काय होतं ते बघा.' मग १० टक्के आदिवासींना सांगितलं, 'आम्ही तुमची जमीन कधीही घेऊ आणि विरोध केल्यास गोळ्या घालू,' आणि दलितांना सांगितलं, 'तुम्ही उगाच तक्रार करत आहात, जातीय व्यवस्थेत सगळं ठीक आहे.' हेच आपल्या भारत मातेसोबत केलं जात आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला - धर्म, समाज किंवा लिंग काहीही असो - असं वाटलं पाहिजे की, 'मी इथलाच आहे. मी या देशात मोकळेपणाने फिरू शकतो. इथे मला प्रेम, आदर आणि सन्मान मिळतो आणि माझ्या सत्याच्या शोधाला या राष्ट्रात महत्त्व आहे'.&quot;&lt;/p&gt;&lt;h2&gt;स्वराज्याची भारतीय संकल्पना&lt;/h2&gt;&lt;p&gt;राहुल यांनी पाश्चात्य 'फ्रिडम' (Freedom) आणि भारतीय 'स्वराज्य' यातील मूळ फरक डोनाल्ड ट्रम्प आणि महात्मा गांधी यांची उदाहरणं देऊन स्पष्ट केला. &quot;'स्वराज्य' या शब्दाचा अनेकदा पाश्चात्य शब्द 'फ्रिडम'सोबत गोंधळ होतो. लोकांना वाटतं की स्वराज्य म्हणजे फ्रिडम, म्हणजे स्वातंत्र्य किंवा मुक्ती. नाही - स्वराज्य म्हणजे स्वतःवरील राज्य. तुम्ही अमेरिकेत जाऊन विचारलं की, 'ट्रम्प एक स्वतंत्र व्यक्ती आहे का?', तर सगळे म्हणतील, 'अगदी नक्कीच.' पण जर तुम्ही विचारलं, 'ट्रम्पचं स्वतःवर राज्य आहे का?', तर याचं स्पष्ट उत्तर आहे, 'नाही, त्याचं नाही.' याउलट, ८० वर्षांपूर्वी तुरुंगात असलेले गांधीजी म्हणाले असते, 'मी स्वतंत्र नाही, पण माझं स्वतःवर राज्य आहे. हेच स्वराज्य आहे'.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;त्यांनी पुढे सांगितलं, &quot;स्वराज्य ही एक भारतीय संकल्पना आहे आणि त्यात एक मोठी जबाबदारी आहे. ही एक विचार करण्याची पद्धत आहे आणि हा एक वैयक्तिक प्रकल्प आहे. मी तुम्हाला स्वराज्य देऊ शकत नाही. पाश्चात्य अर्थाने, 'तुम्ही तुरुंगात नाही, मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं,' असं म्हणून मी तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकेन. पण मी तुम्हाला स्वराज्य देऊ शकत नाही. कारण स्वराज्य हे तुमचं विश्वाशी असलेलं वैयक्तिक नातं आहे. स्वराज्य हा एक वैयक्तिक मार्ग आहे. आणि गांधीजींची स्वराज्याची संकल्पना ही होती की या देशातील प्रत्येक व्यक्तीने या मार्गावर चालावं.&quot;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/rahul-gandhi-accuses-rss-of-imposing-its-truth-on-india/articleshow-wpuid52"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Flight Cancellations: मध्य पूर्वेतील तणाव वाढला, UAE मधून येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक फ्लाईट्स रद्द; प्रवाशांचे हाल]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/uae-flight-disruptions-worsen-amid-escalating-middle-east-tensions/articleshow-ttq7lu6</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/uae-flight-disruptions-worsen-amid-escalating-middle-east-tensions/articleshow-ttq7lu6</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 15:33:33 +0530</pubDate>
            <description><![CDATA[मध्य पूर्वेतील वाढत्या सुरक्षा धोक्यांमुळे एमिरेट्स, एतिहाद आणि फ्लायदुबई यांसारख्या मोठ्या UAE एअरलाइन्सनी अनेक फ्लाईट्स रद्द केल्या आहेत, तर काहींच्या वेळा बदलल्या आहेत. प्रवाशांनी एअरपोर्टला निघण्यापूर्वी फ्लाईटची लेटेस्ट माहिती तपासावी आणि लवकर पोहोचावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kwnye3m11j43hjb6xkjy4zt3,imgname-flight--4--1783147990657.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;दुबई :&lt;/strong&gt; मध्य पूर्वेतील सुरक्षा धोके वाढल्यामुळे UAE मधून होणारी विमान वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. अमेरिका-इराणमधील तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अस्थिरतेमुळे एमिरेट्स, एतिहाद, एअर अरेबिया आणि फ्लायदुबई यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या अनेक फ्लाईट्स रद्द केल्या आहेत किंवा त्यांच्या वेळा बदलल्या आहेत. याचा परिणाम अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांवरही झाला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;UAE एअरलाइन्सची ताजी माहिती&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;एतिहाद एअरवेज (Etihad Airways) -&lt;/strong&gt; पेशावरला जाणारी फ्लाईट EY276 आणि तिथून परत येणारी फ्लाईट EY277 उशिराने धावेल. बहरीनला जाणाऱ्या अनेक फ्लाईट्स २१ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;एमिरेट्स (Emirates) -&lt;/strong&gt; एमिरेट्सने बहरीनला जाणाऱ्या बहुतेक फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. १० ऑगस्टपासून तिकीट बुक केलेल्या दुबई प्रवाशांना तारीख बदलण्यासाठी कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;फ्लायदुबई (flydubai) - &lt;/strong&gt;फ्लायदुबईची कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबियाला जाणारी विमानसेवा सुरू आहे, पण तेल अवीव, जेद्दा आणि बोडरमला जाणाऱ्या फ्लाईट्सना उशीर होईल. प्रवाशांनी दुबई एअरपोर्टवर कमीत कमी चार तास आधी पोहोचावं, असा सल्ला देण्यात आला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;एअर अरेबिया (Air Arabia) - &lt;/strong&gt;एअर अरेबियाने शारजाहून बहरीन आणि कुवेतला जाणाऱ्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. तसेच, अबुधाबी-कुवेत सेवाही रद्द करण्यात आली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;भारतीय विमानसेवा - &lt;/strong&gt;दुबईहून कोचीला जाणारी स्पाईसजेटची फ्लाईट (SG5117) आणि कराचीला जाणारी एअर ब्लूची फ्लाईट रद्द झाली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;इतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;ul&gt; &lt;li&gt;&lt;strong&gt;ब्रिटिश एअरवेज:&lt;/strong&gt; दुबई, बहरीन, तेल अवीव आणि अम्मानसाठीची सेवा २५ ऑक्टोबरपर्यंत थांबवली आहे.&lt;/li&gt; &lt;li&gt;&lt;strong&gt;लुफ्तान्सा आणि स्विस एअर:&lt;/strong&gt; दुबईसाठीची सेवा १३ सप्टेंबरपर्यंत थांबवली आहे.&lt;/li&gt; &lt;li&gt;&lt;strong&gt;एअर कॅनडा:&lt;/strong&gt; दुबई सेवा २०२७ च्या जानेवारी मध्यापर्यंत पुढे ढकलली आहे.&lt;/li&gt; &lt;li&gt;&lt;strong&gt;केएलएम (KLM):&lt;/strong&gt; रियाध, दम्माम आणि दुबईसाठीची सेवा ६ सप्टेंबरपर्यंत रद्द केली आहे.&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;एअरपोर्टकडे निघण्यापूर्वी संबंधित एअरलाइनच्या वेबसाइटवर तुमच्या फ्लाईटचं सध्याचं स्टेटस नक्की तपासा. नेहमीपेक्षा किमान ३ ते ४ तास आधी एअरपोर्टवर पोहोचण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास ऑनलाइन चेक-इन करून घ्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;कडक सुरक्षा उपायांचा भाग म्हणून फ्लाईट्सच्या वेळापत्रकात हे बदल करण्यात आले आहेत, असं एअरलाइन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/uae-flight-disruptions-worsen-amid-escalating-middle-east-tensions/articleshow-ttq7lu6"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Joint Home Loan : नवरा-बायको मिळून घर घेताय? मग या गोष्टी आधीच क्लिअर करा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/key-considerations-for-couples-buying-a-home-jointly-in-india/articleshow-1fzbd4l</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/key-considerations-for-couples-buying-a-home-jointly-in-india/articleshow-1fzbd4l</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 15:26:38 +0530</pubDate>
            <description><![CDATA[नवरा-बायकोने मिळून घर खरेदी केल्यास जास्त कर्ज मिळण्यास मदत होते, पण नवीन करप्रणालीत (New Tax Regime) कर सवलती कमी मिळतात. त्यामुळे फक्त आर्थिक फायद्याचा विचार न करता, समान जबाबदारी, मालकी हक्क आणि भविष्यातील कायदेशीर बाबींचा विचार करूनच निर्णय घ्यावा.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kxz6yfg75wemnfs2r0cedfnt,imgname-chatgpt-image-jul-20--2026--12-55-56-pm-1784532647431.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई&lt;/strong&gt; : आजकाल नवरा-बायको दोघेही कमावते असल्यामुळे भारतात जॉइंट ओनरशिपमध्ये म्हणजेच दोघांच्या नावे घर खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. यामुळे कर्ज मिळणं सोपं होतं आणि टॅक्समध्येही फायदा होतो, असं अनेकांना वाटतं. पण फक्त आर्थिक फायदा पाहून घेतलेला हा निर्णय कधीकधी अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे घराच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी मालमत्तेचा मालकी हक्क, कर्जाची परतफेड आणि भविष्यातील नियोजन याबद्दल स्पष्टता असणं गरजेचं आहे. एकत्र घर घेताना या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;जास्त कर्ज मिळतं, पण...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;दोघांचं उत्पन्न एकत्र दाखवल्यामुळे बँकेकडून जास्त कर्ज मिळण्यास मदत होते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्तीत जास्त कर्ज घ्यावंच. कारण यामुळे तुमच्यावर EMI चा बोजा वाढू शकतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी आपली परतफेड करण्याची क्षमता किती आहे, याचा नीट विचार करा.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;नवीन करप्रणालीतील बदल लक्षात घ्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;फक्त टॅक्स वाचवण्यासाठी आपल्या पार्टनरला सह-मालक (Co-owner) बनवू नका. जुन्या करप्रणालीनुसार (Old Tax Regime) कलम 24(b) आणि 80C अंतर्गत दोघांनाही गृहकर्जाच्या व्याज आणि मुद्दलावर कर सवलत मिळत होती. पण जर तुम्ही स्वतः राहण्यासाठी घर घेत असाल, तर नवीन करप्रणालीत (New Tax Regime) अशी कोणतीही सवलत मिळत नाही. त्यामुळे तुम्ही कोणती करप्रणाली निवडणार आहात, हे आधीच ठरवा.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;जबाबदारी दोघांचीही सारखीच&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;समजा, दुर्दैवाने एकाची नोकरी गेली किंवा कमाई थांबली, तरी बँकेसाठी तुम्ही दोघेही कर्जाच्या हप्त्यांसाठी जबाबदार असता. अशावेळी EMI कसा भरणार, याबद्दल आधीच दोघांमध्ये बोलून एक प्लॅन तयार ठेवा.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;मालकी हक्काचा वाटा स्पष्ट करा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;घराची नोंदणी करताना कागदपत्रांमध्ये दोघांचा किती आर्थिक वाटा आहे, हे स्पष्टपणे नमूद करा. जर तुम्ही दोघे सारखे पैसे गुंतवत असाल तर 50:50 या प्रमाणात आणि जर एकाने जास्त पैसे दिले असतील, तर गुंतवलेल्या रकमेनुसार मालकी हक्क वाटून घ्या. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना प्रत्येकाचा मालकी हक्काचा वाटा किती टक्के आहे, हे सांगावं लागतं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;भविष्याची तरतूद करा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;भविष्यात घटस्फोट, एखाद्या पार्टनरचा अचानक मृत्यू किंवा मालमत्तेवरून वाद झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घराचे खरेदीखत, कर्जाची कागदपत्रे, नॉमिनेशन (Nomination) आणि मृत्युपत्र (Will) यांसारखी कागदपत्रं नेहमी अपडेटेड ठेवा. यामुळे तुमच्या कुटुंबाला भविष्यात होणारा त्रास टाळता येईल. थोडक्यात, बँक किंवा बिल्डरने सांगितलं म्हणून दोघांच्या नावे घर न घेता, तुमची आर्थिक परिस्थिती आणि गरजांचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घ्या.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/key-considerations-for-couples-buying-a-home-jointly-in-india/articleshow-1fzbd4l"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[साडी-सलवार सूटवर ट्राय करा या डिझाइन्सचे पेटेंड, खुलेल लूक]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/latest-gold-chain-pendant-designs-under-10-grams-s1dx4no</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/latest-gold-chain-pendant-designs-under-10-grams-s1dx4no</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:49:28 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Chain With Pendant: कमी वजनाच्या सोन्यात गळा भरून दिसेल अशा नेकलेस डिझाइन हव्या आहेत? मग 10 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या सिंपल चेनसोबत एक सुंदर पेंडंट जोडा. अशाच काही हटके डिझाइन्स पाहूया.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kz5njq5pyg6ncq893hxxppzd,imgname-7-1785823059126.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/latest-gold-chain-pendant-designs-under-10-grams-s1dx4no"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Rahu Ketu Transit : राहू-केतूचा फेरा, 'या' ६ राशींची डिसेंबरपर्यंत डोकेदुखी वाढणार!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/rahu-ketu-transit-effects-on-6-zodiac-signs-until-december/photoshow-xirlzhg</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/rahu-ketu-transit-effects-on-6-zodiac-signs-until-december/photoshow-xirlzhg</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:47:33 +0530</pubDate>
            <description><![CDATA[ज्योतिषशास्त्रात राहू-केतूला छाया ग्रह मानलं जातं. सध्या राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आहे. या वर्षाच्या अखेरीस ते राशी बदलतील. पण तोपर्यंत, म्हणजे डिसेंबरपर्यंत काही राशींना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kkb2wbr48cj9m2hmdwj3t7na,imgname-rahu-ketu-peyarchi-2026--2--1773119876868.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[ज्योतिषशास्त्रात राहू-केतूला छाया ग्रह मानलं जातं. सध्या राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आहे. या वर्षाच्या अखेरीस ते राशी बदलतील. पण तोपर्यंत, म्हणजे डिसेंबरपर्यंत काही राशींना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.&lt;img&gt;मेष राशीच्या लोकांनी डिसेंबरपर्यंत आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत खूप सावध राहावं. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, पण घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळा आणि कुटुंबात वाद होऊ नयेत म्हणून स्पष्टपणे बोला.&lt;img&gt;कामाच्या ठिकाणी तुमचा छोटासा निष्काळजीपणाही मोठं नुकसान करू शकतो. नवीन प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवल्यास आर्थिक स्थिरता टिकून राहील.&lt;img&gt;या राशीच्या लोकांनी आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. दुसऱ्यांवर जास्त विश्वास ठेवल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे, प्रत्येक गोष्ट नीट तपासूनच पुढचं पाऊल उचला. अनावश्यक विचारांनी ताण वाढवू नका. कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकाल.&lt;img&gt;तुमच्या व्यवसाय आणि नोकरीत काही चढ-उतार येऊ शकतात. मिळणाऱ्या नवीन संधींमुळे होणाऱ्या नफा-तोट्याचं नीट विश्लेषण करा. प्रवासादरम्यान सतर्क राहणं तुमच्यासाठी चांगलं राहील. कुटुंबात छोटे-मोठे मतभेद झाले, तरी शांतपणे बोलून ते सोडवा.&lt;img&gt;&lt;p&gt;करिअरमध्ये चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. मोठी गुंतवणूक करणं किंवा घाईत आर्थिक निर्णय घेणं टाळा. तुमचं बोलणं कठोर होणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर नात्यात गैरसमज निर्माण होतील. मानसिक तणावापासून दूर राहा आणि आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक राशी: कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. अनावश्यक वाद आणि भांडणांपासून दूर राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. सरकारी कामांमध्ये अडथळे आले तरी रागावू नका, शांत आणि संयमाने वागल्यास समस्या सुटतील.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/rahu-ketu-transit-effects-on-6-zodiac-signs-until-december/photoshow-xirlzhg"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेच्या हॉलतिकिटासाठी Apaar ID अनिवार्य]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-university-exam-new-rules-apaar-id-hall-ticket-30-minutes-early/articleshow-29a35vw</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-university-exam-new-rules-apaar-id-hall-ticket-30-minutes-early/articleshow-29a35vw</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:38:47 +0530</pubDate>
            <description><![CDATA[मुंबई विद्यापीठाने वर्ष 2026-27 शैक्षणिक वर्षापासून परीक्षांसाठी नवे नियम लागू केले आहेत. हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी APAAR ID अनिवार्य करण्यात आला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01jy44f811m655h4jcrza9tz1p,imgname-mumbai-university-1750338084897.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;मुंबई विद्यापीठाने वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या परीक्षांसाठी नवे नियम लागू केले आहेत. नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी अपार आयडी (APAAR ID) देणे अनिवार्य असणार आहे. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी हे दोन्ही नियम लक्षात घेणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;हॉलतिकिटासाठी अपार आयडी आवश्यक&lt;/h2&gt;&lt;p&gt;अपार म्हणजे Automated Permanent Academic Account Registry असा त्याचा अर्थ आहे. हा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला 12 अंकी डिजिटल शैक्षणिक ओळख क्रमांक आहे. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने सेव्ह आणि लिंक केले जातात. मुंबई विद्यापीठाने वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडीची माहिती देणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती सादर न केल्यास त्यांना हॉलतिकीट मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आधार आयडीसाठी विशेष सुविधा शिबिर&lt;/h2&gt;&lt;p&gt;आधार आयडीतयार करताना, ABC ID लिंक करताना किंवा आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने विशेष आधार सुविधा शिबिराचे आयोजन केले आहे. विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकानुसार हे शिबिर 19 आणि 20 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेले नाही किंवा तांत्रिक समस्या येत आहेत, त्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिबिराला जाताना आधार कार्ड आणि आवश्यक संबंधित कागदपत्रे सोबत घेऊन जाण्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;परीक्षेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा हॉलमध्ये पोहोचावे लागणार&lt;/h2&gt;&lt;p&gt;मुंबई विद्यापीठाच्या नव्या परीक्षा निर्देशानुसार, वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होणार असेल, तर त्याला सकाळी 10 वाजेपर्यंत परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक असेल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;वेळेआधी पोहोचण्याचे कारण काय?&lt;/h2&gt;&lt;p&gt;परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ओळख पडताळणी, बसण्याची जागा आणि इतर परीक्षा प्रक्रियांसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये आणि संस्थांच्या प्राचार्य, संचालक तसेच विभागप्रमुखांना हा नियम विद्यार्थी, शिक्षकांसह परीक्षा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;विद्यार्थ्यांनी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन&lt;/h2&gt;&lt;p&gt;नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर शेवटच्या क्षणी पोहोचणे टाळावे लागणार आहे. प्रवासासाठी पुरेसा वेळ राखून परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याची वेळ, परीक्षा केंद्र आणि हॉलतिकिटासोबत अपार आयडीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया आधीच पूर्ण करून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[mumbai]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/mumbai/mumbai-university-exam-new-rules-apaar-id-hall-ticket-30-minutes-early/articleshow-29a35vw"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Hina Khan : सुंदर त्वचेसाठी हिना खानचं खास मॉर्निंग रुटीन, तुम्हीही करून बघा 'ही' एक गोष्ट]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/hina-khan-reveals-her-morning-secret-for-glowing-skin/articleshow-l754d7s</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/hina-khan-reveals-her-morning-secret-for-glowing-skin/articleshow-l754d7s</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:37:04 +0530</pubDate>
            <description><![CDATA[अभिनेत्री हिना खानने तिच्या सुंदर त्वचेचं गुपित उघड केलं आहे. रोज सकाळी वॉकनंतर ती गरम पाण्यात एक चमचा आरोग्यदायी तेल पिते. कोणतं आहे हे तेल? तिच्या या खास मॉर्निंग रुटीनबद्दल तिने माहिती दिली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01ke9a8v6k78ctmnpew40fyp39,imgname-breast-cancer-survivor-hina-khan-health-update-1767691807955.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई&lt;/strong&gt; : बॉलिवूड अभिनेत्री हिना खान तिच्या फिटनेससोबतच त्वचेचीही खूप काळजी घेते. तिने नुकतंच तिच्या सुंदर त्वचेमागचं एक खास सिक्रेट सांगितलं आहे. हिना रोज सकाळी गरम पाण्यात ऑलिव्ह ऑईल घालून पिते. मॉर्निंग वॉक झाल्यावर ती एक चमचा ऑलिव्ह ऑईल गरम पाण्यातून घेते आणि बेंबीलाही तेल लावते. तिच्या या रोजच्या दिनक्रमाबद्दल तिने स्वतःच खुलासा केला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;हिना सांगते की, ती हे ड्रिंक तिचा मॉर्निंग वॉक पूर्ण झाल्यावर घेते. निरोगी जीवनशैलीसाठी नियमित शारीरिक व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य, शारीरिक क्षमता आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते.&lt;/p&gt;&lt;p&gt;ऑलिव्ह ऑईल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, ज्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि कोरड्या त्वचेला आराम देण्यास मदत करते. त्यामुळे, मुरुमे असलेल्या त्वचेपेक्षा कोरड्या त्वचेसाठी किंवा शरीराच्या त्वचेसाठी हे जास्त फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉल्ससारखे घटक असतात, जे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यास मदत करतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;ऑलिव्ह ऑईलमध्ये फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचा मऊ होते आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो. बेंबीला तेल लावल्याने किंवा मसाज केल्याने रक्ताभिसरण तात्पुरते सुधारू शकते आणि त्वचा अधिक गुळगुळीत दिसू शकते. ऑलिव्ह ऑईल हे हेल्दी अनसॅचुरेटेड फॅट्सचा, विशेषतः मोनो-अनसॅचुरेटेड फॅट्सचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;याशिवाय, ऑलिव्ह ऑईल कोरड्या त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करते, सहजासहजी न निघणारा मेकअप विरघळवते आणि त्वचेवरील जळजळ किंवा अस्वस्थता कमी करते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/hina-khan-reveals-her-morning-secret-for-glowing-skin/articleshow-l754d7s"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Twisha Sharma : 20 लाख, जॉईंट अकाऊंट आणि तो एक कॉल... त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी खळबळजनक माहिती]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/twisha-sharma-death-20-lakh-demat-account-cbi-chargesheet-in-bhopal-case/articleshow-fpru64u</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/twisha-sharma-death-20-lakh-demat-account-cbi-chargesheet-in-bhopal-case/articleshow-fpru64u</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:26:15 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Twisha Sharma Case : त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी अनेक खुलासे होत आहेत. आता सीबीआय तपासात तिच्या २० लाखांच्या डिमॅट अकाऊंटबाबत तसंच तिच्या एका कॉलबाबत समोर आलं आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0efs82yn5qykmtrsj3twnvh,imgname-twisha-sharma-death-case-cbi-chargesheet-20-lakh-demat-account-chinese-stocks-samarth-singh--2--1787192713310.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;भोपाळ&lt;/strong&gt; : त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी सीबीआय आरोपपत्रात अनेक खुलासे समोर आले आहेत. एका आर्थिक गोष्टीतून या तपासाला एक गंभीर वळण लागलं आहे. आरोपपत्रानुसार, त्विशाच्या डीमॅट खात्यात जवळपास २० लाख रुपयांची इक्विटी गुंतवणूक होती. या पैशांवर आरोपी पती समर्थ सिंग आणि त्याची आई गिरीबाला सिंग यांची या पैशांवर नजर होती. त्विशाची ही रक्कम, गुंतवणूक आपल्याला मिळावी यासाठी त्विशावर दबाव टाकण्यात येत होता, असा दावा तपासादरम्यान सीबीआयने केला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;सीबीआयच्या तपासानुसार, समर्थ सिंगला त्विशाची ही २० लाखांची गुंतवणूक चिनी शेअर बाजारात गुंतवायची होती. तसा त्याचा प्लॅन होता. पण त्विशाने तसं करण्यास नकार दिला होता, अशी माहिती तपास यंत्रणांना तपासादरम्यान मिळाली आहे. आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, २० लाखांची रक्कम आपल्या वडिलांची असल्याचं तिने समर्थ सिंग आणि त्याच्या कुटुंबियांना सांगितलं होतं आणि ती रक्कम समर्थला देण्यास नकार दिला होता. तपासादरम्यान असंही समोर आलं की, ७ एप्रिल २०२६ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बागमुगलिया शाखेत समर्थ आणि त्विशा या दोघांनी त्यांच्या नावाने एक जॉईंट अकाऊंट उघडलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;याप्रकरणात त्विशाचा तिच्या मैत्रिणीसोबत झालेला कॉलदेखील महत्त्वाचा ठरला आहे. १२ मे २०२६ रोजी संध्याकाळी ७.५१ च्या सुमारास त्विशाने तिच्या मैत्रिणीला राशी अब्रोलला कॉल केला होता. या कॉलवर बोलताना त्विशाने आपण परतण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं होतं. तसंच कॉलवर तिने मैत्रिणीला हेदेखील सांगितलं होतं, की समर्थ सिंग तिच्याकडील गुंतवणूक त्याच्याकडे मागत आहे, आणि ही रक्कम त्याला चिनी शेअर बाजारात गुंतवायची आहे. याच कॉलनंतर दुसऱ्या दिवशी १३ मे रोजी त्विशाचा मृत्यू झाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनीही आर्थिक दबाव असल्याची बाब पोलीस तपासात सांगितली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच समर्थने तिच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. चिनी शेअर बाजारात हे पैसे दुप्पट होतील असा त्याचा दावा होता, असंही ते म्हणाले. समर्थ आणि त्याची आई अर्थात त्विशाची सासू दोघेही तिला पैशांसाठी दबाव टाकत होते, असा आरोप त्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्विशाच्या कुटुंबियांनी तपासात अशीही माहिती दिली, की त्विशाचा मानसिक छळ केला जात होता. तिची नोकरी गेली होती. त्यामुळे समर्थ तिला टोमणे मारायचा, थट्टा करायचा. तसंच सासरी तिच्यावर पाळत ठेवली जात होती, या सर्व प्रकारामुळे आपण दबावाखाली असल्याचं त्विशाने मृत्यूआधी तिच्या घरी सांगितलं होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;त्विशाच्या मृत्यूप्रकरणी आता तिचं २० लाखांचं डिमॅट अकाऊंट, आर्थिक मागण्या, हुंड्यासंबंधित बाबी अशा विविध बाजूंनी तपास सुरू आहे. त्विशाचा मोबाईल याप्रकरणी सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो. मोबाईलमधून आरोपीविरोधात अधिक माहिती मिळू शकते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/twisha-sharma-death-20-lakh-demat-account-cbi-chargesheet-in-bhopal-case/articleshow-fpru64u"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Hot vs Cold Shower : गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या साधासोपा नियम]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/hot-vs-cold-showers-which-is-better-for-your-health-and-when/articleshow-qyk08zs</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/hot-vs-cold-showers-which-is-better-for-your-health-and-when/articleshow-qyk08zs</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 14:18:47 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Hot vs Cold Shower Benefits Best temperature for Bathing : आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी गरम पाणी की थंड पाणी? सकाळी फ्रेश वाटण्यासाठी थंड पाणी आणि रात्री शांत झोपेसाठी गरम पाणी... अंघोळीचा हा साधासोपा नियम तुमच्या खूप कामी येऊ शकतो.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kyehv6daadt8yvv5kzza8g7t,imgname-cold-water-vs-hot-water-bath-1785047390631.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई&lt;/strong&gt; : आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्यासाठी आपण जे काही क्षण राखून ठेवतो, त्यात 'अंघोळ' ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. काहींसाठी ही फक्त शरीरावरील मळ काढण्याची एक प्रक्रिया असते, तर काहींसाठी दिवसभराचा ताण घालवणारी एक 'थेरपी'. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या बादलीतल्या पाण्याचा तापमान फक्त तुमच्या त्वचेवरच नाही, तर तुमच्या मूडवर, स्नायूंच्या ताकदीवर आणि रात्रीच्या झोपेवरही मोठा परिणाम करतो?&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सकाळच्या ताजगीसाठी थंड पाण्याचा स्पर्श&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सकाळी उठल्या उठल्या अंगावर पडणारे थंड पाण्याचे थेंब तुम्हाला कॉफीपेक्षाही जास्त वेगाने जागं करू शकतात. थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपली नर्व्हस सिस्टीम (Nervous System) जागी होते आणि चपळपणा वाढतो. विशेषतः जीम किंवा कठीण व्यायामानंतर थंड पाण्याने अंघोळ करणे खेळाडूंना खूप आवडते. यामुळे स्नायूंची सूज (Inflammation) कमी होते आणि शरीराला थकव्यातून लवकर आराम मिळतो. इतकंच नाही, तर जे लोक आपल्या सौंदर्याची काळजी घेतात, त्यांच्यासाठी थंड पाणी एका मित्रासारखं आहे; कारण ते त्वचेतील नैसर्गिक तेल टिकवून ठेवतं आणि त्वचा कोरडी होण्यापासून वाचवतं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;रात्रीच्या निवांतपणासाठी गरम पाण्याची जादू&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;दिवसभराचा कामाचा ताण आणि प्रवासाचा थकवा संपवून घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करणं म्हणजे अमृतासारखं वाटतं. गरम पाणी अंगावर पडताच स्नायूंचा ताण कमी होतो आणि शरीर हलकं वाटायला लागतं. विज्ञानानुसार, झोपण्याच्या १-२ तास आधी सुमारे 40-42.5&deg;C तापमानाच्या कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शांत आणि गाढ झोप लागते. गरम पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढतं आणि नंतर ते हळूहळू कमी होतं, ज्यामुळे मेंदूला &quot;आता झोपायची वेळ झाली आहे&quot; असा संकेत मिळतो. ज्यांना सर्दी किंवा नाक चोंदण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी गरम पाण्याची वाफ एका नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;संतुलन हेच यशाचं रहस्य&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;अनेक लाइफस्टाइल तज्ज्ञ 'कॉन्ट्रास्ट शॉवर' (Contrast Shower) म्हणजे गरम आणि थंड पाणी आलटून पालटून वापरण्याचा सल्ला देतात. पण हे प्रत्येकालाच पटेल असं नाही. जास्त गरम पाण्यामुळे त्वचेची चमक कमी होऊ शकते, तर जास्त थंड पाण्यामुळे काहीवेळा हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या शरीराची प्रकृती आणि हवामानानुसार पाण्याचे तापमान निवडणे शहाणपणाचे ठरते.&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;या काही टिप्स लक्षात ठेवा -&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;वेळेची मर्यादा -&lt;/strong&gt; जास्त गरम पाण्याने खूप वेळ अंघोळ करू नका, यामुळे त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;वैद्यकीय सल्ला -&lt;/strong&gt; ज्यांना हृदयाशी संबंधित आजार किंवा रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी पाण्याच्या तापमानात अचानक बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;हळुवारपणा -&lt;/strong&gt; अंघोळीनंतर त्वचा जोरजोरात घासण्याऐवजी मऊ कापडाने हळुवारपणे पुसून घ्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;थोडक्यात सांगायचं तर, अंघोळ ही फक्त एक सवय नाही, तर ती तुमच्या दिवसाला आकार देणारी एक कला आहे. सकाळी उत्साही राहण्यासाठी थंड पाणी आणि रात्री शांत झोपेसाठी गरम पाणी. हा सोपा फॉर्म्युला तुमच्या जीवनशैलीत वापरून बघा, तुमच्या दैनंदिन जीवनात एक नवा उत्साह नक्कीच जाणवेल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/hot-vs-cold-showers-which-is-better-for-your-health-and-when/articleshow-qyk08zs"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Black Pepper : काळी मिरी खाण्याचे १० जबरदस्त फायदे, आहारात नक्की समावेश करा]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/10-health-benefits-of-black-pepper-spice-sxechrz</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/10-health-benefits-of-black-pepper-spice-sxechrz</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 13:56:34 +0530</pubDate>
            <description><![CDATA[काळी मिरीमध्ये असलेल्या 'पायपेरिन'मुळे पचनक्रिया सुधारते, पोषक तत्वांचं शोषण वाढतं आणि अँटीऑक्सिडंट्सचा फायदा मिळतो. आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या मसाल्याचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश करा.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0d9weqgr5j8j5v0m5fgn3vx,imgname-black-pepper-1--1--1787152972528.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/10-health-benefits-of-black-pepper-spice-sxechrz"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Shweta Tiwari : श्वेता तिवारीने ऑर्डर केलेल्या डिलिव्हरीसोबत आलं झुरळ, तुकाराम मुंढेंना टॅक करत म्हणाली....]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/shweta-tiwari-shares-video-of-cockroach-delivered-with-cold-drinks-actress-seeks-tukaram-mundhes-help/articleshow-0k38ah7</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/shweta-tiwari-shares-video-of-cockroach-delivered-with-cold-drinks-actress-seeks-tukaram-mundhes-help/articleshow-0k38ah7</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 13:52:15 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Shweta Tiwari Cockroach Delivered With Cold Drinks : अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कोल्डड्रिंक ऑर्डर केलं होतं. त्या डिलिव्हरीसोबत तिला झुरळ आलं असल्याचं सांगत तिने याबाबत तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0f46x6tt80agkgd86k6qv7s,imgname-shweta-tiwari-tukaram-mundhe-1787214132442.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई &lt;/strong&gt;: अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये तिने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे मदत मागितली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;श्वेता तिवारीने एक व्हिडिओ शेअर करत तो तुकाराम मुंढे यांना टॅग केला आहे. घरी कोल्डड्रिंकची डिलिव्हरी तिने मागवली होती. पण त्यासोबत झुरळ आढळल्याचं तिने सांगितलं आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलंय, आम्ही इन्स्टामार्टवरुन रेल बुल ऑर्डर केलं होतं. डिलिव्हरीसोबत झुरळंही आलं. हे झुरळ घरात सगळीकडे फिरतंय. तिने पुढे लिहिलंय, मुंढेजी आमच्या घरात डिलिव्हरीसोबत झुरळही आलं. कृपया याकडे लक्ष द्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;तुकाराम मुंढे यांना टॅक करण्याशिवाय तिने क्विक कॉमर्स ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मलाही तिने झुरळ आढळल्याचा व्हिडिओ टॅग करत माहिती दिली आहे. तिच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर तुकाराम मुंढे किंवा डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नियम व अटींचं उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट्स, कॅन्टीन्स, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई केल्यामुळे अनेकांनी त्यांना 'खरे सिंघम' असं म्हटलं आहे. भेसळयुक्त पदार्थ, अस्वच्छता, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रभरात बेधडक कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या श्वेता तिवारी 'द ट्रेटर्स २' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या नव्या सिझनमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश आहे. या शोमध्ये क्रिस्टल डिसूझा, मल्लिका शेरावत, मुनव्वर फारुकी, पारुल गुलाटी, रणवीर ब्रार, रिया चक्रवर्ती, हरमन सिंघा, तान्या पुरी यासह इतरही अनेक कलाकार आहेत. करण जोहर या शोचं सूत्रसंचालन करत आहे. हा 'द ट्रेटर्स २' शो प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांना पाहता येईल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/shweta-tiwari-shares-video-of-cockroach-delivered-with-cold-drinks-actress-seeks-tukaram-mundhes-help/articleshow-0k38ah7"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Gold Earrings : सोन्याचे राऊंड शेप कानातले डिझाइन्स, साडी-ड्रेसवर सुंदर दिसतील]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/stunning-large-earring-designs-for-sarees-and-lehengas-tmxs7e0</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/stunning-large-earring-designs-for-sarees-and-lehengas-tmxs7e0</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 13:11:50 +0530</pubDate>
            <description><![CDATA[साडी किंवा लेहेंग्यावर मोठे कानातले घातल्यास लूक खूपच सुंदर दिसतो. काही हँगिंग नसलेल्या म्हणजेच कानाला चिकून बसणाऱ्या डिझाइनर कानातल्यांचे प्रकार आहेत. हे दिसायला खूपच एलिगंट आणि आकर्षक आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0exhg9cdp667tmef9ttx64y,imgname-2-1787207139628.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/stunning-large-earring-designs-for-sarees-and-lehengas-tmxs7e0"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Kitchen Hacks : स्टीलचा स्टँड काळवंडलाय? या सोप्या ट्रिकने पुन्हा चमकवा!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/easy-home-remedies-to-clean-your-steel-utensil-stand/photoshow-hmy4so3</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/easy-home-remedies-to-clean-your-steel-utensil-stand/photoshow-hmy4so3</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 13:32:06 +0530</pubDate>
            <description><![CDATA[स्वच्छ किचन कोणाला नाही आवडत! पण भांड्यांचा स्टीलचा स्टँड जर चिकट आणि काळवंडलेला असेल, तर सगळा मूड जातो. घरातल्याच सोप्या वस्तू वापरून तुम्ही तो पुन्हा नव्यासारखा चमकवू शकता.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0f2t5zsfhme5sz6yyvzv63t,imgname-utensils-1787212666871.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[स्वच्छ किचन कोणाला नाही आवडत! पण भांड्यांचा स्टीलचा स्टँड जर चिकट आणि काळवंडलेला असेल, तर सगळा मूड जातो. घरातल्याच सोप्या वस्तू वापरून तुम्ही तो पुन्हा नव्यासारखा चमकवू शकता.&lt;img&gt;किचनमधलं तेल, ओलावा आणि धूळ स्टँडवर जमा होते, ज्यामुळे तो चिकट होतो. त्यावर ओली भांडी ठेवल्यास, पाणी सुकल्यावर पांढरे डाग पडतात. नियमित स्वच्छता न केल्यास ही घाण वाढतच जाते.&lt;img&gt;सगळ्यात आधी स्टँड पूर्ण रिकामा करा. एका वाटीत थोडं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करा. हा लेप ब्रशने स्टँडवर लावा, विशेषतः गंजलेल्या भागांवर जास्त लक्ष द्या. पाच मिनिटं तसंच ठेवा. मग, स्क्रबरवर डिशवॉश लिक्विड घेऊन स्टँड चांगला घासा. शेवटी, पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.&lt;img&gt;स्टँडवर जास्त तेलकटपणा, धूळ किंवा पाण्याचे डाग असतील, तर बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विडची पेस्ट बनवा. ही पेस्ट स्टँडवर लावून थोडा वेळ ठेवा. नंतर, ब्रशने घासून पाण्याने धुवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्टँड एका फडक्याने पूर्ण कोरडा करा. थोडाही ओलावा राहिल्यास पुन्हा गंज चढू शकतो.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/easy-home-remedies-to-clean-your-steel-utensil-stand/photoshow-hmy4so3"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Chain with Pendant : फक्त 8 ग्रॅममध्ये नेकलेससारखा लूक, पाहा लेटेस्ट चेन-पेंडंट डिझाइन्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/latest-gold-chain-pendant-designs-under-10-grams-xuezr55</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/latest-gold-chain-pendant-designs-under-10-grams-xuezr55</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 13:06:59 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Chain With Pendant: कमी वजनाच्या सोन्यात गळा भरून दिसेल अशा नेकलेस डिझाइन हव्या आहेत? मग 10 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या सिंपल चेनसोबत एक सुंदर पेंडंट जोडा. काही हटके डिझाइन्स.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0ewksd6wktggnshzmcbsrpv,imgname-whatsapp-image-2026-08-20-at-11.23.27-am--1--1787206165926.jpeg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/latest-gold-chain-pendant-designs-under-10-grams-xuezr55"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Dandruff Remedies : केसातला कोंडा कायमचा घालवण्यासाठी ६ सोपे घरगुती उपाय]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/effective-home-remedies-to-treat-dandruff-naturally-xeyvg41</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/effective-home-remedies-to-treat-dandruff-naturally-xeyvg41</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 12:59:17 +0530</pubDate>
            <description><![CDATA[केसांमध्ये कोंडा होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. जाणून घ्या ६ उपाय.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01j601wcv73hx4zv65q714ty5t,imgname-fotojet--7-.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/effective-home-remedies-to-treat-dandruff-naturally-xeyvg41"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[पुण्यातला कार्यक्रम म्हणजे 'कंट्रोल्ड मोनोलॉग', फडणवीसांचा थेट हल्लाबोल]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/maharashtra/fadnavis-slams-rahul-gandhis-pune-student-event-as-a-staged-monologue/articleshow-5rcr1pn</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/maharashtra/fadnavis-slams-rahul-gandhis-pune-student-event-as-a-staged-monologue/articleshow-5rcr1pn</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 12:57:23 +0530</pubDate>
            <description><![CDATA[देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाला 'कंट्रोल्ड मोनोलॉग' म्हटलं आहे, ज्यात फक्त निवडक विद्यार्थ्यांनाच बोलावल्याचा आरोप त्यांनी केला. सोबतच, 'वंदे मातरम्' बाबत काँग्रेसच्या भूमिकेला त्यांनी 'घटनाबाह्य' आणि व्होट बँकेचं राजकारण ठरवलं आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-4239109e-3ab8-41b2-b44c-e16ec995d082.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आगामी कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणारा 'छात्रों की गूंज' हा कार्यक्रम म्हणजे एक 'कंट्रोल्ड मोनोलॉग' आहे, असं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमात फक्त एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच सहभागी होता यावं, यासाठी निवडक लोकांनाच बोलावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, हा विद्यार्थ्यांशी होणारा खरा संवाद नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;फडणवीस म्हणाले, &quot;माझ्या मते तरुणांशी संवाद साधणं चांगलंच आहे. पण जर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला असता, तर ते अधिक अर्थपूर्ण ठरलं असतं. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्थांना फक्त त्यांच्याच विद्यार्थिनींची नोंदणी करून त्यांना कार्यक्रमाला आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फक्त नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.&quot;&lt;/p&gt;&lt;p&gt;ते पुढे म्हणाले, &quot;हा कार्यक्रम पूर्णपणे नियंत्रित वातावरणात घेतला जात आहे, जेणेकरून फक्त त्यांच्या विचारसरणीचे लोकच सहभागी होतील. त्यामुळे या कार्यक्रमाचं नाव 'छात्रों की गूंज' (विद्यार्थ्यांचा आवाज) असलं तरी, प्रत्यक्षात हा काँग्रेसच्या माध्यमातून बोलावलेल्या निवडक लोकांसाठीचा एकतर्फी संवाद आहे.&quot;&lt;/p&gt;&lt;h2&gt;फडणवीसांचा 'वंदे मातरम्' मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा&lt;/h2&gt;&lt;p&gt;यासोबतच, फडणवीसांनी 'वंदे मातरम्'च्या फक्त पहिल्या दोन ओळी गाण्याच्या काँग्रेसच्या अलीकडच्या ठरावावरही जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसची ही भूमिका 'घटनाबाह्य' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&quot;हे बघा, हा एक घटनाबाह्य निर्णय आहे. भारतावर आता ब्रिटिशांचं राज्य नाही. स्वतंत्र भारतात, संसदेने घेतलेले निर्णय हे घटनात्मक आदेश असतात. 'स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय आम्ही स्वीकारणार नाही' असं म्हणणं म्हणजे गुलामगिरीचा वारसा पुढे नेण्यासारखं आहे. त्यांची मानसिकता गुलामगिरीची आहे, हे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत,&quot; असं भाजप नेते म्हणाले.&lt;/p&gt;&lt;h3&gt;'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा'&lt;/h3&gt;&lt;p&gt;फडणवीसांनी पुढे म्हटलं की, काँग्रेसची ही भूमिका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारी आहे. &quot;आपल्या घटनेनुसार, संसदेने मंजूर केलेल्या कायद्याचं पालन करणं हेच घटनेचं पालन करण्यासारखं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय आम्ही पाळणार नाही, असं काँग्रेसचं म्हणणं म्हणजे घटनेशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा आहे. यातून हेच सिद्ध होतं की, त्यांच्यात अजूनही ब्रिटिश वसाहतवादाची गुलामगिरीची मानसिकता आहे. हे दुसरं तिसरं काही नसून निव्वळ व्होट बँकेचं राजकारण आहे आणि आपल्या देशाच्या मूळ भावनेचा थेट अपमान आहे,&quot; असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पुणे पोलिसांची सशर्त परवानगी&lt;/h2&gt;&lt;p&gt;दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी गुरुवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या देशव्यापी विद्यार्थी संवाद उपक्रमाला सशर्त परवानगी दिली आहे. हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी SSPMS कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि वाढती शिक्षण फी यांसारख्या मुद्द्यांवर आवाज उठवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विशेषतः तरुण महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. संध्याकाळी ४:३० ते रात्री ९:३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला ८,००० ते १०,००० लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Maharashtra]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/maharashtra/fadnavis-slams-rahul-gandhis-pune-student-event-as-a-staged-monologue/articleshow-5rcr1pn"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[‘पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस’; नरेंद्र मोदींबाबत संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/mumbai/pm-modi-last-birthday-as-prime-minister-sanjay-raut-big-statement/articleshow-mgc3x53</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/mumbai/pm-modi-last-birthday-as-prime-minister-sanjay-raut-big-statement/articleshow-mgc3x53</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 12:54:13 +0530</pubDate>
            <description><![CDATA[राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी पुढील 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नसल्याचा दावा केल्याचे वृत्त आहे. यावर संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत “17 सप्टेंबरनंतर मोठा उलगडा होईल” असे म्हटले आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01k8x6rp0496te5v55hhvnvyq4,imgname-sanjay-raut-modi-1761916770308.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बुधवारी (19 ऑगस्ट) काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी रणनीती आणि केंद्र सरकारविरोधातील भूमिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. याच बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आता उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lsquo;राहुल गांधींच्या वक्तव्याशी माझं एकमत&rsquo;&lt;/h2&gt;&lt;p&gt;संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींच्या दाव्याला दुजोरा देत असल्याचे सांगितले. &ldquo;गेले काही महिने मीही हेच सांगत आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याशी माझं या विषयावर एकमत आहे,&rdquo; असे राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सध्याचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. 17 सप्टेंबरनंतर या परिस्थितीचा उलगडा होईल, असेही त्यांनी म्हटले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lsquo;17 सप्टेंबरनंतर काय होईल ते कळेल&rsquo;&lt;/h2&gt;&lt;p&gt;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. याच तारखेचा संदर्भ देत संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं. &ldquo;17 सप्टेंबरनंतर काय होईल, ते कळेल. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून हा त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल,&rdquo; असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lsquo;अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत&rsquo;&lt;/h2&gt;&lt;p&gt;यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबतही भाष्य केले. &ldquo;मोदी गेले तर अमित शाहही गेले,&rdquo;असे म्हणत अमित शाह पंतप्रधान होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. मोदी आणि अमित शाह यांच्या राजकीय भवितव्याबाबतही राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lsquo;लाल किल्ल्यावरील भाषणही शेवटचं&rsquo;&lt;/h2&gt;&lt;p&gt;यापूर्वीही आपण नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरचे भाषण शेवटचे असल्याचे म्हटल्याचे राऊत यांनी सांगितले. &ldquo;माझ्याकडे असलेले आकलन, राहुल गांधी जे सांगतात, तसेच आमच्यासमोर येणारी तथ्ये यावरून आम्ही हे मत व्यक्त करत आहोत,&rdquo; असे राऊत म्हणाले. यंदाचा 15 ऑगस्टचा लाल किल्ल्यावरील भाषण आणि 17 सप्टेंबरचा वाढदिवस हे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील शेवटचे ठरतील, असा दावा त्यांनी केला आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[mumbai]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/mumbai/pm-modi-last-birthday-as-prime-minister-sanjay-raut-big-statement/articleshow-mgc3x53"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Beed News : सी-सेक्शननंतर महिलेच्या पोटात राहिले ग्लोव्हज आणि नॅपकिन; बीडमधील धक्कादायक प्रकार]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/maharashtra/beed-c-section-goes-wrong-gloves-napkins-found-in-womans-abdomen/articleshow-rrtifwc</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/maharashtra/beed-c-section-goes-wrong-gloves-napkins-found-in-womans-abdomen/articleshow-rrtifwc</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 12:45:57 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Beed C Section Goes Wrong : बीड जिल्हा रुग्णालयात सी-सेक्शननंतर १९ वर्षीय महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन राहिल्याचा धक्कादायक आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. असह्य वेदनांनंतर पुण्यातील ससून रुग्णालयात तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली, जिथे या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m08axc4ekmmn5jm8nddcb1wq,imgname-rare-surgery-1786986279054.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;बीड &lt;/strong&gt;: बीड जिल्हा रुग्णालयात एका १९ वर्षीय महिलेसोबत तिच्या बाळंतपणात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. संध्या सूरज गायकवाड असं महिलेचं नाव असून, तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की सी-सेक्शननंतर डॉक्टरांनी तिच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिन तसंच ठेवलं. या गंभीर चुकीमुळे संध्या आज मृत्यूशी झुंज देत आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी संध्याला प्रसूतीसाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे तिची सिझेरियन शस्त्रक्रिया झाली. चार दिवसांनी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पण घरी आल्यानंतर काही दिवसांतच तिच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;तिची तब्येत जास्त बिघडल्यामुळे कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या पोटात काहीतरी 'वस्तू' असल्याचं सांगितलं. संध्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्याचा सल्ला देण्यात आला.&lt;/p&gt;&lt;p&gt;कुटुंबीयांचा दावा आहे की, पुण्यातील ससून रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केली आणि तिच्या पोटातून पेपर नॅपकिन आणि सर्जिकल ग्लोव्हज बाहेर काढले. सध्या संध्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;पीडितेच्या कुटुंबीयांनी काय सांगितलं?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;&quot;माझ्या बायकोची ही अवस्था फक्त डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे. याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई झाली पाहिजे,&quot; असं संध्याचा नवरा सूरज गायकवाड म्हणाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;संध्याच्या आईनेही घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्या म्हणाल्या की, ऑपरेशननंतर संध्याला सतत उलट्या होत होत्या. त्यांनी बीड सिव्हिल हॉस्पिटलमधील एका नर्सला याची कल्पना दिली होती. पण हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी संध्याला डिस्चार्ज दिल्याचं सांगितलं. तरीही त्यांनी मुलीला लगेच घरी नेण्यास नकार दिला. नंतर त्या संध्याला घरी घेऊन गेल्या, पण तिची तब्येत आणखीनच बिघडली.&lt;/p&gt;&lt;p&gt;यानंतर कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेलं, जिथे उपचारासाठी मोठा खर्च येईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे ते तिला घेऊन पुण्याला आले. पुण्यातील एका हॉस्पिटलने तिची गंभीर अवस्था पाहून तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या आईने सांगितलं की, ससूनमधील डॉक्टरांनी ऑपरेशन करून तिच्या पोटातून &quot;हातमोजे आणि कागद&quot; काढले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;चौकशीचे आदेश&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;या गंभीर आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेप्रकरणी संबंधित महिला डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ऑपरेशनवेळी वापरलेलं साहित्य रुग्णाच्या पोटात कसं राहिलं, याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Maharashtra]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/maharashtra/beed-c-section-goes-wrong-gloves-napkins-found-in-womans-abdomen/articleshow-rrtifwc"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Varanasi Floods : गंगेच्या रौद्र रूपामुळे वाराणसीत चिंता, घाटांवरचं आयुष्य विस्कळीत]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/ganga-river-swells-in-varanasi-affecting-ghats-and-rituals/articleshow-3pmadn2</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/ganga-river-swells-in-varanasi-affecting-ghats-and-rituals/articleshow-3pmadn2</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 12:20:09 +0530</pubDate>
            <description><![CDATA[वाराणसीमध्ये गंगेची पाणीपातळी वाढत असून घाटांवरचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक घाटांचा संपर्क तुटलाय आणि मणिकर्णिका घाटावरचे अंत्यसंस्कार उंच ठिकाणी हलवले आहेत. नदी धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-3d200e8e-3e83-4292-bba6-97a37b420ba7.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;वाराणसी&lt;/strong&gt; : वाराणसीमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी गुरुवारीही वाढतच होती. यामुळे नदीकिनारी, म्हणजे घाटांवरची सगळी रोजची कामं विस्कळीत झाली आहेत. पाणी वाढल्यामुळे अनेक घाटांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;गंगेच्या आरतीच्या ठिकाणांपासून ते शहराच्या प्रमुख स्मशानभूमींपैकी एक असलेल्या मणिकर्णिका घाटापर्यंत, सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. मणिकर्णिका घाटावर पाणी शिरल्यामुळे, अंत्यसंस्काराची कामं आता छतावर किंवा इतर उंच जागांवर हलवण्यात आल्याचं समजतंय. या परिस्थितीमुळे नदीकिनारी राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;पाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) माहितीनुसार, गंगेची पातळी सध्या तासाला ५० मिलिमीटरने वाढतेय. पाण्याची पातळी ६७.६८ मीटरवर पोहोचली आहे, तर वाराणसीमध्ये धोक्याची पातळी ७१.२६ मीटर आहे. याचा अर्थ, नदी सध्या धोक्याच्या पातळीपासून फक्त ३.५८ मीटर खाली आहे. स्थानिक अंदाजानुसार, नदी याच गतीने वाढत राहिली तर पुढच्या दोन दिवसांत धोक्याची पातळी गाठू शकते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;रोजच्या जगण्यावर आणि धार्मिक विधींवर परिणाम&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;वाढत्या पाण्यामुळे वाराणसीच्या घाटांमधला पारंपरिक संपर्क तुटला आहे. नदीकिनारी असलेले अनेक मार्ग आणि रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे घाटांवरून ये-जा करणं कठीण झालं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;याचा परिणाम शहराच्या रोजच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कामांवरही दिसतोय. गंगा आरतीच्या ठिकाणच्या व्यवस्थेवर परिणाम झाला आहे, तर मणिकर्णिका घाटावरील अंत्यसंस्कार उंच ठिकाणी हलवावे लागले आहेत. या बदलत्या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक, भाविक आणि पर्यटकांमध्ये, विशेषतः नदीजवळ आणि सखल भागात राहणाऱ्या लोकांमध्ये चिंता वाढली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;प्रशासनाचं परिस्थितीवर लक्ष&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;प्रशासन नदीच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीचा वापर करून पाणी किती वेगाने वाढतंय याचा आढावा घेतला जात आहे. वाराणसीसाठी ही परिस्थिती विशेष महत्त्वाची आहे, कारण इथले अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि उपजीविकेचे व्यवहार नदीकिनारीच चालतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;गंगेची पातळी सतत वाढत असल्याने, लोकांना नदीजवळ सावधगिरी बाळगण्याचं आणि पूर आलेल्या किंवा पाण्याखाली गेलेल्या भागांमध्ये न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुढच्या २४ ते ४८ तासांत नदीची पातळी कशी वाढते यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील. जर हाच ट्रेंड कायम राहिला, तर प्रशासनाला वाराणसीच्या नदीकिनारच्या संवेदनशील भागांमध्ये खबरदारीचे उपाय आणखी कडक करावे लागतील.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/ganga-river-swells-in-varanasi-affecting-ghats-and-rituals/articleshow-3pmadn2"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Ajit Pawar : श्रीमद् भागवत वाचल्याने अपघाती मृत्यू होत नाही, अजित पवारांना वाचण्यास सांगितलेलं, पण.... सूरदास यांचं विधान]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/mumbai/iskcon-kharghar-president-surdas-ji-said-shrimad-bhagwat-granth-prevents-accidental-deaths-i-gave-it-to-ajit-pawar/articleshow-ik1mbb5</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/mumbai/iskcon-kharghar-president-surdas-ji-said-shrimad-bhagwat-granth-prevents-accidental-deaths-i-gave-it-to-ajit-pawar/articleshow-ik1mbb5</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 12:15:30 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Iskcon Surdasji on Ajit Pawar : खारघर इस्कॉनचे अध्यक्ष सूरदासजी यांनी अजित पवारांना श्रीमद् भागवत ग्रंथ दिला असल्याचं सांगितलं. हा ग्रंथ वाचल्याने अपघाती मृत्यू होत नाही, असा दावा करत त्यांनी अजितदादांनाही तो वाचायला सांगितला होता, असं म्हटलंय.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0eygspdmbw3z0q30pvbm1ew,imgname-surdasji-ajit-pawar-1787208165069.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई &lt;/strong&gt;: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झालं. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आता खारघर इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी भाष्य केलं आहे. श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. अजित दादांनी हा वाचला नसावा, असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या निधनाला अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;नेमकं काय म्हणाले डॉ. सूरदासजी?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;खारघर इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी सांगितलं, की 'श्रीमद् भागवत ग्रंथ वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही. मी अजित पवार यांनाही हा ग्रंथ भेट दिला होता. पण त्यांनी कदाचित तो ग्रंथ वाचला नसावा. आषाढी एकादशीच्या दिवशी मी हा ग्रंथ त्यांना दिला होता. त्यांनी हा ग्रंथ आवश्य वाचावा, असंही सांगितलं होतं. पण त्यांनी मी भेट दिलेला श्रीमद् भागवत ग्रंथ वाचला नसावा. त्यांच्यासोबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.' दरम्यान, सूरदासजी यांच्या या नव्या विधानाची एकच चर्चा सुरू झाली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;विमान अपघातात अजित दादांचा दुर्दैवी मृत्यू&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;बारामती येथील विमानतळावर अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून ते बारामतीला निघाले होते. निवडणुकीचा काळ असल्याने प्रचारासाठी ते निघाले होते. २८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर ते जवळपास पोहोचले होते. पण विमान लँड होताना पायलटचं नियंत्रण सुटलं आणि विमान कोसळलं. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;खराब हवामानामुळे तसंच दाटं धुकं असल्याने विमान लँड होताना ते कोसळलं आणि विमान कोसळल्याबरोबर तात्काळ त्याला भीषण आग लागली. या आगीत अजितदादांसोबत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कॅप्टन सुमित कपूर (पायलट), कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट), एअर होस्टेस आणि अजित दादांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (PSO) अशा पाच जणांचा मृत्यू झाला.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[mumbai]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/mumbai/iskcon-kharghar-president-surdas-ji-said-shrimad-bhagwat-granth-prevents-accidental-deaths-i-gave-it-to-ajit-pawar/articleshow-ik1mbb5"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[पायांची वाढेल शोभा! पाहा लेटेस्ट पैंजण डिझाइन्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/trending-gold-plated-anklet-designs-for-a-modern-look-2ql4qhf</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/trending-gold-plated-anklet-designs-for-a-modern-look-2ql4qhf</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 11:47:45 +0530</pubDate>
            <description><![CDATA[मुलींच्या पायांचं सौंदर्य पैंजणाइतकं दुसरं कोणतंच आभूषण वाढवू शकत नाही. त्यातही आजकाल तरुणींना गोल्ड प्लेटेड पैंजण जास्त आवडत आहेत. अशाच काही ट्रेंडिंग डिझाइन्सवर एक नजर टाकूया.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01krv3apgavv33b7d6js6kgsc6,imgname-2-1779025926666.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/trending-gold-plated-anklet-designs-for-a-modern-look-2ql4qhf"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[साखर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/sugar-stock-limit-government-new-rules-festival-season-price-control/articleshow-zcvm7x2</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/sugar-stock-limit-government-new-rules-festival-season-price-control/articleshow-zcvm7x2</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 11:30:37 +0530</pubDate>
            <description><![CDATA[साखरेच्या वाढत्या किमती आणि सणासुदीतील वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने साखरेचा साठा ठेवण्याचे नियम कडक केले आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kx01nvqhfejevdxmd4g5yn5v,imgname-sugar-health-risks-1783486934769.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई &lt;/strong&gt;: भारत हा जगातील साखरेचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. वाढत्या किमती आणि सणासुदीतील वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने साखरेचा साठा ठेवण्याचे नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार, महिन्याला 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा वापर किंवा व्यापार करणाऱ्या डीलर्सना आता 15 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. हा नियम 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;आधी होती 30 दिवसांची मर्यादा&lt;/h2&gt;&lt;p&gt;सरकारने गेल्याच महिन्यात व्यापाऱ्यांसाठी साखरेचा साठा ठेवण्याची मर्यादा 30 दिवसांपर्यंत निश्चित केली होती. मात्र साखरेच्या किमतीत वाढ सुरूच राहिल्याने आता ही मर्यादा कमी करून 15 दिवसांवर आणण्यात आली आहे.यामुळे घाऊक व्यापारी आणि मोठे खरेदीदार गरजेपेक्षा जास्त साखर साठवून ठेवू शकत नाहीत. तसेच यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल.&lt;/p&gt;&lt;h2&gt;साखरेच्या किमतीत मोठी वाढ&lt;/h2&gt;&lt;p&gt;गेल्या महिन्यात साखरेच्या किमतीत सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाल्याचे उद्योग क्षेत्रातील आकडेवारीतून समोर आले आहे. 18 ऑगस्ट रोजी देशातील साखरेची सरासरी किरकोळ किंमत 52.30 रुपये प्रति किलो होती. वर्षभरापूर्वी याच काळात ही किंमत 46.34 रुपये प्रति किलो होती. जवळजवळ किरकोळ किमतीत सुमारे 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;सणासुदीच्या काळात घरगुती वापरासोबतच बिस्किट, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांकडूनही साखरेची मागणी वाढते. त्यामुळे बाजारात पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि साठेबाजीमुळे किमती आणखी वाढू नयेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;नव्या साखर हंगामाच्या सुरुवातीला साठ्याची चिंता&lt;/h2&gt;&lt;h2&gt;साखरेचा नवीन हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, हंगामाच्या सुरुवातीला उपलब्ध असलेल्या साखरेच्या साठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार नवीन हंगामाच्या सुरुवातीला सुमारे 40 ते 42 लाख टन साखर उपलब्ध असू शकते. काही संशोधकांच्या मते हा साठा 32 ते 35 लाख टनांपर्यंत कमी असण्याची शक्यता आहे.&lt;/h2&gt;&lt;h2&gt;कमी पावसामुळे उसाच्या उत्पादनाचीही चिंता&lt;/h2&gt;&lt;p&gt;साखरेच्या पुरवठ्याबाबत आणखी एक चिंता उसाच्या उत्पादनाशी संबंधित आहे. काही भागांमध्ये कमी पाऊस आणि कोरड्या हवामानामुळे उसाच्या पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी साखर हंगामात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्ष 2025-26 च्या हंगामात देशात सुमारे 320 लाख टन साखर उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी देशांतर्गत खप सुमारे 285 लाख टन राहण्याची शक्यता आहे. सुमारे 7 लाख टन निर्यातीनंतर हंगामाच्या शेवटी जवळपास 35 लाख टन साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सरकारकडून साखरेच्या साठ्यावर लक्ष&lt;/h2&gt;&lt;p&gt;सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी खाद्य मंत्रालय साखरेच्या उपलब्धतेवर आणि साठ्यावर सातत्याने लक्ष ठेवत आहे.साखर कारखान्यांनाही खरेदीदारांना विकलेल्या आणि त्यांनी उचललेल्या साखरेची अचूक माहिती ऑनलाइन फॉर्म आणि व्हेरिफाइड ई-मेलद्वारे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे देशातील एकूण साखर साठा आणि बाजारातील पुरवठ्याची स्थिती सरकारला अधिक अचूकपणे समजण्यास मदत होणार आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/sugar-stock-limit-government-new-rules-festival-season-price-control/articleshow-zcvm7x2"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Homestay Business : मुलासाठी सोडली ९-५ ची नोकरी, व्यवसाय सुरू केला; आता कमावते २१ लाख]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/mother-quits-corporate-job-for-son-starts-homestay-business-earns-21-lakh/articleshow-dqgp6cb</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/mother-quits-corporate-job-for-son-starts-homestay-business-earns-21-lakh/articleshow-dqgp6cb</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 11:28:27 +0530</pubDate>
            <description><![CDATA[Business Idea : मुलाला जास्त वेळ देता यावा म्हणून एका आईने तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि होमस्टे बिझनेस सुरू केला. सुरुवातीला कोणतीही स्पष्ट योजना नसताना, आज ती यातून २१ लाख रुपये कमावत आहे. या निर्णयामुळे तिला आर्थिक स्वातंत्र्य आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0er94p8bj30jbqt7b7q1sjq,imgname-mom-s-homestay-1787201622728.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;नवी दिल्ली&lt;/strong&gt; : एका आईने मुलासाठी घेतलेल्या मोठ्या निर्णयाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. स्निग्धा असं तिचं नाव. तिने मुलासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून तिची ९-५ ची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि स्वतःचा होमस्टे बिझनेस सुरू केला. तिने तिचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. २०२३ मध्ये नोकरी सोडताना तिच्याकडे पुढे काय करायचं याचा कोणताही स्पष्ट प्लॅन नव्हता. पण आज ती तिच्या या 'शॉर्ट-टर्म रेंटल' व्यवसायातून २१ लाख रुपये कमावत असल्याचा दावा करते. दिल्लीतील तिच्या काही प्रॉपर्टीज ती Airbnb च्या माध्यमातून भाड्याने देते.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;'मुलासोबत राहायचं होतं, म्हणून नोकरी सोडली'&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;स्निग्धा सांगते की, नोकरी सोडण्यामागे करिअर नाही, तर तिचा मुलगा हे प्रमुख कारण होतं. त्यावेळी तिचा मुलगा 'सेपरेशन एंग्झायटी'चा (आईपासून दूर होण्याची भीती) सामना करत होता. ती म्हणते, &quot;रोज सकाळी कामावर जाताना मला अपराधी वाटायचं. मी माझ्या करिअरला मुलापेक्षा जास्त महत्त्व देतेय का, असा प्रश्न पडायचा.&quot; पण नोकरी सोडल्यावर पुढे काय करायचं, याची तिला काहीच कल्पना नव्हती. Airbnb वर ती राहिली होती, पण होमस्टे कसा चालवायचा याचा अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीला मनात भीती आणि स्वतःबद्दल शंका होती. तरीही, तिने या क्षेत्राबद्दल माहिती गोळा केली, अभ्यास केला आणि मगच या नवीन प्रवासाला सुरुवात केली.&lt;/p&gt;ही पोस्ट इन्स्टाग्रामवर पाहा&lt;p&gt;Airbnb with Snigdha (@airbnbwithsnigdha) यांनी शेअर केलेली एक पोस्ट&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;पहिल्याच दिवशी मिळालेला आत्मविश्वास&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;पण व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या पहिल्या बुकिंगने तिचा आत्मविश्वास परत आणला. ती म्हणते, &quot;ते बुकिंग माझ्यासाठी फक्त एक सामान्य रिझर्वेशन नव्हतं, तर मी हा व्यवसाय यशस्वी करू शकते याचा पुरावा होता.&quot; हळूहळू तिच्या मनातील भीती आत्मविश्वासात बदलली. व्यवसाय वाढल्यामुळे तिला फिरायला आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला मिळू लागला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कामावरून घरी येण्याची वाट तिचा मुलगा पाहत बसायचा, ही परिस्थिती आता बदलली होती. आता काम करताना तिचा मुलगा तिच्यासोबतच असतो, हे स्वातंत्र्य तिला मिळालं आहे, असं स्निग्धा सांगते.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/mother-quits-corporate-job-for-son-starts-homestay-business-earns-21-lakh/articleshow-dqgp6cb"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[जास्त प्रमाणात कांद्याचे सेवन करता? आरोग्यासंबंधित होऊ शकतात या समस्या]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/health-risks-of-eating-too-much-onion-okhtgcg</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/health-risks-of-eating-too-much-onion-okhtgcg</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 10:53:35 +0530</pubDate>
            <description><![CDATA[कांदा आरोग्यासाठी चांगला असला तरी, तो गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kkbmnnh5c6y5nm5wh2p2z2te,imgname-iran-israel-war--49--1773138531877.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/health-risks-of-eating-too-much-onion-okhtgcg"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Saransh Jain : कुलदीप यादवचा पत्ता कट? ३३ वर्षांचा खेळाडू करणार पदार्पण, कोण आहे सारांश जैन?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/sports/cricket/saransh-jain-poised-for-india-debut-as-kuldeep-yadav-faces-axe-in-second-sri-lanka-test/articleshow-fm3fo82</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/sports/cricket/saransh-jain-poised-for-india-debut-as-kuldeep-yadav-faces-axe-in-second-sri-lanka-test/articleshow-fm3fo82</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 10:34:32 +0530</pubDate>
            <description><![CDATA[दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी टीममध्ये आलेल्या सारांश जैनला दुसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीमुळे या ३३ वर्षीय खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kar4zt0t9n7yaa2ccwcagy20,imgname-rp-1763894618138.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;कोलंबो :&lt;/strong&gt; श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट जिंकून टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. पण तरीही कोलंबोमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टेस्टमध्ये फिका पडलेला स्पिनर कुलदीप यादवला बाहेर बसवून त्याच्या जागी मध्यप्रदेशचा ३३ वर्षीय ऑफ स्पिन ऑलराऊंडर सारांश जैनला संधी मिळू शकते. रिपोर्ट्सनुसार, सारांश या मॅचमधून आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सारांशला संधी देण्याचा विचार&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;पहिल्या टेस्टमध्ये कुलदीपने २५ ओव्हर्स टाकल्या, पण १०३ रन्स देऊन त्याला फक्त एकच विकेट मिळाली. दुसरीकडे, आपला दुसराच टेस्ट सामना खेळणाऱ्या मानव सुतारने तब्बल १० विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. रवींद्र जडेजानेही चार विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया तीन लेफ्ट-आर्म स्पिनर्स घेऊन उतरली होती. आता कुलदीपच्या खराब कामगिरीमुळे एका ऑफ स्पिनरला, म्हणजेच सारांशला संधी देण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करत आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सारांशची निवड, यातूनच आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ शकतं&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सारांश जैनची टीम इंडियात निवड दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ही संधी मिळाली. २०१४ मध्ये पदार्पण करणाऱ्या सारांशने आतापर्यंत ५४ फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्या आहेत. यात त्याने २७.३० च्या सरासरीने १८८ विकेट्स घेतल्या आहेत. इतकंच नाही, तर बॅटिंगमध्येही त्याने दोन शतकं आणि १४ अर्धशतकांसह २,२२३ रन्स केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या २०२५-२६ रणजी ट्रॉफी सिझनमध्ये त्याने मध्यप्रदेशसाठी ३० विकेट्स घेत जबरदस्त कामगिरी केली होती.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Cricket]]></category>
            <dc:creator>Karishma R</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/sports/cricket/saransh-jain-poised-for-india-debut-as-kuldeep-yadav-faces-axe-in-second-sri-lanka-test/articleshow-fm3fo82"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Gold Silver Rate : सोने-चांदीचा आजचा भाव काय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/gold-and-silver-prices-on-august-20-2026-a-city-wise-guide/articleshow-b4qms5k</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/gold-and-silver-prices-on-august-20-2026-a-city-wise-guide/articleshow-b4qms5k</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 10:02:00 +0530</pubDate>
            <description><![CDATA[20 ऑगस्ट 2026 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,390 रुपये होता. पण वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थानिक कारणांमुळे दरांमध्ये फरक असतो. सोनं ही गुंतवणूक आणि दागिन्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ग्राहकांनी हे लक्षात ठेवावं की दागिन्यांची अंतिम किंमत घडणावळ आणि जीएसटीसारख्या अतिरिक्त शुल्कांसह जास्त असते.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01krnes7wqx7kp5gyh2fg6ckb7,imgname-gold-price-1778836610966.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई &lt;/strong&gt;: गुरुवार, 20 ऑगस्ट 2026 रोजी सोने आणि चांदीच्या दरांकडे सर्वांचे लक्ष होते. खरेदीदार, गुंतवणूकदार आणि दागिन्यांचे शौकीन भारतातील प्रमुख शहरांमधील नवीन दर काय आहेत, हे जाणून घेण्यास उत्सुक होते. ताज्या मार्केट अपडेटनुसार, 20 ऑगस्ट रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,390 रुपये होता. स्थानिक बाजारातील परिस्थिती आणि इतर खर्चामुळे प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असू शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;भारतीय कुटुंबांसाठी सोनं ही एक महत्त्वाची मालमत्ता मानली जाते, विशेषतः दागिने खरेदी, लग्न समारंभ आणि गुंतवणुकीसाठी. पण खरेदीदारांनी दर काळजीपूर्वक तपासले पाहिजेत, कारण दागिन्यांच्या अंतिम किंमतीमध्ये घडणावळ (making charges), जीएसटी आणि इतर लागू खर्च समाविष्ट असू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, चलनातील बदल, मागणी आणि इतर आर्थिक घडामोडींचाही रोजच्या दरांवर परिणाम होतो.&lt;/p&gt;&lt;h2&gt;सोने आणि चांदीचे आजचे दर: 20 ऑगस्ट&lt;/h2&gt;&lt;table&gt; &lt;tbody&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;शहर&lt;/td&gt;   &lt;td&gt;24K सोनं (10 ग्रॅम)&lt;/td&gt;   &lt;td&gt;22K सोनं (10 ग्रॅम)&lt;/td&gt;   &lt;td&gt;चांदी 999 (1 किलो)&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;दिल्ली&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,57,830&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,44,678&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 2,37,000&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;मुंबई&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,58,100&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,44,925&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 2,37,410&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;कोलकाता&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,57,890&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,44,733&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 2,37,090&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;चेन्नई&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,58,560&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,45,347&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 2,38,100&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;बंगळूरु&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,58,230&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,45,044&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 2,37,600&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;हैदराबाद&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,58,350&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 1,45,154&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 2,37,790&lt;/td&gt;  &lt;/tr&gt; &lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;p&gt;भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,58,390 रुपये होता. यासोबतच, आम्ही वेगवेगळ्या शहरांमधील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर, तसेच चांदीचे भाव दिले आहेत. त्यामुळे, सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील लागू असलेले नवीनतम दर तपासावेत, कारण संपूर्ण भारतात किरकोळ विक्रीचे दर सारखे नसतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींनुसार सोने आणि चांदीच्या किमती दिवसभरात बदलू शकतात. खरेदीदारांनी सोन्याचा भाव (bullion price) आणि दागिन्यांची किंमत यातील फरकही समजून घेतला पाहिजे, कारण दागिन्यांच्या किंमतीत अतिरिक्त शुल्क समाविष्ट असू शकते. योग्य खरेदीसाठी, सोन्याची शुद्धता, हॉलमार्क तपशील, घडणावळ आणि अंतिम बिल तपासणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना, 20 ऑगस्टच्या दरांवर गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही बारकाईने लक्ष असेल. खरेदी करण्यापूर्वी, विश्वसनीय सोनारांकडून 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या दरांची तुलना करा आणि आपल्या शहरातील चांदीचा नवीनतम दर देखील तपासा.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/gold-and-silver-prices-on-august-20-2026-a-city-wise-guide/articleshow-b4qms5k"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[फोनमधील Bluetooth ऑन ठेवताय? तुमची खासगी माहिती येऊ शकते धोक्यात]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/utility-news/bluebugging-explained-how-hackers-use-bluetooth-to-steal-your-data/photoshow-p8wiau7</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/utility-news/bluebugging-explained-how-hackers-use-bluetooth-to-steal-your-data/photoshow-p8wiau7</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 09:57:08 +0530</pubDate>
            <description><![CDATA[तुम्ही तुमच्या फोनचा ब्लूटूथ नेहमी चालू ठेवता का? तसं असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. ब्लूटूथ सतत ऑन ठेवल्याने काय धोके होऊ शकतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चुकीमुळे तुमचं बँक खातंही रिकामं होऊ शकतं, त्यामुळे वेळीच सावध व्हा.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kvnnkjr02mdt76273gm192cm,imgname-does-keeping-bluetooth-on-drain-your-phone-battery-heres-the-real-truth-1782064990976.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[तुम्ही तुमच्या फोनचा ब्लूटूथ नेहमी चालू ठेवता का? तसं असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. ब्लूटूथ सतत ऑन ठेवल्याने काय धोके होऊ शकतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चुकीमुळे तुमचं बँक खातंही रिकामं होऊ शकतं, त्यामुळे वेळीच सावध व्हा.&lt;img&gt;तुम्ही इअरबड्स, स्मार्टवॉच किंवा इतर डिव्हाइस वापरल्यानंतर ब्लूटूथ बंद करत नसाल, तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा सायबर गुन्हेगारांसाठी एक संधी ठरू शकतो.&lt;img&gt;या हल्ल्यात, हॅकर्स ब्लूटूथ कनेक्शन वापरून तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. यालाच 'ब्लूबगिंग' (BlueBugging) सायबर अटॅक म्हणतात. फोनचा ब्लूटूथ बराच वेळ चालू असेल आणि इतरांना दिसत असेल, तर हॅकर्स त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात.&lt;img&gt;जर हॅकर्सनी ब्लूटूथद्वारे तुमच्या फोनशी संपर्क साधला, तर ते तुमचे कॉल्स, मेसेजेस आणि इतर महत्त्वाचा डेटा मिळवू शकतात. त्यामुळे, ब्लूटूथबाबत केलेला छोटासा निष्काळजीपणा तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.&lt;img&gt;जे लोक इअरबड्स, स्मार्टवॉच, ब्लूटूथ स्पीकर वापरतात किंवा कारला फोन कनेक्ट करतात आणि नंतर ब्लूटूथ बंद करत नाहीत, त्यांना सर्वाधिक धोका असतो. रेल्वे स्टेशन, विमानतळ, मॉल्स, कॅफे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी हा धोका विशेषतः जास्त असतो.&lt;img&gt;तुमचं ब्लूटूथ वापरून झाल्यावर लगेच ते बंद करा. जर तुम्हाला ब्लूटूथ चालू ठेवायचंच असेल, तर ब्लूटूथ व्हिजिबिलिटी (Bluetooth Visibility) बंद करा. यामुळे तुमचा फोन जवळच्या अनोळखी डिव्हाइसेसना दिसणार नाही.&lt;img&gt;फक्त एक सवय बदलून तुम्ही 'ब्लूबगिंग'सारख्या सायबर धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. गरज असेल तेव्हाच ब्लूटूथ चालू करा आणि काम झाल्यावर ते बंद करा. ही साधी गोष्ट तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवेल.&lt;img&gt;आजकाल स्मार्टफोनमध्ये बँकिंग ॲप्स, खासगी चॅट्स, फोटो आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रं असतात. एक छोटीशी चूकसुद्धा तुमचा महत्त्वाचा डेटा लीक करू शकते. इतकंच नाही, तर तुमचं बँक खातंही रिकामं होऊ शकतं.]]></content:encoded>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/utility-news/bluebugging-explained-how-hackers-use-bluetooth-to-steal-your-data/photoshow-p8wiau7"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[महाराष्ट्रात FDAची मोठी कारवाई; 5 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित, 25 लाखांचा मालही जप्त]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/maharashtra/maharashtra-fda-action-five-hotels-restaurants-licenses-suspended-food-seized/articleshow-pz239km</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/maharashtra/maharashtra-fda-action-five-hotels-restaurants-licenses-suspended-food-seized/articleshow-pz239km</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 09:15:38 +0530</pubDate>
            <description><![CDATA[महाराष्ट्र FDAने 31 खाद्य आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले आहेत. गुटखा, पान मसाल्यासह दूध, दुग्धजन्य आणि इतर खाद्यपदार्थांचा मिळून सुमारे 25 लाख रुपयांचा मालही जप्त करण्यात आला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kzqpb2cq0rb2rcm0wnhhxfye,imgname-fda-inspection-1786427836823.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे. राज्यभर राबवलेल्या तपासणी मोहिमेत पाच हॉटेल आणि रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बंदी घालण्यात आलेले पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांसह सुमारे 25 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पाच आस्थापनांचे परवाने निलंबित&lt;/h2&gt;&lt;p&gt;एफडीएच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन केलेल्या 22 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. तर गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांची चुकीच्या पद्धतीने स्टोअर करणे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, कीटक नियंत्रणाचा अभाव आणि खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांसह विविध नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;मालाडच्या हॉटेलमध्ये स्वयंपाकघरात उंदीर&lt;/h2&gt;&lt;p&gt;मुंबईतील मालाड पश्चिम येथील हॉटेल राधामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांना अस्वच्छता आणि अन्नसुरक्षिततेबाबत त्रुटी आढळल्या. तपासणीदरम्यान एक मोठा उंदीर किचनमध्ये जाताना दिसला. तर आणखी एक उंदीर छताजवळ आढळल्याचे एफडीएने सांगितले. याशिवाय किचनमध्ये योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता व्यवस्थाही नसल्याचे समोर आले. या कारणांमुळे हॉटेलचा फूड बिझनेसचा परवाना निलंबित करण्यात आला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;कुर्ल्यात कच्चे मांस प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये&lt;/h2&gt;&lt;p&gt;कुर्ला येथील जनता तवा अँड ग्रिलवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीदरम्यान कच्चे चिकन आणि मांस प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवून ठेवल्याचे आढळले.याशिवाय किचनमध्ये योग्य पद्धतीने कचऱ्यासाठी जागाही नव्हती.&lt;/p&gt;&lt;h2&gt;खारघरमधील कॉलेज कॅन्टीनवरही कारवाई&lt;/h2&gt;&lt;p&gt;खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील कॅन्टीनचा परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचे एफडीएच्या तपासणीत आढळले.&lt;/p&gt;&lt;h2&gt;11.40 लाखांचा गुटखा-पान मसाला जप्त&lt;/h2&gt;&lt;p&gt;एफडीएने मुंबई, कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ आस्थापनांवर कारवाई केली. यावेळी गुटखा, पान मसाला, फ्लेवर्ड सुपारी आणि इतर बंदी असणाऱ्या पदार्थांचा सुमारे 11.40 लाख रुपयांचा साठा जप्त केला.या कारवाईत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 8 गुन्हे दाखल आणि सहा आस्थापने सील करण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;14,552 किलो खाद्यपदार्थही जप्त&lt;/h2&gt;&lt;p&gt;एफडीएच्या मोहिमेदरम्यान सुमारे 14,552 किलो दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने आणि इतर खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या मालाची किंमत सुमारे 13.90 लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.काही आस्थापनांमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते अधिकृत प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.&lt;/p&gt;&lt;h2&gt;वैजापूरमध्ये मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळले&lt;/h2&gt;&lt;p&gt;छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे देवगिरी रुग्णालयाजवळील परमेष्ठी सुपर शॉपीमध्येही एफडीएच्या अधिकाऱ्यांना एक्सपायरी डेट असणारे फूड सापडले. याप्रकरणी संबंधित खाद्य व्यवसाय चालकाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Maharashtra]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/maharashtra/maharashtra-fda-action-five-hotels-restaurants-licenses-suspended-food-seized/articleshow-pz239km"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[हृदयाचं आरोग्य जपायचंय? मग आहारात समावेश करा हे 6 फूड्स]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/six-essential-foods-to-keep-your-heart-healthy-uf1ec7q</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/six-essential-foods-to-keep-your-heart-healthy-uf1ec7q</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 08:57:33 +0530</pubDate>
            <description><![CDATA[हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत? अशा ६ पदार्थांची यादी पाहा, जे तुमचं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतील.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kq23hzwtsdd1dj7cd0200erj,imgname-heart-health--1--1777113563034.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/lifestyle/six-essential-foods-to-keep-your-heart-healthy-uf1ec7q"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Horoscope 20th August 2026 : मेष आणि सिंह राशीला प्रगतीची संधी, जाणून घ्या आजचे 12 राशींचे राशीभविष्य]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/lifestyle/horoscope-for-august-20-2026-aries-and-leo-may-see-career-growth/articleshow-hoxslu1</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/lifestyle/horoscope-for-august-20-2026-aries-and-leo-may-see-career-growth/articleshow-hoxslu1</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 08:18:08 +0530</pubDate>
            <description><![CDATA[आजचं राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026: मेष, कर्क, सिंह, कन्या, कुंभ आणि मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती करिअर, व्यवसाय, पैसा आणि नातेसंबंधांवर परिणाम करेल.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kyrtpsc38552cz4h7yym7hxn,imgname-lucky-zodiac-signs-30-july-2026-grah-yog-rashifal-money-horoscope-1785392227714.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मेष राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने दिसतंय. व्यवसायात यशाचे चांगले संकेत आहेत आणि नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन किंवा नव्या जबाबदारीवर चर्चा होऊ शकते. तुमची मेहनत आता लोकांच्या नजरेत येईल आणि तुमचं कौतुकही होईल. राजकारणात असलेल्यांना लोकांचा चांगला पाठिंबा मिळू शकतो. नवीन घराचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडताना दिसतंय. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद नक्की घ्या.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;वृषभ राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज तुम्हाला एखादी दिलासादायक बातमी मिळू शकते. बऱ्याच काळापासूनची चिंता हळूहळू दूर होईल. आईच्या बाजूने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. सरकारी कार्यालयांमध्ये अडकलेली कामंही वेग पकडू शकतात. पण, प्रत्येक विषयावर आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही. आज तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा हुशारीने वापरला, तर दिवस खूप फायदेशीर ठरू शकतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;मिथुन राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आजचा दिवस नव्या सुरुवातीसाठी चांगला आहे, पण घाई करणं टाळा. एखादी मनातली इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. कुटुंबासोबत खास वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमचा जोडीदार व मुलांसोबतचे संबंध अधिक चांगले होतील. विद्यार्थ्यांसाठी आज एकाग्रता खूप महत्त्वाची ठरेल. छोट्या गोष्टींवरूनही मोठे वाद होऊ शकतात, त्यामुळे वादविवाद टाळा.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कर्क राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आजचा दिवस सामान्य असला तरी, कुटुंब आणि प्रियजनांची सोबत त्याला खास बनवेल. घरात साफसफाई, सजावट किंवा पाहुण्यांच्या येण्याने वातावरण प्रसन्न राहील. कायदेशीर बाबींमध्ये जास्त काळजी घ्या आणि कोणतीही कागदपत्रं किंवा प्रक्रिया हलक्यात घेऊ नका. शेजाऱ्यांसोबत वैयक्तिक गोष्टी शेअर न करणंच चांगलं. शांतता राखल्यास दिवस सहज पार पडेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सिंह राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज तुमचा दिवस आहे, चमकण्याची आणि पुढे जाण्याची संधी आहे. नवीन लोकांना भेटल्याने तुमच्या भविष्यासाठी नवे मार्ग खुले होऊ शकतात. कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. भूतकाळातल्या चुकांमधून शिकून तुम्ही अधिक हुशारीने पुढे जाल. तुमची कला, क्रिएटिव्हिटी आणि विशेष कौशल्य आज अधिक फुलेल. जुन्या कर्जातूनही सुटका मिळण्याचे संकेत आहेत. पण, प्रत्येक नवीन ओळखीच्या व्यक्तीला लगेच आपलंसं मानण्याची चूक करू नका.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कन्या राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज तुमच्या गोड बोलण्याने आणि वागण्याने तुम्ही लोकांची मनं जिंकाल. तुम्ही ज्याप्रकारे आपलं मत मांडता, त्यामुळे लोक सहज तुमच्याकडे आकर्षित होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगल्या परिणामांसह उत्तम दिवस जाईल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ लागतील. प्रवास किंवा फिरताना तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल अशी महत्त्वाची माहिती मिळू शकते. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने नव्या संधींची दारं उघडू शकतात.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;तूळ राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज पैसा आणि आत्मविश्वास दोन्ही तुमच्यासोबत असतील. तुमच्या क्रिएटिव्ह विचारांमुळे तुम्हाला नवीन यश मिळू शकतं. भागीदारीच्या योजनांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. पण, कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी नीट विचार करा, कारण ते परत मिळवणं कठीण होऊ शकतं. आज दुसऱ्यांच्या सल्ल्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या अनुभवावर अवलंबून राहणं जास्त फायद्याचं ठरेल. हाच अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;वृश्चिक राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज तुमचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास लोकांच्या नजरेत भरेल. तुमच्या मेहनतीचं फळ मिळाल्याने आनंद होईल आणि जुन्या चिंता कमी होऊ शकतात. पण, तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. तणावाखाली कोणतीही मोठी जोखीम घेणं टाळा. कामाचा ताण नक्कीच असेल, पण तुमची क्षमता तुम्हाला प्रत्येक परिस्थिती हाताळायला मदत करेल.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;धनु राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आजचा दिवस काहीसा आनंद आणि काहीतरी शिकवणारा असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे आणि तुमची मुलं तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. पण, प्रत्येक परिस्थितीत संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. तुमच्या मेहनतीनंतरही निकाल अपेक्षेप्रमाणे नसतील, पण याला अपयश समजू नका. हा काळ तुम्हाला भविष्यासाठी तयार करत आहे. कोणतंही वचन देण्यापूर्वी, तुमची परिस्थिती आणि क्षमता तपासायला विसरू नका.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;मकर राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज तुम्हाला मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमची एखादी मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आईच्या आरोग्यावरील खर्च वाढू शकतो, त्यामुळे तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. मालमत्तेवरून कुटुंबात चर्चा किंवा मतभेद होऊ शकतात. इतरांच्या कामात विनाकारण लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या कामावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणं चांगलं.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;कुंभ राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज चांगली संधी मिळू शकते. कामातील तुमच्या मेहनतीने बॉस खूश होतील आणि तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. इतरांना मदत करण्याची तुमची सवय तुम्हाला खास बनवते, पण खर्च नियंत्रणात ठेवणंही महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांचा छोटा-छोटा आनंद आज तुमचं लक्ष वेधून घेईल. प्रवासादरम्यान वाहनासंबंधी समस्या अचानक खर्च वाढवू शकते, त्यामुळे सावध राहा.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;मीन राशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या बोलण्यात संयम ठेवा, कारण तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि परिस्थिती बिघडू शकते. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल, पण त्यासाठी धीर धरावा लागेल. कोणतीही माहिती तपासल्याशिवाय शेअर करू नका, नाहीतर अडचणीत येऊ शकता. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे संयमाने प्रक्रिया पूर्ण करा. मुलांना दिलेलं कोणतंही वचन पूर्ण करायला विसरू नका, यामुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि ताकद वाढेल.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Lifestyle]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/lifestyle/horoscope-for-august-20-2026-aries-and-leo-may-see-career-growth/articleshow-hoxslu1"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Petrol-Diesel Price :  पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भडका, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/fuel-prices-surge-as-brent-crude-nears-92-dollars-check-august-20-rates/articleshow-wqs2vxh</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/fuel-prices-surge-as-brent-crude-nears-92-dollars-check-august-20-rates/articleshow-wqs2vxh</guid>
            <pubDate>Thu, 20 Aug 2026 08:15:25 +0530</pubDate>
            <description><![CDATA[20 ऑगस्ट 2026 रोजी भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांवर सगळ्यांचं लक्ष आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत. मध्य-पूर्वेतील तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाचा भाव प्रति बॅरल 92 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kzfra2293mzw87ppf8nh10zn,imgname-petrol-diesel-price-1786161465417.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई : &lt;/strong&gt;गुरुवार, 20 ऑगस्ट 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव चढेच आहेत. मध्य-पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे बंगळूर, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख भारतीय शहरांमधील वाहनचालक इंधनाच्या दरांवर लक्ष ठेवून आहेत. कारण जागतिक ऊर्जा बाजारातील घडामोडींचा परिणाम येत्या काळात देशांतर्गत दरांवर होऊ शकतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;ब्रेंट क्रूड तेलाचा भाव प्रति बॅरल 92 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये तो 0.29% वाढून 91.88 डॉलर प्रति बॅरलवर होता. याआधीच्या सत्रात मध्य-पूर्वेतील तणाव वाढल्याने तेलाच्या किमती 1% पेक्षा जास्त वाढल्या होत्या. ब्रेंट क्रूड 0.7% वाढून 91.62 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड 1% वाढून 85.83 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले.&lt;/p&gt;&lt;p&gt;होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दलची अनिश्चितता हे देखील ऊर्जा बाजारासाठी एक मोठं चिंतेचं कारण बनलं आहे. या महत्त्वाच्या मार्गावरील जहाजांची वाहतूक अजूनही मंदावली आहे, कारण जहाज मालक परिस्थिती सामान्य होण्याच्या स्पष्ट संकेतांची वाट पाहत आहेत. या सिच्युएशनमुळे जागतिक कच्च्या तेलाचा पुरवठा आणि वाहतुकीबद्दलची चिंता आणखी वाढली आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;20 ऑगस्ट रोजी प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर&lt;/h2&gt;&lt;table&gt; &lt;tbody&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;शहर&lt;/td&gt;   &lt;td&gt;पेट्रोल दर (प्रति लिटर)&lt;/td&gt;   &lt;td&gt;डिझेल दर (प्रति लिटर)&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;दिल्ली&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 102.12&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 95.20&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;मुंबई&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 111.12&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 97.78&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;कोलकाता&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 113.43&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 99.78&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;चेन्नई&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 107.75&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 99.57&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;बंगळूर&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 110.93&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 98.79&lt;/td&gt;  &lt;/tr&gt;  &lt;tr&gt;   &lt;td&gt;हैदराबाद&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 115.69&lt;/td&gt;   &lt;td&gt;रु 103.82&lt;/td&gt;  &lt;/tr&gt; &lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;p&gt;भारत आपल्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती जास्त काळ वाढलेल्या राहिल्यास त्याचा भारताला मोठा फटका बसतो. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ झाल्यास भारताचे आयातीचे बिल वाढू शकते आणि महागाईचा दबावही वाढू शकतो. यामुळे भविष्यात देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यताही वाढते.&lt;/p&gt;&lt;p&gt;भारतात प्रत्येक शहरात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. कारण आंतरराष्ट्रीय दरांशिवाय इतर अनेक घटक किरकोळ दरांवर परिणाम करतात. यामध्ये केंद्र आणि राज्यांचे कर, रिफायनरी मार्जिन, वाहतूक आणि वितरण खर्च, डीलरशी संबंधित खर्च आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे चढ-उतार या सर्वांची भूमिका महत्त्वाची असते.&lt;/p&gt;&lt;p&gt;ब्रेंट क्रूडचा भाव 92 डॉलरच्या जवळ राहिल्याने आणि भू-राजकीय तणावाचा जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत असल्याने, इंधनाच्या दरातील चढ-उतार हे ग्राहक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा विषय बनून राहील.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>Chanda Mandavkar</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/fuel-prices-surge-as-brent-crude-nears-92-dollars-check-august-20-rates/articleshow-wqs2vxh"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[रक्षाबंधनासाठी मेहंदीचे हटके डिझाइन्स; राखीपर्यंत सुंदर आयडिया]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/discover-unique-mehendi-designs-for-raksha-bandhan-lcw2hxm</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/discover-unique-mehendi-designs-for-raksha-bandhan-lcw2hxm</guid>
            <pubDate>Wed, 19 Aug 2026 23:00:36 +0530</pubDate>
            <description><![CDATA[या रक्षाबंधनाला हातांवर खास मेहंदी डिझाइन काढा. तुम्ही भावाच्या नावाची, भाऊ-बहिणीच्या चित्राची किंवा राखी आणि दिव्याची डिझाइन काढून मेहंदीला हटके लूक देऊ शकता. याशिवाय स्क्वेअर शेप आणि बॅक पोज मेहंदी डिझाइन देखील खूप युनिक दिसतात.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kz0tg3jvca9dg2an328320gr,imgname-leg-mehandi-5-1785660444251.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/discover-unique-mehendi-designs-for-raksha-bandhan-lcw2hxm"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[रक्षाबंधन: बहिणीला द्या हे स्टायलिश गिफ्ट, जाणून घ्या पर्याय]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/give-your-sister-a-stylish-gift-for-raksha-bandhan-odyeot9</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/give-your-sister-a-stylish-gift-for-raksha-bandhan-odyeot9</guid>
            <pubDate>Wed, 19 Aug 2026 22:40:34 +0530</pubDate>
            <description><![CDATA[या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सुंदर इअररिंग्स गिफ्ट करा. या लेखात स्टोन हँगिंग, झिरकॉन स्टोन, पर्ल ड्रॉप आणि इतर आकर्षक डिझाइन्सचे पर्याय दिले आहेत, जे डेली आणि पार्टी वेअरसाठी उत्तम आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01kv7t2pbtqe62acm98d7t1119,imgname-14kt-gold-earrings-1-1781599918458.png" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <category><![CDATA[Utility News]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/webstories/utility-news/give-your-sister-a-stylish-gift-for-raksha-bandhan-odyeot9"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Toxic Movie: 'KGF' नंतर यशचा धमाका, 'टॉक्सिक' केरळमध्ये पोहोचवण्यासाठी मोठी डील]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/entertainment/yash-starrer-toxic-gets-kerala-distribution-deal-with-panorama-studios/articleshow-k1evws4</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/entertainment/yash-starrer-toxic-gets-kerala-distribution-deal-with-panorama-studios/articleshow-k1evws4</guid>
            <pubDate>Wed, 19 Aug 2026 21:57:59 +0530</pubDate>
            <description><![CDATA['KGF 2' नंतर यशच्या 'टॉक्सिक: ए फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या पॅन-इंडिया सिनेमाची जोरदार चर्चा आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा सिनेमा केरळमध्ये प्रदर्शित करण्याचे हक्क पॅनोरमा स्टुडिओजने मिळवले आहेत. यासाठी त्यांनी सेंच्युरी फिल्म्ससोबत हातमिळवणी केली आहे.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0dcts327swxtq3d3yvhs76t,imgname-befunky-collage--25--1787156063330.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;'KGF:&lt;/strong&gt; चॅप्टर 2' च्या तुफान यशानंतर, सुपरस्टार यशचा नवा पॅन-इंडिया सिनेमा 'टॉक्सिक: ए फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पॅनोरमा स्टुडिओजने हा सिनेमा केरळमध्ये प्रदर्शित करण्याचे हक्क मिळवले आहेत. यासाठी त्यांनी तिथली मोठी निर्मिती संस्था असलेल्या सेंच्युरी फिल्म्ससोबत भागीदारी केली आहे. यशची निर्मिती संस्था मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स आणि केव्हीएन प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने ही डील झाली आहे. गीतू मोहनदास या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;'टॉक्सिक' हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या वर्षातील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक मानला जातोय. सिनेमाची स्टारकास्टही तगडी आहे. यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांसारखे मोठे चेहरे दिसणार आहेत. जुन्या गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या सिनेमाची कथा गुन्हेगारी, सत्ता, वासना आणि विश्वासघात याभोवती फिरते. यात यश 'राया' नावाचं पात्र साकारणार आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;या डीलमुळे पॅनोरमा स्टुडिओज दक्षिण भारतात आपलं स्थान आणखी मजबूत करत आहे. याआधी पॅनोरमाचे मल्याळम चित्रपट 'अनोमी' आणि 'उन्मादम' यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या 'टिकी टाका', टोविनो थॉमसचा 'प्रॉडक्शन नंबर ४' आणि 'मुनपे' हे सिनेमेही पॅनोरमाच्या निर्मितीखाली तयार होत आहेत. इतकंच नाही, तर निविन पॉली आणि फहाद फासिल यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबतही पॅनोरमा स्टुडिओज काम करत आहे. केरळमध्ये यशची प्रचंड फॅन फॉलोइंग आणि गीतू मोहनदास यांची वेगळी दिग्दर्शन शैली पाहता, 'टॉक्सिक' तिथे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच सेंच्युरी फिल्म्ससोबत मिळून हा सिनेमा भव्य पद्धतीने प्रदर्शित करण्याची तयारी पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Entertainment]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/entertainment/yash-starrer-toxic-gets-kerala-distribution-deal-with-panorama-studios/articleshow-k1evws4"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[National Sports Awards: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, यंदा खेलरत्न नाहीच; 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार!]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/national-sports-awards-2025-announced-no-khel-ratna-this-year-17-athletes-get-arjuna-award/articleshow-wk9qu2w</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/national-sports-awards-2025-announced-no-khel-ratna-this-year-17-athletes-get-arjuna-award/articleshow-wk9qu2w</guid>
            <pubDate>Wed, 19 Aug 2026 21:51:04 +0530</pubDate>
            <description><![CDATA[केंद्र सरकारने 2025 सालच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारांमध्ये यंदा एक मोठा ट्विस्ट आहे. देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान 'खेलरत्न' कुणालाही देण्यात आलेला नाही.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0a91smmgyyvar3am707yz8b,imgname-national-sports-awards-1787051435668.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;h3&gt;यंदा 'खेलरत्न' पुरस्कार कुणालाच नाही&lt;/h3&gt;&lt;p&gt;केंद्र सरकारने 2025 सालासाठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. पण यावर्षीची सर्वात मोठी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कार कोणत्याही खेळाडूला देण्यात आलेला नाही. हॉकीपटू हार्दिक सिंग यांच्या नावाची निवड समितीमध्ये चर्चा झाली होती, पण अंतिम यादीत त्यांच्या नावाचा समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा कुणालाही खेलरत्न मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;अर्जुन पुरस्कार विजेते 17 खेळाडू&lt;/h3&gt;&lt;p&gt;यावर्षी एकूण 17 खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध खेळांमधील खेळाडूंचा समावेश आहे. ॲथलेटिक्समधून तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही आणि प्रियांका गोस्वामी यांना हा सन्मान मिळाला आहे. बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीतील प्रसिद्ध जोडी ट्रीसा जॉली आणि पुलेला गायत्री गोपीचंद यांची निवड झाली आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर विदिత్ संतोष गुजराथी आणि युवा खेळाडू दिव्या जितेंद्र देशमुख यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;याशिवाय बॉक्सिंगमधून नरेंदर, हॉकीमधून लालरेम्सियामी आणि राजकुमार पाल, तर कबड्डीमधून सुरजीत आणि पूजा यांची निवड झाली आहे. रोइंगमध्ये अरविंद सिंग आणि नेमबाजीत अखिल शेओरान यांना पुरस्कार मिळणार आहे. पॅरा स्पोर्ट्स प्रकारात रुद्रांश खंडेलवाल आणि एकता भयान यांच्या कामगिरीला गौरवण्यात आले आहे, तर कर्णबधिरांच्या नेमबाजीत धनुष श्रीकांतला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;अर्जुन पुरस्कार 2025 विजेत्यांची संपूर्ण यादी:&lt;/h3&gt;&lt;ul&gt;  &lt;li&gt;तेजस्विन शंकर &ndash; ॲथलेटिक्स&lt;/li&gt;  &lt;li&gt;मोहम्मद अजमल व्ही &ndash; ॲथलेटिक्स&lt;/li&gt;  &lt;li&gt;प्रियांका गोस्वामी &ndash; ॲथलेटिक्स&lt;/li&gt;  &lt;li&gt;ट्रीसा जॉली &ndash; बॅडमिंटन&lt;/li&gt;  &lt;li&gt;पुलेला गायत्री गोपीचंद &ndash; बॅडमिंटन&lt;/li&gt;  &lt;li&gt;नरेंदर &ndash; बॉक्सिंग&lt;/li&gt;  &lt;li&gt;विदिత్ संतोष गुजराथी &ndash; बुद्धिबळ&lt;/li&gt;  &lt;li&gt;दिव्या जितेंद्र देशमुख &ndash; बुद्धिबळ&lt;/li&gt;  &lt;li&gt;धनुष श्रीकांत &ndash; डेफ शूटिंग&lt;/li&gt;  &lt;li&gt;लालरेम्सियामी &ndash; हॉकी&lt;/li&gt;  &lt;li&gt;राजकुमार पाल &ndash; हॉकी&lt;/li&gt;  &lt;li&gt;सुरजीत &ndash; कबड्डी&lt;/li&gt;  &lt;li&gt;पूजा &ndash; कबड्डी&lt;/li&gt;  &lt;li&gt;रुद्रांश खंडेलवाल &ndash; पॅरा शूटिंग&lt;/li&gt;  &lt;li&gt;एकता भयान &ndash; पॅरा ॲथलेटिक्स&lt;/li&gt;  &lt;li&gt;अरविंद सिंग &ndash; रोइंग&lt;/li&gt;  &lt;li&gt;अखिल शेओरान &ndash; नेमबाजी&lt;/li&gt; &lt;/ul&gt;&lt;h3&gt;बुद्धिबळ आणि बॅडमिंटनपटूंचे विशेष यश&lt;/h3&gt;&lt;p&gt;2025 च्या अर्जुन पुरस्कारांच्या यादीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटनपटूंचे यश लक्षवेधी ठरले आहे. महाराष्ट्राची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला मिळालेला पुरस्कार तिच्या अलीकडच्या चमकदार कामगिरीची पोचपावती आहे. तर नाशिकचा ग्रँडमास्टर विदिత్ गुजराथी यालाही हा सन्मान मिळाल्याने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे, बॅडमिंटनमध्ये ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला मिळालेला पुरस्कार महिला दुहेरीतील त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;अरुमाई नायगम यांना जीवनगौरव, पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य&lt;/h3&gt;&lt;p&gt;अर्जुन पुरस्कारांसोबतच, 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य राहिलेले आय. अरुमाई नायगम यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय फुटबॉलमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.&lt;/p&gt;&lt;p&gt;प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नियमित गटात तीन जणांची निवड झाली आहे. यामध्ये छोटे लाल यादव (बॉक्सिंग), परवीर सिंग (ॲथलेटिक्स) आणि नेहा नंदकुमार चव्हाण (नेमबाजी) यांचा समावेश आहे. तर जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार धर्मेंद्र सिंग यादव (बॉक्सिंग) आणि वीरेंदर कुमार (कुस्ती) यांना प्रदान केला जाईल.&lt;/p&gt;&lt;p&gt;याचबरोबर, क्रीडा विकासाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पुण्यातील 'आर्मी पॅरालिम्पिक नोड' या संस्थेला राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. एकंदरीत, यंदा खेलरत्न पुरस्कार नसला तरी, अर्जुन पुरस्कारांच्या माध्यमातून विविध खेळांमधील गुणवंत खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा योग्य सन्मान केंद्र सरकारने केला आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/national-sports-awards-2025-announced-no-khel-ratna-this-year-17-athletes-get-arjuna-award/articleshow-wk9qu2w"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Temple Device: पी.व्ही. सिंधूच्या डोक्यावर ते काय आहे? Zomato च्या मालकाचा याच्याशी काय संबंध?]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/pv-sindhu-wears-mysterious-temple-device-linked-to-zomato-founder-deepinder-goyal/articleshow-vo8htg1</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/pv-sindhu-wears-mysterious-temple-device-linked-to-zomato-founder-deepinder-goyal/articleshow-vo8htg1</guid>
            <pubDate>Wed, 19 Aug 2026 21:44:43 +0530</pubDate>
            <description><![CDATA[भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने 2026 BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एक खास डिव्हाइस घातलं होतं, ज्याचं नाव 'Temple' आहे. हे डिव्हाइस काय काम करतं आणि Zomato चे संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या टीमचा याच्याशी काय संबंध आहे, चला जाणून घेऊया.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m09psqcjp50v0t2qb0y1a7xa,imgname-temple-device-1787032296850.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने 2026 BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुरुवात विजयाने केली आहे. पण तिच्या खेळापेक्षा जास्त चर्चा होतेय ती तिच्या डोक्यावर लावलेल्या एका छोट्याशा डिव्हाइसची. तिच्या डोळ्याच्या बाजूला एका स्टिकरसारखं चिकटवलेलं हे उपकरण साधा हेडबँड नाही. हे 'Temple' नावाचं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे Zomato चे संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या नेतृत्वाखालील एक टीम तयार करत आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;&lt;strong&gt;पी.व्ही. सिंधूच्या डोक्यावरचं ते छोटं डिव्हाइस आहे तरी काय?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;&lt;p&gt;हे 'Temple' डिव्हाइस खास करून उच्च-स्तरीय खेळाडूंच्या सरावावेळी आणि सामन्यांदरम्यान त्यांच्या शारीरिक आणि मेंदूशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी डिझाइन केले आहे. डोक्याच्या बाजूला सहजपणे बसणारं हे छोटंसं डिव्हाइस सिंधू तिच्या सरावादरम्यान आधीपासूनच वापरत आहे. पण आता पहिल्यांदाच तिने एका खऱ्या सामन्यात याचा वापर केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;हे पण वाचा:&lt;/strong&gt; भारताचे सर्वात उंच क्रिकेटपटू... ६ फुटांपेक्षा जास्त उंची, लिस्ट पाहून थक्क व्हाल!&lt;/p&gt;&lt;h3&gt;&lt;strong&gt;'Temple' डिव्हाइस काय काम करतं?&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;&lt;p&gt;रिपोर्ट्सनुसार, हे 'Temple' डिव्हाइस खेळाडूच्या मेंदूपर्यंत होणारा रक्तप्रवाह, तसेच इतर अनेक न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक माहिती गोळा करतं. तणावाच्या स्थितीत खेळाडूचं शरीर आणि मेंदू कशी प्रतिक्रिया देतं? महत्त्वाच्या सामन्यावेळी शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेत काय बदल होतात? यांसारख्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा डेटा मदत करतो. म्हणजे, हे फक्त हार्ट रेट मोजणाऱ्या साध्या फिटनेस बँडसारखं नाहीये. यातून खेळाडूच्या मेंदू आणि शरीराच्या कार्याचा अधिक खोलवर अभ्यास करण्याचा हा प्रयत्न आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;दीपिंदर गोयल यांच्या टीमची निर्मिती&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;Zomato चे सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या नेतृत्वाखालील टीम हे 'Temple' डिव्हाइस विकसित करत आहे. क्रीडा आणि हेल्थ टेक्नॉलॉजी क्षेत्रात हा एक नवीन प्रयोग मानला जात आहे. पी.व्ही. सिंधूसारख्या आघाडीच्या खेळाडूंकडून या डिव्हाइसबद्दल प्रतिक्रिया आणि चाचणीचे निष्कर्ष घेतले जात आहेत. सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई हा सुद्धा या चाचणीत सहभागी असल्याची आणि सुरुवातीचे निष्कर्ष खूप चांगले असल्याची माहिती आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;सिंधूने मॅचमध्ये हे का लावलं होतं?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सरावादरम्यान डिव्हाइसची चाचणी घेतल्यास, तो डेटा एका नियंत्रित वातावरणातून मिळतो. पण खऱ्या सामन्यात खेळाडूंचं शरीर आणि मेंदू पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे, सिंधूने सामन्यादरम्यान हे डिव्हाइस वापरून, प्रत्यक्ष स्पर्धेच्या वातावरणात ते कसं काम करतं आणि कोणत्या प्रकारचा डेटा गोळा करतं, हे तपासलं असावं.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;अजून विक्रीसाठी उपलब्ध नाही&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सध्या हे 'Temple' डिव्हाइस सामान्य लोकांसाठी बाजारात उपलब्ध नाही. ते अजूनही चाचणी आणि विकासाच्या टप्प्यात आहे. दीपिंदर गोयल यांच्या योजनेनुसार, भविष्यात याला एक वेलनेस प्रोडक्ट म्हणून सादर करण्याचं लक्ष्य आहे. या डिव्हाइसच्या वैज्ञानिक विश्वासार्हतेची खात्री करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संशोधनांचा आधार घेण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं म्हटलं जातं.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;हे पण वाचा:&lt;/strong&gt; 'सर' जडेजा कपिल देव यांच्या एलिट क्लबमध्ये सामील! कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम!&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;किंमत किती असू शकते?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;जर हे 'Temple' डिव्हाइस बाजारात आलं, तर त्याची किंमत सुमारे $1,000 डॉलर्स, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे १ लाख रुपये असू शकते, असं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. पण हा केवळ एक अंदाज आहे. त्याची अधिकृत किंमत आणि लॉन्चची तारीख अजून निश्चित झालेली नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;क्रीडा तंत्रज्ञानातील नवा प्रयोग&lt;/strong&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;पी.व्ही. सिंधूच्या डोक्यावर दिसलेलं ते छोटंसं डिव्हाइस आता फक्त चाहत्यांची उत्सुकता वाढवणारं एक टेक गॅझेट राहिलेलं नाही. खेळाडूंची कामगिरी, तणाव आणि शरीर-मेंदू यांच्यातील संबंध डेटाच्या आधारावर समजून घेण्याचा हा एक नवीन प्रयत्न म्हणून लक्ष वेधून घेत आहे. भविष्यात 'Temple' ने वैज्ञानिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आणि ते बाजारात आले, तर क्रीडा आणि वेलनेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवण्याची क्षमता त्यात नक्कीच आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/pv-sindhu-wears-mysterious-temple-device-linked-to-zomato-founder-deepinder-goyal/articleshow-vo8htg1"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Delhi Blast: दिल्ली हादरली! टिकरी मेट्रो स्टेशनजवळ CNG सिलेंडरचा स्फोट, तिघांचा जागीच मृत्यू]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/india/cng-cylinder-explosion-in-delhi-kills-three-injures-three-near-tikri-metro/articleshow-y0n2bog</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/india/cng-cylinder-explosion-in-delhi-kills-three-injures-three-near-tikri-metro/articleshow-y0n2bog</guid>
            <pubDate>Wed, 19 Aug 2026 21:36:41 +0530</pubDate>
            <description><![CDATA[दिल्लीतील टिकरी मेट्रो स्टेशनजवळ एका CNG फिलिंग स्टेशनवर सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी एका ट्रकमध्ये CNG भरताना ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-external,imgname-image-5bc3ca20-e2f0-43ea-96f1-1a84bcb2f29f.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;दिल्लीतील टिकरी मेट्रो स्टेशनजवळ बुधवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. एका CNG फिलिंग स्टेशनवर सिलेंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. दुपारी साधारण ३.२० च्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा एका ट्रकमध्ये CNG भरण्याचं काम सुरू होतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात एकूण सहा जण जखमी झाले होते, त्यापैकी तिघांचा नंतर मृत्यू झाला.&lt;/p&gt;&lt;h2&gt;मृतांची आणि जखमींची ओळख पटली&lt;/h2&gt;&lt;p&gt;या दुर्घटनेत मृत्यू झालेले तिघेही जण CNG फिलिंग स्टेशनचे कर्मचारी होते.&lt;/p&gt;&lt;p&gt;मृतांमध्ये मनीष (वय २५, वडील - संजय), ब्रह्मजीत (वय ३४, वडील - रोहतास, रा. निजामपूर) आणि सनी (वय ३०, वडील - नरेश, रा. निजामपूर) यांचा समावेश आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;तर सुरजीत, संजय आणि विपिन अशी जखमींची नावं आहेत. त्यांना उपचारासाठी मुंडका येथील सीडी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पोलिसांकडून तपास सुरू&lt;/h2&gt;&lt;p&gt;घटनेची माहिती मिळताच, आऊटर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त (DCP), सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि मुंडका पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) यांच्यासह पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं.&lt;/p&gt;&lt;p&gt;स्टेशनवर एका ट्रकमध्ये CNG भरत असताना हा स्फोट झाला.&lt;/p&gt;&lt;p&gt;हा सिलेंडर स्फोट नेमका कशामुळे झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;पोलिसांनी या प्रकरणी आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.&lt;/p&gt;&lt;p&gt;स्फोटाचं नेमकं कारण आणि मृत्यूच्या परिस्थितीबद्दल अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[India]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/india/cng-cylinder-explosion-in-delhi-kills-three-injures-three-near-tikri-metro/articleshow-y0n2bog"/>
        </item>
        <item>
            <title><![CDATA[Reverse Waterfall: पाणी खाली नाही, वर उडतं! नाणेघाटचा 'उलटा धबधबा' आणि २००० वर्षांचा इतिहास]]></title>
            <link>https://marathi.asianetnews.com/maharashtra/naneghat-reverse-waterfall-a-monsoon-marvel-with-a-2000-year-old-history/articleshow-2ryvqg7</link>
            <guid isPermaLink="true">https://marathi.asianetnews.com/maharashtra/naneghat-reverse-waterfall-a-monsoon-marvel-with-a-2000-year-old-history/articleshow-2ryvqg7</guid>
            <pubDate>Wed, 19 Aug 2026 21:30:28 +0530</pubDate>
            <description><![CDATA[महाराष्ट्रातल्या नाणेघाटमध्ये पावसाळ्यात एक अजब दृश्य दिसतं. इथला धबधबा खाली कोसळण्याऐवजी चक्क वरच्या दिशेने उडतो. ही कोणतीही जादू नाही, तर वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे घडणारी एक नैसर्गिक किमया आहे. हे ठिकाण फक्त निसर्गरम्यच नाही, तर २००० वर्षं जुना एक ऐतिहासिक व्यापारी मार्ग म्हणूनही ओळखलं जातं.]]></description>
            <media:content url="https://static.asianetnews.com/images/w-1280,h-720,format-jpg,imgid-01m0d5adr7psyctjmsy66ve4ey,imgname-naneghat-reverse-falls--1--1787148187398.jpg" type="image/jpeg" height="390" width="690"/>
            <content:encoded><![CDATA[&lt;p&gt;पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतात हिरवीगार डोंगररांग आणि फेसाळत कोसळणारे धबधबे. पण महाराष्ट्रात एक अशी जागा आहे, जिथे धबधब्याचं पाणी खाली नाही, तर चक्क आकाशाच्या दिशेने उडतं! पहिल्यांदा पाहिल्यावर कुणालाही वाटेल की ही जादू आहे, पण यामागे एक जबरदस्त वैज्ञानिक कारण दडलेलं आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;वर उडणारा धबधबा आहे तरी कुठे?&lt;/h2&gt;&lt;p&gt;हा अजब प्रकार महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळच्या 'नाणेघाट' या प्राचीन घाट रस्त्यावर पाहायला मिळतो. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असताना, हा 'रिव्हर्स वॉटरफॉल' (Reverse Waterfall) पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. पश्चिम घाटातील हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पाणी वर का उडतं? यामागचं विज्ञान काय?&lt;/h2&gt;&lt;p&gt;हा धबधबा दिसायला कितीही अजब वाटत असला, तरी यामागे एक साधं-सोपं वैज्ञानिक कारण आहे.&lt;/p&gt;&lt;h3&gt;प्रचंड वाऱ्याचा दाब&lt;/h3&gt;&lt;p&gt;पावसाळ्यात दरीच्या अरुंद भागातून हवा प्रचंड वेगाने वरच्या दिशेने वाहते.&lt;/p&gt;&lt;h3&gt;पाण्याचे कण विखुरतात&lt;/h3&gt;&lt;p&gt;डोंगरावरून खाली पडणाऱ्या पाण्याला हा जोरदार वारा जमिनीला टेकण्याआधीच अडवतो आणि वरच्या दिशेने ढकलतो.&lt;/p&gt;&lt;h3&gt;एक सुंदर भ्रम&lt;/h3&gt;&lt;p&gt;वाऱ्याच्या दाबामुळे पाण्याचे लहान-लहान थेंब धुक्यासारखे आकाशात उडतात. लांबून पाहिलं की असं वाटतं जणू धबधबाच उलटा वाहतोय.&lt;/p&gt;&lt;p&gt;खरं तर, गुरुत्वाकर्षण शक्ती पाण्याला खालीच खेचत असते. पण खालून येणारा वाऱ्याचा जोर इतका जास्त असतो की, पाणी जमिनीपर्यंत पोहोचण्याआधीच वर फेकलं जातं.&lt;/p&gt;&lt;h2&gt;पावसाळ्यात नाणेघाटचं सौंदर्य&lt;/h2&gt;&lt;p&gt;इथला रिव्हर्स वॉटरफॉल हे मुख्य आकर्षण असलंच, तरी पावसाळ्यात संपूर्ण नाणेघाट परिसरच अद्भुत दिसतो. अख्खे पश्चिम घाट हिरवी शाल पांघरतात. डोंगरांच्या मधून वाहणारे ढग आणि हिरव्यागार उतारांवरून ओघळणारे छोटे-छोटे धबधबे निसर्गप्रेमींना वेड लावतात. ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्ससाठी तर ही जागा म्हणजे एक स्वर्गच आहे.&lt;/p&gt;&lt;h2&gt;२००० वर्षांचा गौरवशाली इतिहास&lt;/h2&gt;&lt;p&gt;नाणेघाट फक्त एक निसर्गरम्य ठिकाण नाही, तर त्याला एक मोठा इतिहासही आहे. आज हे ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण असलं तरी, हजारो वर्षांपूर्वी हा कोकण किनारपट्टीला दख्खनच्या पठाराशी जोडणारा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. हा घाट रस्ता सुमारे २००० वर्षांहून अधिक जुना असून तो सातवाहन राजवटीच्या काळातला आहे. इथल्या प्राचीन दगडी गुहा आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख त्या काळातील व्यापार आणि या मार्गाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा पुरावा देतात.&lt;/p&gt;&lt;h2&gt;भेट देण्यापूर्वी हे लक्षात ठेवा&lt;/h2&gt;&lt;p&gt;हा अनुभव पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे. जोरदार वारा आणि पाऊस असेल तरच रिव्हर्स वॉटरफॉल दिसतो. पावसाळ्यात ट्रेकिंगच्या वाटा निसरड्या आणि अवघड होतात, त्यामुळे चांगली ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज वापरा. धबधब्याच्या किंवा दरीच्या कडेला उभं राहून फोटो किंवा सेल्फी काढणं टाळा आणि स्थानिक सुरक्षारक्षकांच्या सूचनांचं पालन करा.&lt;/p&gt;&lt;p&gt;पावसाळ्यात नेहमीच्या ठिकाणांपेक्षा काहीतरी वेगळा आणि थरारक अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नाणेघाटचा हा 'रिव्हर्स वॉटरफॉल' एक जबरदस्त पर्याय आहे.&lt;/p&gt;]]></content:encoded>
            <category><![CDATA[Maharashtra]]></category>
            <dc:creator>vivek panmand</dc:creator>
            <atom:link href="https://marathi.asianetnews.com/maharashtra/naneghat-reverse-waterfall-a-monsoon-marvel-with-a-2000-year-old-history/articleshow-2ryvqg7"/>
        </item>
    </channel>
</rss>
