
AIMIM नेते वारिस पठाण यांनी देवनार बकरा मार्केटला भेट देत व्यापारी, प्रशासन आणि BMC अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बकरीदच्या पार्श्वभूमीवर सुविधा, पाणीटंचाई आणि जनावरांच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “प्रत्येक वेळी बकरीदआधी मुस्लिमांना घाबरवलं जातं,” असा आरोप करत गोवंशाला राष्ट्रप्राणी घोषित करण्याचं आव्हानही त्यांनी BJP ला दिलं. तसेच mob lynching, beef export आणि MCOCA कारवाईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.